Maharashtra

Nagpur

CC/09/473

Pankaj Vinayakrao Ghodmare - Complainant(s)

Versus

Live Motors, Nagpur - Opp.Party(s)

03 Nov 2009

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/09/473
1. Pankaj Vinayakrao GhodmareNagpurMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Live Motors, NagpurNagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 03 Nov 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार दाखल दिनांकः 17/07/2009
आदेश पारित दिनांकः 03/11/2009
 
 
कोर्ट विद्यमान मा.अध्‍यक्ष, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
 
तक्रार क्र.     :     473/2009
 
 
 
तक्रारकर्ता   :    पंकज विनायकराव घोडमारे,
                वय : 31 वर्षे,
                  रा.नाईक रोड, सुधाकरराव निंबाळकर
यांचे घर, महाल, नागपूर.
 
     
                 
                   //- विरुध्‍द   -//
 
 
 
गैरअर्जदार     : संचालक, लाईव मोटर्स, प्रोप्रा.राहुल खुराना,
            रा.249, एन.आय.टी. शोरुम-2, जयश्री अपार्टमेंट,
            4 शॉप ब्‍लॉक, नंदनवन पोस्‍ट ऑफीससमोर, नागपूर.
 
 
 
 
 
तक्रारकर्त्‍यातर्फे          :        ऍड. श्री. आर. एस. चावला.
गैरअर्जदारातर्फे               :        श्री. मिश्रा, प्रति‍निधी.
 
       
गणपूर्ती               :     1.    श्री.नलिन मजिठीया   -    अध्‍यक्ष.
                           2.    श्री.मिलिंद केदार      - सदस्‍य.
 
 
                                
               ( मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. नलिन मजिठीया अध्‍यक्ष)
 
 
 
//- आदेश -//
(पारित दिनांक – 03/11/2009)
 
1.     तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्रा.सं.कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा आहे की, त्‍याने गैरअर्जदाराकडून दि.14.05.2008 रोजी रु.11,000/- डाऊन पेमेंट करुन सुलभ हफ्त्‍याने श्रीराम फायनांसकडून कर्ज काढून कायनेटीक फ्लाईट गाडी क्र.MH31/SW 1204 खरेदी केली. सदर गाडी एक महिन्‍याचे आत बंद पडल्‍याने तक्रारकर्त्‍याने ते गैरअर्जदाराकडे नेले असता त्‍यांनी वाहन ठोकपीठ करुन सुरु केले. परंतु वाहन शोरुमच्‍या बाहेर पडल्‍याबरोबर बंद झाले. वाहनामध्‍ये काही विशेष तांत्रिक दोष असण्‍याची शक्‍यता असल्‍याने, सदर वाहन तीन दिवसांकरीता गैरअर्जदाराकडे ठेवण्‍यास सांगितले व तीन दिवसांनतर वाहन नेण्‍यास सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने वाहन गैरअर्जदाराच्‍या सुपूर्द केले. तीन दिवसानंतर वाहन घेण्‍यास तक्रारकर्ता गेला असता त्‍याला गैरअर्जदाराने वाहनाचे इंजिन खराब आहे व त्‍याकरीता नविन पार्टस टाकावे लागेल आणि त्‍याकरीता रु.8,000/- खर्च तक्रारकर्त्‍यास सहन करावा लागेल. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे वाहनाची वारंटी कालावधी हा 36 महिने किंवा 30000 कि.मी. चालविण्‍यापर्यंत राहील. जर या कालावधीत उत्‍पादनक्षमता राहीली तर वाहनाची दुरुस्‍ती व बदलविण्‍याची हमी देण्‍यात येते. परंतु सदर वाहन बंद पडले असून त्‍याचा काहीच उपयोग तक्रारकर्त्‍याला होत नसल्‍याचे त्‍याने तक्रारीत म्‍हटले आहे. गैरअर्जदाराला याबाबत कळविले असता त्‍यांनी सदर बाबीबाबत काहीच दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन वाहन बदलवून देण्‍याबाबत आदेश द्यावे, मानसिक व शारीरीक त्रासाबाबत रु.25,000/- मिळावे, न्‍यायालयीन खर्च रु.5,000/- मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. आपल्‍या म्‍हणण्‍यादाखल तक्रारकर्त्‍याने एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेली असून त्‍यामध्‍ये मुख्‍यत्‍वे वाहन खरेदी केल्‍याची पावती, विमा प्रमाणपत्र, रजिस्‍ट्रेशन स्‍मार्ट कार्ड, वारंटी कार्ड, टॅक्‍स पावती इ. चा समावेश आहे.
 
2.    सदर प्रकरण मंचासमोर दाखल झाल्‍यानंतर मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला असता गैरअर्जदाराने आपले लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याने वाहन घेतल्‍याची बाब नमूद करुन दि.14.07.2008 ला वाहन सर्व्हिसिंगला आणले असता वाहनात कोणत्‍याही प्रकारचा दोष असल्‍याचे सांगितले नाही. तसेच गैरअर्जदार हे कायनेटीक मोटर कंपनीचे अधिकृत विक्री आणि सेवा केंद्र आहे. जर तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनात उत्‍पादन कमतरता राहील्‍यास कायनेटीक मोटर कंपनीचे सर्व्‍हीस तज्ञ त्‍या गाडीचे परीक्षण करुन निराकरण करुन देतात. तक्रारकर्त्‍याने कायनेटीक कंपनीला विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ट केले नाही. तक्रारकर्त्‍याने नमूद केलेले वाहनातील दोष गैरअर्जदाराने काढला नाही व लक्ष दिले नाही ही बाब खोटी असल्‍याचे गैरअर्जदाराने म्‍हटले आहे. गैरअर्जदार आजही तक्रारकर्त्‍याचे वाहन सर्व्‍हीसींग करुन देण्‍यास तयार आहे, वाहनात कुठलाच दोष नाही. परंतु तक्रारकर्त्‍याने सर्व्‍हीसींग करण्‍यास नकार दिला आहे. तसेच वाहन बदलवून देण्‍याबाबत कोणतेही ठोस कारण तक्रारीत नमूद केले नाही. म्‍हणून तक्रार खारीज करण्‍याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे.
4.    प्रस्‍तुत प्रकरण मंचासमोर 21.10.2009 रोजी युक्‍तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचा युक्‍तीवाद ऐकला. उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
5.    प्रस्‍तुत प्रकरणात गैरअर्जदाराने दि.14.05.2008 रोजी कायनेटीक फ्लाईट दुचाकी वाहन तक्रारकर्त्‍यास विकल्‍याचे मान्‍य केले आहे. तक्रारकर्त्‍याने लावलेले आरोप व वाहनाचे इंजिन खराब आहे ही बाब अमान्‍य केली आहे. सर्वप्रथम ही बाब मंचाला लक्षात घेणे आवश्‍यक आहे की, तक्रारकर्त्‍याने वाहनाचे इंजिन खराब असल्‍याची व त्‍याला रु.8,000/- खर्च करावा लागेल ही बाब सिध्‍द केली आहे काय ?  तक्रारकर्त्‍याने तक्रारीत वाहन नादुरुस्‍त असल्‍याबद्दल रु.8,000/- खर्च नव्‍याने काही सुटे भाग टाकण्‍याकरीता येईल असे सिध्‍द केले नाही व त्‍यासंबंधी कोणतेच दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. याउलट गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता सन 2008 ला मोफत सर्व्‍हीसिंग करुन दिलेले आहे. परंतू दि.20.04.2009 च्‍या जॉब कार्डमध्‍ये वाहन नादुरुस्‍त आहे ही बाब नमुद केली आहे. तसेच वाहन चालता-चालता बंद होते ही तक्रार तक्रारकर्त्‍याने केली होती हे सदर दस्‍तऐवजावरुन निदर्शनास येते. वाहनामध्‍ये बॅटरी नाही व पेट्रोल लिकेजबद्दल तपासणी करण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत प्रकरणी वाहनाचे वेळोवेळी केलेल्‍या सर्व्‍हीसिंगची पावती दाखल केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने काही सर्व्‍हीसिंग केलेल्‍या नाही. तक्रारकर्त्‍याने वाहन हे ग्‍यारंटी कालावधीमध्‍ये असल्‍यामुळे व त्‍याचे इंजिन खराब असल्‍यामुळे व रु.8,000/- खर्च येण्‍याबद्दल कोणताच पुरावा दाखल केला नाही. तक्रारकर्त्‍याने वाहन हे बदलवून देण्‍याबाबत विनंती केली आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याची मागणी ही सिध्‍द केली नाही व तसेच उत्‍पादन करणा-या कंपनीला गैरअर्जदार म्‍हणून सामिल करुन घेतले नाही. वास्‍तविक पाहता तक्रारकर्त्‍याने उत्‍पादन कंपनीला गैरअर्जदार म्‍हणून सामिल करुन घ्‍यावयास पाहिजे होते. मंचाने राष्‍ट्रीय आयोगाच्‍या नवभारत मोटर्स एजंसी वि. कौशिकभाई पटेल, I (2006) CPJ  7 या निवाडयाचे अवलोकन केले असता प्रस्‍तुत निवाडयात राष्‍ट्रीय आयोगाने नमुद केले आहे की, वाहनात उत्‍पादीत दोष असल्‍याचा उजर केला असला तर उत्‍पादन कंपनीला गैरअर्जदार म्‍हणून सामिल करुन घ्‍यावयास पाहिजे. उत्‍पादनामधील दोषाबद्दल वितरकाला जबाबदार धरता येत नाही ही बाब नमूद केली आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार हे वाहन बदलवून देण्‍यास जबाबदार नाही असे मंचाचे मत आहे. तथापि, मौखिक युक्‍तीवादाच्‍यावेळी गैरअर्जदाराने नमुद केले आहे की, वाहनात कोणताच दोष नाही. गैरअर्जदार त्‍यांची जबाबदारी नसतांनाही, वाहनात फक्‍त रु.1200/- किमतीचे सुटे भाग बदलवायचे आहेत व ते स्‍वखर्चाने अ‍ाणि मोफत सेवा देण्‍यास तयार आहेत. प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍याने व गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता व निवाडयाचे अवलोकन केले असता खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांना आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या आत तक्रारकर्त्‍याचे वाहन आवश्‍यक ते सुटे भाग बदलवून व सर्व्‍हीसिंग करुन परत द्यावे.
3)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्‍वतः सोसावा.
 
 
 
      (मिलिंद केदार)                    (नलिन मजिठीया)
         सदस्‍य                           अध्‍यक्ष