जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/10. प्रकरण दाखल दिनांक – 13/01/2009. प्रकरण निकाल दिनांक – 21/04/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. मोहमंद फारुख मो.जाफर वय वर्षे 46, व्यवसाय व्यापार, रा. द्वारा जाफर शेट, पिल्ली बिलटकट मंडई, नांदेड. अर्जदार विरुध्द भारतीय जीवन बीमा निगम जीवन प्रकाश, पहिला मजला, हिंगोली रोड, गैरअर्जदार नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदारा तर्फे - अड.शेख इक्बाल अहेमद. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार भारतीय जीवन बिमा निगम लि. यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी फेब्रूवारी,2003 मध्ये पॉलिसी नंबर 83049055 ही पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडून घेतली. रु.41,824/- सहामाही हप्ता ठरलेला होता. याप्रमाणे फेबू्रवारी 2003 ते फेब्रूवारी 2005 पर्यत एबूण पाच हप्ते म्हणजे रु.2,09,120/- गैरअर्जदार यांचेकडे भरले. परंतु मार्च,2005 पासून अर्जदार यांनी त्यांचे व्यवसायात आर्थिक अडचणी येऊ लागल्यामूळे त्यांना विम्याचे पूढील हप्ते भरणा अशक्य झाले म्हणून ते पूढील हप्ते भरु शकलेले नाहीत. अर्जदार यांनी रु.2,09,120/- भरलेली रक्कम गैरअर्जदार यांना वापस मागितली असता त्यांनी आजपर्यत ती दिली नाही.एवढी रक्कम व त्यावर 9 टक्के द.सा.द.शे. व्याज असे एकूण रु.4,00,000/- व दावा खर्च म्हणून रु.,5,000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. पॉलिसी गैरअर्जदार यांना मान्य आहे. मार्च,2005 पासून अर्जदारास व्यवसायात अडचण आली त्यामूळे त्यांनी हप्ते भरले नाही ही बाब त्यांना अमान्य आहे. अर्जदाराने दि.10.02.2008 रोजी लेखी विनंतीवरुन नोटीस पाठविचली होती हे म्हणणे त्यांना मान्य नाही. उलट अर्जदाराच्या नोटीसला गैरअर्जदारांनी उत्तर दिले व पॉलिसीच्या अटीप्रमाणे तिन वर्षापर्यत पॉलिसी चालू स्थितीत नसल्यामूळे मूळे रक्कम परत मिळत नसल्याचे परंतु पॉलिसी रिव्हयू करता येत असल्याचे कळविले आहे. परिस्थिती अशी आहे की, पॉलिसी तिन वर्ष चालू स्थितीत नव्हती. Policy document is the evidence of contract & life insurance contract is a special contract व पॉलिसीच्या अटीप्रमाणे पॉलिसी घेतल्याचे दिनांका पासून 3 वर्षाचे आंत पॉलिसी बंद पडल्यास विमाधारकास काहीच रक्कम मिळत नाही. विमा हप्ते स्विकारलेल्या कालावधीत गैरअर्जदाराने अर्जदाराचे जीवनाचे जोखीम कव्हर केली आहे. त्यामूळे अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे रु.2,09,120/- व्याजासह एकूण रु.4,00,000/- नूकसान भरपाई बददल व दावा खर्च म्हणून मिळण्यास ते पाञ नाहीत. गैरअर्जदाराने Special Revival campaign दि.1,11,2006 ते 15.12,2006 यासाठी दि.06.11.2006 रोजीचे एक पञ व नंतर दि.19.01.2009 ते दि.28.02.2009 या कालावधीत बंद असलेलया पॉलिसी थकीत हप्ते भरुन व्याजासहीत रिव्हीयू (नूतनीकरण) करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यास तयार आहेत. नसता पॉलिसी ही लॅपस कंडीशनमध्ये समजली जाते. म्हणून गैरअर्जदार यांनी त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी केलेली नसल्यामूळे अर्जदार हे कोणतीही रक्कम मिळण्यास पाञ नाहीत. त्यामूळे त्यांची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द नाही. करतात काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदारांनी आपल्या तक्रार अर्जात परिच्छेद नंबर 3 मध्ये असा उल्लेख केला आहे की, वर्ष,2005 पर्यत त्यांनी हप्ते भरलेले आहेत. व त्यानंतर अर्जदाराच्या व्यवसायात आर्थिक अडचण आल्यामूळे ते बाकी पूढील हप्ते भरु शकलेले नाहीत. भारतीय जीवन विमा निगम यांची पॉलिसी ही विमेदार व कंपनीत करार आहे व कराराप्रमाणे अर्जदाराने भरावयाची रक्कम न भरल्यास पॉलिसी लॅपस होते व अशा लॅपस झालेल्या पॉलिसीचे हप्ते जर तिन वर्ष पूर्ण भरले असेल तरच भरलेली रक्कम पॉलिसीतील नियमाप्रमाणे वापस मिळण्याची तरतूद आहे. परंतु अर्जदार यांनी अडीच वर्षच म्हणजे 5 हप्तेच भरलेले आहेत व नंतरचा एक हप्ता भरणे त्यांना शक्य झाले नाही. म्हणून पॉलिसी लॅपास झाली. गैरअर्जदारांनी पॉलिसी बंद (लॅपस) पडल्यानंतर Special Revival Compaign मध्ये दि.01.1.2006 ते 15.12.2006 या कालावधीत आपली पॉलिसी एक हप्ता भरुन चालू करुन घ्यावी असे दि.06.11.2006 रोजीला पञ पाठवीले आहे. त्यांचा फायदा अर्जदार यांना घेता आला नाही. त्यांनी कूठूनही कर्ज काढून देखील एक हप्ता भरु शकले असते तर ती पॉलिसी चालू होऊन त्यांना भरलेली पूर्ण रक्कम वापस मिळू शकली असती. आज ही गैरअर्जदार हे दि.19.1.2009 ते 28.02.2009 रोजी Special Revival Compaign मध्ये अर्जदार यांना थकीत हप्ता व व्याज भरुन पॉलिसी चालू करुन देण्या बददल संधी उपलब्ध करुन देत आहेत परंतु आजही अर्जदार या संधीचा फायदा घेत नाहीत. पॉलिसीतील नियम व अटी प्रमाणे तिन वर्षापर्यत पॉलिसी चालू राहीली नसल्यामूळे गैरअर्जदारांनी पॉलिसी लॅपस केली. यात कोणतेही गैरकायदेशीर कृत्य केलेले नाही. म्हणून त्यांचे सेवेतील ञूटी सिध्द होऊ शकत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |