निकाल
दिनांक- 10.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार मंगल बारीकराव पिंपळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले क्र.3 यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दयावयाच्या लाभात त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार हया व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे पती नामे बारीकराव रामभाऊ पिंपळे हे पालसिंगन ता.जि.बीड येथे राहत होते. तक्रारदार यांचे पतीचे नांवे शेत जमिन नोंदलेली आहे. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. दि.4.8.2012 रोजी तक्रारदार यांचे पती अॅपे रिक्षामध्ये बसून जात असताना बीड कडून जाणारा ट्रक क्र.एम.एच.12/डीजी-8706 या वाहनाने रिक्षास धडक दिली. तक्रारदार यांचे पती गंभीर जखमी झाले. अपघाताची खबर येरमाळा पोलिस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिसांनी गून्हयाची नोंद करुन पूढील तपास केला. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी क्लेम व संबंधीत सर्व कागदपत्राची पूर्तता करुन प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांचेकडे दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांचेकडे मान्यतेसाठी पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी मुदतीत तो प्रस्ताव मंजूर केला नाही.
तक्रारदार यांनी या मंचासमोर तक्रार क्र.28/2013 दाखल केली होती. सदरील तक्रारीमध्ये या मंचाने आदेश केला की, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्लेम विमा कंपनीकडे निकाल मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दाखल करावा. विमा कंपनीने तो प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत त्यावर निर्णय घ्यावा. त्याप्रमाणे प्रस्ताव हा विमा कंपनीकडे पाठविण्यात आला, तो अद्याप मंजूर केला नाही. त्यामुळे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब, तक्रारदार यांची विनंती की, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सामनेवाले क्र.3 यांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.8 अन्वये लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, या मंचाच्या आदेशानुसार त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाले क्र.3 यांचेकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांचेकडे प्रलंबित आहे.
सामनेवाले क्र.3 यांना या मंचाची नोटीस प्राप्त झाली. सदरील नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचे नांवे रु.1,00,000/- चा धनादेश क्रमांक 528413 दि.16.04.2014 एक्सीस बॅकेचे नांवे पाठविला. तक्रारदार यांनी तो चेक प्राप्त झाला. तक्रारदार हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी पूरशीस नि.11 दिली. सदरील पूरशीस नुसार तक्रारदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. सबब, तक्रारदार यांना सदरील तक्रार चालविणे नाही असे कळविले आहे.
वर नमूद केलेल्या सर्व पुराव्याचे अवलोकन केले व पुरशीसचे अवलोकन केले. तक्रारदार यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार बंद करण्यास पात्र आहे. तक्रारदार यांनी खर्चा बाबत व इतर नुकसानी बाबत हक्क सोडून दिलेला आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- तक्रारदार यांचे पूरशीस आधारे त्यांना संपूर्ण विमा रक्कम मिळाली आहे असे जाहीर करणेत येत आहे.
- खर्चाबददल आदेश नाही..
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक