जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/92 प्रकरण दाखल तारीख - 20/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मेहरुनिसा बेगम भ्र.शे.इमाम, रा.बिलालनगर, नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि.शाखा कार्यालय, गैरअर्जदार चौफाळा, नांदेड. 2. डेप्युटी इंजिनियर, म.रा.वि.वि.कं.लि. शाखा कार्यालय, वजिराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अ.व्ही.चौधरी. गैरअर्जदारां तर्फे वकील - अड. व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते, सदस्य) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदाराचे गैरअर्जदाराने पहीले मिटर दि.04/01/2004 रोजी मिटर नं.5195711 च्या ऐवजी मिटर नं.1642166 देण्यात आले. तसेच मिटर नं.1642166 च्या ऐवजी दि.25/08/2005 रोजी मिटर क्र.108065 देण्यात आला. तसेच वरील मिटर सन 2004 व 2005 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी मध्ये गरज भासल्यामुळे सदरचे मिटर बदललेले होते. परंतु वरील मीटरवर दि.25/08/2005 नंतर फारसे बिले वेळेवर मीळाले नाहीत परंतु जेव्हा केंव्हा बिल मिळाले त्या वेळेस नियमीतपणे भरणा केलेला आहेत. परंतु दि.06/12/2005 रोजी अर्जदार यांना अचानक रु.14,810/- चे बिल मिळाले व ज्यामध्ये रु.13,029/- थकबाकी दाखविली असे मिळुन रु.14,810/- चे बिले मिळाले. परंतु अर्जदार यांचा वरील मीटरवर वापर फार कमी स्वरुपात असून अर्जदारास 200 ते 250 रुपये एवढे बिल येत होते. वरील आलेले चुकीचे बिल हे गैरअर्जदारा मार्फत कमी करण्यात आले नसुन ते वाढतच गेले ज्यामध्ये दि.16/12/2006 रोजी रु.17,170/- दि.30/11/2007 रोजी रु.23,230/- तसेच दि.25/02/2008 रोजी रु.24,490/- दि.27/0522008 रोजी रु.26,790/- तसेच दि.23/12/2009 रोजी रु.43,300/- दि.25/0122010 रोजी रु.29,540/- दि.24/02/2010 रोजी रु.29,920/- व दि.23/03/2010 रोजी रु.30,530/- अशा प्रकारची वेगवेगळी व जास्तीचे बिले देण्यात आले. अर्जदार यांने दि.21/12/2009 रोजी रु.20,000/- गैरअर्जदाराकडे भरणा केले तसेच त्यापुर्वी रु.5,000/- भरणा केले आहेत. परंतु दि.23/12/2009 रोजी अर्जदार यांस रु.43,300/- चे बिल मिळाले. दि.05/01/2010 रोजी आश्चर्यकारकरित्या रु.29,540/- चे बिल अर्जदारास प्राप्त झाले त्यामुळे एकतर चुकीचे बिल असुनही विजेचा वापर नसतांना देखी एवढे बिल आले. खरे पहाता रु.43,300/- दि.23/12/2009 या मधुन रु.20,000/- भरणा केलेले कमी केले असता रु.23,300/- रुपयाचे बिल यावयास पाहीजे होते असे न होता पुढचे बिलामध्ये रु.29540//- बाकी दाखविले. अर्जदार यांचा विद्युत प्रवाह दि.18/03/2010 रोजी खंडीत करण्यता आला. अर्जदारोन दि.23/03/2006 रोजी रु.4,000/- भरलेले आहेत. अर्जदार यांनी दि.25/08/2005 रोजी मिटर बसविले व त्यामुढे चार वर्षे पाच महिन्यामध्ये अर्जदार यांचा वापर 200 ते 250 या युनिटप्रमाणे महिना रु.500/- गृहीत धरला व आजपर्यंत प्रत्येक महिन्यातले रु.500/- प्रमाणे बिल गृहीत धरले तर 52 x 500 याचे सरासरी बिल रु.26,000/- होते व अर्जदाराने आज पर्यंत रु.24,000/- भरणा केला आहे. प्रस्तुत बिलामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, मिटर क्र.55001021436 वरील खंडीत केलेला विद्युत पुरवठा जोडणीचे आदेश देण्यता यावे. अवाजवी व जास्तीचे बिल रु.30,530/- दुरुस्त करुन योग्य ते कमी वाजवी बिल देण्याचे आदेश करण्यात यावे. दि.21/12/2009 रोजी भरलेली रक्कम रु.24,000/- याचा सरासरी विचार करुन बिलाची दुरुस्ती करुन योग्य त वाजवी बिल देण्यात यावे तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले म्हणणे वकीला मार्फत सादर केलेले आहे त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराला गैरअर्जदारांनी सेवा पुरविण्यामध्ये कोणतीही त्रुटी केली नाही. अर्जदार हया जुन्या ग्राहक आहेत या बाबत वाद नाही. मिटर हे दोनदा नव्हे तर तीनदा बदलण्यात आले होते. वरील मिटरवर दि.25/08/2005 नंतर फारशी बिले वेळेवर मिळाली नाहीत हे म्हणणे सर्वस्वी खोटे व चुकीचे आहे. जेंव्हा केंव्हा बिल मिळाले तेंव्हा तेंव्हा अर्जदाराने पैसे भरले हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराच्या मिटरचा कंझुमर पर्सनल लेजरला उतारा दाखल करीत आहे. अर्जदार विजेचे बिल भरण्यात किती अनियमित होत हे नमुद केले आहे. अर्जदाराचा विज पुरवठा अखंडीतपणे चालु असतांना देखील दि.26/0722004 रोजी रु.240/- चा भरणा केल्यानंतर अर्जदार यांनी विजेचा वापर नियमित केला. परंतु विजेच्या बिलाचा भरणा मात्र केला नाही. त्यामुळे सदर रक्कम ही थकीत या सदराखाली गेली. अर्जदारास रु.200 ते 250 रुपये एवढयाच विजेचा वापर नियमितपणे होत असतो हे अर्जदाराचे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. वरील आलेले चुकीचे बिल हे गैरअर्जदारा मार्फत कमी करण्यात आले नसुन ते वाढतच गेले व त्यामध्ये दि.16/12/2006 रोजी रु.17,170/-दि.30/11/2007 रोजी रु.23,230/- दि.25/02/2008 रोजी रु.24,490/- दि.27/05/2008 रोजी रु.26,790/- दि.23/12/2009 रोजी रु.43,309/- दि.25/01/2010 रोजी रु.29,540/- दि.24/02/2010 रोजी रु.29,920/- दि.23/03/2010 रोजी रु.30,530/- अश प्रकारची वेगवेगळी व जास्तीची बिले मिळाल्याबद्यलचा पुरावा तक्रारीसोबत जोडला आहे हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदार यांनी दि.21/12/2009 रोजी रु.20,000/- गैरअर्जदार यांचेकडे भरणा केले व त्यापुर्वी देखील रु.5,000/- भरणा केलेले आहे. दि.23/12/2009 रोजी रु.43,300/- चे बिल मिळाले होत व रु.20,000/- चा भरणा केल्यानंतर दि.05/01/2010 रोजी आश्चर्यकारकरित्या रु.29,540/- चे बिल अर्जदारास प्राप्त झाले, विजेचा वापर नसतांनाही सदरचे बिल देण्यात आले व ते दुरुस्त झाले नाही हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराचा विद्युत प्रवाह दि.18/03/2010 रोजी खंडीत करण्यात आला. अर्जदार यांनी दि.23/03/2006 रोजी रु.4,000/- भरणा केला यावेळेस अर्जदारांनी त्यांना त्यावेळेस दिलेले विजेचे बिल रु.16,389/- होते ही मंचासमोर दाखविले नाही. आतापर्यंत अर्जदार यांनी रु.24,000/- चा भरणा केला आहे या बाबत गैरअर्जदार नमुद करतात की, त्यांनी केलेल्या विजेच्या उपभोगापेक्षा ही रक्कम अत्यंत तुटपूंजी आहे, कमी आहे या रक्कमेवर अर्जदाराच्या पुर्ण विज बिलाची थकबाकी कमी होऊ शकत नाही. अर्जदार हे स्वतःच्या मर्जीने गणिते करण्यात पटाईत दिसतात 250 युनिटचा दर सरासरी 4 रुपये प्रती युनिट या अर्जदारांनी मान्य केलेल्या आकडयाशी गुणाकार केला असता, प्रती महिन्याचे विजेचे बिल 1,000/- कमीत कमी होते. 52 महिन्याचे रु.52,000/- होतात. या परिच्छेदातील पहिल्या दोन ओळीमध्ये त्यांनी 2006 सालानंतर 2009 सालीच रक्कम भरल्याचे मान्य केले आहे. दि.21/12/2009 रोजी अर्जदार यांच्या घरास विज वितरण कंपनीच्या सक्षम अधिका-यांनी भेट देवून तेथील विज संच उपकरणांची पहाणी केली असता, तेथे जिवंत विज पुरवठा क्र.2054869 आढळला तसा अहवाल सदरच्या अधिका-यांनी कार्यालयास दिलेला होता त्या दिवशी अर्जदाराच्या मिटरवर 5574 युनिटसची नोंद करण्यात आली होती व मार्च 2008 मध्ये त्यांना दिलेल्या शेवटच्या बिलावर 2317 युनिटसची नोंद करण्यात आली होती. याचा अर्थ 3257 युनिटसचा वापर अर्जदाराने केला होता परंतु परंतु त्याची रक्कम भरलेली नव्हती. प्रचलित कार्यपध्दतीनुसार एप्रिल 2008 ते डिसेंबर 2009 या कालावधीचे3257 युनिटसचे बिल रु.16,501.35 पैसे इतके झाले व थकबाकी ही रु.26,794.47 पैसे इतकी होती. या दोन्ही विज बिलाची रक्कम प्रत्यक्ष वापराप्रमाणे असल्या कारणाने अर्जदारांना दि.23/12/2009 रोजी रु.43,300/- चे विजेचे बिल देण्यात आले. म्हणुन गैरअर्जदारांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी केलेली नाही. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज रु.10,000/- खर्चासह खारिज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? होय 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – गैरअर्जदार यांनी चुकीचे बिल दिले त्यामुळे ते बिल रद्य करावे असे अर्जदार म्हणतात, एकंदरीत अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्या मागे त्यांचे बिल अदा करण्यात अनियमितपणा दिसुन येतो. त्यामुळे गैरअर्जदारांनी दि.18/03/2010 रोजी विद्युत पुरवठा खंडीत केला होता. अर्जदाराचे दि.21/12/2009 ला मिटर बदलण्यात आले. त्यातील मिटर बॉडी सिल इनटॅक्ट आहे त्या विषयी वाद नाही परंतु गैरअर्जदारांनी जे सी.पी.एल. दाखल केलेले आहे हे पाहीले असता, दि.23/03/2004 नंतर एकदम 2006 मध्येच बिल रु.4,000/- दि.23/06/2006 ला भरले, दोन वर्ष बिलेच भरले नाही व विद्युत पुरवठा चालु होता म्हणजे बिल येणे चालू होते यानंतर पुढील बिल 2009 पर्यंत भरलेच नाही. यानंतर दि.24/12/2009 ला रु.20,000/- भरले म्हणजे 6-7 वर्षाचा कालावधीत फक्त रु.24,000/- ची रक्कम गैरअर्जदारांना दिलेली आहे, असे असतांना बिल पाहीले असता, ते अतीशय कमी आहे परंतु मागची जी थकबाकी आहे ते वाढत गेली शेवटी गैरअर्जदारांनी दि.23/12/2009 ला रु.43,300/- चे बिल दिलेले होते यात फक्त रु.24,000/- ची रक्कम भरण्यात आलेले आहे व पुढचे बिल येतच राहीले व अर्जदाराने ती भरली नाहीत म्हणुन थकबाकीची रक्कम वाढत गेली रु.43,300/- च्या बिलावर रु.20,000/- भरल्यानंतर रु.23,300/- अर्जदाराकडे बाकी राहतात व यानंतर जानेवार 2010 चे जे बिल आलेले आह ते बिल फक्त रु.34.50 चे आहे. यात थकबाकी रु.29,881.17 दर्शविलेली आहे. इथे थकबाकीची रक्कम डिसेंबरनंतर रु.23,300/- येणे अपेक्षित होते म्हणजे रु.29,900 – 23,300/- = 5,600/- ची रक्कम थकबाकीत जास्तीची दाखविलेली आहे व ही रक्कम पुढे वाढत गेली यात फेब्रवारीचे बिल रु.613.59 चे आहे. म्हणजे पाचशे ते सहाशे असे वाढवावयास पाहीजे या अनुषंगाने गैरअर्जदारांनी दिलेली सर्व बिले यात डिसेंबर 2009 या बिलाचे अवलोकन केले असता रु.305/- च्या बिलावर रु.5,869.55 पैसे व्याज लावलेले आहे व दि.23/12/2009 च्या बिलात एकुण बिलाची रक्कम रु.43,300/- दाखविण्यात आलेले आहे. मग असे असतांना दुस-याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यातच अंतीम रिडींग 5574 असे दाखविण्यात आलेले ही दि. 23/12/2009 च्या बिलात तेवढीच आहे मग हे आणी पुढील एकुण धरुन सर्व बिल दिले असतांना परत व्याजाची रक्कम वाढवीण चुकीचे आहे. गैरअर्जदारांनी दिलेले दुरुस्तीचे रिवाईज बिल रु.23,300/- कायम ठेवावेत व अज्रदाराने दि.24/12/2009 रोजी जे रु.20,000/- पार्ट पेमेंट भरलेले आहे हे वजा जाता थकबाकी ही रु.23,300/- गृहीत धरुन यापुढील जानेवारी महिन्या पासुनचे बिल त्यात येणारे नियमित बिलावर उल्लेख केल्याप्रमाणे थकबाकी गृहीत धरुन डिसेंबर 2009 पासुन ते आजपर्यंतचे पुढील बिल दुरुस्त करुन अर्जदारास देण्यात यावे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत त्यांनी दिलेले दि.23/12/2009 चे रु.43,300/- जे रिवाईज बिल हे नक्क करण्यात येते व यावर अर्जदाराने दिलेली रक्कम वजा जाता रु.23,300/- ची थकबाकी येथे गृहीत धरुन याप्रमाणे थकबाकीत दुरुस्ती करुन डिसेंबर 2009 पासुन ते आजपर्यंतचे गैरअर्जदारांनी दिलेली सर्व नियमित बिले कायम ठेवून डिसेंबर पासुन रु.23,300/- ची थकबाकी धरुन यापुढील सर्व बिले दुरुस्त करुन ती अर्जदारास द्यावी. दि.20/03/2010 चा अंतरीम आदेशानुसार भरलेली रक्कम रु.10,000/- हे देखील बिलात जमेस धरण्यात यावे यानंतर जे दुरुस्तीचे बिल अर्जदारास देण्यात येईल ते अर्जदारांने बिल मिळाल्या पासुन 30 दिवसांत भरावा व यापुढील सर्व बिले अर्जदारोन नियमितपणे भरावेत. 3. मानसिक त्रासाबद्यल आदेश नाही. 4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दावा खर्च म्हणुन रु.1,000/- अर्जदारास द्यावे. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |