Complaint Case No. CC/340/2017 | ( Date of Filing : 09 Aug 2017 ) |
| | 1. Smt. Vidya Ravindra Karpate | R/o. Sant Dnyaneshwar Ward, Shahalangdi Road, Hinganghat, Dist. Wardha 442301 | WARDHA | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Jayka Insurance Brokerage Pvt. Ltd.,Through its Branch Manager | Regd. Office- 2nd floor, Jayka Building, Commercial Road, Civil Road, Nagpur 440001 | Nagpur | Maharashtra | 2. The Oriental Insurnace Co.Ltd., through its Divisional Manager | Office- 21/A-2, Oswal Bandhu Samaj Building, J.N.Road, Pune 411042 | Pune | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, त.क.चा पती शासकीय नौकरीत असतांना त्याच्या नांवे मौजा- सावली, तह.जि.वर्धा, गट क्रं. 210/1, येथे 0.81 हे.आर. शेतजमीन होती. वि.प. 1 हा विमा अभिकर्ता (इन्श्युरन्स ब्रोकर) असून वि.प. 2 ही विमा कंपनी आहे. त.क.च्या पतीने वि.प. 1 मार्फत शेतकरी अपघात विमा पॉलिसी काढली होती.
- त.क.चा पती दि. 27.12.2016 ला त्याच्या मोटर सायकल क्रं. MH.32- 7104 ने समुद्रपूर वरुन राहत्या घरी हिंगणघाट येथे येत असतांना त्याला नंदुरी गावाकडून भरधाव वेगाने येणा-या अनोळखी टिप्परने रामचौक, चंद्रपूर रोडवर ( जाम गावाजवळ) धडक दिल्यामुळे अपघात झाला व सदरच्या अपघातात त.क.च्या पतीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला सिव्हील हॉस्पीटल हिंगणघाट येथे भरती करण्यात आले व त्यानंतर सावंगी व त्यानंतर नागपूर मेडिकल कॉलेज येथे भरती करण्यात आले आणि तिथे उपचारा दरम्यान दि. 06.01.2017 ला सकाळी 5.45 वा. त.क.च्या पतीचे निधन झाले.
- त.क.ने पुढे नमूद केले की, तिने पतीच्या निधनाबाबतची सूचना वि.प. 1 ला दि. 20.01.2017 रोजी दिली होती, परंतु वि.प. 1 ने त.क.ला क्लेम फॉर्म दिला नाही. तसेच वि.प. च्या कोणत्याही अधिका-याने त.क.च्या घरी भेट दिली नाही. त्यानंतर त.क.ने वि.प. 2 च्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्याने त.क.ला क्लेम फॉर्म दिला व फॉर्म भरण्यास मदत केली. त.क. अशिक्षित व ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा फायदा घेऊन वि.प. 2 च्या कार्यालयातील कर्मचा-यांने/ एजंटने त.क.कडून तिचा पती रविंद्र हा दारु पिऊन होता आणि तिला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत असलेला विमा बाबतचा दावा दाखल करावयाचा नाही असे लेखी लिहून घेतले. त्यामुळे वि.प. 2 यांनी दि. 06.07.2017 च्या पत्रान्वये त.क.चा विमा दावा हा त.क. चा पती दारु पिऊन मोटर सायकल चालवित असल्यामुळे आणि त.क.ने स्वतः विमा दावा दाखल करण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन सदरचा विमा दावा देण्यास नाकारल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन मागणी केली की, वि.प.ने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे. तसेच वि.प.ने त.क.ला विमा दाव्याची रक्कम रुपये 2,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केलेली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ने आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, शासनाने शेतकरी व त्यांच्या कुटुंबाकरिता शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा पॉलिसी काढलेली आहे. या योजने अंतर्गत तक्रारकर्तीला आपला विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत सादर करावयाचे असते आणि असे दावे प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करुन सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर सदरचा विमा दावा हा वि.प. 1 मार्फत विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे पाठविण्यात येतो. वि.प. 1 हे केवळ विमा कंपनी आणि विमाधारक यांच्या मधील मध्यस्थी म्हणून काम करतात.
- वि.प. 2 ने आपल्या उत्तरात नमूद केले की, जो पर्यंत अर्जदार त्यांच्याकडे योग्यरित्या विमा दावा प्रस्ताव सादर करीत नाही तो पर्यंत त्यांच्याकडे विमा दावा मिळण्याबाबतची प्रक्रिया सुरु होऊ शकत नाही. तसेच तक्रारकर्तीने विमा दावा मिळण्याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की, वि.प. 1 मार्फत विमा दावा सादर केलेला नाही. तसेच सदरची तक्रार ही मुदतबाहय असून ती ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत चालू शकत नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीचा पती अपघाताच्या वेळी मद्यपान करुन मोटर सायकल चालवित असल्यामुळे नियमाप्रमाणे तक्रारकर्ती विमा दावा मिळण्यास पात्र नाही. तसेच तक्रारकर्तीने सदरचा विमा दावा नको असल्याबाबतचे पत्र लिहून त्यावर स्वाक्षरी असलेले पत्रा सोबत फोटो काढून विरुध्द पक्ष 2 कडे सादर केलेला आहे. सदरचा फोटो विरुध्द पक्ष 2 ने आपल्या उत्तरासोबत दाखल केलेला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष 2 यांनी दि. 06.07.2017 रोजी सदरचा विमा दावा नाकारला असल्याबाबतचे पत्र तक्रारकर्तीस पाठविले आहे, त्यामुळे वि.प. 2 यांना अतिरिक्त जबाब दाखल करण्याची आवश्यकता नाही व इत्यादी सर्व कारणामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज व त्यांच्या वकिलांनी केलेले तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.
- तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीच्या पतीच्या नांवे मौजा- सावली, तह.जि.वर्धा, गट क्रं. 210/1, येथे 0.81 हे.आर. शेतजमीन होती, त्यामुळे शेतकरी या नात्याने त.क.च्या पतीच्या नांवे वि.प. 1 विमा अभिकर्ता (इन्श्युरन्स ब्रोकर) मार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा पॉलिसी काढली होती, याबाबत उभय पक्षात वाद नाही. यावरुन तक्रारकर्ती लाभार्थी या नात्याने वि.प.ची ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. त.क.चा पती दि. 27.12.2016 ला त्याच्या मोटर सायकल क्रं. MH.32- 7104 ने समुद्रपूर वरुन येत असतांना भरधाव वेगाने येणा-या अनोळखी टिप्परने धडक दिल्यामुळे अपघात झाला व सदरच्या अपघातात त.क.च्या पतीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला सिव्हील हॉस्पीटल हिंगणघाट येथे भरती करण्यात आले व त्यानंतर सावंगी व त्यानंतर नागपूर मेडिकल कॉलेज येथे भरती करण्यात आले आणि तिथे उपचारा दरम्यान दि. 06.01.2017 ला सकाळी 5.45 वा. त.क.च्या पतीचे निधन झाले हे दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्तीने याबाबतची सूचना वि.प. 1 ला दि. 20.01.2017 रोजी दिल्यानंतर सुध्दा वि.प. च्या कोणत्याही अधिका-याने त.क.च्या घरी भेट दिली नाही, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी आहे.
- त.क.ने वि.प. 2 च्या कार्यालयात भेट दिल्यानंतर तिला त्यांनी क्लेम फॉर्म दिला, परंतु तक्रारकर्ती अशिक्षित व ग्रामीण भागातील रहिवासी असल्यामुळे वि.प. 2 च्या कर्मचारी/ एंजटने त.क.कडून तिचा पती रविंद्र हा दारु पिऊन होता आणि तिला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत असलेला विमा बाबतचा दावा दाखल करावयाचा नाही असे तक्रारकर्तीच्या स्वाक्षरीसह असलेले दिनांक 04.04.2017 रोजी लेखी पत्र लिहून घेतले व त्या पत्रासह तक्रारकर्तीचा फोटो काढून विरुध्द पक्ष 2 कडे सादर केला होता. त्यामुळे वि.प. 2 यांनी दि. 06.07.2017 रोजीच्या पत्रान्वये त.क.चा विमा दावा हा त.क. चा पती दारु पिऊन मोटर सायकल चालवित असल्यामुळे नाकारल्याचे कळविले, परंतु ही विरुध्द पक्ष 2 ने तक्रारकर्ती सोबत केलेली फसवणूक असल्याचे दिसून येते.
- तक्रारकर्तीने नि.क्रं. 2 (1) वर दाखल केलेल्या पोलिस पंचनाम्यात तक्रारकर्तीचा पती हा दारु पिऊन मोटर सायकल चालवित असल्याबाबतची कुठे ही नोंद असल्याचे दिसून येत नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा पती अपघात घटनेच्या वेळी दारु पिऊन मोटर सायकल चालवित असल्याबाबतचा कोणताही वैद्यकीय पुरावा आपल्या कथनाच्या समर्थनार्थ अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच सदरहू अपघात हा टिप्पर चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्यामुळे झालेला आहे असे पोलिस चौकशीतील दस्तावेजात लेखी नमूद आहे. तसेच विरुध्द पक्ष 2 यांच्या कार्यालयातील कर्मचारी / एजंटने तक्रारकर्तीच्या स्वाक्षरीसह असलेले दिनांक 04.04.2017 रोजी लेखी पत्र लिहून घेतले व त्या पत्रासह तक्रारकर्तीचा फोटो काढून विरुध्द पक्ष 2 कडे सादर केला होता, ही विरुध्द पक्ष 2 ने तक्रारकर्ती सोबत केलेली फसवणूक असल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे विमा दावा दाखल केलेला असतांना सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या विमा दावा प्रस्तावाची योग्यरित्या पडताळणी न करता विमा दावा नाकारलेला आहे ही विरुध्द पक्ष 1 व 2 च्या सेवेतील त्रुटी असल्याचे दिसून येते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 यांनी सेवेत त्रुटी केली असल्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीला रुपये 5,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्तीस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत असलेली विमा दावा रक्कम रुपये 2,00,000/- व त्यावर दि. 06.07.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह रक्कम अदा करावी.
- विरुध्द पक्ष 2 ने तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्तीला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |