Maharashtra

Nanded

CC/09/275

Laxmibai madhavrao malegave - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance - Opp.Party(s)

ADV. R. Kulkarni

05 Apr 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/275
1. Laxmibai madhavrao malegave Gojegao,Tq. Mukhed. Dist Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. ICICI Lombard General Insurance Keshvarao Khade Road, Mahalxmi, MumbaiNandedMaharastra2. Maneger ICICI Lombard Gen.Insu.Com. Ltd.Near kalamandir, Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 05 Apr 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/275
 
                    प्रकरण दाखल तारीख -   19/12/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    05/04/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.एस.आर.देशमुख.          -   सदस्‍या
                मा.श्री.सतीश सामते.               - सदस्‍य
 
लक्ष्‍मीबाई भ्र.माधवराव माळेगावे,
वय वर्षे 51, व्‍यवसाय घरकाम,                                  अर्जदार.
रा.गोजेगांव ता.मुखेड जि.नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड,                                   गैरअर्जदार.
     जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
झोनेथ हाऊस, केशवराव खाडे मार्ग,
महालक्ष्‍मी, मुंबई 400034.
2.   व्‍यवस्‍थापक,
आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड, जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
शाखा कार्यालय, कलामंदीर जवळ,नांदेड.
3.   तहसिलदार,
तहसिल कार्यालय, मुखेड ता.मुखेड जि.नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील            - अड.रघुरविर कुलकर्णी.
गैरअर्जदारा तर्फे वकील          - अड.अजय व्‍यास.
 निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्‍यक्ष)
 
          यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार ही मयत माधवराव पांडुरंग माळेगावे यांची पत्‍नी आहे. मयत माधवराव माळेगावे यांचा मृत्‍यु दि.04/09/2005 रोजी रस्‍ता अपघातात रावी ते उदगीर रस्‍त्‍यावर ता.मुखेड येथे झाला. सदरील अपघाताबाबत पोलिस स्‍टेशन मुक्रमाबाद ता.मुखेड यांनी गुन्‍हा क्र.58/2005 कलम 279,304 अ नोंदविली आहे. शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभागाने मयत माधवराव माळेगावे यांचा विमा काढला होता, सदरील विमा पॉलिसीचा कालावधी 10 एप्रिल 2005 ते 9 एप्रिल 2006 असा होता. विमा योजने अंतर्गत मयत माधवराव माळेगावे हे लाभार्थी आहेत. सदरील घटना घडल्‍यानंतर अर्जदारांनी शेतकरी अपघात विमा योजना तरतुदीनुसार तहसिलदार मुखेड यांच्‍या कार्यालयात विमा दावा दाखल केला. अर्जदाराचा विमा रक्‍कम रु.1,00,000/- मिळणे बाबत दावा तहसिलदार मुखेड यांनी गैरअर्जदार इन्‍शुरन्‍स कंपनीचे कार्यालयात पाठविला. अर्जदारास नामे रामदास पि.माधवराव अनुसया पि.माधवराव, दत्‍ता माधवराव ही मुले आहेत. अर्जदाराच्‍या मुला व मुलीस शेतकरी अपघात विमा योजनेची रक्‍कम अर्जदारास देण्‍यास काहीही आक्षेप नाही. प्रस्‍तुत तक्रारीत अर्जदारांनी क्‍लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, सातबारा, होल्‍डींग, प्रथम माहीती अहवाल, शवविच्‍छेदन अहवाल यांच्‍या सत्‍यप्रती दाखल केले आहेत. विमा मिळणे बाबतचा अर्ज गैरअर्जदार इन्‍शुरन्‍स कंपनीकडे दाखल करुनही अर्जदार यांना विमा योजने अंतर्गत रक्‍कम दिली नाही म्‍हणुन प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रु.1,00,000/- दि.04/09/2005 पासुन 12 टक्‍के व्‍याजासहीत द्यावेत.तसेच मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- द्यावेत.
 
     प्रस्‍तुत प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 1 व 2 हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदारास हे मान्‍य नाही की, मयत माधवराव माळेगावे याचा मृत्‍यु दि.04/09/2005 रोजी रस्‍ता अपघातात रावी ते उदगीर रस्‍त्‍यावर ता.मुखेड येथे झाला. न्‍याय मंचास सदरील प्रकरण चालविण्‍याचा अधिकार नाही कारण की, शासनाने दि.5 जानेवारी 2005 रोजी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना मंजुर केलेली आहे. शासनाच्‍या योजनेप्रमाणे घटना घडल्‍याच्‍या सात दिवसांच्‍या आंत अर्जदाराने तलाठयाकडे सर्व कागदपत्रे दिली पाहीजेत व सर्व कागदपत्रांची छाननी करुन तहसिलदाराने विमा कंपनीकडे एक आठवडयाचे आंत पाठवीणे आवश्‍यक आहे. शासन निर्णय दि.05/01/2005 मंचासमोर अर्जदाराने जाणुन बजून दाखल केले नाही. अर्जदार ही मयत माधवराव यांची पत्‍नी असल्‍याबद्यल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्‍यांना अमान्‍य आहे. अर्जदार यांनी पोलिस पेपर्स व इतर कागदपत्र हे सांक्षाकीत दाखल केलेले नाही फक्‍त झेरॉक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत. अर्जदार यांनी क्‍लेम दावा तहसिलदार यांच्‍या मार्फत दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी मयताचे नांवाचा 7/12 दाखल केलेला नाही. मयत अर्जदार यांनी पॉलिसीच्‍या नियम व अटीचे पालन केलेले नाही. ज्‍यावेळेस अपघात झाला त्‍यावेळेस अर्जदाराच्‍या नांवाने शेती नव्‍हती. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
     प्रस्‍तुत प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 3 हे हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी आपला अर्ज या कार्यालयात दि.13/12/2005 रोजी दाखल केला. त्‍याचा प्रस्‍ताव पुर्ण कागदपत्रासह आयसीआयसी लोंबार्ड जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि, मुंबई यांच्‍याकडे तात्‍काळ पाठविण्‍यात आला. मयतास गट क्र.1237 मौजे गोजेगांव येथे 0.96 आर जमीन आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्‍हणुन अर्जदारास प्रस्‍ताव आयसीआयसी लोंबार्ड यांना पाठविण्‍यात आला. म्‍हणुन कार्यालयात अर्जदार यांचा लाभ देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव प्रलंबीत नाही. गैरअर्जदार यांनी, अर्जदारांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणी असा उजर घेतला की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
 
     अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र, तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.   
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय ?      होय.
2.   काय आदेश ?                                             अंतीम आदेशा प्रमाणे.  
                            कारणे
मुद्या क्र. 1
     मयत माधवराव याचा मृत्‍यु दि.04/09/2005 रोजी रस्‍ता अपघातात रावी ते उदगीर रस्‍त्‍यावर ता.मुखेड येथे झाला. याबद्यलचा पुरावा म्‍हणुन पुरावा म्‍हणुन पी.एम.रिपोर्ट, करुन चौकशीचे कागदपत्र पाठविले बाबत पत्र, मेडीकल ऑफिसर यांचा रिपोर्ट यात इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍याप्रमाणे मयत माधवराव यांचा रस्‍त्‍यामध्‍ये मृत्‍यु झाल्‍याचे मरणोत्‍तर पंचनामा यात माधवराव यांचा रस्‍त्‍यामध्‍ये मृत्‍यु झाला असे म्‍हटले आहे. पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट यात डॉक्‍टराच्‍या मते According to my opinion cause of his death is cardio- Respiratary failure due to coma secondary to cruished spinal cord at cervical region and ceretral haniusshage. असे म्‍हटले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. पी.एम. रिपोर्ट तक्रारीसोबत जोडली आहे. अर्जदाराचे नांवे सन 2005 मध्‍ये जमीन असल्‍याबद्यल 7/12 व तलाठी यांनी प्रमाणपत्र दिले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांनी मयत माधवराव यांचा विमा प्रस्‍ताव आला असुन त्‍यासोबत खालील कागदपत्र जसे पी.एम.रिपोर्ट,इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, एफ.आय.आर.,मृत्‍युनंतर दाव्‍यासाठी क्‍लेम फॉर्म पुर्ण भरुन घेऊन तहसीलदार यांना दिल्‍याची नोंद आहे. अर्जदार यांनी दि.04/11/2009 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय.लोम्‍बार्ड यांना विमा दाव्‍या बाबत कायदेशिर नोटीस पाठविलेली आहे.
          2009 vol. III C.P.J. page no.75 Supreme Court, Kandimalla V/s National Insurance Co.Ltd. गैरअर्जदार यांचे वकीलांनी यांनी चुक सायटेशन दिले म्‍हणुन, त्‍यात तंबाखुचया गोडाऊनला 1988 ला आग लागली व त्‍याची सुचना गैरअर्जदार यांना 1992 ला दिली म्‍हणुन लिमीटेशन नाही, असे असले तरी तहसिलदार यांनी गैरअर्जदार यांना एक वर्षात कळविले आहे. म्‍हणुन सदरील सायटेशन प्रस्‍तुत प्रकरणांस लागु होणार नाही.
 
          Limitaion period will commence from the date of accident cause of action not continues till denial of claim- reply to legal notice, declining to issue claim forms, not resulted in extending limitation period complained filed in 1997 without application of condonation of delay manifestly bared by limitation- dismissal of complaint justified.
 
          2009 vol.II C.P.R. page no.257, National Commission T.Seshaish & another V/s Standard Charted Bank, Ones a cause of action arose for filing complaint, making of any subsequent representation could not extend period of limitation.
 
     वरील परिस्थिती प्रमाणे सदर सायटेशन या प्रकरणांस लागु होणार नाही. 
                    2009 vol. I. C.P.R. page no. 1, Supreme Court. H.P. States Forest Company V/s United India Insurance , iv) Insurance—Limitation—Claim if not pressed within 12 months from the date of loss, Insurance company cease to be liable.
 
    
     अर्जदार यांनी सतत पाठपुरावा करत राहील. म्‍हणुन सदरील प्रकरणांस लिमीटेशनचा प्रश्‍न येणार नाही.
 
          Shilpa silk palace V. United India Insurance co. Limited,2003 (1) CPR 393 (Guj) SCDRC. (181) Insurance claim—Arbitration, Clause.
 
     यात अंतरिम रेमीडी आहे. तेंव्‍हा अर्जदारास या मंचापुढे प्रकरण दाखल करता येते. त्‍यामुळे अशा परिस्थितीत मंच स्‍वतः अशी दिरंगाई माफ करु शकते.
 
          Consumer Protection Act,1986—section 12 and 17—Insurance claim-Arbitration clause in policy—It would not prevent consumer court to judge deficiency in sevice.
 
     वरील परिस्थिती नुसार सदर सायटेशन या प्रकरणांस लागु होणार नाही.
      खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दुखात असतात. त्‍यामुळे ताबडतोब क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणुन अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाच्‍या परिपत्रका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही त्‍यामुळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्‍नीकल कारणांसाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे. शेतक-याचा मृत्‍यु अपघाती झाला हे स्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहीजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. विम्‍याची रक्‍कम ही मयताच्‍या पत्‍नीस मिळाली पाहीजे, त्‍यामुळे अर्जदाराचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यात येते. शासनाने मध्‍यस्‍थी म्‍हणुन कबाल इन्‍शुरन्‍स यांना नेमले जरी असले तरी याचा अर्था अर्थी तसा काही उपयोग नाही. उलट हे नियमावर बोट ठेऊन कारण नसतांना इन्‍शुरन्‍स कंपनीकडे क्‍लेम प्रपोजल पाठवितच नाहीत व अपणच निर्णय घेऊन मोकळे होतात. मध्‍यस्‍थीचे काम स्‍क्रुटीनी सारखे असते. त्‍यांने तपासणी करुन कमी जास्‍त काही कागदपत्र आहेत काय याची छाननी करणे व जरी यात नियमात बसत नसले तरी कमीत कमी माहितीसाठी म्‍हणुन हे प्रपोजल पाठवीणे आवश्‍यक आहे. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे प्रपोजल पोहचतच नाही. त्‍यामुळे अशा प्रकारचा क्‍लेम आहे हे त्‍यांना साहजिकच माहीत नसते. आता गैरअर्जदार यांचे मते हे प्रिमॅच्‍युअर प्रपोजल आहे कारण त्‍यांनी यावर निर्णयच घेतलेला नाही व त्‍यांना प्रपोजल देऊन परत निर्णय घ्‍या, म्‍हणजे अजुन दिरंगाई करणे होईल. खरे तर दि.2005 मध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 यांना प्रपोजल तहसिलदार गैरअर्जदार क्र. 3 यांनी पाठविले बाबत पुरावा म्‍हणुन पत्र दाखल आहे शिवाय तसे लेखी पत्र दिले आहे, प्रपोजल मिळुनही गैरअर्जदार यांनी निर्णय घेतला नाही. म्‍हणुन प्रिमॅच्‍युअर्ड असे आता म्‍हणता येणार नाही. यात  विमा क्‍लेम देण्‍यासाठी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे उपलब्‍ध आहेत. या कागदपत्राचे आधारावर विम्‍याची रक्‍कम देता येईल. फक्‍त विमा कंपनीला प्रपोजल मिळालेच नसल्‍या कारणाने त्‍यांना विमा रक्‍कमेवर व्‍याज लावणे व मानसिक त्रास दयावयास सांगणे हे कायदयाचे दृष्‍टीने योग्‍य होणार नाही. म्‍हणुन आम्‍ही तसा आदेश करणार नाही.
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                            आदेश.
1.   अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजुर करण्‍यात येते.
2.   अर्जदार यांनी परत एक प्रपोजल आवश्‍यक त्‍या कागदापत्रासह किंवा येथे दाखल असलेले कागदपत्राच्‍या सत्‍य प्रती घेऊन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना हे प्रपोजल द्यावे किंवा आय.सी.आय.लोंबार्ड कंपनी मंचातुन या प्रपोजलचा सेट घेऊ शकतात व यावर निर्णय घेऊन 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- द्यावेत. असे न केल्‍यास दि.04/05/2010 पासुन त्‍यावर 9 टक्‍के व्‍याज लावण्‍यात येईल व यानंतर पुर्ण रक्‍कम अर्जदारा मिळेपर्यंत ती व्‍याजासह देण्‍यात यावी.
3.   मानसिक त्रासाबद्यल आदेश नाही.
4.   दावा खर्च ज्‍यांचा त्‍यांनी आपापला सोसावा.
5.   गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍द आदेश नाही.
6.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                      (श्रीमती.सुवर्णा.देशमुख)                                        (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                                     सदस्‍या                                                             सदस्‍य
 
गो.प.निलमवार.लघूलेखक.