Maharashtra

Beed

CC/13/2

Shaikh Fahim Begum Shaik Ahemed Tulla - Complainant(s)

Versus

Head Of the Department Kabal Insurance Broking Services Pvt Ltd - Opp.Party(s)

Pawase

13 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/2
 
1. Shaikh Fahim Begum Shaik Ahemed Tulla
R/o Talwada Ta Georai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Head Of the Department Kabal Insurance Broking Services Pvt Ltd
Cidco Aurangabad
Aurangabd
Maharashtra
2. Branch Manager, Reliance INsurance Co
19 Reliance Center,Walchand Hirachand Marg Belard Estate MUmbai
Mumbai
Maharashtra
3. District Collector
Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 13.08.2014

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

           तक्रारदार श्री.शेख फाहिम बेगम शेख अहेमद तूल्‍ला यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत सेवा देण्‍यास त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

            तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे प्रमाणे, तक्रारदार हया मौजे तलवडा ता. गेवराइ्र जि.बीड येथे त्‍यांचे कूटूंबिया सोबत राहतात. तक्रारदार हया शेती व्‍यवसाय करुन स्‍वतःचा उदरनिवाईह करतात. तक्रारदार यांचे पती शेख अहमद तूल्‍ला हे दि.23.1.2008 रोजी विजेचा शॉक लागल्‍यामुळे मयत झाले. मयत हे व्‍यवसायाने शेतकरी होते.त्‍यांचे नांवे मौजे गोविंदवाडी येथे शेत जमिन नोंदलेली आहे. तक्रारदार यांचे पती मयत झाल्‍यानंतर त्‍या बाबत खबर माजलगांव पोलिस स्‍टेशनला देण्‍यात आली. पोलिसांनी घटनास्‍थळावर जाऊन पंचनामा केंला.

            महाराष्‍ट्र शासनाने सर्व शेतक-याच्‍या लाभासाठी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना सूरु केली आहे. या विमा योजने अंतर्गत शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास नुकसान भरपाई रु.1,00,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेमार्फत शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला. अर्जासोबत सर्व कागदपत्र हजर केले आहेत. सामनेवाले यांना विमा प्रस्‍ताव प्राप्‍त होऊनही त्‍यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदार यांनी क्‍लेम मंजूर होण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या सर्व दस्‍ताऐवजी पुर्तता केली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडहून शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमाय योजना अंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/- मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.

 

            सामनेवाले क्र.1 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.13 अन्‍वये लेखी कैफियत दाखल केली.  सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार हे त्‍यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाले 1 हे सल्‍लागार व मध्‍यस्‍थ म्‍हणून काम पाहतात. शेतक-याचा विमा अर्ज तहसील कार्यालय मार्फत प्राप्‍त झाल्‍यानंतर ते विमा कंपनीकडे पाठवून देण्‍याच काम करतात. त्‍यावर ते कोणताही मोबदला स्विकारत नाहीत. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, शेख अहमदतूल्‍ला रा. तलवाडा यांचा अपघात दि.23.1.2008 रोजी झाला. सदरील प्रस्‍ताव हा तहसील कार्यालय गेवराई मॉर्फत प्राप्‍त झाला. तो प्रस्‍ताव रिलायन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कंपनीला दि.25.8.2008 रोजी पाठविला. सदरील क्‍लेम इन्‍शूरन्‍स कंपनीने नाकारला. मयताचे वारस यांना दि.24.11.2010 रोजी कळविण्‍यात आले.

 

            सामनेवाले क्र.2 यांना नोटीस प्राप्‍त  होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही. सबब त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.

            सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी नि.10 सोबत आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचे क्‍लेम कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी कडे सादर करण्‍यात आला. तक्रारदार यांचे कडून कोणताही विमा हप्‍ता स्विकारला नाही. शासनाने शेतक-याच्‍या वतीने विमा हप्‍त्‍याची रक्‍क्‍म अदा केलेली आहे.

            तक्रारदार यांचे पुराव्‍याचे शपथपत्र व दस्‍त व सामनेवाले क्र.1 व 2 यांचे शपथपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री. पावसे यांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

               मुददे                                                 उत्‍तर

1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत

      त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ?               नाही.

2.     तक्रारदार यांची तक्रार मुदतीत आहे काय                            नाही.

3.    तक्रारदार हे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने

     अंतर्गत लाभ  मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           नाही

4.    काय आदेश ?                                         अंतिम आदेशाप्रमाणे.

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 ते 3 ः-

 

              तक्रारदार यांचे वकील श्री. पावसे यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती व्‍यवसायाने शेतकरी होते. दि.23.1.2008 रोजी त्‍यांचा विजेचा शॉक लागून मृत्‍यू झाला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम मिळणेसाठी सर्व कागदपत्राची पुर्तता केली व क्‍लेम दाखल केला. सामनेवाले यांनी तो क्‍लेम मंजूर केला आहे किंवा काय या बाबत अद्याप कळवलेले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी केलेली मागणी मान्‍य करण्‍यात यावी.

 

            सामनेवाले क्र.1 ब्रोकर्स यांचे प्रतिज्ञापत्र व सोबत दाखल केलेल्‍या दस्‍ताचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी दाखल केलेला क्‍लेम दि.24.11.2010 रोजी नामंजूर केलेला आहे. या बाबत पत्र सोबत जोडलेले आहे. त्‍या पत्रामध्‍ये तक्रारदार यांनी आवश्‍यक ते दस्‍ताऐवज हजर केले नाही. तसेच तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही आावश्‍यक ते दस्‍त दिले नाही. त्‍यामुळे सामनेवाले विमा कंपनी यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम  “नो क्‍लेम रिपोर्ट”   म्‍हणून दप्‍तरी दाखल केला आहे.

 

             तक्रारदार यांचे शपथपत्र व दस्‍त यांचे अवलोकन केले असता काही बाबी ज्‍या निकाल देण्‍यासाठी आवश्‍यक आहे त्‍या नमूद करणे क्रमप्राप्‍त ठरते. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत गांव नमूना 7/12 चा उतारा,गांव नमुना 8-अ चा उतारा दाखल केलेला आहे. सदरील महसूल दस्‍ताचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे नांवे गट नंबर 1246 इतर सह हिस्‍सेदारा बाबत नोंदलेल्‍या आहेत. यावरुन तक्रारदार यांचे पतीचे नांवे मौजे गोविंदवाडी ता. गेवराई येथे शेत जमिन होती ही बाब सिध्‍द होते.

            सदरील अपघात कसा झाला त्‍या बाबत पोलिस पेपरचे अवलोकन करणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी आकस्‍मीक खबर रिपोर्ट दाखल केलेला आहे. त्‍यांचे अवलोकन केले असता दि.23.1.2008 रोजी तक्रारदार यांचे पती माजलगांव येथिल महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळ  कार्यालयामध्‍ये लाईनमन म्‍हणून कार्यरत होते. ते लाईनचे काम करीत असताना विद्यूत शॉक लागून खाली पडले व त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला असे नमूद केलेले आहे. पंचनाम्‍याचे  अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, माजलगांव ते गेवराई रोडवरील फुले पिेंपळगांव  शिवारातील धनदिप जिनींगचे  पूर्व बाजूकडील कंपाऊडवाल जवळ दिसत आहेत.सदरील पोलावरुनप 11 के.व्‍ही. विद्यूत प्रवाह वाहत आहे. सदरील ठिकाणी माजलगांव कडून गेवराई कडे 33 के.व्‍ही. लाईनचे मुख्‍य तारा जात आहेत. त्‍यांच तारेच्‍या  खालून सिंदफना इंग्‍लीश स्‍कूलकडे लाईन जात आहे. सदरील मयत व्‍यक्‍ती हा पोलवर चढून तार जोडत होता. त्‍यावेळी 33 के.व्‍ही.  तारेला 11 11 के.व्‍ही.  तार लागून पोल नंबर 3 वर स्‍फोट झाला व त्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे पती मयत झाले. संपूर्ण पोलिस पेपरचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळ मध्‍ये नौकरीस होते व ते नौकरी करीत असताना विद्यूत पोलवर चढहून तारेचा झोल काढत होते. त्‍यांनी योग्‍य ती काळजी घेतली नाही. तसेच सदरील पोल जवळून 33 के.व्‍ही. तार जात होती. दोन्‍ही तारा एकमेकाला स्‍पार्क होऊन त्‍यामध्‍ये विद्यूत प्रवाह आला व त्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे पती मयत झाले. सदरील घटनेचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती हे महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळामध्‍ये लाईनमन या पदावर कार्यरत होते. ते आपल्‍या नौकरीवर कार्यरत असताना विद्यूल पोलवर चढले व निष्‍काळजीपणाने तारेतील झोल काढू लागले. सदरील तारेचे वर दूस-या विद्यूत प्रवाह वाहून नेणारी तार गेलेली होती. मयत यांनी योग्‍य ती काळजी घेणे आवश्‍यक होते. तक्रारदारयांहचे पतीचे नांवे शेत जमिन नोंदलेली असली तरी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी  महाराष्‍ट्र शासनाने नमूद केलेल्‍या व क्‍लेम मिळण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या बाबीची पुर्तता करणे गरजेचे होते. तक्रारदार यांचे पती स्‍वतः त्‍यांचे मृत्‍यूस जबाबदार आहेत. ते सेवेत असताना नौकरीचा भाग बनून ते विद्यूत प्रवाह दूरुस्‍त करीत होते. त्‍यांना शॉक लागून ते मयत झाले. सदरील बाबीचा शेतकरी अपघात विम्‍याशी तसा संबंध येत नाही. संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचा क्‍लेम विमा कंपनीने दि.21.11.2010 रोजीच्‍या पत्राने नाकारला आहे. तसे तक्रारदार यांना कळविण्‍यात आले आहे. सदरील क्‍लेम बाबत तक्रारदार यांना वेळोवेळी दस्‍ताची मागणी करुनही ते दिले नाही म्‍हणून नाकारला आहे. सदरील बाबीचा विचार केला असता तक्रारदार यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारल्‍यापासून दोन वर्षाचे आंत दाखल करणे क्रमप्राप्‍त होते. तक्रारदार यांनी सदरील क्‍लेम मुदतीनंतर दाखल केला आहे. विलंब माफ होण्‍यासाठी संयूक्‍तीक कारण दिलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

 

            मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                             आदेश

 

            1)  तक्रारदाराची  तक्रार  नामंजूर  करण्‍यात  येत  आहे.          

2)

            3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

               20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

               करावेत.  

 

 

 

                                श्री.रविंद्र राठोडकर        श्री.विनायक लोंढे,

                                   सदस्‍य                  अध्‍यक्ष

                                  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

 

जयंत पारवेकर

लघुलेखक 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.