जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1832/2008
तक्रार दाखल तारीखः- 12/01/2009
तक्रार निकाल तारीखः- 12/09/2012
दिनकर दत्तात्रय डहाळे,
उ.व.68 धंदा –पेंन्शनर, .........तक्रारदार
रा. गायत्रीनगर,नाहाटा कॉलेज मागे,
जामनेर रोड, भुसावळ जि.जळगांव..
विरुध्द
1. भारत सरकार (रेल्वे विभाग), ........विरुध्दपक्ष.
2. जनरल मॅनेजर सेन्ट्रल रेल्वे,
(नं. 1 व 2 करिता समन्स व नोटिस
जनरल मॅनेजर मध्ये रेल्वे मुंबई)
छ.शि.ट.यांना बजावण्यात यावी)
3. मुख्य वाणिज प्रबंधक (मध्ये रेलवे) (धनवापसी)
नविन प्रशासकीय भवन दुसरा मजला, छ.शि.ट.,
मुंबई – 400 001.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ. एस.एस.जैन. सदस्या.
-------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.राजेश जे. शर्मा.
विरुध्दपक्ष तर्फे अड.सौ.एस.डी.देशवंडीकर.
.
नि का ल प त्र
सौ.एस.एस.जैन,सदस्या ः विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना यात्रेचे टिकीटाची रक्कम परत केली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार की, तक्रारदार यांनी भुसावळ येथुन पी.एन.आर.830-4013936 अन्वये रिझर्व्हेशन टिकीट नं.92056402 घेतलेले होते व सदरचे टिकीट कन्फर्म होते. सदरचे टिकीट 1093 डाऊन या गाडीचे एस- 4 या बोगीमधे बर्थ नं.17,18 व 20 अर्जदार स्वतः, त्यांची पत्नी व मुलगी या तीन व्यक्तीच्या नांवे आरक्षीत होते. यात्रेची तारीख. 07/08/06 रोजी दादर ते भुसावळ स्टेशनपर्यंत होती. परंतु त्या दिवशी मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवास विस्कळीत झाल्यामुळे तक्रारदाराने सदर टिकीट त्याच दिवशी म्हणजे दि.07/08/06 रोजी मुख्य टिकीट निरीक्षक,ठाणे यांच्याकडे जमा केल्यावर त्यांनी टि.डी.आर.नंबर.322752 रक्कम रु.521 चा तक्रारदारास दिला. सदरचा टिडीआर तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्याकडे रक्कम मिळण्यासाठी पाठविला तो त्यांना दि.27/08/06 रोजी मिळाला. विरुध्दपक्ष यांनी रेल्वेच्या नियमाप्रमाणे सदरची रक्कम सहा महिन्याच्या आत परत करावयास पाहीजे होती. परंतु त्यांनी मुदतीत रक्कम परत दिली नाही व सेवेत त्रुटी केली आहे.
3. तक्रारदार यांनी शेवटी विरुध्दपक्ष यांचेकडुन टिकीटाचे टि.डी.आर. पावतीची रक्कम रु.521/-,नोटीसचा खर्च रक्कम रु.1,000/-,शारिरीक व मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.10,000/- व सदोष सेवा दिल्यामुळे रु.10,000/- असे एकुण रु.21,521/- व त्यावर द.सा.द.शे.24 टक्के प्रमाणे व्याज मिळावा अशी विनंती केली आहे.
4. विरुध्दपक्ष यांनी आपला खुलासा दाखल करुन तक्रारदाराने स्मरणपत्र पाठविल्यानंतर जवळ जवळ एक वर्षानंतर तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवली व विरुध्दपक्षाकडुन पैसे उकळण्याच्या हेतुने सदर तक्रार दाखल केली. विरुध्दपक्ष यांनी असेही म्हटले आहे की, सदरचा वाद हा भाडे परतीचा आहे यासाठी तक्रारदार यांना त्रास झाला असेल तर त्याचे निवारणासाठी स्वतंत्रपणे रेल्वे क्लेम्स ट्रीब्युनल उपलब्ध आहे. रेल्वे क्लेम्स ट्रीब्युनल अट 1987 चे कलम 13 व 15 पाहीले तर सदर अक्टचे कलम 13 (1)(ब) नुसान क्लेम्स ट्रीब्युनलला अशा प्रकारचे भाडे परतावा संबंधीचे क्लेम्स चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे. तसेच ग्राहक मंचास सदरचे तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही असे म्हटले आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ विरुध्दपक्ष यांनी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ग्राहक तक्रारअर्ज क्र.40/2007, व सदर अर्जाचे मा.राज्य आयोग,महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचेकडील अपील क्र. 1291/2007 दाखल केलेले आहे. सदर ग्राहक तक्रारअर्ज व मा.राज्य आयोग यांचेकडील अपीलाचा विचार होऊन तक्रारदार यांची तकार रद्य करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
5. विरुध्दपक्षाने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (दावा) श्री.के.एम.सक्सेना यांचे शपथपत्र तसेच रेल्वेच्या IRCA च्या परिच्छेद क्र.118 नुसारचा नियम दाखल केला आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार विरुध्दपक्ष यांचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
7. मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार यांची तक्रार चालवण्याचे या मंचास अधिकाक्षेत्र आहे काय? नाही.
2. आदेश काय खालीलप्रमाणे
विवेचन
8. मुद्या क्र. 1 - तक्रारदार यांची तक्रार आहे की, त्यांनी भुसावळ येथुन पी.एन.आर.830-4013936 अन्वये रिझर्व्हेशन टिकीट नं.92056402 घेतलेले होते व सदरचे टिकीट कन्फर्म होते. सदरचे टिकीट 1093 डाऊन या गाडीचे एस- 4 या बोगीमधे बर्थ नं.17,18 व 20 अर्जदार स्वतः, त्यांची पत्नी व मुलगी या तीन व्यक्तीच्या नांवे आरक्षीत होते. यात्रेची तारीख. 07/08/06 रोजी दादर ते भुसावळ स्टेशनपर्यंत होती. परंतु त्या दिवशी मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवास विस्कळीत झाल्यामुळे तक्रारदाराने सदर टिकीट त्याच दिवशी म्हणजे दि.07/08/06 रोजी मुख्य टिकीट निरीक्षक,ठाणे यांच्याकडे जमा केल्यावर त्यांनी टि.डी.आर.नंबर.322752 रक्कम रु.521 चा तक्रारदारास दिला. सदरचा टिडीआर तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्याकडे रक्कम मिळण्यासाठी पाठविला तो त्यांना दि.27/08/06 रोजी मिळाला. विरुध्दपक्ष यांनी रेल्वेच्या नियमाप्रमाणे सदरची रक्कम सहा महिन्याच्या आत परत करावयास पाहीजे होती. परंतु त्यांनी मुदतीत रक्कम परत दिली नाही व सेवेत त्रुटी केली आहे. तर विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादामध्ये असे म्हटले आहे की, सदरचा वाद हा भाडे परतीचा आहे यासाठी तक्रारदार यांना त्रास झाला असेल तर त्याचे निवारणासाठी स्वतंत्रपणे रेल्वे क्लेम्स ट्रॅब्युनल उपलब्ध आहे. रेल्वे क्लेम्स ट्रब्युनल अट 1987 चे कलम 13 व 15 पाहीले तर सदर अक्टचे कलम 13 (1)(ब) नुसार क्लेम्स ट्रब्युनल यांना अशा प्रकारचे भाडे परतावा संबंधीचे क्लेम्स चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे. अशाप्रकारचे वाद ग्राहक मंचास चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ विरुध्दपक्ष यांनी रेल्वेच्या आगमन व निर्गमनाच्या नियमितपणाविषयी रेल्वेच्या IRCA च्या परिच्छेद क्र.118 नुसार प्रवाशांना खात्री देवू शकत नाही किंवा भरपाई देण्यास बांधील नाही या संबंधीचा नियम दाखल केले आहे. तसेच नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ग्राहक तक्रारअर्ज क्र.40/2007 व सदर अर्जाचे मा.राज्य आयोग,महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचेकडील अपील क्र. 1291/2007 दाखल केले आहे. वरील परस्परविरोधी म्हणणे पाहता या मंचास सदर तक्रार चालवीण्याचा अधिकारक्षेत्र आहे काय हे पाहणे आवश्यक ठरते.
9. यां संदर्भात रेल्वे क्लेम्स ट्रीब्युनल अक्ट 1987 चे कलम 15 चे अवलोकन केले त्यात पुढील प्रमाणे विषद आहे.
Sec. 15 – Bar of Jurisdiction - On and from the appointed day, no court or other authority shall have or be entitled to exercise any jurisdiction, powers or authority in relation to matters referred in & Sub. Secs. (1) and (1-a) of Sec 13.
विरुध्दपक्ष यांनी मा.राज्य आयोग,महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचेकडील अपील क्र. 1291/2007 चा न्यायिक दृष्टांत दाखल केलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की, The appellant should have approached for this relief to the Railway Claims Tribunal established under Railway Claims Tribunal Act,1987. However, the appellant has approached Consumer Forum, which is not proper Forum. यावरुन तक्रारदार यांची सदर तक्रार चालवण्याचा अधिकार या मंचास नाही, या मतास आम्ही आलो आहोत म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत..
18. मुद्या क्र. 3 - यावरुन तक्रारदार यांची सदर तक्रार चालवण्याचा अधिकार या मंचास नाही, या मतास आम्ही आलो आहोत. त्यामुळे तक्रारदार यांना आपली तक्रार योग्य त्या न्यायालयात दाखल करण्याचा अधिकार राहील व प्रस्तुत तक्रारीसाठी गेलेला वेळ माफ होऊन मिळण्यास पात्र राहील. वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश.
1. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
2. तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी आपापला खर्च सोसावा.
(सौ.एस.एस.जैन ) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव