ग्राहक तक्रार क्र. 52/2015
दाखल तारीख : 19/01/2015
निकाल तारीख : 11/03/2016
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 22 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. गोविंद पि. दत्तोपंत बिराजदार,
वय – 54 वर्षे, धंदा – नौकरी,
रा.मु.पो. निलकमल, सावरगार पुर्नवसन,
विद्याभवन शाळेजवळ, ढोकी रोड,
कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. महाव्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र,
शिवाजी नगर, पुणे.
2. विभागीय व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र,
विभागीय कार्यालय, सोलापुर.
3. शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळंब,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
4. जनरल मॅनेजर,
भारतीय रिझर्व बँक, मुंबई.
5. मा. बँकींग लोकपाल साहेब,
व्दारा. भारतीय रिझर्व बँक,
गारमेंट हाऊस,वरळी, मुंबई.400018. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र.अध्यक्षा.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एच.एस.बिक्कड.
विरुध्द पक्षकार क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारित.
विरुध्द पक्षकार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश पारित.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधिज्ञ : श्री.एस.ए.देशपांडे.
विरुध्द पक्षकार क्र.4 विरुध्द एकतर्फा आदेश पारित.
विरुध्द पक्षकार क्र.5 विरुध्द एकतर्फा आदेश पारित.
न्यायनिर्णय
मा. प्र.अध्यक्ष, सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
1) अर्जदार गोविंद दत्तोपंत बिराजदार हे मु.पो.निलकमल सावरगांव पुर्नवसन विद्याभवन शाळेजवळ ढोकी रोड कळंब, ता. कळंब जि.उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षीप्त रुपात बँक) यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
2) अर्जदार हे नोकरीस असल्याने विप क्र. 3 महाराष्ट्र बँक यांचेकडे दि.12/07/1995 रोजी बचत खाते क्र.20260102483 या नंबरने खाते उघडले आहे. अर्जदाराने विप क्र.3 महाराष्ट्र बँक यांचे कडून रितसर ए.टीएम. कार्ड सेवा घेतलेली असून त्याचा ए.टीएम. क्र.4214090430001805 हा आहे.
3) दि.18/02/014 रोजी 11.47 वाजता बँक ऑफ इंडिया शाखा कळंब मधील एटीएम मशीन मधून रु.10,000/- काढत असताना मशीन मधून रक्कम मिळाली नाही तेव्हा शाखा व्यवस्थपक बँक शाखा व्यवस्थापक कळंब यांना त्या संदर्भात लेखी तक्रार दिलेली आहे. तसेच CBR7893830430 ने दि.02/05/2014 ला दुपारी 4.30 वाजता दिलेली आहे.
4) अर्जदाराने पुन्हा दि.06/03/2014 ला बँक ऑफ इंडिया शाखा कळंबच्या एटीएम आयडी BOIM508033 व्दारे रक्कम रु.5000/- दुपारी 5.15 वाजता काढताना मशीन मधून रक्कम मिळालेली नाही सदर रक्कम खात्यातुन कमी/ डेबीट झाली व पावती मिळालेली नाही. पुन्हा शाखा व्यवस्थापक बँक ऑफ व्यवस्थापक. बँक ऑफ महाराष्ट्र कळंब यांना तक्रार दि.07/03/2014 ला CBR 7893880430 ने दिली.
5) रक्कम परत मिळणेसाठी अर्जदाराने वेळोवेळी प्रयत्न केले पण रक्कम न मिळाल्याने दि.26/06/2014 रोजी विप क्र.2 यांना रजिष्ट्रर पोष्टाने तक्रार केली तसेच सदर तक्रार विप क्र.1 आणि जनरल मॅनेजर व मा. बँकिंग लोकपाल साहेब. भारतीय रिझर्व बँक गारमेंट हाऊस वरळी मुंबई पिनकोड 400018 यांना R.L.A. ने दिली व विप क्र. 3 ला कार्यालयात दिली.
6) सदरची तक्रार विप क्र. 1 यांना दि.01/07/2014 ला मिळाली. भारतीय रिझर्व बँक यांनी दि.07/1022014 ला पत्र देऊन बँकींग लोकपालव्दारा भरतीय रिझर्व बँक गारमेंट हाऊस वरळी मुंबई यांना अर्जदाराने A.T.M. मधून केलेले व्यवहार हे यशस्वी असल्याचे म्हंटले आहे. A.T.M. मधून पैसे म्हिाले नसल्याबाबत वेळोवेळी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यापण काही उपयोग झाला नाही म्हणून सदर तक्रारीव्दारे विप क्र.1 ते 3 यांचेकडून रक्कम रु.15,000/- देण्यात यावा. A.T.M. नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,00/- तक्रार खर्चापोटी रु.5,000/- देण्यात यावे अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
7) विप क्र.1, 2, 4, 5 यांनी मंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाही म्हणून मंचाचे त्यांचे विरुध्द दि.24/03/2015 रोजी एकतर्फा आदेश पारित केला.
8) विप क्र.3 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले असून त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार खोटी आहे खारीत होणे न्याय आहे. तक्रारदार प्राध्यापक आहेत हे माहित नाही. अर्जदाराचे खाते विप क्र.3 कडे आहे हे मान्य केलले आहे व त्यांना A.T.M. कार्ड दिलेले आहे हे सत्य आहे. अर्जदाराने दि.18/;2/2014 रोजी A.T.M. मधून रु.10,000/- काढले व रक्कम मिळाली नाही पण खातेतुन रक्कम डेबीट झाली हे खोटे असल्याचे महंटले आहे. पुन्हा दि.06/03/2014 रोजी रु.5,000/- काढताना रक्कम मिळालेली नाही पण खातेतुन डेबीट झाले हे मान्य नाही. तक्रार बनावट आहे कोणताही कायदेशीर आधार नाही. अर्जदाराचे म्हणणेनुसार A.T.M. मशीनव्दारे दि.18/02/014 रु.10,000/- व दि.06/02/2014 रोजी रु.5,000/- मशीन मधून काढलेले आहेत व ते त्यांना मिळालेले आहेत.
9) अर्जदाराने Bank of India शाखा कळंब यांना non joinder of necessary party या तत्वाखाली अर्ज खारीत करणे योग्य आहे. असे म्हंटलेले आहे.
10) अर्जदाराची तक्रार दाखल केले नंतर या विप ने दि.18/02/2014 रोजी complaint No.CBR7632480430 नोंद केली. त्याचप्रमाणे 06/03/2014 रोजी तक्रार देखील दि.07/03/2014 रोजी नोंदवलेली आहे त्याचा क्र.CBR7706760430 असा आहे. दोन्ही संदर्भाने card sale manegment and information system यांनी कळवले आहे की, As per JP/EJ Log received from Acquining Bank transaction is successful and claim is rejected या प्रमाणे सिध्द झाले आहे की अर्जदारास दोन्ही रकमा प्राप्त झालेल्या आहेत व असे असताना अर्जदाराने खोटे कथन करुन तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज खारीज करुन रक्कम रु.10,000/- अर्जदाराकडून विप क्र.3 यांना देण्यात यावा अशी विनंती केलेली आहे.
11) अर्जदाराने तक्रारीसोबत पासबुकची छायांकीत प्रत, A.T.M. Card ची झेरॉक्स, A/c Details of Bank of Maharashtra, दि.26/06/2014 चा अर्ज, भारतीय रिझर्व बँकेचे पत्र, लोकपाल कार्यालयाचे पत्र, विप क्र.3 ने information system dt.18/02/2014, 07/03/2014 लोकपाल यांचे पत्र, तसेच उभयतांचा लेखी युक्तिवाद वाचला व तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराने बँक ऑफ इंडिया या बँकेला प्रकरणात विरुध्द पक्ष
म्हणून सामिल करणे आवश्यक आहे का? होय.
2) अर्जदाराचे विनंतीनुसार नुकसान भरपाई व
एटीएम ची न मिळालेली रक्कम मिळण्यास
अर्जदार पात्र आहे का नाही ? नाही.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
1) मुद्दा क्र.1 व2
12) वास्तविक पाहता अर्जदाराकडे Bank of Maharashtra of Debit card (A.T.M.)आहे. आणि त्याने bank of India च्या A.T.M. मशिनव्दारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला रक्कम मिळालेी नाही ही त्याची प्रमुख तक्रार आहे.
13) तसे पाहता अर्जदाराने Bank of India च्या कळंब शाखेला सदर प्रकरणात विप म्हणून सामिल करणे गरजेचे होते कारण महाराष्ट्र बँकेचे कार्ड जरी असले तरी Bank of India ची ATM मशीन आहे. कारण अर्जदाराने ATM कार्ड वापरले. पण पैसे ड्रॉप बॉक्स मध्येच राहिले याची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण कधी कधी अशा घटना घडू शकतात आणि अशी घटना घडल्यानंतर त्वरीत बँकेशी संपर्क साधने गरजेच आहे परंतु अर्जदाराने अभिलेखावर दि.26/06/2014 चा लेखी अर्ज दाखल केलेला आहे तो 4 महिने उशिरा दिलेला आहे. आणि CBR ची complaint पण 3 महिने उशिरा दिलेली आहे. त्यानंतर दि.06/03/2014 पुन्हा ATM Card use केले आणि पुन्हा तिच घटना अर्जदाराच्या बाबतीत घडली आणि अर्जदाराने 3 ते 4 महिने उशिरा तक्रार नोंदविली परंतु जर अर्जदाराने Bank of India तक्रारीत विप म्हणून सामिल केले असते तर खरी position ताबडतोब कळाली असती कारण AT.M. मशिन इंडिया बँक यांचे होती आणि अर्ज/तक्रार बँक ऑफ इंडिया बँकेतच देणे गरजेचे होते. सर्व बॅका या एकमेकास जरी connected असल्यातरी ज्या त्या बँकेचे व्यवहार ज्या त्या बँकेच्याच लक्षात येणार. अर्जदाराने बँक ऑफ इंडिया या बँकेला प्रकरणात विप म्हणून पक्षकार केलेले नसल्याने non joinder of necessary party या तत्वाखाली अर्जदार त्याची ATM मधून न मिळालेली रक्कम मिळण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहोत.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) उभय पक्षाने आपआपला खर्च स्वत: सोसावा.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्रीमती विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.