(घोषित दि. 23.08.2011 व्दारा सौ.रेखा कापडीया, सदस्या) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला. गैरअर्जदार यांच्या नवप्रकाश योजनेअंतर्गत त्यांनी वीज बिलाची तडजोडीची रक्कम भरली. गैरअर्जदार यांनी ही रक्कम स्विकारल्यानंतरही अर्जदारास पुन्हा मागील थकबाकी रक्कम भरण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 51003028688 असा आहे. अर्जदार यांच्याकडे एकूण 48,439/- रुपयाची वीज बिलाची थकबाकी होती. गैरअर्जदार यांनी वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी नवप्रकाश योजना जाहीर केली होती. अर्जदाराने या योजने अंतर्गत दिनांक 04.08.2008 रोजी 5,000/- रुपये भरले व या योजनेच्या अटीनुसार हमीपत्र सुध्दा दिले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नवप्रकाश योजने नुसार वीज बिल आकारणी केली. मार्च 2010 मध्ये त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही असे सांगून गैरअर्जदार यांनी अर्जदारास वाढीव वीज बिले दिले व ही रक्कम न भरल्यामुळे दिनांक 31.08.2010 रोजी अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत केला. अर्जदाराने अनेकवेळेस विनंती करुन खंडीत केलेला वीज पुरवठा चालू करण्याबाबत तसेच नवप्रकाश योजने अंतर्गत वीज बिलाची आकारणी करण्याबाबत गैरअर्जदार यांना विनंती केली. गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून खंडीत केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करणे, नवप्रकाश योजने अंतर्गत वीज बिल आकरणी करणे व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती, नवप्रकाश योजनेचे परिपत्रक इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने नवप्रकाश योजनेतील अटी व शर्तीचे पालन केलेले नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ देता येत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराकडे वीज बिलाची थकबाकी असून ती टाळण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली आहे. अर्जदारास देण्यात आलेली वीज बिले योग्य असून त्यांना देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदारयांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. अर्जदाराकडे वीज बिलाची 48,439/- रुपये थकबाकी होती व त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेलाहोता. गैरअर्जदार यांनी अशा ग्राहकांसाठी व जुनी थकबाकी काही अंशी वसूल करण्याच्या उद्देशाने नवप्रकाश योजना तयार केली ज्याचा परिपत्रक क्रमांक 83 दिनांक 15.07.2008 असा आहे. या परिपत्रकाचे अवलोकन केल्यास सदरील योजना ही 15 जुलै 2008 ते 30 ऑगस्ट 2008 या कालावधीसाठी होती. या योजनेतील अटी क्रमांक 2 नुसार ज्या ग्राहकांची थकबाकी 31.03.2008 पर्यंत रुपये 10,000/- व त्यापेक्षा जास्त असेल अशा ग्राहकांनी रुपये 5,000/- एकरकमी तडजोड म्हणून भरल्यास त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्यात येईल असे म्हटले आहे. अर्जदाराने दिनांक 31.07.2008 रोजी या योजनेतील अटी प्रमाणे 200/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गैरअर्जदार यांच्या नावे हमीपत्र दिलेले दिसुन येते. त्याचप्रमाणे दिनांक 04.08.2008 रोजी या योजने अंतर्गत 5,000/- रुपये भरल्याचे दिसून येते. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास या योजनेत समाविष्ट केलेले स्पष्टपणे दिसून येते. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल. वरुन जानेवारी 2009 ते सप्टेबर 2009 या काळात मागील रिडींग व चालू रिडींग 11,920 असे दर्शवून अर्जदारास 360 युनिट प्रति महिना वीज बिल आकारणी केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याच प्रमाणे नवप्रकाश योजने अंतर्गत 5,000/- एकरकमी भरल्यानंतर मागील थकबाकी बिलामध्ये दाखवून गैरअर्जदार यांनी अर्जदारास चुकीची वीज बिल आकारणी केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात अर्जदाराने नवप्रकाश योजनेतील अटी व शर्तीचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे. पण नेमक्या कोणत्या अटीचे पालन केलेले नाही याचा खुलासा केलेला नाही. जानेवारी 2009 ते सप्टेबर 2009 या काळात सरासरीवर आधारीत वीज बिलाची आकारणी करणे व दुसरीकडे बिलापोटी अर्जदाराने नियमित वीज बिल भरले नाही असे म्हणणे हे अयोग्य असल्याचे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी ऑक्टोबर 2009 मध्ये अर्जदाराचे मीटर बदलले पण त्यानंतर देखील ऑक्टोबर 2009 ते जानेवारी 2010 या काळात त्यांना INACC असे दाखवून सरासरीवर आधारीत वीज बिल दिले. ऑक्टोबर 2009 ते जुलै 2010 या दहा महिन्याच्या काळात अर्जदाराचा एकूण वापर (3339 – 1 = 3338) असा दिसून येतो. या वरुन त्यांचा सरासरी वीज वापर 334 युनिट प्रति महिना असा असल्याचे दिसून येते. वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास चुकीच्या वीज बिलाची आकारणी केल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे नव प्रकाश योजनेत अर्जदार पात्र असताना देखील त्यांना या योजने पासून वंचित ठेवून कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला, ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. आदेश - गैरअर्जदार यांनी अर्जदारास नवप्रकाश योजनेत सामावून घेऊन त्यांना जुलै 2008 पूर्वीची थकबाकीची मागणी करु नये.
- जानेवारी 2009 ते सप्टेबर 2009 या काळात अर्जदारास 334 युनिट प्रति महिना या प्रमाणे वीज बिल आकारणी करावी व त्यानुसार वीज बिल दुरुस्त करुन द्यावे व यावर कोणतेही व्याज व दंड आकारु नये.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासा बद्दल रुपये 1,500/- व खर्चा बद्दल रुपये 1,000/- 30 दिवसात द्यावेकिंवा सदर रक्कम त्याच्या देयकामध्ये समायोजित करावी.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |