Maharashtra

Bhandara

CC/18/72

SANGITA MADAN CHACHERE - Complainant(s)

Versus

DIVISIONAL MANAGER. THE ORIENTAL INSURANCE CO. L.T.D. - Opp.Party(s)

MR. UDAY P. KSHIRSAGAR

29 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/72
( Date of Filing : 31 Oct 2018 )
 
1. SANGITA MADAN CHACHERE
R/O SAVARI. TA.LAKHANI. BHANDARA
BHANDARA
MAHARSHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL MANAGER. THE ORIENTAL INSURANCE CO. L.T.D.
PLOT NO.321..A 2 OSWAL BANDHU SAMAJ BUILDING. J.N.ROAD. PUNE 411042
PUNE
MAHARSHTRA
2. DIVISIONAL MANAGER. THE ORIENTAL INSURANCE CO. L.T.D
DIVISION OFFICE NO.3. PLOT NO. 321. A.2 OSWAL BANDHU SAMAJ BUILDING. J.N.ROAD. PUNE.411042
PUNE
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. UDAY P. KSHIRSAGAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 29 Nov 2019
Final Order / Judgement

                                  (पारीत व्‍दारा  श्री नितीन माणिकराव घरडे, सदस्‍य.)

                                                                                                (पारीत दिनांक– 29 नोव्‍हेंबर, 2019)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे भाऊ याचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा भाऊ मृतक श्री राजू रामदास दिघोरे हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- सावरी, तहसिल लाखनी, जिल्‍हा भंडारा, येथे भुमापन क्रं 140/1  या वर्णनाची होती.

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा भाऊ नामे श्री राजू रामदास दिघोरे याचा दिनांक-19.09.2018 रोजी पायी जात असताना एका ट्रकने धडक दिल्‍याने मृत्‍यु झाला. यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या भाऊचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती बहीण या नात्‍याने “लाभार्थी” आहे. तिचे भाऊचे मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी लाखनी, जिल्‍हा भंडारा  यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-13.12.2017 रोजी दाखल केला होता. विरुध्‍दपक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली होती.

      तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने दिनांक-06.03.2018 रोजीचे पत्राव्‍दारे मृतकाचे नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही असे कारण दर्शवून तिचा विमा दावा नामंजूर केला. ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तकारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याचा दिनांक-13.12.2017 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 50,000/- आणि तक्रार खर्च रुपये-20,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे.

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय, पुणे यांना ग्राहक मंचाव्‍दारे रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळाल्‍या बद्यलची रजि.पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु ते अशी रजि.नोटीस मिळूनही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश ग्राहक मंचाने प्रकरणात दिनांक-18.04.2019 रोजी पारीत केला.

04.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांनी आपले लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 61 व 62 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, विमाधारक मृतक श्री राजू दिघोरे हा तक्रारकर्तीचा भाऊ होता व तक्रारकर्तीचे लग्‍न झालेले असल्‍याने ती त्‍याचे उत्‍पनावर आश्रीत नव्‍हती करीता तक्रारकर्ती ही विमा योजने मध्‍ये लाभार्थी म्‍हणून शासनाच्‍या परिपत्रका प्रमाणे पात्र होत नाही. तसेच त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक श्री राजू रामदास दिघोरे हयाचे नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही, त्‍यामुळे या कारणास्‍तव तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्‍यात आला त्‍याप्रमाणे त्‍यांनी तसे तक्रारकर्तीला दिनांक-06.03.2018 रोजीचे पत्रान्‍वये कळविले. तक्रारकर्तीचा विमा दावा हा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार देय नसल्‍याने दावा नामंजूर केला. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

05.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर पान कं 65 व 66 वर दाखल केले. त्‍यांनी तक्रारकर्तीचे मृतक भाऊ याचे नावे मौजा सावरी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे शेती होती व तो शेतीचा व्‍यवसाय करीत होता या बाबी मान्‍य केल्‍यात. तक्रारकर्तीचा भाऊ याचा रस्‍त्‍याने पायी जात असताना एका ट्रकने धडक दिल्‍याने मृत्‍यू झाल्‍याची बाब सुध्‍दा मान्‍य केली. पुढे त्‍यांनी असे नमुद केले की, शेतकरी जनता अपघात विमा योजना शासन निर्णय क्रं-शेअवि-2009/प्र.क्रं 268/11-अे, दिनांक-04.12.2009 नुसार मृतक शेतक-याची विवाहित बहीण ही वारसदार असते. तक्रारकर्तीने त्‍यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-21.12.2017 रोजी दाखल केला असता त्‍यांनी लगेच दुसरे दिवशी म्‍हणजे दिनांक-22.12.2017 रोजी जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दाखल केला. विमा दावा मंजूर करणे अथवा नामंजूर करणे ही बाब त्‍यांचे अधिकारक्षेत्रात येत नाही. करीता त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

06.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय-2016-2017, तिचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे पत्र, तिने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला विमा दावा प्रस्‍ताव, तिचे मृतक भाऊ याचे नावाचा 7/12 उतारा व ईतर शेतीचे दस्‍तऐवज, मृतकाचा शव विच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे भाऊ याचे वयाचा पुरावा, ग्राम पंचायत पोहरा यांचे प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 74 ते 76  वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-79 व 80 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 61 व 62 वर दाखल केले. तसेच पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ठ क्रं- 78  वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

08.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र,  विरुध्‍दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर व शपथपत्र  तसेच वि.प.क्रं 3 यांचे लेखी उत्‍तर तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्री विनय भोयर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन ग्राहक मंचा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची ग्राहक होते काय

-होय-

2

वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

3

काय आदेश

अंतिम आदेशा नुसार

                                                                                                    :: निष्‍कर्ष ::

मुद्या क्रं 1 बाबत

09.  तक्रारकर्तीचा मृतक भाऊ शेतकरी होता, त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश होता व तक्रारकर्तीचे भाऊ याचा मृत्‍यु ट्रकने धडक दिल्‍याने दिनांक-19/09/2017 रोजी झाला या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत.

10.   तक्रारकर्तीने आपल्‍या लेखी युक्‍तीवादा मध्‍ये ही बाब स्‍पष्‍टपणे नमुद केली आहे की, ती, तिचे भाऊ व एक बहीण असे मिळून मौजा सावरी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा येथील भूमापन क्रं 140/1 या शेतजमीनीवर उत्‍पादन घेत होते व त्‍या उत्‍पन्‍ना पासून ते कुटूंबाचे पालनपोषण करीत होते.  विरुध्‍दपक्ष क्र 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, शेतकरी जनता अपघात विमा योजना शासन निर्णय क्रं-शेअवि-2009/प्र.क्रं 268/11-अे, दिनांक-04.12.2009 नुसार मृतक शेतक-याची विवाहित बहीण ही वारसदार असते, त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची ग्राहक (लाभार्थी) आहे करीता मुद्या क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्या क्रं 2 व 3 बाबत

11.    तक्रारकर्तीने तक्रारी बरोबर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता दस्‍तऐवज क्रं 2 जे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीचे अंतिम अस्विकार पत्र दिनांक-06.03.2018 रोजीचे असून त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्तीने दाखल केलेला दावा हा पॉलिसीच्‍या नियम व अटीच्‍या तुलनेत कसुन तपासणी केली असता सदरचा विमा दावा हा मृतक व्‍यक्‍तीच्‍या नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा व 6-ड यावर नाव नमुद नसल्‍या कारणास्‍तव रद्य करण्‍यात येतो.

12.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ती ही मृतक श्री राजू दिघोरे याची विवाहीत बहीण असल्‍या कारणास्‍तव ती त्‍याचे उत्‍पनावर आश्रीत नव्‍हती त्‍यामुळे ती विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही. तर विरुध्‍दपक्ष क्र 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे शेतकरी जनता अपघात विमा योजना शासन निर्णय क्रं-शेअवि-2009/प्र.क्रं 268/11-अे, दिनांक-04.12.2009 नुसार मृतक                  शेतक-याची विवाहित बहीण ही वारसदार असते, येथे विरुध्‍दपक्ष क्रं 2 व विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांनी दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरांमध्‍ये ग्राहक मंचास विसंगती आढळून येते.

13.  अभिलेखावरील दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता दिनांक-24 ऑक्‍टोंबर, 2017 रोजी पर्यंतचे 7/12 उता-या मध्‍ये मृतक श्री राजू रामदास दिघोरे याचे नाव नमुद असल्‍याचे दिसून येते.

14.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूरीचे पत्रात मृतक  श्री राजू रामदास दिघोरे हयाचे नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा व 6-ड नाही असे कारण नमुद केलेले आहे.

     या संदर्भात तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला-

     IV (2012) CPJ 51 (N.C.) . NATIONAL CONSUMER DISUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – Reliance General Insu. co. ltd.. – Vs Sakorba Hetubha Jadeja  & ors

       या प्रकरणात जर शेतकरी अपघात विमा योजना लागू होण्यापूर्वी शेतक-याच्या वडिलांच्या मृत्‍युमुळे त्याला शेतजमिनीत वारसा हक्काने मालकी झाली असेल परंतु वेळीच फेरफार घेण्यांत न आल्याने विमा योजना सुरू झाली त्या दिवशी अशा शेतक-याचे नांव 7/12 मध्ये नोंदले नसेल आणि ते नंतर नोंदण्यात आले असेल तर असा शेतकरी अपघाताने मरण पावल्यास त्याचे वारस शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात काय? असा मुद्दा माननीय राष्ट्रीय आयोगासमोर उपस्थित झाला होता.  त्यात माननीय राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

      “ Nothing among the records produced by Mr. Nandwani (from among those produced before and considered by the District Forum) is contrary to the cogent analysis of the documentary evidence by the District Forum. Moreover, if as per the entries in  Village Form 6 extract, the date of death of Bharmalji Bapeeji Jadeja was nearly five months before the date of the said entry’    i.e., 12.04.2002, Bharmalji died sometime in December 2001.   Hence, all his legal heirs became registered farmers immediately after the death of their father and it was only the statutory process   of registration of the legal heirs in the village record of rights after the death of a farmer that took time, leading to the final entry    showing the names of Hetubha Jadeja and others as the legal right   pertaining to the agricultural land owned by their father being       made in Village Form 6 on 12.04.2002. Therefore, it has to be held that sometime in December 2001, i.e., well before  26.01.2002, the date of inception of the insurance policy in question, Hetubha Jadeja become a registered farmer as one of the legal heir of his deceased father who was a registered farmer.     Hence, on his death in May 2002, his heirs, i.e. the    respondents/complainants were entitled to receive the sum assured within 30 days of the proposal for claim being submitted.”

            माननीय राष्ट्रीय आयोगाच्या वरील निर्णयाच्या आधारे हे स्पष्ट होते की, हातातील प्रकरणातील पान क्रं 21 वर दाखल 7/12 उता-याचे प्रतीवरुन असे स्‍पष्‍ट होते की, सदर 7/12 उतारा हा दिनांक-24.10.2017 रोजी पर्यंत अद्यायावत केलेला असून त्‍यामध्‍ये मृतक राजू रामदास दिघोरे याची आई श्रीमती सुलोचना रामदास दिघोरे हिचे मृत्‍यू नंतर तिचे नाव सदर 7/12 उता-या मधून कमी केलेले असून त्‍याऐवजी तिचे कायदेशीर वारसदार म्‍हणून तिचा मुलगा मृतक श्री राजू रामदास दिघोरे आणि तिच्‍या विवाहित मुली नामे संगीता मदन चाचेरे (या प्रकरणातील तक्रारकर्ती) आणि सुनिता प्रमोद नान्‍हे यांची नावे नमुद केलेली आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा असा आक्षेप आहे की, मृतक श्री राजू रामदास दिघोरे हयाचे नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही, त्‍यामुळे या कारणास्‍तव तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्‍यात आला. परंतु उपरोक्‍त नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडया प्रमाणे जर शेतकरी अपघात विमा योजना लागू होण्यापूर्वी शेतक-याच्या वडिलांच्या मृत्‍युमुळे त्याला शेतजमिनीत वारसा हक्काने मालकी झाली असेल परंतु वेळीच फेरफार घेण्यांत न आल्याने विमा योजना सुरू झाली त्या दिवशी अशा शेतक-याचे नांव 7/12 मध्ये नोंदले नसेल आणि ते नंतर नोंदण्यात आले असेल तर असा शेतकरी अपघाताने मरण पावल्यास त्याचे वारस शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. आमचे समोरील हातातील प्रकरणात मृतक श्री राजू रामदास दिघोरे याचे पूर्वी जमीनीच्‍या अभिलेखामध्‍ये त्‍याची आई श्रीमती सुलोचना रामदास दिघोरे हिचे नाव नोंद होते, याचाच अर्थ असा होतो की, तिची मुले म्‍हणजे मृतक श्री राजू रामदास दिघोरे आणि तिच्‍या विवाहित मुली (तक्रारकर्ती आता विवाहित नंतरचे नाव सौ.संगीता मदन चाचेरे) सौ.संगीता मदन चाचेरे आणि सुनिता प्रमोद नान्‍हे  हे त्‍यावेळी सुध्‍दा शेतीचे मालक होते व आहेत. आई श्रीमती सुलोचना रामदास दिघोरे हिचे मृत्‍यू नंतर जरी मृतक श्री राजू रामदास दिघोरे याचे नाव जमीन अभिलेखामध्‍ये नोंदविल्‍या गेले असेल तरी शेतकरी अपघात योजना सुरु होण्‍याचा दिनांक-30.11.2016 चे पूर्वीपासून शेतकरी होता ही बाब उपरोक्‍त मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे न्‍यायनिवाडयाचा अभ्‍यास केल्‍यास स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची मृतक श्री राजू रामदास दिघोरे याचे नावाचा शेतकरी अपघात विमा योजना सुरु होण्‍याचा दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही या कारणास्‍तव तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती चुकीची असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे हातातील प्रकरणात हा न्‍यायनिवाडा तंतोतंत लागू पडतो. करीता ग्राहक मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे मृतक भाऊ याचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा नामंजूर करुन सेवेत त्रृटी दिल्‍याची बाब स्‍पष्‍ट दिसून येते. करीता तक्रारकर्ती ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे मृतक भाऊ याचे अपघाती मृत्‍यू संबधात विम्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे तसेच नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

15.   या ठिकाणी आणखी एक बाब स्‍पष्‍ट करणे जरुरी आहे की, हातातील तक्रारीमध्‍ये  ग्राम पंचायत पोहरा, पंचायत समिती लाखनी, जिल्‍हा परिषद भंडारा येथील सरपंच यांनी दिनांक-18.11.2017 रोजी दिलेले प्रमाणपत्र अभिलेखावर पान क्रं 48 वर दाखल आहे, त्‍यामध्‍ये असे नमुद आहे की, मृतक विमाधारक श्री राजू रामदास दिघोरे हा मृत्‍यू पावलेला असून त्‍याचे आई वडील सुध्‍दा मृत्‍यू पावलेले आहेत आणि मृतक श्री राजू रामदास दिघोरे याचे मृत्‍यू नंतर त्‍याच्‍या बहिणी अनुक्रमे श्रीमती संगीता मदन चाचेरे आणि श्रीमती सुनिता प्रमोद नान्‍हे हया आहेत. परंतु प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक मंचा समोर श्रीमती संगिता मदन चाचेरे हिने दाखल केलेली आहे, त्‍यामुळे ग्राहक मंचा समोर प्रश्‍न निर्माण झाला होता की, मृतक विमाधारक शेतकरी श्री राजू रामदास दिघोरे याचे अपघाती मृत्‍यू प्रकरणात विमाराशी आणि अन्‍य नुकसान भरपाईच्‍या रकमा तसेच तक्रारीची रक्‍कम तक्रारकर्ती श्रीमती संगिता मदन चाचेरे हिला अदा कराव्‍यात किंवा कसे. या संदर्भात तक्रारकर्तीचे वकील   श्री उदय क्षिरसागर यांचे जवळ सदर मुद्दा ग्राहक मंचाव्‍दारे मौखीक युक्‍तीवादाचे वेळी उपस्थित करण्‍यात आला होता, त्‍यानुसार दिनांक-26.11.2019 रोजी तक्रारकर्ती श्रीमती संगिता मदन चाचेरे हिचे पती श्री मदन देवराम चाचेरे हे ग्राहक मंचा समोर उपस्थित झाले व त्‍यांनी दस्‍तऐवज दाखल करण्‍यास परवानगी अर्ज दाखल केला, सदर अर्ज ग्राहक मंचाव्‍दारे मंजूर करुन दस्‍तऐवज अभिलेखावर घेण्‍यात आलीत, सदर दस्‍तऐवजा मध्‍ये श्री मदन देवराम चाचेरे यांनी आपले आधार कॉर्डची प्रत ओळखीचा पुरावा म्‍हणून दाखल केली तसेच श्रीमती सुनिता प्रमोद नान्‍हे हिने तक्रारकर्ती श्रीमती संगिता मदन चाचेरे हिचे नावाने रुपये-100/- चे स्‍टॅम्‍पपेपरवर लाखनी येथे दिनांक-14.12.2017 रोजी लिहून दिलेल्‍या सम्‍मतीपत्राची प्रत दाखल केलेली  असून, सदर सम्‍मतीपत्रामध्‍ये श्रीमती सुनिता प्रमोद नान्‍हे हिने प्रस्‍तुत तक्रारीतील निकालपत्राप्रमाणे विमाराशीची उचल तिची बहिण आणि तक्रारकर्ती श्रीमती संगिता मदन चाचेरे हिने उचल केल्‍यास तिची व तिचे कायदेशीर वारसदारांची कोणतही हरकत राहणार नाही असे नमुद केलेले आहे. सदर सम्‍मतीपत्रवर दोन साक्षीदारांच्‍या सहया सुध्‍दा आहेत. अशाप्रकारे श्रीमती सुनिता प्रमोद नान्‍हे हिने सम्‍मतीपत्र लिहून दिल्‍यामुळे तक्रारकर्ती श्रीमती संगिता मदन चाचेरे हिचे नावे निकालपत्रा प्रमाणे विमा राशी तसेच नुकसानभरपाईच्‍या रकमा, त्‍याच बरोबर तक्रारीचा खर्च मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे.

16.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                                                      :: आदेश ::

(01)  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी, अनुक्रमे विभागीय कार्यालय, पूणे व क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्‍द  वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे भाऊचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-06.03.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1  व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04) विरुध्‍दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, लाखनी,जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.