( निकालीपत्र पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
::निकालपत्र::
(पारीत दिनांक –24 मे,2012 )
1. तक्रारकर्ता/अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार गैरअर्जदार/विरुध्दपक्ष मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ता/अर्जदाराची संक्षीप्त तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार चैतन्यवाडी क्रेडीट को ऑपरेटीव्ह सोसायटी, नागपूर (निकालपत्रात यापुढे गैरअर्जदार यांचा उल्लेख "गैरअर्जदार सहकारी संस्था" असा संक्षीप्त करण्यात येईल) मध्ये बचतठेव खाते क्रमांक-3109 मध्ये रुपये-1,88,219/- एव्ढी रक्कम गुंतविली होती. सदर रक्कम मागणीसाठी तक्रारकर्त्याने गैरअर्जदार सहकारी संस्थेमध्ये दिनांक-24.08.2009 रोजी अर्ज सादर केला. सदर अर्ज दि.27.08.2009 पासून ते आता पावेतो तसाच प्रलंबित अवस्थेत आहे व अद्यापही गैरअर्जदार सहकारी संस्थेने तक्रारकर्त्याची रक्कम मागणी करुनही दिलेली नाही.
3. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने सदरची रक्कम देय व्याजासह परत मिळावी म्हणून गैरअर्जदार सहकारी संस्थेला दिनांक 10.02.2011 रोजीची रजिस्टर नोटीस पाठवून मागणी केली परंतु अद्यापही तक्रारकर्त्यास सदरची रक्कम देय व्याजासह मिळालेली नाही आणि ही गैरअर्जदार सहकारी संस्थेच्या सेवेतील त्रृटी आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक: 156/2011
4. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचात दाखल केली आणि तीद्वारे गैरअर्जदार कडून रक्कम रुपये-1,88,219/- आणि सदर रकमेवर व्याज यासह येणारी रक्कम मिळावी. तसेच त.क.ला झालेल्या मानसिक त्रासा बद्यल रुपये-10,000/- गैरअर्जदार कडून मिळावेत अशा मागण्या केल्यात.
5. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे मार्फतीने यामधील गैरअर्जदार सहकारी संस्थेस नोटीस पाठविली असता, गै.अ.संस्थेचे वतीने व्यवस्थापक शा.या.खडककार यांनी दिनांक-12.10.2011 रोजी लेखी जबाब दाखल करण्यास वेळ मागणारा अर्ज न्यायमंचा समक्ष सादर केला, सदर अर्ज न्यायमंचाने मंजूर केला. त्यानंतर गै.अ.सहकारी संस्थेच्या तर्फे सचिव चंद्रभान रघुनाथ आपतूरकर यांनी दिनांक-31.01.2012 रोजी न्यायमंचा समक्ष पान क्रं 16 वर अर्ज दाखल केला, सदर अर्जामध्ये नमुद केले की, गैरअर्जदार संस्थेत दिनांक-15.10.2011 रोजी प्रशासकाची नियुक्ती झालेली असून त्यांनी दिनांक 31.10.2011 रोजी चॉर्ज दिला व त्यासंबधाने त्यांनी प्रशासकाचे या आशयाचे दिनांक 24 ऑक्टोंबर, 2011 रोजीचे पत्र पान क्रं 17 वर दाखल केले.
6. गैरअर्जदार सहकारी संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याचे कळल्या वरुन तक्रारकर्त्याने न्यायमंचा समक्ष पान क्रं 19 वर अर्ज दाखल करुन प्रस्तुत प्रकरणात प्रशासकास विरुध्दपक्ष क्रं 2 म्हणून सामील. करण्याचा अर्ज दाखल केला, सदर अर्ज न्यायमंचाने मंजूर करुन दुरुस्ती करुन वि.प.ला नोटीस काढावी असा आदेश दिनांक 22.03.2012 रोजी पारीत केला परंतु तक्रारकर्त्याने शेवट पर्यंत मूळ तक्रारअर्जात दुरुस्ती केली नाही व प्रशासकास प्रस्तुत प्रकरणात विरुध्दपक्ष म्हणून सामील केले नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक: 156/2011
7. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे गैरअर्जदार सहकारी संस्थेस आपले म्हणणे न्यायमंचा समक्ष मांडण्याची योग्य संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही म्हणून गैरअर्जदार सहकारी संस्थे विरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने दिनांक-17.12.2011 रोजी प्रकरणात पारीत केला.
8. तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं 3 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये पासबुकाची प्रत, गैरअर्जदार संस्थेत दिलेले रकमेची मागणी करणारे पत्र, रजिस्टर नोटीस प्रत, नोटीस परत आल्या बद्यल पोस्टाचे दस्तऐवजाची प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
9. प्रस्तुत प्रकरणात त.क.ला युक्तीवादासाठी अंतिम संधी देऊनही त.क. तर्फे कोणीही युक्तीवादाचे वेळी उपस्थित नव्हते. गैरअर्जदार विरुध्द यापूर्वीच प्रकरणात एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला होता.
10. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार ,प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
11. प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती तसेच उपलब्ध दस्तऐवज पाहता, तक्रारकर्त्याची त्याचे गैरअर्जदार सहकारी संस्थेमध्ये असलेल्या बचतखात्यात दिनांक-30.01.2009 रोजी रक्कम रुपये-1,88,219/- एवढी रक्कम जमा होती ही बाब दाखल दस्तऐवजा वरुन दिसून येते. तसेच दाखल दस्तऐवजा वरुन असेही
ग्राहक तक्रार क्रमांक: 156/2011
दिसून येते की, तक्रारदाराने काही आर्थिक अडचणीस्तव सदर रकमेची गैरअर्जदार सहकारी संस्थेकडे मागणी केली होती परंतु गैरअर्जदार सहकारी संस्थेने अदयाप पावेतोही तक्रारदारास त्याची व्याजासह देय असलेली रक्कम परत केली नाही आणि ही गैरअर्जदार सहकारी संस्थेच्या सेवेतील त्रटी आहे. सद्य स्थितीत गैरअर्जदार सहकारी संस्थेवर शासना तर्फे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याचे दाखल दस्तऐवजा वरुन व गैरअर्जदार संस्थेच्या कथना वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराची व्याजासह देय असलेली रक्कम आणि त.क.यास झालेल्या मानसिक शारिरीक त्रासा बद्यल व प्रस्तुत तक्रारीचे खर्चा बद्यल नुकसान भरपाई गैरअर्जदार सहकारी संस्थेच्या अकाऊंट मधून देण्याची जबाबदारी, गै.अ.संस्थे तर्फे प्रशासकाची राहिल.
12. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1) तक्रारदाराचीतक्रार गैरअर्जदार सहकारी संस्थे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात
येते.
2) गैरअर्जदार सहकारी संस्थेने, तक्रारकर्त्यास रुपये -1,88,219/-(अक्षरी रुपये-
एक लक्ष अठठयाऐंशी हजार दोनशे एकोणीस फक्त ) एवढी रक्कम
दिनांक-30.01.2009 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो गैरअर्जदार
सहकारी संस्थे तर्फे प्रचलीत बचतखात्यावर देण्यात येणा-या व्याजासह येणारी
संपूर्ण रक्कम परत करावी.
ग्राहक तक्रार क्रमांक: 156/2011
3) गैरअर्जदार सहकारी संस्थेने, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक
त्रासापोटी रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) आणि तक्रारीचे
खर्चापोटी रुपये 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) गैरअर्जदार सहकारी संस्थेतर्फे संबधितांनी सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची
प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.