Maharashtra

Gadchiroli

CC/11/23

Someshwar Mukhru Dhote - Complainant(s)

Versus

Cabal Insuarance co ltd - Opp.Party(s)

Adv. Raut

30 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/23
 
1. Someshwar Mukhru Dhote
Saigaon Tah Armori
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Cabal Insuarance co ltd
11, Daga Lay out Ambazhari Road Nagpur
nagpur
Maharashtra
2. Tahsildar Armori
Armori
Gadchiroli
Maharashtra
3. Branch Manager National Insurance co ltd
Dhantoli Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्‍यक्ष(प्रभारी))

(पारीत दिनांक : 30 मार्च 2012)

                                      

1.           अर्जदाराने सदर तक्रार, शेतकरी अपघात विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता दाखल केली असून,  जुना मुळ तक्रार क्र.3/2008 मध्‍ये आदेश दि.23 जुन 2008 अन्‍यये पारीत झाला. मा.राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई, सर्कीट बेंच, नागपूर यांचे कडील अपील क्र.A/08/877 आदेश दि.4.5.11 चे आदेशान्‍वये सदर तक्रारीत गै.अ.क्र.3 ला जोडण्‍याची परवानगीसह केस पुन्‍हा चालविण्‍याकरीता मंचाकडे पाठविण्‍यात आली.  मा.राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई, सर्कीट बेंच, नागपूर यांचे कडील अपील क्र.A/08/877 आदेश दि.4.5.11 चे आदेशान्‍वये मुळ तक्रारीत दुरुस्‍ती करण्‍यात आली व नवीन तक्रार क्रमांक देण्‍यात आला. तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

2.          अर्जदार हा मृतक इंशुअर्ड मुखरु सेामा धोटे याचा मुलगा असून मुखरुचा अपघात दि.4.6.2007 ला शेतातील झाडावरुन पडून गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्‍यान दि.12.6.2007 ला नागपूर मेडीकल कॉलेज येथे मृत्‍यु झाला.  अर्जदार हा सोमेश्‍वर च्‍या वडीलाच्‍या नांवे शेतजमीन असून ते सदर जमीनीतून उत्‍पन्‍न घेत होते. 

 

3.          महाराष्‍ट्र सरकाने महाराष्‍ट्रातील शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा काढला असल्‍यामुळे व त्‍याची विदर्भातील जबाबदारी नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि.कडे व कबाल इन्‍सुरन्‍स सर्व्‍हीस प्रा.लि. या विमा कंपनीकडे आहे. तसा, महाराष्‍ट्र सरकारने नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि. व कबाल इन्‍शुरन्‍स सोबत करार केला आहे व प्रिमियमची रक्‍कम कंपनीकडे भरलेली आहे. अर्जदाराच्‍या वडीलाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यु झाल्‍यानंतर डॉ.नगराळे साहेब, मेडीकल कॉलेज, नागपुर यांनी त्‍याचा पोष्‍टमार्टम दि.13.7.2007 रोजी केला. अर्जदाराने शेतकरी अपघात विमा मिळावा व सर्व कागदपञासहीत तलाठी, शिवणी बुज. मार्फत तहसिलदार आरमोरी यांचेकडे अर्ज सादर केला होता.  तहसिलदार आरमोरी यांनी दि.10.9.2007 चे आपले अर्जाचे संदर्भ देवून दि.29 सप्‍टेंबर 2007 ला सोमोश्‍वर मुखरु धोटे म्‍हणजेच अर्जदाराला ञुटीचे पञ दिले.  अर्जदाराने पञ मिळताच दोन-चार दिवसात कुंटुंब विवरणपञ, सुधारीत 7/12 ची पुर्तता केली.  अर्जदाराने सर्व कागदपञाची पुर्तता करुन सुध्‍दा अर्जदाराला त्‍याच्‍या मृतक इन्‍शुअर्ड वडीलाच्‍या विमा मिळावा म्‍हणून तहसिलदार, आरमोरी यांचेकडे वारंवार चौकशी करुन सुध्‍दा विम्‍याची रक्‍कम न मिळाल्‍यामुळे नाईलाजास्‍तव ग्राहक न्‍यायमंचाकडे सादर केली. अर्जदाराने शेतकरी अपघात

 

... 3 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

 

विमा अंतर्गत न मिळालेली रक्‍कम रुपये 1,00,000/-, नुकसान भरपाई खर्च रुपये 15,000/- असे एकूण रक्‍कम रुपये 1,15,000/- मिळावी व विम्‍याची रक्‍कम न मिळाल्‍यामुळे अर्जाच्‍या तारखेपासून 18 टक्‍के व्‍याज गै.अ.क्र.1, 2 व 3 कडून देण्‍याची प्रार्थना केली आहे.

 

4.          अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 17 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नव्‍याने पुनश्‍च नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्‍यात आले.  गै.अ.क्र.1 ने नि.क्र.16 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले. गै.अ.क्र.2 यांनी दि.15.4.2008 ला पञाव्‍दारे म्‍हणणे सादर केले व त्‍यासोबत कागदपञ दाखल केले आहेत.  गै.अ.क्र.3 ने हजर होऊन नि.क्र. 18 नुसार लेखी बयान दाखल केले.

 

5.          गै.अ.क्र.1 ने लेखी उत्‍तरात नमूद केले की, सदर तक्रारीतून कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि. ला निर्दोष मुक्‍त करावे अशी विनंती केली आहे.  तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाहीत, परंतु, ज्‍या विमा कंपनीने राज्‍य शासनाकडून विमा प्रिमीयम स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे, त्‍याचेच ग्राहक होऊ शकतात.  आम्‍ही केवळ सल्‍लागार आहोत व शासनास विना मोबदला सहाय्य करतो.  यामध्‍ये, मुख्‍यत्‍वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषि अधिकारी/तहसिलदार यामार्फत आमच्‍याकडे आल्‍यावर विमा दावा अर्ज योग्‍यपणे भरला आहे कां ? सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्‍याप्रमाणे आहेत कां ?  नसल्‍यास तालुका कृषि अधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्‍यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्‍य कागदपञे मिळाल्‍यावर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, ऐवढाच आहे.  मृतकमुखरु सोमा धोटे, गांव - सायगाव, तालुका – आरमोरी, जिल्‍हा – गडचिरोली सदरील अपघात हा दि.4.6.2007 रोजी झाला.  सदरी दावा हा आमच्‍या कार्यालयास प्राप्‍त झाल्‍यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नॅशनल इंन्‍शुरन्‍स कंपनी, मुंबई यांचेकडे पाठविण्‍यात आला.  सदर दाव्‍या विषयी वारंवार विचारणा करुनही दावा अर्ज विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. त्‍यामुळे, आम्‍हांस योग्‍यत्‍या दोषी कडून कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्‍यास भाग पाडल्‍याने या अर्जाचा खर्च रक्‍कम रुपये 5000/- देण्‍याचा व तक्रारीतून निर्दोष मुक्‍तता करण्‍यात यावी, अशी विनंती केली.

 

6.          गै.अ.क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, श्री मुखरु सोमा धोटे याचा दि.12.7.2007 रोजी अपघाता झाला.  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेला आहे.  या कार्यालयातील पञ दि.25.10.2007 अन्‍वये सदर

 

... 4 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

 

प्रस्‍ताव व्‍यवस्‍थापक कबाल इंन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि., यांना अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणेबाबत पाठविण्‍यात आलेला आहे. श्री उदय कांबळे, विभागीय व्‍यवस्‍थापक, नॅशनल इन्‍श्‍योरंस कंम्‍पनी मुंबई यांचे पञ दि.31.10.07 नुसार श्री मुखरु सोमा धोटे यांचे प्रस्‍ताव या कार्यालयास परत करण्‍यात आलेले होते.  सदर प्रकरणातील ञुटीची पुर्तता करुन हा प्रस्‍ताव या कार्यालयातील पञ दि.28.1.2008 अन्‍वये कार्यालयास पुनश्‍च सादर करण्‍यात आलेले आहे.  प्रकरण विमा कंपनी यांचेकडून प्रलंबीत आहे.  या कार्यालयाकडून कोणताही विलंब झालेला नाही.

 

7.          गै.अ.क्र.3 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराने मृतक मुखरु च्‍या मृत्‍युबद्दल शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी सादर केलेला दावा, विमा पॉलिसीच्‍या तरतूदीनुसार नियमबाह्य असल्‍यामुळे नामंजूर करण्‍यात आलेला आहे.  तक्रारीतील संपूर्ण मजकूर असत्‍य व खोटा, तसेच बनावट स्‍वरुपाचा असून अमान्‍य व नाकबूल आहे. अर्जदाराने नुकसान भरपाईसाठी दि.10.9.2007 रोजी अर्ज केला होता व त्‍याला दि.19.9.2007 चे पञान्‍वये ञुटी पूर्ण करण्‍यासंबंधी पञ देण्‍यात आले होते.  नुकसान भरपाईची मागणी करण्‍यासाठी आवश्‍यक ते दस्‍ताऐवज वेळीच सादर केलेले नाहीत.  त्‍यामुळे मागणी मान्‍य करण्‍याचा प्रश्‍नच येत नव्‍हता, म्‍हणून नियमानुसार ञुटींची पुर्तता लगेच केलेली नाही या कारणास्‍तव मागणी नियमाप्रमाणे अमान्‍य करण्‍यात आलेली आहे. 

 

8.          गै.अ.क्र.3 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराने तहसिलदार आरमोरी यांचेकडून कौटुंबीक विवरण प्रमाणपञ दि.22.10.2007 ला प्राप्‍त करुन घेतले आहे.  तसेच, अर्जदाराने गांव नमुना-6(क) वारसा प्रकरणाची नोंदवही दि.16.1.2008 ला प्राप्‍त करुन घेतली आहे.  वरील दोन्‍ही दस्‍ताऐवज सन 2008 च्‍या जानेवारी महिन्‍याच्‍या शेवटी क्‍लेम सादर केलेले आहेत. त्‍यामुळे, अपूर्ण दस्‍ताऐवजाच्‍या आधारावर सादर केलेला क्‍लेम मंजूर करण्‍यात आलेला नाही व त्‍यासाठी केवळ अर्जदार सर्वस्‍वी जबाबदार आहे. अर्जदाराचा दावा नियमबाह्य असल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावा, अशी विनंती केली आहे.  

 

9.          अर्जदाराने नि.क्र.19 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. गै.अ.क्र.3 ने दाखल केलेले लेखी बयान हेच रिजॉईन्‍डरचा भाग समजण्‍यात यावा अशी पुरसीस नि.क्र.20 नुसार दाखल केली.  तसेच, गै.अ.क्र.3 ने नि.क्र.21 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन व गै.अ.क्र.3 ने

 

 

... 5 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

 

दाखल केलेला लेखी युक्‍तीवाद व अर्जदाराचे वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

//  कारणे व निष्‍कर्ष  //

 

10.         प्रस्‍तुत तक्रार अर्जदार सोमेश्‍वर यांनी दाखल केलेल्‍या तक्रार क्र.3/08 मध्‍ये आदेश दि.23 जुन 2008 ला पारीत करण्‍यात आला होता.  गै.अ.क्र.1 यांनी सदर आदेशाचे विरुध्‍द मा.राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, सर्कीट बेंच नागपूर यांचेकडे अपील दाखल करण्‍यात आले.  गै.अ.क्र.1 ची अपील मंजूर करुन प्रकरण या मंचाकडे पुन्‍हा चालविण्‍याकरीता पाठविण्‍यात आले.  

 

11.          गै.अ.क्र.3 ला अपीलाचे आदेशानुसार तक्रारीत जोडण्‍यात आले.   गै.अ.क्र.3 यांनी आपले लेखी उत्‍तर मृतक मुखरु यांच्‍या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा मिळण्‍याकरीता सादर केला.  तो दावा पॉलिसीच्‍या तरतुदीनुसार नियमबाह्य असल्‍यामुळे नामंजूर करण्‍यात आलेला आहे.  गै.अ.क्र.3 यांनी विमा दावा कोणत्‍या तारखेला नामंजूर केला, याचा कुठलाही उल्‍लेख, लेखी उत्‍तरात केलेला नाही.  तसेच, दावा नामंजूर केल्‍याचे कुठलेही दस्‍ताऐवज रेकॉर्डवर दाखल केलेले नाही.  उलट, गै.अ.क्र.1 यांनी विनाशपथपञावर लेखी उत्‍तर पोष्‍टामार्फत पाठविले आहे.  सदर लेखी उत्‍तर शपथपञावर नसल्‍यामुळे ठोस पुरावा म्‍हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  परंतु, गै.अ.क्र.1 ने त्‍यात मान्‍य केले आहे की, मृतकमुखरु सोमा धोटे, राह. सायगांव याच्‍या अपघाती मृत्‍युनंतर विमा दावा कार्यालयास प्राप्‍त झाल्‍यानंतर पुढील कार्यवाहीकरीता नॅशनल इंशुरन्‍स कंपनी, मुंबई यांचेकडे पाठविण्‍यात आला.  सदरील दाव्‍या विषयी विमा कंपनीकडे वारंवार विचारणा करुनही सदरील दावा अर्ज हा विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे.  या गै.अ.क्र. 1 च्‍या कथनावरुन आणि गै.अ.क्र. 3 ने पॉलिसी तरतुदीच्‍या नियमबाह्य असल्‍याने नामंजूर करण्‍यात आला, असे कथन केले आहे, यात दोन्‍ही गै.अ. च्‍या कथनावरुन एक बाब स्‍पष्‍ट होते की, मयताचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्‍याकरीता विमा दावा पाठविण्‍यात आला.  परंतु, गै.अ.क्र.3 यांनी विमा दाव्‍याची रककम दिली नाही आणि मोघमपणे विमा दावा नामंजूर करण्‍यात आला, असे बचावात कथन केले आहे.  गै.अ.क्र.2 यांनी आपले दि.15.4.2008 च्‍या पञात दावे संदर्भातील ञुटीची पुर्तता करुन पूर्ण दस्‍ताऐवज गै.अ.क्र.1 कडे पाठविण्‍यात आले.  गै.अ.क्र. 1 ने विमा दावा मिळण्‍याकरीता प्राप्‍त झालेल्‍या प्रस्‍तावाची पडताळणी करुन, विमा कंपनीकडे पाठविला. गै.अ.क्र.1 ला क्‍लेमचे कागदपञ पडताळणी करुन विमा कंपनीकडे पाठविण्‍याचे काम आहे, त्‍यानुसार गै.अ.क्र. 1 ने पाठविले.  परंतु,

... 6 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

 

गै.अ.क्र.3 यांनी विमा दावा निकाली काढला नाही आणि विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- अर्जदारास दिली नाही, ही गै.अ.क्र.3 च्‍या सेवेतील न्‍युनता आहे, हे दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होतो. 

 

12.         गै.अ.क्र.3 ने आपले लेखी उत्‍तरातील विशेष कथनात असे कथन केले आहे की, अर्जदाराने कौटुंबीक विवरणपञ, गाव नमुना-6 क हे दस्‍ताऐवज जानेवारी 2008 चे शेवटी पाठवीले.  गै.अ.क्र.3 चे वकीलांनी लेखी युक्‍तीवादात असा मुद्दा घेतला आहे की, पॉलिसी शर्ती व अटीच्‍या तरतुदीनुसार 90 दिवसात क्‍लेम सादर करणे आवश्‍यक आहे. झालेल्‍या करारात बदल करण्‍याचा मंचाला अधिकार नाही, याबाबत लेखी युक्‍तीवादात वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयाचा उल्‍लेख केलेला आहे.  परंतु, त्‍या न्‍यायनिवाडयाच्‍या निकालाच्‍या प्रती सादर केलेल्‍या नाहीत.  अर्जदाराने दाखल केलेले दस्‍ताऐवज आणि गै.अ. यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवजावरुन मृतक मुखरु सोमा धोटे याचा झाडावरुन खाली पडल्‍याने दि.4.6.07 रोजी मृत्‍यु झाला.  अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजानुसार तलाठ्याचे प्रमाणपञ, क्‍लेम फार्म भाग 1 दि.8.9.07 ला दिलेले आहे.  अर्जदाराने दस्‍ताऐवज गै.अ.क्र.2 कडे सादर केले.  त्‍यात असलेल्‍या ञुटीची पुर्तता करण्‍याकरीता कळविण्‍यात आले. त्‍यानंतर, दि.25.10.07 ला तहसिलदार आरमोरी यांनी सर्व कागदपञ गै.अ.क्र.1 कडे पाठविले.  मयताचा मृत्‍यु झाल्‍यानंतर त्‍याच्‍या वारसदारांनी तात्‍काळ विमा क्‍लेम सादर करावेत हे अपेक्षीत नाहीत.  कारण की, कुंटुंबातील कर्ता पुरुषाचे अपघाती मृत्‍यु झाल्‍यानंतर त्‍यातून सावरण्‍यातच बराचसा वेळ निघून जातो.  अशास्थितीत, महाराष्‍ट्र शासनाची शेतकरी अपघात विमा योजना ही सर्व सामान्‍याना माहित असेलच असे म्‍हणता येत नाही, अशावेळी प्रशासनाने माहिती देवून त्‍याचा लाभ मिळवून देणे अपेक्षीत आहे.  प्रस्‍तुत प्रकरणात दस्‍ताऐवज सादर करण्‍यात विलंब झाला, हे म्‍हणणे गै.अ.क्र.3 चे संयुक्‍तीक नाही.  गै.अ.क्र.3 यांनी उपस्थित केलेला पॉलिसीच्‍या तरतुदी विरुध्‍द असल्‍याचा मुद्दा ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी याच स्‍वरुपाच्‍या प्रकरणात दिलेले मत या प्रकरणातील बाबीला तंतोतंत लागु पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे.      

 

Consumer Protection Act 1986,-- Section 2(1)(g) – Insurance – Accidental death—claim repudiated due to delayed filing of claim – complaint allowed by Forum – Hence Appeal – No reasonable opportunity given to widow undergoing mourning period cannot be expected to  rush to insurer to lodge claim – claim submitted on 25.8.2003 repudiated on 18.3.2005 --- Delay in rejection of claim highly objectionable – No Post mortem curried out, insistence for Post

... 7 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

mortem report unjustified – Voluminous documentary evidence produced to show that insured met with accidental death – order of Forum upheld.

           

                                    National Insurance Co.Ltd.-Vs.- Asha Jamdar Prasad

                                                I(2009) CPJ. 147. mah.

 

13.         गै.अ.क्र.3 यांनी आपले लेखी उत्‍तरात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अपूर्ण दस्‍ताऐवजाचे आधारावर क्‍लेम मंजूर करण्यात आला नाही व त्‍यासाठी केवळ अर्जदार सर्वस्‍वी जबाबदार आहे.  गै.अ.क्र.3 यांचे वरील म्‍हणणे न्‍यायसंगत नाही.  गै.अ.क्र.2 यांनी दि.15.4.08 ला मंचात आपले म्‍हणणे दाखल केले.  त्‍यासोबत, दि.25.10.07 च्‍या कार्यालयीन पञाची प्रत, तसेच दि.24 ऑगष्‍ट 2007 च्‍या शासन निर्णयाची प्रत दाखल केली आहे.  सदर शासन निर्णयानुसार प्रपञ ड मध्‍ये आवश्‍यक कागदपञांचा उल्‍लेख केलेला आहे. त्‍यात, अनुक्रमांक 8 वर उंचावरुन पडून झालेला अपघात किंवा मृत्‍यु संदर्भातील आवश्‍यक कागदपञामध्‍ये प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील चौकशी अहवाल, मृत्‍यु विश्‍लेषण अहवाल, पोलीस अंतीम अहवाल, मृत्‍यु दाखला एवढया दस्‍ताऐवजाची आवश्‍यकता असल्‍याचे नमूद केले आहे.  तहसिलदार आरमोरी यांनी क्‍लेम, सातबारा व इतर आवश्‍यक कागदपञ पाठविले असतांनाही गै.अ.क्र.3 यांनी कागदपञाची पुर्तता केलेली नाही म्‍हणून विमा दाव्‍याची रक्‍कम दिली नाही.  जेंव्‍हा की, क्‍लेम फार्म सोबत आवश्‍यक दस्‍ताऐवज सादर केल्‍याचे दाखल दस्‍तावरुनच सिध्‍द होतो.  गै.अ.क्र.3 यांनी विमा दावा निकाली काढण्‍यास विलंब केला, तसेच नामंजूर केल्‍याचे पञ अर्जदारास दिले नाही व त्‍यासंदर्भात पञ रेकॉर्डवरही दाखल केले नाही.  या सर्व बाबीवरुन, गै.अ.क्र.3 यांनी सेवेत न्‍युनता केले या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  गै.अ.क्र.2 ने गै.अ.क्र.1 कडून वेळोवेळी मागणी केलेल्‍या दस्‍ताऐवजाची पुर्तता केली व गै.अ.क्र.1 ने विमा प्रस्‍तावानुसार विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरीता, गै.अ.क्र.3 कडे पडताळणी करुन प्रस्‍ताव पाठविला, तरी गै.अ.क्र.3 ने विमा दाव्‍याची रक्‍कम दिली नाही.  गै.अ.क्र.1 व 2 ने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे.  परंतु, गै.अ.क्र.3 यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम दिली नाही, हे उपलब्‍ध रेकॉर्डवरुन सिध्‍द होतो.  यावरुन, गै.अ.क्र.1 व 2 ने सेवा देण्‍यात न्‍युनता केली नसून, त्‍यांचे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.  तर गै.अ.क्र.3 विरुध्‍द तक्रार मंजूर होण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे. 

 

14.         अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजानुसार मृतक मुखरु सोमाजी धोटे यास पत्‍नी सत्‍यभामा मुखरु धोटे, सोमेश्‍वर मुखरु धोटे, आणि मुलगा प्रमोद मुखरु धोटे असे वारसदार आहे.  त्‍यामुळे विमा दाव्‍याची रक्‍कम गै.अ.क्र.3 यांनी मुळ तक्रार दाखल

... 8 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

 

केल्‍याचा दि.8.2.2008 पासून व्‍याजासह देण्‍यास पाञ आहे.  गै.अ.क्र.3 ने आदेशीत रक्‍कम मंचात जमा केल्‍यानंतर, ती रक्‍कम सम प्रमाणात तिन्‍ही वारसदार मिळण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.   

 

15.         गै.अ.क्र.3 यांनी विमा दावा निकाली काढण्‍यास विलंब केला. अर्जदार यांनी वारंवार तहसिलदार व गै.अ.क्र.1 यांचेकडे मागणी केली, परंतु विमा दाव्‍याची रक्‍कम मिळाली नाही.  त्‍यामुळे, मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला.  त्‍यामुळे, त्‍याची नुकसान भरपाई गै.अ.क्र.3 भरुन देण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.

 

16.         एकंदरीत, उपलब्‍ध रेकॉर्डचे अवलोकन केला असता आणि दोन्‍ही पक्षाचे युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर गै.अ.क्र.3 चे विरुध्‍द तक्रार मंजूर करण्‍यास पाञ आहे आणि गै.अ.क्र.1 व 2 चे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने, तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                 

//  अंतिम आदेश  //

 

(1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.  

 

(2)   गैरअर्जदार क्र.3 ने मृतक मुखरु सोमा धोटे याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- दि.8.2.2008 पासून द.सा.द.शे. 6 % व्‍याजाने आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत मंचात जमा करावे.

 

(3)   गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 2000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत मंचात जमा करावे.   

 

(4)   गैरअर्जदार क्र. 3 ने, विमा दाव्‍याची रक्‍कम आदेशानुसार जमा केल्‍यानंतर व्‍याजासह येणारी रक्‍कम मुतकाची पत्‍नी सत्‍यभामा व दुसरा मुलगा नामे प्रमोद व अर्जदार यांना समप्रमाणात विभागणी करुन देण्‍यात यावी.

 

(5)   गैरअर्जदार क्र.1 व 2 चे विरुध्‍द तक्रार खारीज.

 

... 9 ...                 (ग्रा.त.क्र.23/2011)

 

(6)   गैरअर्जदार क्र.3 ने वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्‍यास आदेशीत रक्‍कम मंचात जमा करे पर्यंत द.सा.द.शे. 12 % व्‍याज देय राहील.

 

(7)   गैरअर्जदार यांनी आप आपला खर्च स्‍वतः सहन करावे.

 

(8)   अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी. 

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.