तक्रार क्र.07/2016.
तक्रार दाखल दिनांक - 08/01/2016. तक्रार नोंदणी दिनांक - 12/01/2016
तक्रार निकाल दिनांक - 07/06/2016
कालावधी 04 महिने 29 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
प्रभाकर पि.सुंदरराव शेळके, अर्जदार
वय ४० वर्ष धंदा - अॅड.ज्ञानेश्वर दराडे.
रा.हातनुर ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द
एल.अॅण्ड टी फायनान्स कंपनी लि,
तर्फे शाखा अधिकारी, गैरअर्जदार
शाखा निरज हॉटेल शेजारी,स्टेशन रोड, अॅड.जी.एस.वैदय.
कोरम - श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. - मा.सदस्या.
नि का ल प त्र
(निकालपत्र पारीत द्वारा – मा. श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा)
तक्रारदाराने गैरअर्जराकडुन दि.०६/०३/२०१४ रोजी रक्कम रु.६,२०,०००/- कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला त्याचा क्र.OKG002069R1400776354 असा आहे. सदरचे कराराप्रमाणे व्याजदर ८ टक्के ठरला व अर्धवार्षिक हप्ता रु.८८,५००/- असा ठरला तसेच कर्ज एकुण ७२ हप्त्यात परतफेड करण्याचे ठरले. तक्रारदाराने दि.२२/१०/२०१४ रोजी रु.९३,३००/- गैरअर्जदाराकडे जमा केले. तसेच दि.०९/०५/२०१५ रोजी रु.८८,५००/- चा हप्ता जमा केला. तक्रारदाराकडे आतापर्यंत केवळ एक हप्ता बाकी आहे म्हणुन गैरअर्जदाराने सदरची रक्कम त्याच्या खात्यात दर्शविलेली नाही. तक्रारदाराने आतापर्यंत ट्रॅक्टरसाठी रु.२,४२,८००/- खर्च केलेले आहे. केवळ एक हप्ता बाकी राहीलेला असून गैरअर्जदार हे त्यांचे वाहन जप्त करण्याबाबत तोंडी सांगत आहेत. गैरअर्जदार हे गुंड लोकांचा वापर करुन रक्कम वसूल करतील. दि.०२/०१/२०१६ रोजी अर्जदाराला फोन करुन धमकी दिली की, जर तक्रारदाराने आठ दिवसांचे आंत रक्कम रु.६,६२,९९२/- जमा केले नाही तर ते ट्रॅक्टर जप्त करतील. सदरचे वाहन गैरअर्जदाराने जप्त करु नये. गैरअर्जदाराने रु.८८,५००/- त्यांच्या खात्यात जमा दाखविलेले नाही ही गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी आहे म्हणुन गैरअर्जदारांना असा आदेश देण्यात यावे की, त्यांनी तक्रारदाराचे खाते व्यवस्थीत मेंटेन करावे.
गैरअर्जदार हे दि.०५/०३/२०१६ रोजी हजर होऊन त्यांनी आपले शपथपत्र तसेच लेखी कथन दाखल केले त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हा थकबाकीदार आहे व आता तो रु.२,५०,०००/- देणे लागतो. तक्रारीत लिहीलेले मजकुर चुकीचे व खोटे आहे. अर्जदाराने जे कर्ज घेतले होते ती मुळ रक्कम रु.६,२०,०००/- अशी होती. अर्जदार हा दि.०३/०३/२०१६ पर्यंत रु.६,८५,७२४.०१ गैरअर्जदारास देणे लागतो. अर्जदाराने केवळ रु.१,८१,८००/- भरलेले आहे. म्हणुन सदरचे प्रकरणांमध्ये गैरअर्जदाराने दि.०५/११/२०१५ रोजी अर्जदाराला कर्ज रक्कम परतफेड करावे यासाठी नोटीस दिलेली होती व अर्जदाराने ती रक्कम भरलेली नाही. सदर प्रकरणांमध्ये गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज न्यायमंचाने फेटाळण्यात यावे.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, साक्षीचे शपथपत्र, युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी कथन, साक्षीचे शपथपत्र्, युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर.
1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? नाही.
3. आदेश काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र. 1 - चे उत्तर होय असून ही बाब गैरअर्जदारांना मान्य आहे. त्यांनी दि.०६/०३/२०१४ रोजी कर्ज रक्कम रु.६,२०,०००/- दिलेले आहेत व त्यावर ११.८८ टक्के व्याज लागेल असे लिहीलेले आहे.
मुददा क्र. 2 - चे उत्तर नाही असून गैरअर्जदारांनी अर्जदारांना दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. अर्जदार हा गैरअर्जदारांचा थकबाकीदार लागतो. अर्जदार त्यांचे खाते व्यवस्थीत मेंटेन करण्याबाबत म्हणत आहेत तसे प्रकरणामध्ये अर्जदाराने खाते उतारा दाखल केलेला नाही व अर्जदाराने लेखी कोणतेही खाते उतारा मागीतलेला नाही. अर्जदाराने सदरची केस ही केवळ ट्रॅक्टर क्र.OKG002069R1400776354 ही गैरअर्जदार उचलून घेऊन जाईल या भीतीपोटी सदरची तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. मात्र गैरअर्जदाराने आजपर्यंत असे कृत्य केलेले नाही. म्हणून हा अर्ज दाखल करण्याचे मुळात कारण घडलेले नाही. अर्जदाराने गैरअर्जदारांच्या हक्कामध्ये गहाणखत करुन दिलेले आहे व शेतीचा ७/१२ दिलेला आहे. अर्जदाराने घेतलेल्या मुळ कर्ज रक्कमेवर दि.न्यु.इंडिया इन्शुरन्स कंपनी यांनी विमा काढलेला आहे व तो दि.०८/०३/२०१४ ते ०७/०३/१५ पर्यंत कालावधी आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराला दिलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली दिसून येत नाही. अर्जदार हा गैरअर्जदारांचा थकबाकीदार आहे हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच अर्जदाराचा खाते उतारा गैरअर्जदारांनी न्यायमंचा समोर दाखल केलेला आहे. जानेवारी २०१६ रोजी अर्जदार हा गैरअर्जदारास रु.१,०३,७६०/- देणे लागत होता. अर्जदाराची गाडी ही अर्जदारांच्या ताब्यात आहे. तसेच खाते उतारा देखील योग्य पध्दतीने गैरअर्जदाराने मेंटेन केलेले आहे त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रुटी न केल्यामुळे अर्जदाराचा सदरील अर्ज नामंजुर होण्यास पात्र आहे. यास्तव मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश.
1. अर्जदाराचा अर्ज नामंजुर करण्यात येतो.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. उभयपक्षकार यांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा