Maharashtra

Nanded

CC/10/90

Ramesh Kishanrao Patil - Complainant(s)

Versus

Branch Maneger, United India Insurance Com. Ltd. - Opp.Party(s)

Adv. R. N. Kulkarni

09 Jun 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/90
1. Ramesh Kishanrao Patil Sugaon, Tq. Mukhoed, dist. NadedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Maneger, United India Insurance Com. Ltd. Tilak Road, Latur.LaturMaharastra2. Branch Maneger, United India Insurance com. Ltd.Tarasingh Market, Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 09 Jun 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2010/90
                    प्रकरण दाखल तारीख -   19/03/2010     
                    प्रकरण निकाल तारीख    09/06/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,                 - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.               - सदस्‍या
 
रमेश पि.किशनराव पाटील,                                अर्जदार.
रा.सुगांव बु. ता.मुखेड जि.नांदेड.
      विरुध्‍द.
 
1.   युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि.                           गैरअर्जदार.
     तारासिंह मार्केट,नांदेड.
मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,नांदेड.
 
2.   युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि.
     मार्फत विभागीय व्‍यवस्‍थापक, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील                 - अड.आर.एन.कूलकर्णी.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील      - अड.एस.जी.मद्ये.
 
निकालपत्र
(द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख, सदस्‍या )
 
          अर्जदार यांची थोडक्‍यात तक्रारी अशी की,मयत रविकांत पाटील हा इ.सन 2008-09 या शेक्षणीक वर्षात यशवंत माध्‍यमीक व उच्‍च्‍ माध्‍यमिक विद्यालय, अहमदपुर ता.अहमदपुर येथे इयत्‍ता 11 वी वर्षात शिकत होता. मयत रविकांत पाटील यांचा मृत्‍यु दि.02/12/2008 रोजी सोयाबीन पिकाच्‍या मळणी यंत्रामध्‍ये हात अडकुन अपघात झाल्‍यामुळे झाला, या संदर्भात पोलिस स्‍टेशन माळाकोळी ता.लोहा जि.नांदेड येथे गुन्‍हा नोंदविला आहे.   इ.स.2008-09 या शैक्षणीक वर्षात महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व विद्यार्थ्‍यांचा राजीव गांधी विद्यार्थी विमा योजने अंतर्गत विमा उतरविला आहे, विमा कालवधी दि.27/08/2008 ते 26/08/2009 असा होता. सदरील विमा योजनेत शासनाने सर्व विद्यार्थ्‍यांची विम्‍याची रक्‍कम भरलेली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत विमा योजनेत मयत  रविकांत पाटील व अर्जदार हे लाभार्थी आहे. सदरील घटना घडल्‍यानंतर अर्जदाराने राजीव गांधी विद्यार्थी विमा योजनेतील तरतुदी नुसार विमा रक्‍कम रु.30,000/- मिळण्‍यासाठी सर्व कागदपत्रासह यशवंत माध्‍यमीक व उच्‍च माध्‍यमीक विद्यालय, अहमदपुर यांचे मार्फत गैरअर्जदार इन्‍शुरन्‍स कंपनीकडे विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी दि.25/11/2008 रोजी विमा दावा दाखल केला. पण आजपर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्‍कम दिली नाही. गैरअर्जदर कंपनीने अर्जदार हा विमा रक्‍कम रु.30,000/- मिळण्‍यास पात्र असल्‍यामुळे विमा रक्‍कम न दिल्‍यामुळे दि.10/02/2010 रोजी गैरअर्जदार कंपनीस वकीला मार्फत नोटीस दिली व विमा रक्‍कमेची मागणी करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्‍कम न देवुन सेवेत कमतरता केली म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, अपघाती मृत्‍यु झाल्‍याबद्यल राजीव गांधी विद्यार्थी विमा योजने अंतर्गत रु.30,000/- दि.30/10/2008 पासुन 12 टक्‍के व्‍याजाने द्यावेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल रु.5,000/- व दावा खर्चाबद्यल रु.2,000/- द्यावेत अशी विनंती केली आहे.
 
     गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे मांडले व शपथपत्र दाखल केले. तसेच त्‍यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केले, त्‍यांचे म्‍हणणेनुसार अर्जदाराचा मुलगा हा यशवंत माध्‍यमीक व उच्‍च माध्‍यमिक विद्यायल, अहमदपुरचा विद्यार्थी नव्‍हता व दि.30/10/2008 रोजी सदरील अपघात झालेला नव्‍हता व त्‍यामध्‍ये मयत रविकांत गेलेला नव्‍हता व अर्जदारास सदरील क्‍लेम मागण्‍याचा अधिकार नाही कारण त्‍यांच्‍या मुलाचा विमा नव्‍हता तसेच त्‍यांचा मुलगा गेल्‍यापासुन सात दिवसांच्‍या आंत ही घटना गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना कळवीणे आवश्‍यक होते व ते त्‍या कालावधीत न कळविता उशिरा कळविले म्‍हणुन अर्जदाराचा दावा खारीज करावा करावा व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना कॉस्‍ट देण्‍यात यावी.
 
     अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे तपासुन व दोन्‍ही बाजुचा युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित झाले आहे.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
 
1.   अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय?              होय.
2.   गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिली आहे काय?        होय.
3.   काय आदेश?                        अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                        कारणे.
मुद्या क्र. 1
 
     अर्जदार यांचा मुलगा रविकांत पाटील हा यशवंत माध्‍यमीक व उच्‍च माध्‍यमीक विद्यालय, अहमदपुर येथे 11 वी या वर्गात घेत होता. दि.30/10/2008 रोजी सोयाबीन पिकाच्‍या मळणी यंत्रामध्‍ये  हात अडकुन रविकांत यांचा अपघात झाला व तो त्‍यामध्‍ये तो मरण पावला. माळाकोळी पोलिस स्‍टेशन ता.लोहा जिल्‍हा नांदेड येथे अपघाती मृत्‍यु क्र.17/2008 दि.31/10/2008 रोजी नोंद केली. दि.25/11/2008 रोजी सर्व कागदपत्रे, शवविच्‍छेदन अहवाल, पोलिस रिपोर्टसह दाखल केले. सदरील कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 1 यांना अर्जदाराने राजीव गांधी विद्यार्थी विमा योजनेनुसार यशवंत माध्‍यमीक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय अमदपुर ता.अहमदपुर यांच्‍या मार्फत विमा रककम रु.30,000/- मिळण्‍यासाठी दाखल केले. तरीही आजपर्यंत अर्जदारास गैरअर्जदार यांनी विद्यार्थी सरंक्षण विमा योजने अंतर्गत असलेली विमा रक्‍कम दिली नाही म्‍हणुन अर्जदाराने हा दावा मंचा समोर दाखल केला. अर्जदाराचा मुलगा राजीव गांधी विद्यार्थी विमा योजनेत असल्‍यामुळे तो गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा ग्राहक आहे म्‍हणुन मुद्या क्र. 1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येत आहे.
 
मुद्या क्र. 2
 
     इ.स.2008-09 या शैक्षणीक वर्षाकरीता महाराष्‍ट्र शासनाने राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत राज्‍यातील पहिली ते उच्‍च शिक्षण घेणा-या विद्यर्थ्‍यांचा विमा गैरअर्जदार युनायटेड इंडिया इंशुरन्‍स कंपनी यांचेकडे उतरविला असुन विम्‍याची रक्‍कम सुध्‍दा शासनाने गैरअर्जदार कंपनीकडे भरलेली आहे. दि.25/11/2008 रोजी सर्व कागदपत्रे दाखल करुनही अर्जदारास गैरअर्जदार यांनी क्‍लेम मंजुर केला नाही.
     गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे मांडले व शपथपत्र दाखल केले. तसेच त्‍यांचे लेखी युक्‍तीवाद दाखल केले, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराचा मुलगा हा यशवंत माध्‍यमीक व उच्‍च माध्‍यमीक विद्यालय अहमदपुरचा विद्यार्थी नव्‍हता व दि.30/10/2008 रोजी सदरील अपघात झालेला नव्‍हता व त्‍यामध्‍ये मयत रविकांत मेलेला नव्‍हता व अर्जदारास सदरचा क्‍लेम मागण्‍याचा अधिकार नाही कारण त्‍यांच्‍या मुलाचा विमा नव्‍हता तसेच त्‍यांचा मुलगा गेल्‍यापासुन सात दिवसांच्‍या आंत ही घटना गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना कळवीणे आवश्‍यक होते पण ती त्‍या कालावधीत न कळविता उशिरा कळविले म्‍हणुन अर्जदाराचा दावा खारीज करावा व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना कॉस्‍ट देण्‍यात यावा? तसेच अर्जदार यांनी कोणतीही विमा पॉलिसी दाखल केलेली नाही? त्‍यामुळे सदरील विद्यार्थ्‍यांचा क्‍लेम मंजुर करणे त्‍यांच्‍या कक्षेत नाही. गैरअर्जदार यांनी म्‍हणणे मांडलेव शपथपत्र देऊन त्‍यांनी ज्‍या ज्‍या गोष्‍टी यामध्‍ये मांडल्‍या ते सर्व चुकीच्‍या असुन अर्जदाराचा मुलगा हा यशवंत माध्‍यमीक व उच्‍च माध्‍यमीक विद्यालय अहमदपुर येथे शिकत असल्‍याचा पुरावा म्‍हणुन अर्जदाराने सदरील कॉलेजचे प्राचार्याचे पत्र त्‍यांच्‍या लेटर पॅडवर दिलेले दाखल केलेले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी मांडलेली थेअरी ही या ठिकाणी चुकीची वाटते तसेच राजीव गांधी विमा संरक्षण योजनेचे प्रिमीअमची सर्व रक्‍कम शासनाने गैरअर्जदार यांचेकडे आधीच भरलेली आहे व ती प्रत्‍येक विद्यार्थ्‍याच्‍या नांवाने नसुन शाळेत शीकत असलेले प्रत्‍येक विद्यार्थ्‍यासाठी असल्‍यामुळे अर्जदाराने वेगळी पॉलिसी दाखल करण्‍याची गरज वाटत नाही तसेच अर्जदाराने कागदपत्र उशिरा दाखल केली, हा तांत्रिक मुद्या असुन तो सात दिवसांत दाखल करावे यावर फार काटेकोरपणे पालन करण्‍याची गरज वाटत नाही. सदरील कागदपत्र सात दिवसात दाखल केले किंवा त्‍या पेक्षा जास्‍त दिवसांत जरी दाखल केले तरी त्‍यातील सत्‍यता बदलत नाही ती आहे तीच राहते. म्‍हणुन अर्जदाराने कागदपत्र उशिरा दाखल केली, या म्‍हणण्‍यास तितकेसे तथ्‍य वाटत नाही. अर्जदाराने स्‍वतःचा मुलगा गमावल्‍यामुळे नैसर्गीकरित्‍या तो दुखाःत असणार ही गोष्‍ट विचारात घेऊन कागदपत्र दाखल करण्‍यास उशिर झाला त्‍यामध्‍ये फारसे वावगे वाटत नाही. सदरचा अपघात हा पॉलिसीच्‍या कालावधीत असल्‍यामुळे अर्जदाराचा क्‍लेम गैरअर्जदार यांनी मंजुर करणे आवश्‍यक होते. म्‍हणुन दि.25/11/2008 रोजी दाखल केलेले कागदपत्र गैरअर्जदार यांच्‍या समोर असतानाही आजपर्यंत अर्जदाराचा क्‍लेम मंजुर केला नाही ही एक प्रकारची सेवेतील त्रुटी आहे, हे अर्जदार यांनी सिध्‍द केले आहे व गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिली या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. म्‍हणुन राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत तरतुद करण्‍यात आलेली रककम रु.30,000/- दि.01/01/2009 पासुन 9 टक्‍के व्‍याज दराने अर्जदारास एक महिन्‍याचे आत द्यावे. एक महिन्‍याचे आत सदरील रक्‍कम न दिल्‍यास संपुर्ण रक्‍कमेवर 12 टक्‍के व्‍याजाने अर्जदाराची रक्‍कम फिटेपर्यंत रक्‍कम द्यावी. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास दावा खर्चापोटी रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- एक महिन्‍याचे आंत द्यावे.
          वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                         आदेश
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्‍यात येतो.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदारास राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत तरतुद करण्‍यात आलेली रककम रु.30,000/- दि.01/01/2009 पासुन 9 टक्‍के व्‍याज दराने अर्जदारास एक महिन्‍याचे आत द्यावे. एक महिन्‍याचे आत सदरील रक्‍कम न दिल्‍यास संपुर्ण रक्‍कमेवर 12 टक्‍के व्‍याजाने अर्जदाराची रक्‍कम फिटेपर्यंत रक्‍कम द्यावी.
3.   गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास दावा खर्चापोटी रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- एक महिन्‍याचे आंत द्यावे.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकालाच्‍या प्रती देण्‍यात यावा.
 
 
       अध्‍यक्ष                                                                                                             सदस्‍या 
 (श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                                                             (श्रीमती.सुवर्णा देशमुख)
 
 
 
 
गो.प.निलमवार,लघुलेखक.