Maharashtra

Beed

CC/12/136

Ramdas Eaknat Rakh - Complainant(s)

Versus

Branch Manager,New India Assurance Co Ltd.C/0 Branch Pune - Opp.Party(s)

Adv Arvind Kale

28 Oct 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/136
 
1. Ramdas Eaknat Rakh
R/o Theral Ta Patoda
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,New India Assurance Co Ltd.C/0 Branch Pune
Beed
Beed
Maharashtra
2. Manager,Kabal Insurance Broking Pvt Ltd
Cidco Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र
                            दिनांक 28.10.2013
                    (घोषित द्वारा ः-श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्‍या)
            तक्रारदार रामदास एकनाथ राख यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी  सेवेमध्‍ये कसूर केल्‍याबाबत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी म्‍हणून दाखल केली आहे.
            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे,तक्रारदार हे थेरला ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी असून शेती व घरकाम करुन आपली उपजिवीका भागवतात. सामनेवाले क्र.1 ही विमा कंपनी असून महाराष्‍ट्र शासनाने सदरील विमा कंपनीकडे मराठवाडा विभागातील सर्व शेतक-यांचा आकस्‍मीत मृत्‍यूबददल किंवा त्‍यांना कायमस्‍वरुपी काही अपंगत्‍व आल्‍यास त्‍यांना अथवा त्‍यांचे वारसांना ठराविक रक्‍कम मिळावी म्‍हणून सर्व शेतक-यांचा विमा औरंगाबाद विभाग येथे उतरविलेला आहे. विम्‍याचा कालावधी 15 ऑगस्‍ट 2010 ते 14 ऑगस्‍ट 2011 व पॉलिसी क्र.153401/47/10/2300/200000 असा आहे. तक्रारदाराची पत्‍नी प्रभावती ही सामनेवाले क्र.1 यांची ग्राहक आहे.  तक्रारदाराची पत्‍नी प्रभावती हिच्‍या नांवे मौजे थेरला ता.पाटोदा जि.बीड येथे गट नं.489 मध्‍ये 17 गुंठे जमिन आहे.
            दि.06.05.2011 रोजी तक्रारदार हा औरंगाबाद येथून बीड येथे त्‍यांचे साडूचे मूलीचे लग्‍नासाठी आपले पत्‍नीसोबत मोटार सायकल क्र.एम.एच.-20-झेड-2973 वरुन येत असताना दुपारी अंदाजे 4.30 वाजता बागपिंपळगांव गावाजवळ रोडवर तक्रारदाराचे पाठीमागून येणा-या ट्रकने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. पाठीमागे बसलेल्‍या तक्रारदाराच्‍या पत्‍नीस डोक्‍यास जबरदस्‍त मार लागला व ती खाली पडून जागेवरच मरण पावली व त्‍यामध्‍ये तक्रारदारास पण मार लागला. अपघाता संदर्भात गेवराई पोलिस स्‍टेशन येथे फिर्याद दिली. त्‍यानुसार गु.र.नं.117/2011 नोंदविण्‍यात आला. मयताचे प्रेताचे उपजिल्‍हा रुग्‍णालय गेवराई येथे शवविच्‍छेदन करण्‍यात आले. त्‍यांचा अहवाल डॉक्‍टरांनी दिला असून त्‍याचे मते तक्रारदाराच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू अपघातात डोक्‍याला मार लागल्‍यामुळे झालेला आहे.   तक्रारदार हे वारस असल्‍यामुळे त्‍यांनी सर्व कागदपत्रे गोळा केली व नियमाप्रमाणे विमा दावा रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यासाठी तलाठी थेरला यांचेकडे क्‍लेम फॉर्म सहीत दाखल केला. तलाठयाचे रिपोर्टनुसार सामनेवाले क्र.3 यांचेकडे दावा दाखल केला आहे. सामनेवाले क्र.3 यांनी सामनेवाले क्र.2 कडे दावा पाठविला. सामनेवाले क्र.2 यांनी दावा सामनेवाले क्र.1 कडे योग्‍य त्‍या कार्यवाहीसाठी पाठविला. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराचा दावा मंजूर केला नाही परंतु दि.07.07.2011 रोजी तक्रारदारास पत्र पाठवून असे कळविले की, दि.15.08.2010 रोजी मयत प्रभावती यांचे नांवावर जमिन नव्‍हती. त्‍यामुळे दावा देता येणार नाही.  सामनेवाले क्र.1 यांनी दावा नाकारुन सेवेत त्रूटी केली आहे म्‍हणून तक्रारदाराने सदर मंचामध्‍ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारास विम्‍याची रककम रु.1,00,000/- व आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/-  असे एकूण रु.1,25,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली.
            सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. मयताची कोणतीही पॉलिसी काढलेली नव्‍हती त्‍यामुळे तिच्‍या मृत्‍यू बददल क्‍लेम देता येणार नाही. ज्‍या अपघातात तक्रारदाराची पत्‍नी मरण पावली तो अपघात सामनेवाले यांना मान्‍य नाही.हे म्‍हणणे खरे आहे की, ज्‍या दिवशी अपघात झाला त्‍यादिवशी तक्रारदाराची पत्‍नी यांचे नांवावार शेत जमिन नव्‍हती.  म्‍युटेशन नोंद प्रमाणे मयत प्रभावती हिच्‍या नांवे शेत जमिन ही दि.23.02.2011 रोजी झाली. पॉलिसी ही दि.15.08.2010 रोजी काढलेली आहे. त्‍यामुळे मयत प्रभावती ही पॉलिसी काढली त्‍यावेळेस शेतकरी नव्‍हती. त्‍यामुळे तक्रारदाराचा विमा दावा मंजूर करता येणार नाही. म्‍हणून तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर केलेला आहे असे करुन सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
            सामनेवाले क्र.2 यांचा लेखी जवाब पोस्‍टाने प्राप्‍त झाला. त्‍याचे म्‍हणणे की, विमाचा कालावधी दि.15.08.2010 ते 14.08.2011 या कालावधीत सामनेवाले क्र.2 हे मराठवाडा विभागचे ब्रोकर म्‍हणून कार्यरत नव्‍हते. म्‍हणून सदर प्रस्‍ताव बाबत काहीही सांगता येणार नाही.त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
            सामनेवाले क्र.3 हे स्‍वतः मंचात हजर झाले. सामनेवाले क्र.3 यांच्‍या कथनेनुसार तक्रारदाराचा विमा दावा दि.22.6.2011 रोजी प्राप्‍त झाला असून तो प्रस्‍ताव या कार्यालयाने दि.23.6.2011 रोजी विमा कंपनीस प्रस्‍तावाची छाननी करुन पाठवला. मयत प्रभावती हिचे नांवावर जमिन दि.15.08.2010 रोजी शेतजमिन नव्‍हती असे विमा कंपनीचे पत्र दि.7.7.2011 नुसार संबंधीस तक्रारदारास कंपनीने कळविले आहे. तक्रारदारास या कार्यालयाने वेळोवेळी सहकार्य केलेले आहे त्‍यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही.
            तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले,सामनेवाले क्र.1,2, व 3 यांचे लेखी जवाबाचे अवलोकन केले.
            तक्रारदार यांचे वकिलांचा व सामनेवाले क्र.1 यांचे वकिलाचा युक्‍तीवाद ऐकला, न्‍याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
                 मुददे                                       उत्‍तर
1.    तक्रारदार यांना सामनेवाले यांनी सेवा देण्‍यामध्‍ये
     त्रुटी ठेवली आहे काय ?                                    होय.     
2.    तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास
      पात्र आहेत काय ?                                       होय. 
3.    काय आदेश ?                                अंतिम आदेशाप्रमाणे.     
 
                        कारणमिंमासा  
मुददा क्र.1 ते 3 ः-
            तक्रारदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र दाखल केले तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले इन्‍शुरन्‍स कंपनीने दावा नाकारलेले पत्र, क्र 154 अंतर्गत पहिली खबर, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, क्‍लेम फॉर्म, गाव नमुना 8-अ चा उतारा, फेरफार नक्‍कलची नोंद, गाव नमुना 6 3, अधिकार पत्र, मृत्‍यू प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्‍यादी कागदपत्रांच्‍या छायांकित प्रती दाखल केल्‍या आहेत.
            तक्रारदार यांचे वकील श्री. काळे यांनी केलेला युक्‍तीवाद असा की, तक्रारदार यांची पत्‍नी शेतकरी आहे. त्‍यांच्‍या नांवे शेत जमिन आहे. तक्रारदार यांनी पत्‍नीच्‍या मृत्‍यूनंतर तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे रितसर प्रस्‍ताव अर्ज दाखल केले होते. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदारांच्‍या नांवे शेत जमिन आहे व ती शेतकरी होती. पोलिसांचे जवाब यांचे अवलोकन केले असता तक्रारदाराची पत्‍नी प्रभावती राखा यांचा मृत्‍यू दि.06.05.2011 रोजी मोटार सायकलला ट्रकने धडक दिल्‍यामुळे  डोक्‍यास जबरदस्‍त मार लागला व त्‍या जागेवर मरण पावल्‍या. त्‍याबाबत शवविच्‍छेदन अहवाल मध्‍ये स्‍पष्‍ट नमूद केले आहे कि,तक्रारदाराची पत्‍नी हिचा मृत्‍यू डोक्‍यात मार लागल्‍यामुळे झाला आहे.
            पत्‍नीच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारदार यांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्‍यासाठी व रक्‍कम रु.1,00,000/- ची नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी सामनेवाले क्र.3 यांच्‍याकडे रितसार अर्ज केला व सामनेवाले क्र.3 यांनी सदर अर्जाची पडताळणी करुन सदर प्रस्‍ताव हा सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडे पाठविला. सामनेवाला क्र.2 यांच्‍या कथनेनुसार शेतकरी व्‍यक्‍तीगत विमा योजनेचा कालावधी दि.15.08.2010 ते 14.08.2011 असा आहे.या कालावधीत सामनेवाले क्र.2 हे मराठवाडा विभागाचे ब्रोकर एजन्‍सी म्‍हणून काम करत नव्‍हते. म्‍हणून सदर प्रस्‍तावाबददल काही सांगता येणार नाही. तक्रारदारास सामनेवाले क्र.1 यांचे दि.07.07.2011 रोजीचे पत्र प्राप्‍त झाले. त्‍यात मयत प्रभावती हयांच्‍या नांहवे दि.15.08.2010 रोजी शेतजमिन नव्‍हती म्‍हणून मयत हि शेतकरी नव्‍हती. मयताच्‍या नांवे दि.23.02.2011 रोजी शेतजमिन झाली आहे. म्‍हणून सदर प्रस्‍ताव हा सामनेवाले क्र.1 यांनी नाकारला आहे.
            तक्रारदार यांच्‍या वकिलांनी केलेला यूक्‍तीवाद व सामनेवाले क्र.3 यांच्‍या वकिलांनी केलेला युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. त्‍यावरुन मयत प्रभावती राख हिच्‍या नांवे मृत्‍यूच्‍या वेळी शेतजमिन होती काय हे ठरविणे महत्‍वाचे आहे.
           
 
            तक्रारदारांनी दाखल केलेले फेरफारची नक्‍कल नोंद क्र. 880 यांचे अवलोकन केले. त्‍यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, दि.23.02.2011 रोजी मयत हिच्‍या नांवे शेतजमिन होती.तक्रारदार यांच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू दि.06.05.2011 रोजी झाला. महाराष्‍ट्र शासनाच्‍या जी आर प्रमाणे शेतकरी ज्‍या दिवशी मयत होतो त्‍या दिवशी त्‍यांच्‍या नांवावर शेती असणे आवश्‍यक आहे. विमाधारक हा विमा पॉलिसीच्‍या कालावधीच्‍या आधी शेतकरी असणे गरजेचे नाही. त्‍यावरुन ही बाब सिध्‍द होते की, मयत प्रभावती यांच्‍या नांवे शेतजमिन होती व ती शेतकरी होती.  मंचाचें असे मत आहे की, तक्रारदाराची मयत पत्‍नी ही शेतकरी होती व तीच्‍या नांवे दि.06.05.2011 रोजी शेतजमिन होती. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यामध्‍ये कसूर केला ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार हे रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यास पात्र आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत कसूर केल्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1500/- मिळण्‍यास पात्र आहेत.
            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
2.    सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार 
      यांना विमा दावा रक्‍कम रु.1,00,000/-   निकाल कळाल्‍यापासून 30    
      दिवसांचे आंत दयावेत. सदरील रक्‍कम 30 दिवसांचे आंत न दिल्‍यास
      त्‍यावर द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज तक्रार दाखल दि.31.05.2012
      पासून संपुर्ण रक्‍कम वसुल होईपर्यत दयावे.
3.    सामनेवाले क्र.1  यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार   
      यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व दाव्‍याच्‍या
      खर्चापोटी रक्‍कम रु.1500/- दयावेत.
      4.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.