Maharashtra

Nanded

CC/10/29

Shashikalabai Vishnu Barapatre - Complainant(s)

Versus

Branch Manager - Opp.Party(s)

ADV A.V. Choudhary

20 Mar 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/29
1. Shashikalabai Vishnu Barapatre NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager NandedMaharastra2. Branch Manager, Kabal Insurance Service Pvt. LtdAurangabadAurangabadMaharastra3. Branch Manager, National Insurance Com. Ltd.Mumbai.MumbaiMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 20 Mar 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2010/29.
                          प्रकरण दाखल तारीख - 29/01/2010
                          प्रकरण निकाल तारीख 20/03/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
श्रीमती शशीकलाबाई भ्र.विष्‍णू बारापाञे
वय सज्ञान, धंदा शेती व घरकाम                         अर्जदार
रा. पांधरा ता. किनवट जि. नांदेड
 
     विरुध्‍द.
1.   विभागीय प्रमुख,
     कबाल इंन्‍शूरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
     शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्‍पलेक्‍स,
     टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद.
2.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.                गैरअर्जदार
     मार्फत शाखा अधिकारी,
मूंबई कार्यालय डिव्‍हीजन नंबर.09, कर्मर्शियल युनियन
हाऊस, एक्‍सीलर थिएटरच्‍या बाजूस, 9 वॅलेस स्टिट,
फोर्ट, मुंबई 400 001.
3.   मा.तहसीलदार,
     तहसील कार्यालय किनवट ता.किनवट जि. नांदेड.
4.   नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, नगिना घाट,नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.ऐ.व्‍ही.चौधरी.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील       - स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 2 व 4 तर्फे वकिल - अड.एस.ऐ.पाठक
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील        - स्‍वतः
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष )
 
 
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार ही मयत विष्‍णू मारोती बारापाञे यांची पत्‍नी आहे. मयत विष्‍णू हे त्‍यांची शेत जमिन गट नंबर 17 क्षेञफळ 1 हे. 14 आर मौजे पांधरा ता.किनवट   येथे शेती करीत होते. सर्व व्‍यवस्थित चालू असताना अचानक दि.28.02.2007 रोजी 23.40वाजता पाणधरा शेतातील शिवारात आखाडयावर जागलीस जात असताना सापाने मयताच्‍या डाव्‍या पायाच्‍या घोटयाजवळ चावा घेतल्‍यामूळे त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाला. अपघात मृत्‍यू म्‍हणून घटनेची फिर्याद पोलिस स्‍टेशन किनवट ता.किनवट येथे गून्‍हा नंबर 01/2007 कलम 174 सीआरपीसी अंतर्गत नोंद केली. अर्जदार हे मयत विष्‍णू यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती वारस आहे. महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्‍या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन गैरअर्जदार क्र.1 मार्फत विमा पॉलिसी घेतली. कबाल इन्‍शुरन्‍स ही विमा सल्‍ला देणारी कंपनी आहे व ते शासन व विमा कंपनी यामधील दूवा आहेत.  म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे रितसर क्‍लेम फॉर्मसह पाठविले असता सदरील क्‍लेम हा गैरअर्जदार क्र.1  कडे प्रलंबित आहे. सदरचा क्‍लेम हा टाळाटाळ करणे व उडवून लावणे या चुकीच्‍या माध्‍यमातून रिजेक्‍ट गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडून करण्‍यात आला. अर्जदार यांनी दि.21.8.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना विमा दाव्‍याबाबत वकिलामार्फत नोटीस पाठविली, नोटीस मिळूनही त्‍यांनी विमा दावा दिला नाही व नोटीसचे उत्‍तरही दिले नाही. तसेच दि.17.12.2007 रोजी वकिलामार्फत  रिलायन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांना दिलेला अर्ज दाखल केलेला आहे. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की,तिला  विम्‍याची रक्‍कम रु,1,00,000/- व त्‍यावर 18 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत म्‍हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
 
                       गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्‍लेम त्‍यांचेकडे
 
 
दि.04.04.2008 रोजी तहसिलदार यांचेकडून आला व त्‍याप्रमाणे अपघात हा दि.28.2.2007 रोजी झाला व अर्जदाराचे पॉलिसीचा कालावधी दि.15.7.2006 ते दि.14.7.2007 असा आहे. त्‍याप्रमाणे विमा दावा हा दि.14.10.2007 पर्यत येणे आवश्‍यक होते पण दावा वेळेत आला नाही त्‍यामूळे त्‍यांनी तो परत रजिस्‍ट्रर्ड न करता तहसील कार्यालय यांना दि.8.4.2008 रोजी वापस पाठविण्‍यात आला. त्‍यामूळे त्‍यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
 
                  गैरअर्जदार क्र.2 व 4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे एकञितरित्‍या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी ही अटी व शर्ती वर दिल्‍या जाते. अर्जदार यांनी ते शेतकरी असल्‍याबददल व व शेती त्‍यांचे नांवावर असल्‍याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही.हे शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 याचेकडून त्‍यांनी काढली आहे हे त्‍यांना मान्‍य नाही. अर्जदार ही मयत आत्‍माराम यांची पत्‍नी असल्‍याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्‍यांना अमान्‍य आहे. मयत विष्‍णू दि.28.02.2007 रोजी साप चावल्‍यामूळे मरण पावले हे त्‍यांना मान्‍य नाही. अर्जदार यांनी पोलिस पेपर व इतर कागदपञ हे सांक्षाकीत दाखल केलेले नाही फक्‍त झेराक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत.अर्जदार यांनी मयताचे नांवाचा 7/12 दाखल केलेला नाही. मयत अर्जदार यांनी पॉलिसीच्‍या नियम व अटीचे पालन केलेले नाही. ज्‍यावेळेस अपघात झाला त्‍यावेळेस अर्जदाराच्‍या नांवाने शेती नव्‍हती.त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
         
               गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले पण त्‍यांनी जवाब दाखल केला नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द नो से चा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
 
 
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
             
                   मयत विष्‍णू यांचा दि.28.02.2007 रोजी सुमारे 23.40 वाजता साप चावून मृत्‍यू झाला म्‍हणजे त्‍यांचा अपघातात मृत्‍यू झाला असे म्‍हटले आहे. या बददलचा पूरावा म्‍हणून दि.02.03.2007 रोजी पी.एम. करुन चौकशीचे कागदपञ पाठविले बाबत पञ, मेडीकल ऑफिसर यांचा रिपोर्ट यात इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍याप्रमाणे मयत विष्‍णू यांना सापाने चावा घेतला असे म्‍हटले आहे,दि.1.3.2007 चा मरणोत्‍तर पंचनामा यात मयत विष्‍णू यांचे डाव्‍या पायावर सरळ व घोटयाजवळ सापाने चावा घेतल्‍याचे दाताचे व्रण तसेच मयतास दि.28.2.2007 रोजी सापाने चावा घेतला होता व सापाने चावा घेतल्‍याने मृत्‍यू असे आलेले आहे.     पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट यात डॉक्‍टरच्‍या मते  A mole on the neck at left lateral side. Teeth intact. Snake bite mark on the left leg laterally above anklejt. Bite mark was “V” shaped. तसेच त्‍यांचे ओपिनियन मध्‍ये  Opnion as to the cause of death is due to cardio-resporatory failure due to “ Snake bite”. असे स्‍पष्‍ट दिलेले आहे. त्‍यामूळे मृत्‍यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. पी.एम. रिपोर्ट ही तक्रारी सोबत जोडलेला आहे.अर्जदार यांचे नांवे जमिन असल्‍याबददल 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्‍याबददल त्‍यांच्‍या नांवाचा 7/12 व गांव नमूना सहा क   दाखल आहे. याप्रमाणे 1.14 हेक्‍टर ही जमिन पाघंरा ता.किनवट येथे आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांनी मयत आत्‍माराम यांचा विमा प्रस्‍ताव आला असून त्‍यासोबत खालील कागदपञ जसे पी.एम. रिपोर्ट, वयाचे प्रमाणपञ, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, 7/12, मयताचे निवडणूक आयोगाचे ओळखपञ दाखल केलेले आहे. मृत्‍यूनंतर दाव्‍यासाठी क्‍लेम फॉर्म पूर्ण भरुन घेऊन तहसीलदार यांना दिल्‍याची नोंद आहे. रिलायन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांना अर्जदार यांचा विमा क्‍लेम बाबतचा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.07.12.2007 रोजी पाठविल्‍याचे पञ सोबत जोडले आहे. अर्जदार यांनी दि.21.08.2008 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना विमा दाव्‍या बाबत कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाच्‍या परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही त्‍यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ 
 
 
टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा मृत्‍यू अपघाती झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. विम्‍याची रक्‍कम ही मयताच्‍या पत्‍नीस मिळाली पाहिजे, त्‍यामूळे अर्जदारांचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यात येते.  शासनाने मध्‍यस्‍थी म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 कबाल इन्‍शूरन्‍स कंपनी यांना नेमले जरी असले तरी यांचा अर्था अर्थी तसा काही उपयोग नाही. उलट हे नियमावर बोट ठेऊन कारण नसताना इन्‍शूरन्‍स कंपनी कडे क्‍लेम प्रपोजल पाठवितच नाहीत व आपणच नीर्णय घेऊन मोकळे होतात. मध्‍यस्‍थीचे काम स्‍क्रूटीनी सारखे असते. त्‍यांने तपासणी करुन कमी जास्‍त काही कागदपञ आहेत काय यांची छाननी करणे व जरी यात नियमात बसत नसले तरी कमीत कमी माहीती साठी म्‍हणून हे प्रपोजल पाठवीणे आवश्‍यक आहे. गैरअर्जदार क्र.1 मूळे इन्‍शूरन्‍स कंपनीकडे प्रपोजल पोहचतच नाही. त्‍यामूळे अशा प्रकारचा क्‍लेम आहे हे त्‍यांना साहजिकच माहीत नसत. आता गैरअर्जदार यांचे मते हे प्रिम्‍यचूअर प्रपोजल आहे कारण त्‍यांनी यावर नीर्णयच घेतलेला नाही व त्‍यांना प्रपोजल देऊन परत नीर्णय घ्‍या, म्‍हणजे अजून दिरंगाई करणे होइल. म्‍हणून प्रिम्‍यॅचूअर स्‍वरुपाची तक्रार जरी असली तरी दाखल कागदपञा आधारे क्‍लेम सेंटल होऊ शकतो. यात विमा क्‍लेम देण्‍यासाठी आवश्‍यक ती सर्व कागदपञे उपलब्‍ध आहेत. या कागदपञाचे आधारावर विम्‍याची रक्‍कम देता येईल. फक्‍त विमा कंपनीला प्रपोजल मिळालेच नसल्‍याकारणने त्‍यांना विमा रक्‍कमेवर व्‍याज लावणे व मानसिक ञास दयावयास सांगणे हे कायदयाचे दृष्‍टीने योग्‍य होणार नाही. म्‍हणून आम्‍ही तसा आदेश करणार नाही.
             
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
2.                                         अर्जदार यांनी परत एक प्रपोजल आवश्‍यक त्‍या कागदपञासह किंवा येथे दाखल असलेले कागदपञाच्‍रूा सत्‍य प्रती घेऊन गैरअर्जदार क्र.4 यांना हे प्रपोजल दयावे किंवा नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी मंचातून या प्रपोजलचा सेट घेऊ शकते व यावर नीर्णय घेऊन 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- दयावेत,
 
 
 
 
         असे न केल्‍यास दि.21.04.2010 पासून त्‍यावर 9 टक्‍के   
          व्‍याज लावण्‍यात येईल व यानंतर पूर्ण रक्‍कम अर्जदारास
          मिळेपर्यत ती व्‍याजासह देण्‍यात यावी.
3.                                         मानसिक ञास देण्‍याचा आदेश नाही.
 
4.                                         दावा खर्च ज्‍यांचा त्‍यांनी आपआपला सोसावा.
 
5.                                         गैरअर्जदार क्र.1 व 3 विरुध्‍द आदेश नाही.
 
6.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                                                       श्री.सतीश सामते     
             अध्‍यक्ष                                                                                                          सदस्‍य
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.