प्रकरण पंजीबध्द करण्यांत आले दि.01/01/2010 विरुध्दपक्षास नोटीस लागून हजर राहण्याची तारीख :- 03/02/2010 मा. अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बुलडाणा यांचे समक्ष प्रकरण क्रमांक :- सी.सी. /02/2010 निकाल तारीख :- 23/11/2010 मनोज रतनलाल जोगड, : वय 35 वर्षे, धंदा - व्यापार, : तक्रारकर्ता रा. प्रताप चौक, लोणार, ता.लोणार, जि.बुलडाणा. : --विरुध्द-- दि ओरीएन्टल इन्शुअरन्स कंपनी लि. : तर्फे शाखाधिकारी, बुलडाणा : गजानन महाराज मंदीर जवळ, सुवर्णनगर, : बुलडाणा. : विरुध्दपक्ष जिल्हा मंचाचे पदाधिकारी :- 1) श्री.राजीव त्रिं. पाटील - अध्यक्ष 2) श्रीमती नंदा लारोकर - सदस्या तक्रारकर्त्यातर्फे वकील :- श्री. आर.डी. मुणोत विरुध्दपक्षातर्फे वकील :- श्री.डि.एस.चव्हाण (मा.अध्यक्ष श्री.राजीव त्रिं. पाटील यांनी निकाल कथन केला) आ दे श प त्र 1.. तक्रारकर्त्यानुसार त्याने विरुध्दपक्षाकडे विमा काढलेल्या चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.-28 सी 5174 या वाहनाला दि.18/5/2009 रोजी अपघात झाल्यानंतर या वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले. तक्रारकर्त्याने याबाबत विरुध्दपक्षाकडे विम्याचा दावा सादर केल्यानंतर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला पत्र पाठवून तक्रारकर्त्याने विमा पॉलीसीच्या अटींचा भंग केला आहे असे कळवून त्यांना विम्याची रक्कम देण्यास नाकारले असल्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन विम्याची रक्कम व त्यावरील व्याज व नुकसान भरपाई इत्यादी मिळण्याची मागणी केली आहे. ..2.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /02/2010 ..2.. 2.. विरुध्दपक्षाच्या लेखी जवाबानुसार तक्रारकर्त्याने संबंधीत वाहनाचे रजिस्ट्रेशन हे खाजगी वाहनामधे केले होते व विरुध्दपक्षाने विमा देखील खाजगी वाहनाचा काढला होता, मात्र तक्रारकर्त्याने हे वाहन भाडयाने प्रवासी वाहतुकीकरीता वापरले होते ज्या दरम्यान संबंधीत वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे तक्रारकर्त्याने विम्याच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्यामुळे विरुध्दपक्ष हे तक्रारकर्त्याला कोणतीही विम्याची रक्कम द्यायला बाध्य नाहीत. 3.. या प्रकरणातील तक्रार अर्ज, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब व उभय बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेता आमच्या समोर खालील मुद्दे निर्णयासाठी उपस्थित होतात. अ) विरुध्दपक्षांची या प्रकरणातील सेवेतील त्रुटी आहे काय ? -- होय. ब) या तक्रारीचा अंतिम आदेश काय ?-- कारणमिमांसेप्रमाणे.. 4.. दोन्ही पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व युक्तीवाद केला. या प्रकरणातील वादाचा एकमेव मुद्दा संबंधीत वाहन हे तक्रारकर्त्याने प्रवासी वाहतूक करण्याकरीता भाडयाने दिले होते अथवा नाही हा आहे. विरुध्दपक्षाने त्यांच्या लेखी जवाबासोबत त्यांचे कंपनीचे वकील श्री. अमोल डहाके,खामगांव यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट दाखल केला आहे, ज्यानुसार संबंधीत वकीलानी तक्रारकर्ता मनोज रतनलाल जोगड व इतर काही व्यक्तींची बयाणे नोंदविलेली आहेत. तक्रारकर्त्याच्या संबंधीत बयाणामधे तक्रारकर्त्याने असे नमूद केलेले दिसून येते की, त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना मुंबई येथे जाण्याकरीता त्यांची गाडी संबंधीत व्यक्तीच्या खर्चाने डिझेल टाकून नेण्याच्या अटीवर दोन दिवसाकरीता दिली होती व सदर गाडी तक्रारकर्त्याचा वाहनचालक सुभाष टेकाळे हा चालवित होता. इतर काही व्यक्तींनी त्यांच्या बयाण्यामधे संबंधीत गाडी ही त्यांनी भाडयाने घेतली होती असे नमूद केले आहे. मात्र या सर्व व्यक्तींची बयाणे प्रतिज्ञालेखावर नोंदविलेली नाहीत. तसेच संबंधीत ..3.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /02/2010 ..3.. इन्स्पेक्शन करणा-या वकीलांनी देखील या प्रकरणात कोणताही प्रतिज्ञालेख दाखल केलेला नाही. उलट तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीमधे संबंधीत वाहन हे त्यांनी इतर व्यक्तीशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे गाडी वापरण्याबाबत कोणतेही भाडे न घेता संबंधीत गाडी वापरण्यास दिली होती असे त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने संबंधीत व्यक्तीकडून कोणतेही भाडे न आकारता केवळ त्या व्यक्तींनी वाहनामधे डिझेल भरावे या अटीवर त्याचे वाहन वापरायला दिले असावे असे दिसून येते. 5.. विरुध्दपक्षाने या प्रकरणात दाखल केलेल्या त्यांचे सर्व्हेअर श्री.बोराखडे यांच्या दि. 16/8/2009 च्या सर्व्हे रिपोर्टनुसार संबंधीत वाहनाचे अपघातामधे संपूर्ण नुकसान झालेले असून सर्व्हेअरने सदर वाहन हे not economically feasible to repairअसा निष्कर्ष काढलेला आहे. त्यामुळेतक्रारकर्त्याच्या वाहनाचे संबंधीत अपघातामधे संपूर्ण नुकसान झालेले आहे असल्यामुळे व या वाहनाचा रु.4,40,000/- चा विमा काढलेला असल्यामुळे Total Loss Basis तत्वानुसार संबंधीत वाहनाच्या नुकसानीकरीता विरुध्दपक्ष रु.4,39,000/- ची रक्कम द्यायला बाध्य आहेत. तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीत संबंधीत व्यक्तीने डिझेल टाकून संबंधीत वाहन वापरण्याकरीता नेले होते असे नमूद केलेले असल्यामुळे तक्रारकर्त्याने देखील जरी हे वाहन भाडयाने वाहतूक करण्याकरीता दिलेले नसेल तरीही तक्रारकर्त्याने देखील विमा पॉलीसीच्या काही अटी व शर्तींचे निश्चितच उल्लंघन केलेले दिसून येते. त्यामुळे अशा प्रकरणामधे मा.सर्वोच्च न्यायालयाने व मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी या अगोदर दिलेल्या अनेक न्यायनिवाडयानुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्या गाडीच्या संपूर्ण नुकसान भरपाईबाबत नियमाप्रमाणे देय असलेल्या रु.4,39,000/- या विम्याच्या रकमे ऐवजी या विम्याच्या दाव्याला Non Standard Basis तत्वावर मंजूर करुन तक्रारकर्त्याला या रकमेपैकी 75% रक्कम देणे न्यायोचीत होईल असे मंचाचे मत आहे. ..4.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /02/2010 ..4.. म्हणून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्या गाडीच्या संपूर्ण नुकसानीबाबत रु.4,39,000/- च्या 75% रक्कम म्हणजेच रु.3,29,250/- देण्याचा आदेश पारीत करण्यांत येतो. मात्र विरुध्दपक्षाने देखील योग्य त्या संशयामुळे तक्रारकर्त्याला विम्याचा दावा देण्याचे नाकारले असल्यामुळे विरुध्दपक्ष हे या रकमेवर इतर कोणतेही व्याज व नुकसान भरपाई देण्यास बाध्य नाहीत असे मंचाचे मत आहे. 5.. तक्रारकर्त्याने त्यांच्या लेखी युक्तीवादासोबत खालील दोन न्यायनिवाडे देखील सादर केलेले आहेत. 1) I (2010) CPJ 167 (NC) NATIONAL C.D.R.C., NEW DELHI National Insurance Company Ltd. & Ors. --- Vs/--- Balwant Singh 2) III (2010 ) CPJ 32 DELHI S.C.D.R.C., NEW DELHI Mauyur Batra --V/s-- ICICI Lombard General Insurance Co.Ltd. & Anr. मंचानुसार वरील दोन्ही न्यायनिवाडे या प्रकरणास लागू होत नाही. कारण मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या न्यायनिवाडयामधे संबंधीत वाहनाची चोरी झाली होती व त्यामुळे चोरीला गेलेले वाहन हे व्यापारी तत्वावर वापरले जात होते अथवा नाही ही बाब विचारात घ्ज्ञेणे आवश्यक नाही असे मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ग्राहय धरले आहे. मात्र मंचासमोरील प्रकरणामधे संबंधीत वाहन हे प्रत्यक्ष वापरले जात असतांना त्यांचा अपघात झालेला असल्यामुळे वरील न्यायनिवाडा या प्रकरणात लागू होत नाही. मंचाने या प्रकरणात देखील ..5.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /02/2010 ..5.. वाहनाचे संपूर्ण नुकसान झालेले आहे असे ग्राहय धरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला विम्याची संपूर्ण रक्कम Non Standard Basis वर देण्याचा आदेश पारीत केलेला असल्यामुळे दुसरा न्यायनिवाडा देखील या प्रकरणात लागू होत नाही. सबब खालील अंतीम आदेश पारीत करण्यांत येतो. अं ती म आ दे श 1) तक्रारकर्त्याचे वाहन क्रमांक एम.एच.28-सी-5174 ला दि.18-5-2009 रोजी झालेल्या अपघाताबाबत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा विम्याचा दावा नॉन स्टॅन्डर्ड बेसीसच्या आधारावर मंजूर करुन तक्रारकर्त्याला त्याच्या वाहनाच्या झालेल्या संपूर्ण नुकसानीबाबत विम्याची 75% रक्कम रु.3,29,250/- (अक्षरी रु. तीन लक्ष एकोणतीस हजर दोनशे पन्नास फक्त ) द्यावी. विरुध्दपक्ष या रकमेवर कोणतेही व्याज इत्यादी द्यायला बाध्य नाही. 2) वरील आदेशाचे पालन विरुध्दपक्षाने हा आदेश मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावे. 3) न्यायीक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. (श्रीमती नंदा लारोकर) (राजीव त्रिं. पाटील) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बुलडाणा. स्थळ :- बुलडाणा दिनांक :- 23/11/2010
| [HONORABLE Mrs Nanda Larokar] Member[HONORABLE R T Patil] PRESIDENT | |