Maharashtra

Nanded

CC/10/32

Vimalbai Pandurang Karandekar - Complainant(s)

Versus

Branch Manager, Kabal Insurance services Prv. Ltd. - Opp.Party(s)

ADV A.V. Choudhary

26 Apr 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/32
1. Vimalbai Pandurang Karandekar Ritha Tq.Bhokar, Dist. Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager, Kabal Insurance services Prv. Ltd. Cidco,AurangabadAurangabadMaharastra2. Branch Manager, National Insurance Com. Ltd.MumbaiMumbaiMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 26 Apr 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2010/32.
                          प्रकरण दाखल तारीख - 01/02/2010
                          प्रकरण निकाल तारीख 26/04/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
 
विमलबाई भ्र. पांडूरंग करंडेकर
वय सज्ञान वर्षे, धंदा शेती व घरकाम                         अर्जदार
रा. रिठा ता. भोकर जि. नांदेड
     विरुध्‍द.
1. शाखा अधिकारी,
    कबाल इंन्‍शूरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
    शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्‍पलेक्‍स,
    टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद.
2.   व्‍यवस्‍थापक
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
मुंबई कार्या.डिव्‍हीजन नं.9 कर्मशियल
यूनियन हाऊस, एक्‍सीलर थिएटरच्‍या बाजूस,
9, वॅलेस स्टिट, फोर्ट, मुंबई -400001.
3.        मा.तहसीलदार,                                   गैरअर्जदार
     तहसील कार्यालय भोकर ता.भोकर जि. नांदेड.
4.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.                      
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,  
     शाखा नगिना घाट, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.अ.व्‍ही.चौधरी
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील        -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र.2 व 4 तर्फे वकिल   - अड.जी.एस.औढेंकर
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील        - कोणीही हजर नाही.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्‍या)
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,मयत पांडूरंग जळबाजी करंडेकर हा शेतकरी असून तो अर्जदार यांचा पती होता, मयत पांडूरंग  हे त्‍यांची शेत जमिन गट नंबर 42 मध्‍ये मौजे रिठा ता.भोकर जि. नांदेड  येथे  शेती  करीत होते.   सर्व व्‍यवस्थित चालू असताना अचानक
दि.26.06.2007 रोजी 23.30 वाजता भोकर ते भैसा रोडवर पोमवाळा शिवार येथे हयगयी व निष्‍काळजीपणाने वाहन क्र.एम.एच.-26-जी-1751 च्‍या चालकाने मयतास जबर धडक देऊन त्‍यांचे मरणास कारणीभूत ठरला. अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्‍टेशन भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे गू.रं.नं.91/2007 कलम 279, 304 (अ)  सी.आर.पी.सी. प्रमाणे अपघाती मृत्‍यूचा गुन्‍हा नोंदविला. घटने संदर्भात पोस्‍ट मार्टम रिपोर्ट तसेच इतर वैद्यकीय प्रमाणपञे अर्जदार हीने प्रस्‍तूत तक्रारकामी पुराव्‍याकामी दाखल केलेले आहेत. अर्जदाराने आवश्‍यक कागदपञासह गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला. महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली.  त्‍या  अनुषंगाने  औरंगाबाद  महसूल  विभागात  येणा-या सर्व
शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. गैरअर्जदार क्र.2 यांने अर्जदारास दि.10.06.2008 रोजी कळविले की पॉलिसी क्‍लेम क्र.260600/47/07/969000/247 हा कालमर्यादत आहे परंतु क्‍लेम रक्‍कम आजपर्यत दिली नाही.तसेच  गैरअर्जदार क्र.4 मार्फत विमा उतरविला.   म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल  तहसीलदार भोकर यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना पाठविले असता, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आजपर्यत अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची रक्‍कम दिली नाही. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांना विम्‍याची रक्‍कम रु,1,00,000/-  12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्‍हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
 
               गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत.
त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्‍लेम त्‍यांचेकडे दि.16.08.2007 रोजी तहसिलदार यांचेकडून आला, परंतु त्‍यामध्‍ये  the said claim was imcomplete for want of 7/12 , Death certificate orginal, 6k, age proof attested, Spot Panchanama Attested by police officer, pherphar, the same was conveyed to the claimanat via Tahsildar Bhokar vide our letter dated 23.8.2007, reminder-1 on 25.09.07, 30.10.07, 15.12.2007 and Reminders from National Insurance Company on 7.12.07, 11.08.08 finally the file is closed by the Insurance Company vide their letter dated 18.02.2009, असा जवाब दिलेला आहे. मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
               
                  गैरअर्जदार क्र.2 व 4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे एकञितरित्‍या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी
ही अटी व शर्ती वर दिल्‍या जाते. अर्जदार यांची तक्रार गैरअर्जदार यांचे कडे आलेली नाही व त्‍यांस कोणतेही उत्‍तर गैरअर्जदार यांनी दिलेले नाही म्‍हणून सदर तक्रार ही खर्चासह नामंजूर करावी असे म्‍हटले आहे.अर्जदार यांनी वारसा बददल कोणतेही रेकॉर्ड   अथवा ठोस पूरावा दाखल केलेले नाही.अर्जदार यांनी ते शेतकरी असल्‍याबददल व त्‍यांचे नांवे जमिन होती हे त्‍यांनी सिध्‍द केले पाहिजे व शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 याचेकडून त्‍यांनी काढली आहे हे त्‍यांना मान्‍य नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्‍यांना अमान्‍य आहे. मयत पांडूरंग यांचा अपघात झाला व ते मरण पावले हे त्‍यांना मान्‍य नाही.  त्‍याबददल पोलिस स्‍टेशन भोकर येथे गून्‍हा क्र.91/2007 नोंदविला हे त्‍यांना मान्‍य नाही, हे त्‍यांना सिध्‍द करावे लागेल. गैरअर्जदार यांना हे मान्‍य नाही की त्‍यांनी सर्व कागदपञासह दावा दाखल केला. हे त्‍यांना मान्‍य नाही की, अर्जदार हिचा पती शेतकरी आहे व त्‍यांनी शेतकरी अपघात विमा पॉलिसी काढली होती. त्‍यामूळे ते गैरअर्जदार क्र.2 यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराने विम्‍याची रक्‍कम 12 टक्‍के व्‍याजासह व तसेच नूकसान भरपाई रु.50,000/- सह, रु.5,000/- खर्चासह मागितली हे देण्‍यासाठी गैरअर्जदार जबाबदार नाहीत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर दाव्‍याबाबत मागणी केलेली नाही त्‍यामूळे दावा फेटाळण्‍याचा संबंधच नाही. म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही प्रिमॅच्‍यूअर स्‍वरुपाची आहे.गैरअर्जदाराचे यांचे म्‍हणणे आहे की, अर्जदाराकडे अपघात झाला त्‍यावेळी व्‍हॅलिंड लायसन्‍स नव्‍हते. मयत अर्जदार हा अपघाताचे वेळी अटो रिक्षामध्‍ये ड्रायव्‍हरच्‍या बाजूला बसला होता त्‍यामूळे
 
 
त्‍यांला हे माहीत नव्‍हते की, अटो मध्‍ये कोणत्‍या शिटवर बसत असतात.  गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. यासोबत दाव्‍याशी संबंधीत कागदपञ जसे खासरा पञक, पहाणी पञक आणि प्रिव्‍हीयस एक्‍सट्रक्‍ट चह 7/12, शेताची पावती व इतर आवश्‍यक कागदपञ इत्‍यादी कागदपञ असणे आवश्‍यक आहे. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.   
                  गैरअर्जदार क्र.3 यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळून ते हजर झाले नाही व आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
 
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.2 व 4 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
 
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार   यांचे पती मयत शेतकरी पांडूरंग करंडेकर यांचा दि.26.06.2007 रोजी भोकर ते भैसा रोडवर पोमवाळा शिवार येथे हयगयी व निष्‍काळजीपणाने वाहन क्र.एम.एच.-26-जी-1751 च्‍या चालकाने मयतास जबर धडक दिल्‍यामूळे मयत पांडूरंग यांचा मृत्‍यू अपघाती झाला.   या बददलचा   पूरावा म्‍हणून   घटनास्‍थळाचा पंचनामा,इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, तलाठयाचे प्रमाणपञ, एफ.आय.आर., मरणोत्‍तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट,मृत्‍यू नोंदणीची रजिस्‍ट्रर इत्‍यादी दाखल आहे.   यात इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍यामध्‍ये यातील मयत बसलेला अटो ट्रॅक्‍टरचे उभे राहीलेल्‍या ट्रॉलीमध्‍ये घूसल्‍याने मयताचे छातीस गंभीर धडक बसून छाती दबल्‍याने मरण पावला असे म्‍हटले आहे. पोस्‍ट मार्टम रिपोर्ट मध्‍ये डॉक्‍टराच्‍या मते Above named deeased case death is “ Haemarrhagra shock due to crush injuries due to road traffic accident.” असे म्‍हटलेले आहे म्‍हणजे मृत्‍यू हा अपघातानेच झालेला आहे. त्‍यामूळे मृत्‍यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. घटनेच्‍या मरणोत्‍तर पंचनाम्‍या मध्‍ये मयताचे नांव पांडूरंग जळबाजी करंडेकर असे असून पोलिस स्‍टेशन भोकर येथे गून्‍हा नोंदविण्‍यात आलेला
 
 
आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे. मयत गोविंद यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्‍याबददल त्‍यांच्‍या नांवाचा 7/12 व गाव नमूना आठ- अ,  दाखल आहे. याप्रमाणे गट नंबर 42 मध्‍ये  ही जमिन रिठा ता. भोकर येथे आहे. यावरुन अर्जदार ही मयत पांडूरंग यांची पत्‍नी आहे. तलाठयाचे मृत्‍यू बददलचे पञ दाखल केलेले आहे. यात मयताचा मृत्‍यू हा अपघाताने झाला यांची नोंद आहे व त्‍यांस पत्‍नी विमलबाई ,मूलगी अश्‍वीनी, रविना, मूलगा साईनाथ व छकूली हे मूले आहेत. तसेच 0.40 आर जमिन वहितीखाली आहे असा उल्‍लेख आहे.मृत्‍यूनंतर दाव्‍यासाठी क्‍लेम फॉर्म नंबर 1 पूर्ण भरुन घेऊन तहसीलदार भोकर यांना दिल्‍याची नोंद आहे. दि.26.06.2007 रोजीला अपघात झाला, तहसीलदार भोकर यांना लगेच  कळविण्‍यात आले म्‍हणजे विलंब झाला नाही, पण 90 दिवसांचा अवधी क्‍लेम दाखल करण्‍यास होता. त्‍यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाने परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्‍यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा मृत्‍यू अपघाती झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. विम्‍याची रक्‍कम ही मयताच्‍या पत्‍नीस मिळाली पाहिजे. वयाचा दाखला नाही म्‍हणून मयत शेतकरी नाही, त्‍यासाठी दावा नाकारता येणार नाही, काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्‍हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्‍यांचे जबाबदारीतून मुक्‍त होता येणार नाही.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
 
2.                                         गैरअर्जदार क्र.2 व 4 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.26.06.2007 पासून 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम वसूल होईलपर्यत व्‍याजासहीत दयावेत.
 
3.                                         गैरअर्जदार क्र.2 व 4  यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल   रु.5000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत.
 
4.                                         गैरअर्जदार क्र.,1 व 3 विरुध्‍द आदेश नाही.
 
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                              श्रीमती सुवर्णा देशमूख                                     श्री.सतीश सामते     
          अध्‍यक्ष                                                                           सदस्‍या                                                        सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.