Maharashtra

Nanded

CC/10/44

Gangaram Laxman Shirse - Complainant(s)

Versus

Branch Manager, Kabal Insurance Services Prv. Ltd. - Opp.Party(s)

Adv. A.V. Choudhary

14 Jul 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/44
1. Gangaram Laxman Shirse Shirsakhoda, Tq. Dharmabad. Dist. Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager, Kabal Insurance Services Prv. Ltd. Cidco, Aurangabad.AuranagabadMaharastra2. Branch Manager, ICICI Lombard General Issurance Com. Ltd.Mahalaxmi Road, MumbaiMumbaiMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 14 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/44.
                          प्रकरण दाखल तारीख - 06/02/2010
                          प्रकरण निकाल तारीख 14/07/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
गंगाराम पि. लक्ष्‍मण शिरसे
वय 48 वर्षे, धंदा शेती                                   अर्जदार
रा.शिरसखोड ता. धर्माबाद जि. नांदेड
     विरुध्‍द.
1. शाखा अधिकारी,
कबाल इंन्‍शूरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
शॉप नं.2, दीशा अलंकार कॉम्‍प्‍लेक्‍स,
टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद.
2.   शाखा अधिकारी
     आय.सी.आय.सी.आय. लोबार्ड जनरल
     इन्‍शूरन्‍स कं.लि. केशवराव खाडे मार्ग,
     झेनथि हाऊस, महालक्ष्‍मी मार्ग, मुंबई.
3.        नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.                       गैरअर्जदार                    
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,  
     मुंबई कर्या. डिव्‍हीजन नं.09, कर्मशियल युनियन
हाऊस, एक्‍सीलर थिएटरच्‍या बाजूस, 9 वॅलेजस स्ट्टि फोर्ट, मूंबई.
4.   तहसीलदार,
तहसील कार्यालय,धर्माबाद ता. धर्माबाद जि. नांदेड
5.   नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
     मार्फत व्‍यवस्‍थापक, नगिना घाट, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.ए.व्‍ही.चौधरी
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील        -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकिल      -   अड.ऐ.जी.व्‍यास
 
 
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील       -   कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.3 व 5 तर्फे वकील   - अड.रियाजऊल्‍ला
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्‍या)
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार गंगाराम हा  शेतकरी असून तो शेतीचे काम संपल्‍यानंतर मजूरी करुन उदरनिर्वाह चालवितो. मयत गौतम गंगाराम शिरसे हा अर्जदाराचा मूलगा होता. मयत यांचा मृत्‍यू दि.26.04.2007 रोजी दरड/बूरुज अंगावर कोसळून जुना शिराखोड गावातून माती आणतेवेळेस सांयकाळी 5 ते 5.30 च्‍या सुमारास झाला. सदर घटने बाबत अपघात मृत्‍यू म्‍हणून पोलिस स्‍टेशन धर्माबाद येथे नोंद झाली कआहे. तसेच त्‍यानुसार आ.मृ.क्र. 11/2007 सी.आर.पी.सी 174 अंतर्गत दाखल झाला आहे. वरील घटने संदर्भात पोस्‍ट मार्टम रिपोर्ट तसेच इतर वैद्यकीय प्रमाणपञे अर्जदार यांनी दाखल केलेली आहे. अर्जदार हा वयस्‍कर असून मयत हा घरातील कर्ता व्‍यक्‍ती होता व त्‍यांचेवर संपूर्ण कूटूंबाची जबाबदारी होती. अर्जदार यांना मौजे शिरसखोड ता.धर्माबाद येथे गट नंबर 152  मध्‍ये शेत जमिन आहे. अर्जदाराने आवश्‍यक कागदपञासह गैरअर्जदार क्र.4 मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 3   यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला.त्‍यानुसार प्रस्‍तूत तहसीलदार गैरअर्जदार क्र.4  यांनी चूकीने सदर क्‍लेम अर्ज गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविला. तहसीलदार यांनी सदरचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला. महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्‍या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.3 व 5 नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. तसेच गैरअर्जदार क्र.1 मार्फत विमा उतरविला.म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल तहसीलदार गैरअर्जदार क्र.4 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.3 यांना पाठविले असता, गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची रक्‍कम दिली नाही. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांना
 
 
अपघात विमा योजनेअंतर्गत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- 18 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्‍हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
 
               गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company
appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत.
त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा कोणताही क्‍लेम त्‍यांचेकडे आलेला नाही. त्‍यामूळे या बाबत ते काहीही भाष्‍य करीत नाहीत. मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
 
              गैरअर्जदार क्र.2 हे स्‍वतः हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.अर्जदारानी तहसीलदार यांच्‍याकडे क्‍लेम फॉर्मसह अर्ज दाखल केला व तहसीलदार यांनी चूकीने सदरचा क्‍लेम अर्ज गैरअर्जदार क्र.2 यांच्‍याकडे पाठविला. अर्जदाराचा मूलगा दि.26.4.2007 रोजी झाला होता त्‍यामूळे अर्जदाराने सदरची तक्रार दि.26.4.2007 पासून दोन वर्षाचे आंत म्‍हणजे दि.26.4.2009 पर्यत दाखल करणे आवश्‍यक होते परंतु अर्जदाराने सदरची तक्रार दि.07.04.2010 रोजी दाख्‍ल केली. जी मूदतीच्‍या बाहेर आहे त्‍यामूळे सदर तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
                  गैरअर्जदार क्र.3 व 5 हे  वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.अर्जदार यांनी स्‍वतःची तक्रार सबळ पूरावा दाखल करुन सिध्‍द करावी. अर्जदारांनी पोलिस स्‍टेशन मध्‍ये जी तक्रार दाखल केली आहे ती त्‍यांना मान्‍य नाही. सदरची योजना ही कोकन विभागाची असल्‍यामूळे ती वर्ष 2007-08 सालासाठी लागू होती. अर्जदार हा अपघाताच्‍या वेळेस त्‍या योजनेस पाञ नव्‍हता त्‍यामूळे त्‍यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी.  गैरअर्जदार
 
 
 
यांना ञास देण्‍याचे उददेशाने ही तक्रार दाखल केलेली आहे, त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
    
              गैरअर्जदार क्र.4 यांना मंचाने नोटीस पाठवून ते हजर झाले नाही व त्‍यांनी आपले म्‍हणणे मांडले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
 
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1,2,3 व 5 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
 
              अर्जदाराने आयसीआयसीआय लोम्‍बार्ड जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी, मूंबई यांना गैरअर्जदार केलेले होते. तसेच नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि. मूंबई यांनाही गैरअर्जदार केलेले होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी असे म्‍हटले आहे की, अर्जदाराचा मूलगा ज्‍या काळात मयत झाला त्‍या काळात शेतकरी अपघात विमा त्‍या भागाचा त्‍यांचेकडे नव्‍हता. अशा प्रकारचे परिपञक मंचासमोर दाखल केले आहे त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्‍हणणे सिध्‍द झाले म्‍हणून दि.01.07.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांना वगळण्‍यात आले.
 
              अर्जदार यांचा मूलगा मयत गौतम गंगाराम शिरसे यांचा दि.26.04.2007 रोजी दरड/बूरुज अंगावर कोसळून जुना शिराखोड गावातून माती आणतेवेळेस सांयकाळी 5 ते 5.30 च्‍या सुमारास झाला. सदर घटने बाबत अपघात मृत्‍यू म्‍हणून पोलिस स्‍टेशन धर्माबाद येथे नोंद झाली कआहे. तसेच त्‍यानुसार आ.मृ.क्र. 11/2007 सी.आर.पी.सी 174 अंतर्गत दाखल झाला आहे. वरील घटने संदर्भात पोस्‍ट मार्टम रिपोर्ट तसेच इतर वैद्यकीय प्रमाणपञे अर्जदार यांनी दाखल केलेली आहे. या बददलचा   पूरावा तहसीलदाराचे जिल्‍हाधिकारी नांदेड यांना दि.15.1.2008 रोजीचे पञ, पोलिस
 
 
स्‍टेशन धर्माबाद यांना दिलेला अर्ज, मयत गौतम यांचे नांवाने शेती असल्‍याबददल गाव नमूना सात, मेडीकल ऑफिसर धर्माबाद यांचे मयताचे मृत्‍यू बददल व त्‍यांचे कूटूंबातील सदस्‍याबददल पञ, पोलिस पाटील व ग्रामसेवक व संरपचाचे वारस प्रमाणपञ,पोलिस स्‍टेशन धर्माबाद यांचा अकस्‍मात मृत्‍यू रिपोर्ट, इन्‍क्‍सेस्‍ट पंचनामा दाखल केला आहे त्‍यात मयत गौतम यांचा मृत्‍यू हा बूरुज कोसळून झाला असे म्‍हटले आहे. पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट दाखल केला आहे त्‍यात मयताचा मृत्‍यू हा अंगावर बूरुज यकोसळून मातीत दबून झाला असे म्‍हटले आहे. घटनास्‍थळ पंचनाम्‍यामध्‍ये सूध्‍दा मयत गौतम हा अचानक भिंत अंगावर कोसळून मृत्‍यू असे म्‍हटले आहे.
Provisional Postmortem Report  मध्‍ये    “ Death due to complete blockage of respiratory passage due to debris of Earth partcles leading to asphysia and respiratory failure ”  असे म्‍हटले आहे. अर्जदार गौतम   यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्‍याबददल त्‍यांच्‍या नांवाचा 7/12 व गाव नमूना बारा दाखल आहे. तलाठयाचे अपघाताबददलचे पञ दाखल केलेले आहे. यात अर्जदार हे शेतकरी असून ते शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत असल्‍यामूळे ते विमा रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहेत असे म्‍हटले आहे. दि.26.04.2007 रोजीला अपघात झाला, तहसीलदार धर्माबाद यांना लगेच क्‍लेम फॉर्म सहीत दावा  दाखल केलेला आहे. क्‍लेम हा 90 दिवसांचा अवधी क्‍लेम दाखल करण्‍यास होता. त्‍यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना
शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूःखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाचे परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्‍यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा अपघात झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्‍हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्‍यांचे जबाबदारीतून मुक्‍त होता येणार नाही.
 
 
 
 
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
2.                                         गैरअर्जदार क्र. 3 व 5 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- दयावेत, तसे न केल्‍यास संपूर्ण रक्‍कमेवर म्‍हणजे रु.1,00,000/- वर रक्‍कम मिळेपर्यत त्‍यांना 9 टक्‍के व्‍याजाने रक्‍कम दयावी लागेल.
3.                                         गैरअर्जदार क्र. 3 व 5 यांनी दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- दयावेत.
4.                                         गैरअर्जदार क्र.1 व 4 विरुध्‍द आदेश नाही.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                              श्रीमती सुवर्णा देशमूख                               श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                सदस्‍या                                                   सदस्‍य.
 
 
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक