::निकालपत्र::
(पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक –31 मार्च,2012 )
1. अर्जदार/तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली प्रस्तुत तक्रार गैरअर्जदार विरुध्द न्यायमंचासमक्ष दाखल केली आहे.
2. यातील तक्रारकर्त्याचे थोडक्यात निवेदन असे आहे की, त्याने आपले मालकीचा ट्रक क्रमांक-MH-31-C.B.-4802 चा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक-03.01.2010 ते 02.01.2011 या कालावधीसाठी काढला होता. दिनांक-11.10.2010 रोजी सदर विमाकृत ट्रकला अपघात झाला, त्या संबधिचा विमा दावा त.क.ने गैरअर्जदार/विरुध्दपक्षाकडे सादर केला. त.क.ला विमाकृत ट्रकचे दुरुस्तीसाठी रुपये-4,73,065/- एवढया रकमेचे अंदाजपत्रक देण्यात आले, त्या संबधीचे दस्तऐवज गैरअर्जदार विमा कंपनीकडे सादर केले. परंतु गेरअर्जदार विमा कंपनीने विमादाव्या संबधाने फक्त रुपये-1.00 लक्षचा धनादेश पाठविला. सदर धनादेश त.क.ने कायदेशीर हक्क राखून स्विकारला आणि विमा दाव्या संबधाने कमी रक्कम प्राप्त झाली म्हणून प्रस्तुत तक्रार वि.जिल्हा न्यायमंचा समक्ष दाखल केली.
3. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार विरुध्द पुढील प्रकारच्या मागण्या केल्यात- त.क.ला रुपये-3,73,065/- एवढी नुकसान भरपाईची रक्कम गैरअर्जदार कडून मिळावी. तसेच त.क.ला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-20,000/- आणि नोटीस खर्च म्हणून रुपये-1000/- गैरअर्जदार कडून मिळावेत.
ग्राहक तक्रार क्रमांक : 147/2011
4. प्रस्तुत प्रकरणात या न्यायमंचाचे मार्फतीने यामधील गैरअर्जदार विमा कंपनीस नोटीस पाठविली असता, त्यांनी उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर पान क्रं 38 ते 42 वर निशाणी क्रं 13 अनुसार न्यायमंचा समक्ष दाखल केले. गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनीने त्यांचे लेखी उत्तराद्वारे त.क.ची सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत आणि असा बचाव घेतला की, त्यांचे सर्व्हेअरने या संबधीची सर्व माहिती विचारात घेऊन रुपये-1,30,000/- एवढी नुकसानी निर्धारित केली व ती योग्य आहे. त्यामुळे रुपये-1,00,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास दिलेले आहेत व तक्रारकर्त्याने सदर रक्कम स्विकारलेली आहे, त्यामुळे त.क. यास आता कोणताही क्लेम मागण्याचा हक्क नाही, यास्तव त.क.ची तक्रार चुकीची असल्यामुळे ती खारीज व्हावी, असा उजर गैरअर्जदार विमा कंपनी तर्फे घेण्यात आला.
5. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं 6 निशाणी क्रमांक-3 वरील दाखल यादी नुसार एकूण 18 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये विम्या संबधीचे दस्तऐवज, वाहन दुरुस्तीचे अंदाजपत्रकाची प्रत, बिलाच्या प्रती, कॅश मेमोची प्रत, टॅ्क्स इन्व्हाईस प्रत, त.क.ने गैरअर्जदारास दिलेले पत्र व नोटीस प्रत, पोस्टाची पावती इत्यादीचा समावेश आहे. त.क.ने पान क्रं 43 ते 45 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 46 ते 49 वर आपले शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 51 वरील यादी नुसार एकूण 08 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये त.क.ने वि.प.ला दिलेले पत्र, पोस्टाची पावती, पोच पावती, कॅश बिलाच्या प्रती, अपघात रिपोर्ट फॉर्म अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक: 147/2011
6. गैरअर्जदार/विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तर पान क्रं 38 ते 42 वर निशाणी क्रं 13 अनुसार प्रतिज्ञालेखावर दाखल केले.
7. प्रस्तुत प्रकरणात उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
8. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, गै.अ. चे प्रतिज्ञालेखावरील उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व उभय पक्षां तर्फे वकीलांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
9. प्रस्तुत प्रकरणातील महत्याची बाब म्हणजे या प्रकरणातील विवाद हा अतिशय संक्षीप्त स्वरुपाचा आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने तिचे सर्व्हेअरने विमाकृत वाहना संबधाने कोणते अंदाजपत्रक तयार केले व त्यात किती नुकसानी दर्शविली या संबधीचे दस्तऐवज दाखल केले नाहीत. तक्रारकर्त्याने सुध्दा त्याने वाहन दुरुस्ती संबधाने केलेल्या खर्चाचे संपूर्ण दस्तऐवज सादर केलेले नाहीत.
10. त.क.ने गैरअर्जदार विमा कंपनीने विमा दाव्यापोटी देऊ केलेली रक्कम रुपये-1,000,000/- आपले हक्क राखून स्विकारलेली असल्याचे दस्तऐवज दाखल केले, त्यामुळे त.क.ला उर्वरीत रक्कम मागण्याचे पूर्ण अधिकार आहेत.
11. गैरअर्जदार विमा कंपनीने नमुद केल्या नुसार त्यांचे सर्व्हेअरने विमाकृत वाहनाचे दुरुस्ती संबधाने रुपये-1,30,000/- एवढया रकमेची नुकसानी निर्धारित केली होती. सर्व्हेअरने रुपये-1.30 लक्ष नुकसानी निर्धारित केलेली असताना गैरअर्जदार विमा कंपनीने त.क.ला केवळ रुपये-1.00 लक्ष
ग्राहक तक्रार क्रमांक: 147/2011
एवढी रक्कम कशी काय दिली? या संबधाने खुलासा दिला नाही आणि ही गैरअर्जदार विमा कंपनीचे सेवेतील त्रृटी आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
12. त.क.ने दाखल केलेल्या बिलाचे अवलोकन केले असता त्यांनी रुपये-2,56,383/- एवढया रकमेची बिले न्यायमंचात दाखल केलेली आहेत आणि या पेक्षा जास्त रक्कम त्यांना विम्यापोटी मंजूर करणे न्यायोचित होणार नाही असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. त.क.चे म्हणण्या प्रमाणे त्याचे जवळ तक्रार दाखल करते वेळी झेरॉक्स काढून न ठेवल्यामुळे काही बिलांच्या प्रती उपलब्ध नव्हत्या त्यामुळे तो त्यावेळी दाखल करु शकला नाही. त.क.ने युकतीवादाचे वेळी काही बिले दाखल केली ती विचारात घेण्या योग्य नाही असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे कारण ते दस्तऐवज मूळ तक्रारी सोबत दाखल करणे गरजेचे होते.
13. रुपये-2,56,383/- एवढया रकमे पैकी रुपये-6383/- भंगारा पोटी कपात केल्यास, त.क.ला रुपये-2,50,000/- एवढी रक्कम विम्यापोटी मिळणे गरजेचे आहे परंतु त्यापैकी रुपये-1,00,000/- एवढी रक्कम त.क.ला गैरअर्जदार विमा कंपनीकडून प्राप्त झालेली आहे, त्यामुळे विमादाव्या पोटी गैरअर्जदार विमा कंपनी कडून उर्वरीत रक्कम मिळण्यास त.क. पात्र आहेत असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 147/2011
14. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1) तक्रारकर्त्याची तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येते.
2) गैरअर्जदार विमा कंपनीने त.क.यास रुपये-1,50,000/- (अक्षरी रुपये-
एक लक्ष पन्नास हजार फक्त ) एवढी रक्कम आणि तीवर
दि.18.02.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो
द.सा.द.शे.9% व्याज यासह येणारी रक्कम सदर आदेशाची प्रत प्राप्त
झाल्या पासून तीस दिवसाचे आत द्यावी. विहित मुदतीत रक्कम न
दिल्यास सदर रक्कम द.सा.द.शे. 9% ऐवजी द.सा.द.शे. 12% दराने
दंडनीय व्याज यासह रक्कम देण्यास गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनी
जबाबदार राहील.
3) गैरअर्जदार विमा कंपनीने, त.क.ला झालेल्या मानसिक त्रासा बद्यल
रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) आणि तक्रारीचे खर्चा
बद्यल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) सदर आदेश प्राप्त
झाल्या पासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.