निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 25/04/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 06/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 17/02/2014
कालावधी 02 वर्ष 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
रंजना भ्र. शेषराव बेटकर. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा. घरकाम. अॅड.अरुण डी.खापरे.
रा.हातनूर,ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द
1 मा.तहसीलदार, गैरअर्जदार.
तहसील कार्यालय,सेलू.ता.सेलू जि.परभणी. स्वतः
2 तालुका कृषी अधिकारी, स्वतः
तालुका कृषी अधिकारी, सेलू. ता.सेलू जि.परभणी.
3 विभागीय व्यवस्थापक, स्वतः
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं. 7, सेक्टर ई 1, टाऊन सेंटर,सिडको, औरंगाबाद.
4 व्यवस्थापक, अॅड.एस.ए.पाठक.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
मंडल कार्यालय, (272000)
विभागीय कार्यालय, नगीनाघाट रोड, नांदेड.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिचा पतीचा नामे शेषराव रंगनाथ बेटकर दिनाक 03/12/2006 रोजी वाहन अपघातात मृत्यू झाला. याबद्दल अपघाताची माहिती बाळापूर ता.हिंगोली येथील पोलीस स्टेशनला दिली. संबंधीत पोलीसांनी स्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केला व साक्षीदाराचे जबाब नोंदविले. व सरकारी दवाखान्यात मयताचे पी.एम. करण्यात आले.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती हयात असतांना मौजे हातनूर ता.सेलू येथील गट क्रमांक 33 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीन मध्ये शेती कसून खात होते. याबाबत अर्जदाराच्या मयत पतीचे नाव 7/12, 8 अ, 6 ड, 6 क प्रमाणपत्रावर आलेली आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत पतीचा विमादावा संपूर्ण कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दाखल केला. सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तो गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवला व गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीकडे पाठवला, परंतु गैरअर्जदार क्रमांक 3 याने जाणून बजून त्रास देण्यासाठी दिनांक 10/06/2008 च्या पत्राव्दारे त्रुटीच्या कागदपत्राची पुर्तता करा, असे अर्जदारास कळवीले तरी देखील मागणी प्रमाणे सर्व कागदपत्राची पुर्तता केली.
सदर विमा दाव्याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे चौकशी केली असता, त्यांनी पुन्हा एक फाईल तयार करुन गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविली त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 4 ने पुन्हा 18/02/2009 रोजी अर्जदारास पत्र पाठविले व त्यामध्ये असे नमुद केले होते की, आम्ही पाठविलेल्या पत्रानुसार कागदपत्राची पुर्तता न केलेमुळे तुमची फाईल बंद केली, असे कळविले. अर्जदारास सदर विमा कंपनीचे पत्र उशिरा मिळाले. सदरच्या पत्रात विमा कंपनीने त्यानी पाठविलेल्या दिनांक 10/06/2008 च्या पत्राचा उल्लेख केलेला नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, तिला विमा कंपनीचे 18/02/2009 चे पत्र मिळाल्यानंतर तिने वकीला मार्फत नोटीस पाठविली व विमा दाव्याची रक्कम मागीतली, परंतु गैरअर्जदाराने नोटीसीस दाद दिली नाही. म्हणून सदरचा विमादावा मुदतीत आहे.
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा बेकायदेशिरपणे बंद करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करावी व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 1 लाख रु. मृत्यू झाल्या तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे अर्जदारास द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचे आदेश व्हावेत.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 4 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 6 वर 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये रेप्युडेशन लेटरची प्रत, गैरअर्जदार क्रमांक 4 यांचे कागदपत्र सादर करण्याचे पत्र, मृत्यू प्रमाणपत्र, पासबुक, टी.सी., होल्डींग प्रमाणपत्र, 7/12 उतारा, गाव नमुना नं. 6(क), घटनास्थळ पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, एफ.आय.आर.ची प्रत. इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 39 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदारानी शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळवले बाबतचा अर्ज या कार्यालयाचे पत्र दिनांक 08/01/2007 अन्वये नुकसान भरपाई मिळवले बाबत श्री.विनीत अठल्ये कबाल औरंगाबाद यांचेकडे पाठवण्यात आला होता, परंतु सदर प्रस्तावा मध्ये विमा कंपनीने कागदपत्राची पुर्तता करणे बाबत आम्हांस कळवले होते, करीता प्रस्तुत प्रकरणात तत्काळ कार्यवाही करणे बाबत या कार्यालया मार्फत वेळोवेळी विमा कंपनीना पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 38 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विमादावा त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर सदरचा प्रस्ताव आम्ही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांना पुढील कार्यवाहीस्तव सादर केलेला होता. व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांनी तो अर्जदाराचा सदरचा विमादावा दिनांक 26/12/2008 रोजी कबालकडे पाठवीला.
गैरअर्जदार क्रमांक 3 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 37 वर लेखी कळविले की, सदर तक्रारीची नोटीस त्याना मिळाली बाकी कागदपत्रे मिळाली नाहीत, तरी अर्जदारास आदेश द्यावा की, त्याने सर्व कागदपत्र आम्हांस द्यावेत. व तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या विलंब माफीच्या अर्जावर गैरअर्जदार क्रमांक 3 ने नि.क्रमांक 17 वर आपला लेखी निवेदनात म्हंटले आहे की, अर्जदाराचा आम्हास विमादावा दिनांक 02/02/2007 रोजी मिळाला व सदरचा विमादावा अपुर्ण होता व त्रुटीच्या कागदपत्राची पुर्तता करणेसाठी आम्ही दिनांक 06/02/2007, 26/03/2007, 29/04/2007, 30/05/2007, व 15/08/2007 या रोजीच्या पत्राव्दारे मागणी केली होती, परंतु अर्जदाराने त्रुटीचे कागदपत्रे दाखल केली नाही व शेवटी विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा दिनांक 18/02/2009 रोजी बंद केला.
गैरअर्जदार क्रमांक 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 40 वर पुर्शिस दाखल केली आहे की, त्याने अर्जदाराच्या विलंब माफीच्या अर्जावर जो Say दाखल केला आहे तोच Say अर्जदाराच्या सदरच्या तक्रारीस लेखी जबाब समजण्यात यावा. नि.क्रमांक 25 वर दाखल केलेल्या Say मध्ये विमा कंपनीने असे म्हंटले आहे की, अर्जदार ही शेतकरी नाही, ती स्वतः उदरनिर्वाह करुन शेती करत नाही. अर्जदार हिने जो मंचासमोर 7/12 दाखल केलेला आहे तो खोटा आहे. अपघात हा दिनांक 03/12/2006 रोजी झाले असे नमुद केले आहे व शासनाकडून पैसे उचलण्यासाठी 7/12 उतारा नंतर केला आहे. अर्जदारानी 7/12 उतारा 2009 /2010 चा दाखल केला आहे, यापूर्वीचा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. अर्जदाराने विमा प्रस्तावा सोबत रितसर कागदपत्रे दाखल केलेली नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, विमा कंपनीने दिनांक 18/02/2009 रोजीचे पत्र अर्जदारास उशिरा मिळाले विमा कंपनीचे म्हणणे की, शासनाने वेळोवेळी त्रुटीच्या कागदपत्राची पुर्तता करण्यास अर्जदारास कळविले होते, परंतु अर्जदाराने कागदपत्रे दाखल न केलेमुळे विमा कंपनीने अर्जदाराची फाईल बंद केली विमा कंपनीचे म्हणणे की, आम्ही अर्जदारास दिनांक 07/06/2008 रोजी पत्र पाठवुन कागदपत्र पुर्तता करावी, म्हणून कळविले होते, यात विमा कंपनी जबाबदार आहे. असे म्हणणे योग्य वाटत नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, शासनाने कराराच्या वेळी जे नियम दिले आहेत त्या नियमांचे उल्लंघन अर्जदाराने केलेले आहे. अर्जदाराने आपला विमादावा 90 दिवसाच्या आत दाखल करणे आवश्यक होते, तरी विमा कंपनीने मंचास विनंती केली की, सदरचा अर्ज खारीज करण्यात यावा.
विमा कंपनीने नि.क्रमांक 31 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने अर्जदाराचा शेतकरी
अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमा
दावा बंद करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती नामे शेषराव बेटकर यांना मौजे हातनुर ता.सेलू जि.परभणी येथे गट क्रमांक 33 मध्ये 26 गुंठे शेत जमीन होती, ही बाब नि.क्रमांक 6/8 वरील फेरफार नकले वरुन व नि.क्रमांक 6/9 वर दाखल केलेल्या गाव नमुना 6 क च्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे पती नामे शेषराव रंगनाथ बेटकर यांचा दिनांक
03/12/2006 रोजी ट्रक क्रमांक MH-26 B 7548 च्या चालकाने हलगर्जीपणे ब्रेक लावल्याने पाठीमागुन येणारा टेंपो क्रमांक MH 24 –F 5726 पाठी मागून ट्रकवर येवुन आदळल्याने व अर्जदाराचे पती पाठी मागील सदर टेंपोत प्रवासी होते, व त्यात त्यांचा सदर अपघातात मृत्यू झाला होता, ही बाब नि.क्रमांक 6/10 वरील गुन्हा क्रमांक 133/05 पोलीस स्टेशन आ.बाळापूरच्या घटना स्थळ पंचनामाच्या व तसेच नि.क्रमांक 06/11/1 वरील पी.एम. रिपोर्ट वरुन सिध्द होते. अर्जदार ही मयत शेषराव बेटकर यांची पत्नी वारस आहे, ही बाब नि.क्रमांक 6/8 वर दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला होता, ही बाब गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबात मान्य केले आहे. अर्जदाराचा विमादावा जिल्हा कृषी अधिका-याने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवला होता, ही बाब नि.क्रमांक 13/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्रमांक 3 ने सदरचा अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 4 कडे पाठविल्यानंतर विमा कंपनीने दिनांक 10/06/2008 रोजीच्या पत्राव्दारे त्रुटीच्या कागदपत्राची पुर्तता करा असे अर्जदारास कळविले होते, ही बाब नि.क्रमांक 6/2 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने अर्जदारास मागणी केलेल्या कागदपत्राची पुर्तता न केलेमुळे दिनांक 18/02/2009 रोजी विमा कंपनीने अर्जदारास पत्र पाठवुन विमादावा बंद केला असे कळविले होते, ही बाब नि.क्रमांक 6/1 वर दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे विमा कंपनीचे पत्र अर्जदारास मिळाल्यानंतर त्यांनी वकीला मार्फत गैरर्अदारास नोटीस पाठविली होती, व नोटीस सोबत सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविली, याबाबत अर्जदाराने कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही. अर्जदाराने सर्व कागदपत्राची पुर्तता विमा कंपनीकडे दाखल केल्याबाबत योग्य तो पुरावा मंचासमोर आणला नाही.
अर्जदाराने प्रस्तुत तक्रार दाखल करणेस विलंब झाला व झालेला विलंब माफ करावा असा अर्ज एम. ए. नं. 01/2011 केला हेाता, व सदरचा अर्ज मंचानी दिनांक 06/02/2012 रोजी मंजूर केला व झालेला विलंब माफ केला होता.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे.
गैरअर्जदार विमा कपंनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही. तरी परंतु अर्जदारास परत एकदा विमा कंपनीकडे मागणी प्रमाणे कागदपत्र
दाखल करणेस संधी देणे योग्य व न्यायाचे ठरेल, असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने आदेशाच्या प्रती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विमा कंपनीने
मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीकडे
करावी. गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने अर्जदाराकडून सर्व कागदपत्र प्राप्त
झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत अर्जदाराचा शेतकरी अपघात योजने अंतर्गत
तिच्या मयत पतीचा विमादावा निकाली काढावा.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.