निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 17/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 18/04/2013
कालावधी 01 वर्ष 01 महिना 16दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
तुकाराम सुदामराव पवार. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.निवृत्त कर्मचारी. अड.एस.एन.वेलणकर.
रा.आसमान गंज,भजनगल्ली.
सरकारी दवाखान्या जवळ,परभणी.
विरुध्द
अब्दुल सुबान अब्दुल गनी. गैरअर्जदार
वय-सज्ञान,धंदा घर बांधकाम गुत्तेदार. स्वतः
मामू किराणा दुकान व मोरेश्र्वर किराणा दुकानाच्या बाजुला,
सरफराज नगर, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
अर्जदार श्री तुकाराम सुदामराव पवार यांनी हि तक्रार गैरअर्जदार अब्दुल सुबान अब्दुल गनी धंदा बांधकाम गुत्तेदार रा.सरफराज नगर परभणी यांचे विरुध्द बांधकामा बाबत करार करुन अर्धवट बांधकाम करुन सेवेत दिलेल्या त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळावे अशी तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे की,
अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून त्याने गैरअर्जदार अब्दुल सुबान अब्दुल गनी या बांधकाम गुत्तेदार सोबत नं.पा.मालमत्ता क्रमांक 91 चा पहिल्या मजल्यावर बांधकाम करणे विषयी दिनांक 26/09/2011 रोजी करार केला होता.त्याचे असे ही म्हणणे आहे की, सपूर्ण बांधकाम बाबत 1,20,000/- रुपये देण्याचे ठरले होते.पहिला हप्ता 50,000/- रुपयांचा व बाकीच्या हप्त्याचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर 30,000/- देण्याचे ठरले व नंतर बांधकाम पुर्ण झाल्यावर उर्वरित पैसे देण्याचे ठरले.त्याप्रमाणे गैरअर्जदारास 50,000/- रुपये दिले. व त्यांनी बांधकामास सुरुवात केली,पण कराराच्या अटी विरुध्द जाऊन गैरअर्जदाराने पैसे मागावयास सुरु केले व छत टाकण्याच्या आगोदरच अर्जदाराने त्यास 1,07,000/- रुपये दिले. पण काम पुर्ण न करताच अर्धवट काम सोडून 20/12/2011 रोजी पासून काम बंद केले.
अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की,
1) गैरअर्जदारास आदेश द्यावा की, काम न केलेल्या रक्कमेची भरपाई म्हणून
50,000/- रुपये अर्जदारास दिनांक 23/09/2011 पासुन 12 टक्के व्याजासहीत द्यावेत.
2) झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रुपये 20,000/- पाच महिन्याच्या 12 टक्के व्याजासहीत द्यावे.
3) व मानसिक त्रासापोटी 10,000/- व खर्चापोटी रुपये 5,000/- द्यावे.
अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रं. 2 वर दाखल केलेले आहे व अर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रं. 4 वर दिलेल्या यादी प्रमाणे दाखल केले आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस आर.पी.ए.डी.ने काढण्यांत आले होते,पण ते Unclaimed म्हणून परत आले म्हणून मंचाने गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केले.
अर्जदाराचा युक्तिवाद ऐकला यावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैंरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराने बांधकाम कराराची प्रत दाखल केली आहे. तसेच गैरअर्जदाराला दिलेल्या रक्कमे संबंधीचे रिसिप्ट पण दाखल केलेले आहेत, पण बांधकाम शिल्लक राहिले यांचा पुरावा सादर केला नाही.
तसेच अर्जदाराने केलेल्या विनंती वरुन मंचाने कोर्ट कमीशनर म्हणून इंजिनियर श्री.एस.एम.आजेगांवकर यांना नियुक्त केले होते. त्यांनी आपला अहवाल सादर केला नाही.अर्जदाराने मंचास विनंती केली की, त्याचा अहवाल सादर करण्यास वेळ देण्यांत यावे, मंचाने वेळ देवुनही आजपावेतो अहवाल सादर झाला नाही, व अर्जदाराने तसे करण्याचे तसदी घेतली नाही, म्हणून अर्जदाराने आपले म्हणणे की,कंत्राटदाराने अर्धवट बांधकाम केले हे सिध्द केलेले नाही.
सबब,वरील उपस्थितीत केलेल्या मुद्याचे नकारार्थी उत्तर देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यांत येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष