निकाल
दिनांक- 31.10.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार हे मौजे गांजपुर ता.धारुर जि.बीड येथील रहीवासी आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे कूटूबियाची उपजिवीका शेती उत्पन्नावर चालते. तक्रारदार यांनी त्यांचे शेतात विहीर खोदलेली आहे. विहीरीवर विद्यूत मोटार बसवलेली असून सामनेवाले क्र. 1 यांचेकडून विज पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराची गट नंबर 1/अ मध्ये एकूण 5 एकर 7 गुंठे मौ.गांजपूर येथे जमिन आहे. तक्रारदार यांनी सदरील जमिनीमध्ये कापूस, ज्वारी व इतर पिके घेतली. तक्रारदार यांनी सदरील शेतामध्ये ज्वारीचे पिक घेतले. तक्रारदार यांना ज्वारीचे जवळपास 15000 कडबा तयार झाला. प्रत्येकी तक्रारदार यांनी 5 हजार कडब्याची पेढयांची गंजी आपआपल्या शेतात पाळीव प्राण्यांना खाद्य म्हणून रचून ठेवली. तक्रारदार यांनी ज्या विद्यूत वाहीनीमधून विज पुरवठा घेतला आहे. त्या तारांना ब-याच ठिकाणी झोळ पडला होता. सामनेवाले यांनी तारा योग्य प्रमाणात न ओढल्यामुळे तारा ढिल्या झाल्या होत्या. सामनेवाले यांनी ताराची योग्य काळजी घेणे आवश्यक होते. सदरील तारा एकमेकांना चिकटून स्पार्क होण्याची प्रकार ब-याच वेळा घडले. सदरील बाब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे निदर्शनास आणून दिली.
तक्रारदार यांनी त्यांचे शेतात तयार झालेला कडबा बांधावर तिन गंजी रचून ठेवला होता. दि.27.01.2013 रोजी दुपारी 4 वाजेचे सुमारास वा-यामुळे तारा एकमेकास घासून त्यांची स्पार्कीग होऊन जाळाची ठिणगी कडब्यावर पडली व कडब्याचे गंजीस आग लागली. त्यावेळी तक्रारदार हे त्यांचे शेतावर काम करीत होते. तक्रारदार यांनी कडब्याच्या गंजी विझवण्याचा प्रयत्न केला पंरतु त्यांना आगीवर नियंत्रण ठेवता आले नाही. तक्रारदार यांचे एकूण 15000 पेंढया कडबा जळून गेला. तक्रारदार यांनी सदरील आगी बाबत व त्यांचा कडबा जळाल्या बाबत सामनेवाले यांचेकडे ताबडतोब माहीती दिली. तसेच पोलिस स्टेशन यूसूफ वडगांव यांना खबर दिली. पोलिस स्टेशन मध्ये आकस्मिक जळीत प्रकरण 2/13 अशी नोंद करण्यात आली. तहसीलदार धारुर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. सामनेवाले यांनी विज पोल वरील ताराची योग्य काळजी न घेतल्यामुळे तारा एकमेकांला घासून स्पार्कीग होऊन त्यांच्या ज्वाला कडब्याच्या गंजीवर पडल्या त्यामुळे संपूर्ण कडबा जळून खाक झाला. तक्रारदार यांचे रु.4,50,000/- चे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाले यांनी तक्रारची दखल घेतली नाही. तक्रारदार यांचे गुरांना खाण्यासाठी कडबा उरला नाही. जनावरावर उपासमारीची पाळी आली. सामनेवाले यांनी ताराची योग्य काळजी न घेतल्यामुळे सदरील घटना घडली. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून कडब्याच्या पेंढयाची नुकसान भरपाई रु.4,50,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.30,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाले यांना रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठविली. त्या प्राप्त झाल्या. सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांनी नि.4 सोबत तक्रारीत नमूद केलेल्या बाबीच्या संदर्भात दस्त हजर केलेले आहेत. त्यावर पोलिसांना दिलेली खबर, पोलिसांनी आकस्म्ीक जळीत म्हणून केलेल्या नोंदीचा उतारा, घटनास्थळ पंचनामा, सामनेवाले यांना पाठविलेला अर्ज, फोटो, 7/12 चा उतारा, विज देयकाच्या पावत्या हजर केलेल्या आहेत. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री. काळे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्राचे निरीक्षण केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे ही
बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय होय
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय होय, अंशतः
असल्यास किती
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार हे शेती व्यवसाय करुन आपले कूटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांनी त्यांचे शेतामध्ये ज्वारीचे पिक पेरले. ज्वारीचे पिक काढल्यानंतर कडबा बाधूंन तक्रारदार यांनी त्यांचे गंजी शेतक-याचे बांधावर ठेवली होती. सदरी कडबा हा तक्रारदार यांचे गूरांना खाण्यासाठी ठेवला होता. सूमारे 15000 पेंडी जळून खाक झाल्या. सामनेवाले यांनी विज वाहक तारेचे योग्य प्रकारे नियोजन केले नाही. विज वाहक तारामध्ये झोल असल्यामुळे हवेमुळे एकमेकांवर आदळून स्पॉकींग झाले व ती ठिणगी कडब्याच्या गजीवर पडली. त्यामुळे संपूर्ण कडबा जळून खाक झाला. सामनेवाले यांना वेळोवेळी सांगूनही विज वाहक ताराची व्यवस्था ठेवली नाही. तक्रारदार यांचे विहीरीवर सामनेवाले यांचेकडून विज कनेक्शन घेतले आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीत केलेली मागणी रास्त व वाजवी असून ती मंजूर करण्यात यावी.
तक्रारदार यांनी या मंचासमोर दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करुन प्रत्यक्षात तक्रारदार यांचे किती नुकसान झाले तसेच तक्रारदार यांनी त्यांचे शेतामध्ये किती क्षेत्रामध्ये ज्वारीचे पिकल पेरले होते हे पाहणी गरजेचे आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पोलिसाकडे जो अर्ज दिला आहे. त्या अर्जाची प्रत दाखल केली आहे. त्या अर्जामध्ये तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की,त्यांचे शेजारील गावांतील सोपान डापकर, अरुण श्रीकृष्ण डापकर व इतराच्या चा-याच्या गंज्या आहेत. त्यांचे शेतात गंजी जवळचा लाईटचा पोल व त्यावरुन तार गेलेली आहे. दि.27.3.2013 रोजी दुपारचे सुमारास शार्टसकिट होऊन कडब्याच्या गंजीस आग लागली. सूमारे रु.5,00,000/- चे नुकसान झालेले आहे असे कथन केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. संपूर्ण कडबा जळून गेल्यामुळे प्रत्येकी कित्या पेंडयाच्या गंजी होत्या हे ठरवता आलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांचे अर्जावर रु.4,50,000/- चे नुकसान झाले असे कथन केले आहे. खरोखरच तक्रारदार यांचे 15000 गंजी कडबा जळून खाक झाला आहे हे प्रथमदर्शनी शाबीत करण्याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये त्यांचे शेतात कापूस, ज्वारी व इतर पिक घेतली असे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या 7/12 च्या उता-याचे अवलोकन केले असता तक्रारदार क्र.1 श्रीकृष्ण डापकर यांचे हिस्सात 2 एकर क्षेत्र दाखवले आहे. तक्रारदार क्र.2 अंगद डापकर यांचे हिस्सात पिक घेण्याजोगे क्षेत्र नमूद केलेले नाही. 10 गुठठें क्षेत्र हे श्रीकृष्ण डापकर, अंगद डापकर, अरुण डापकर यांचे एकत्रित दर्शवले आहे. अंगद डापकर यांनी या मंचासमोर स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे किती क्षेत्र सदरील गट क्र. 1(अ) गांजापूर येथे आहे हे स्पष्ट होत नाही. केवळ 10 गुंठठे क्षेत्र 3 लोकांचे नांवे लिहीलेले आहे. तक्रारदार क्र.3 अरुण डापकर यांचे नांवे 2 एकर 37 गुंठठे क्षेत्र नमूद केलेले आहे. सदरील 7/12 च्या उता-यातील पिक पाहणीची नोंद पाहिली असता त्यामध्ये कापूस, पिक घेतल्याचे नमूद केलेले आहे. इतर पिक घेतल्या बाबत पिक पाहणी मध्ये नोंद नाही. विशेष्तः ज्वारी पिक तक्रारदार यांनी घेतल्या बाबत पिक पाहणी मध्ये नोंद नाही. यावरुन तक्रारदार यांचे प्रत्यक्षात किती क्षेत्रामध्ये ज्वारीचे पिक केले होते यांचा बोध होत नाही. यातील क्षेत्रामध्ये कापूस पिक दर्शवलेले आहे त्यामुळे तक्रारदार यांचे शेतातील काही क्षेत्रामध्ये कापूस पिक घेतले आहे असे निदर्शनास येते. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र ज्वारी पेरली होती हे जे तक्रारदार यांचे म्हणणे आहे तो दस्ताऐवजावरुन सिध्द होत नाही.
तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जावरुन पोलिसांनी व तहसीलदार यांनी पंचनामा केलेला आहे. पंचनाम्यात तक्रारदार यांनी सांगितल्याप्रमाणे कडब्याच्या पेंडयाचा मजकूर लिहीलेला आहे. प्रत्यक्ष कडबा जळून गेल्यामुळे किती पेंडया कडबा जळाला यांचा बोध होत नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन कडबा जळाल्या बाबत निदर्शनास येते. तक्रारदार यांचे ताब्यात असलेल्या क्षेत्र व प्रत्येकी एकरी सरासरी ज्वारी पिकाचे उत्पन्न हे अनुमान काढून तक्रारदार यांचे किती नुकसान झाले आहे हे ठरवावे लागेल.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन तक्रारदार यांनी ज्याठिकाणी कडब्याच्या गंजी लावलेल्या होत्या त्यांला लागून इलेक्ट्रीक पोल आहेत व त्या इलेक्ट्रीक पोल वरुन विज वाहक तारा गेलेल्या आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे विहीरीवर सामनेवाले यांचे मार्फत कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांचे गंजी लगत असलेल्या इलेक्ट्रीक पोलवरुन विज वाहक तारा गेलेल्या आहेत व त्या ताराची स्पॉर्कीग होऊन कडब्याच्या गंजी वरती ठिणगी पडली व त्यामुळे कडब्याला आग लागली. सर्वसाधारणपणे शेतकरी ज्याठिकाणी विज वाहक पोल आहेत व विज वाहक तारा गेलेल्या आहेत त्या खाली ज्वालागृही वस्तू ठेवत नाहीत. कडबा हा वाळलेला असल्यामुळे त्यांचेवर ठिणगी पडताच तो पेट घेऊ शकतो यांची जाणीव तक्रारदार यांना निश्चितच असेल. सामनेवाले यांनी विज वाहक ताराची योग्य प्रकारे काळजी घेणेक गरजेचे होते. तारामध्ये झोल पडल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे स्पॉंर्कीग होऊन ठिणगी कडब्याच्या गंजीवर पडली व आग लागली.
तक्रारदार यांचे नांवे असलेले क्षेत्र लक्षात घेता, 7/12 उता-याचे अवलोकन केले असता तक्रारदार म्हणतात तेवढे कडब्याच्या पेंढया जळाल्या आहेत हे म्हणणे अतिशोयोक्ती राहिल. तक्रारदार यांचे क्षेत्र लक्षात घेता व काही क्षेत्रामध्ये कापूस पेरले हे ही लक्षात घेता सर्वसाधारणपणे तक्रारदार श्रीकृष्ण सोपान यांनी त्यांचे एक एकर क्षेत्रामध्ये ज्वारीचे पिक घेतले आहे व अरुण श्रीकृष्ण यांनी एक एकर क्षेत्रामध्ये ज्वारीचे पिक घेतले असे म्हणणे संयूक्तीक ठरते. एक एकर क्षेत्रामध्ये ज्वारीचे पिकाचे उत्पन्न व पेंडीची संख्या लक्षात घेतली असता 5000 कडब्या पेक्षा जास्त कडबा असणे अशक्य आहे. अंगद सोपान म्हणजे तक्रारदार क्र.2 यांचे नांवे व इतर दोघांचे नांवे सामाईक फक्त 10 गुंठठे क्षेत्र दाखवले आहे. त्यामुळे अंगद सोपान यांने त्यांचे क्षेत्रामध्ये ज्वारी पेरली हाती असे गृहीत धरणे योग्य होणार नाही. सदरील बाब 7/12 वरुन स्पष्ट दिसते. दि.27.1.2013 रोजी केलेला पंचनाम्यामध्ये अनुक्रमे 5000 पेंडया असलेल्या गंजी असा उल्लेख केलेला आहे. तक्रारदार यांनी महसूल दस्ताऐवज या मंचापूढे दाखल करुन त्यांने किती क्षेत्रामध्ये ज्वारी पेरली होती हे सिध्द करणे गरजेचे आहे. 7/12 चा उतारा पाहिला असता ज्वारी पिकाची नोंद नाही पण प्रत्यक्षात कडबा जळाल्या बाबत पुरावा उपलबध आहे.
वरील सर्व बाबीचा विचार करता सर्वसाधारणपणे तक्रारदार क्र.1 व 3 यांचे कडब्याच्या गंजीस आग लागून त्या जळाल्या आहेत असे गृहीत धरणे उचित होईल. पंचनाम्यात जरी तक्रारदार क्र.2 अगंद यांचे नांवाचा उल्लेख असला तरी त्यांचे नांवावर गट क्र.1(अ) मौजे गांजापूर येथे पिके घेण्या इतपत जमिन नोंदलेली नाही. त्यामुळे त्यांचा कडबा जळून गेला असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. तक्रारदार क्र.1 व 3 यांचे अंदाजे 5000 कडबा जळून नुकसान झाले असे या मंचाचे मत आहे. दर शेकडा कडब्याचा भाव पाहिला असता तो रु.1500/- इतका आहे. म्हणजेच सर्वसाधारणपणे कडब्याचा भाव सरासरी 1500 शेकडा धरणे उचित होईल. सदरील बाबत पुरावा जरी उपलब्ध नसला तरी सर्वसाधारण शेतकरी व बाजारामध्ये कडब्याची किंमत यांचा अंदाज गृहीत धरुन वरील दर ठरवणे योग्य होईल. म्हणजे तक्रारदार क्र.1 व 3 यांचे एकूण सूमारे रु.75,000/- चा कडबा जळून नुकसान झालेले आहे व ती नुकसान भरपाई मिळण्यास ते पात्र आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीत अवास्तव व अयोग्य नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. सबब, या मंचाचे मत की, तक्ररदार क्र.1 व 3 हे प्रत्येकी रु.37,500/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार क्र.2 अंगद यांचे नांवे फक्त 3.50 गुंठठे जमिन दर्शवलेली आहे. त्यामुळे त्यांचे बडब्याचे गंजीत आग लागून नुकसान झाले हा निष्कर्ष काढता येत नाही. त्यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली परंतु सामनेवाले यांनी ती देण्यास टाळाटाळ केली, तसेच नुकसान भरपाई निश्चित केली नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे.
मुददा क्र..1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड