निकाल
दिनांक- 27.03.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार दादाराव नामदेव माने यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजनेचा क्लेम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांची आई गांधारीबाई मारोती माने या दि.31.5.2011 रोजी रस्ता अपघातामध्ये मयत झाल्या. तक्रारदार हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांचे वडील मारोती नामदेव माने हे दि.09.03.2013 रोजी मयत झाले. तक्रारदार यांच्या आईच्या मृत्यू झाल्यानंतर त्या बाबत नेकनूर पोलिस स्टेशनला खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, मरणोत्तर पंचनामा करण्यात आला. तक्रारदार यांची आई या व्यवसायाने शेतकरी होत्या. महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यासाठी कल्याणकारी योजने अंतर्गत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली आहे. सर्व शेतक-याचा विमा काढलेला आहे. शेतक-याचा अपघातात मृत्यू झाल्यास विमा योजनेची कारवाई तालुक्याचे कृषी अधिकारी, विभागीय ब्रोकर इन्शुरन्स सर्व्हीस कंपनी व विमा कंपनी यांचे मार्फत होते. तक्रारदार यांची आई मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे क्लेम दाखल केला. सदरील क्लेम ब्रोकर कंपनी मार्फत विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा वडिलांना दि.17..11.2011 रोजी पत्र पाठवून मयत गांधारीबाई हिचे वय 78 असल्याचे निवडणूक ओळखपत्रा मध्ये नमूद केलेले असल्यामुळे सदरील दावा नाकारला आहे असे कळविले. तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांचे आईचे वय 55 वर्षाचे होते व तशी नोंद मयताचे मरणोत्तर पंचनाम्यामध्ये व शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे आईचे वय 78 वर्ष होते असे ग्राहय धरुन क्लेम नामंजूर केला. सदरील बाब ही चूक आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून विमा रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- दयावेत अशी विंनती केली आहे.
सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.8 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रककम मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाही. तक्रारदार यांनी तक्रारीत आवश्यक ते पक्षकार सामील केलेले नाही. तक्रारीत Non-joinder of necessary party ची बांधा येते. सामनेवाले यांचे कथन की, त्यांना विमा प्रस्ताव प्राप्त झाला त्यांनी दस्ताऐवजाची छाननी केली असता मयत व्यक्तीचे वय 78 वर्षाचे होते असे निदर्शनास आले. त्यामुळे सदर शेतकरी अपघात विमा योजनेनुसार तक्रारदार हे क्लेम मिळण्यास पात्र नाहीत. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, क्लेम नाकारण्या बाबत पत्र तक्रारदार यांचे वडिलांना देण्यात आले. तक्रारदार यांनी त्यांचे वडिलांना दाव्यात पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, 6-क चे दस्त, सामनेवाले यांनी दिलेले पत्र, हजर केले आहेत. तक्रारदार यांनी नि.12सोबत मयत गांधारीबाई यांचे मृत्यू नोंदणीचा फॉर्म हजर केला आहे. तक्रारदार यांची वकील श्री.धांडे यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री. वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे
सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
केली आहे काय ? होय. .
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले दस्त व तक्रारीतील व सामनेवाले यांचे लेखी कैफियतीमधील बाबीचा विचार केला असता तक्रारदार व सामनेवाले यांचे मध्ये खालील बाबी विषयी वाद नाही. तक्रारदार यांची आई गांधारीबाई या दि.31.5.2011 रोजी अपघातात मयत झाल्या. तक्रारदार यांचे वडिलांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम मिळण्यासाठी कृषी अधिकारी मार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे क्लेम पाठविला होता. सामनेवाले विमा कंपनी यांनी सदरील क्लेम दि.17.11.2011 रोजी नाकारला व तसे पत्र तक्रारदार यांचे वडिलांना देण्यात आले. तक्रारदार यांची आई व्यवसायाने शेतकरी होती ही बाब मान्य आहे.
सामनेवाले यांचे वकील श्री. वाघमारे यांनी या मंचाचे लक्ष शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभाच्या वयावर वेधले व असा यूक्तीवाद केला की, सदरील योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र व्यक्ती म्हणजे ज्यांचे वय 12 ते 75 वर्ष आहे त्या होत. मयत गांधारीबाई यांचे वय मृत्यू समयी 78 वर्षाचे होते. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम रास्त कारणासाठी नामंजूर केला आहे. सबब, तक्रारदार हे सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र नाहीत.
तक्रारदार यांहचे वकील श्री.धांडे यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे वडील दि.9.3.2013 रोजी मयत झाले. तक्रारदार हे मयत गांधारी व मारोती यांचे कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार हे शेतकरी विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष मयत गांधारी यांचेवर झालेल्या मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व ग्रामपंचायत पांढ-याची वाडी यांनी प्रमाणीत केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर वेधले व असा यूक्तीवाद केला की, मयत गांधारी यांचे वय मृत्यूसमयी 55 वर्षाचे होते. सदरील गांधारीबाई हिचे निवडणूक ओळखपत्रामध्ये वया बाबत चूकीची नोंद झालेली आहे. सदरील वय ग्राहय धरता येणार नाही. तसेच सदरील वय नोंदवते वेळी कोणताही दस्ताऐवज दाखविला जात नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र मयत गांधारी यांचे वया बाबत ग्राहय धरण्यात यावेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्ताचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी मयत गांधारी हिचा मरणोत्तर पंचनामा हजर केला आहे. त्यामध्ये मयत गांधारी हिचे वय 55 वर्ष दर्शवले आहे. तक्रारदार यांनी शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे. त्यातही मयत गांधारी हिचे वय 55 वर्ष नमूद केले आहे. मृत्यू नोंद फॉर्म हजर केला आहे त्यामध्ये मयत गांधारी हिचे वय 55 वर्ष दर्शवलेले आहे. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन मयत गांधारी हिचे वय मृत्यू समयी 55 वर्ष होते ही बाब सिध्द होते. सामनेवाले यांनी मयत गांधारी हिचे वय 78 वर्ष होते हे सिध्द करण्यासाठी भारतीय निवडणूक ओळखपत्र दाखल करुन त्यांचा ऊहापोह केला आहे. या मंचाचे मत की, ओळखपत्रात वय नमूद करीत असताना कोणत्याही प्रकारची छाननी केली जात नाही. वय ढोबळमानाने लिहीले जाते. मयत गांधारी हिचे वय 78 वर्ष होते असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. सबब, या मंचाचे मते मयत गांधारी हिचे वय मृत्यूसमयी 55 वर्षाचे होते. तक्रारदार हे मयत गांधारी हिचे अपघाती मृत्यूबददल शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. दावा नाकारुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे व मंचात तक्रार दाखल करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रासाबददल रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक