निकाल
दिनांक- 18.06.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार मिरा भांडवलकर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार ही सुलतानपुर ता.माजलगांव येथील रहिवासी असून शेती करुन तिचे कुटूंबाची उपजिवीका चालविते. तक्रारदार हीचे पती विष्णू हे शेतकरी होते व त्यांचे नांवे सुलतानपुर येथे गट क्र.138 मध्ये 38 आर जमिन आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतक-याचा सामनेवाले क्र.1 कडे सामनेवाले क्र.2 मार्फत विमा उतरवीलेला आहे. तक्रारदार व त्यांचे पती सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराचे पती दि.15.1.2010 रोजी सुलतानपुर शिवारात विहीरीचे काम करीत असताना एक दगड त्यांचे डोक्यावर पडला त्यामध्ये ते जखमी झाले. दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची खबर मुजा नरवडे यांनी पोलिस स्टेशन माजलगांव येथे दिली. ए.डी. नं.03/2010 अन्वये आकस्मीत मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तक्रारदार हीने शेतकरी अपघात विमायोजने अंतर्गत रु.1,00,000/- मिळण्यासाठी दि.10.3.2010 रोजी तालुका कृषी अधिकारी माजलगांव यांचेकडे क्लेम तक्रारीत नमूद सर्व कागदपत्रासह करुन नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाले क्र.3 ने दि.15.3.2010 रोजी विमा दावा सामनेवाले क्र.2 कडे पाठविला व दि.2.10.2010 रोजी सामनेवाले क्र.2 ने मागणी केलेली फेरफारची नक्कल दि.14.2.2011 रेाजी सामनेवाले क्र.3 यांना दिली. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर केला नाही. शेवटी दि.16.8.2013 रोजी सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना तूमचे प्रकरण बंद करण्यात आले आहे असे कळविले.
म्हणून तक्रारदार यांनी या मंचात तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विमा दावा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे निशाणी क्र. 15 वर दाखल केले आहे. तसेच जबाबासोबत शिवाजी विश्वनाथ उलमुले यांचे शपथपत्र नि.क्र.16 दाखल केले आहे. तक्रारदार ही सूलतानपूर येथील रहिवासी आहे व शेती करुन तिचे कूटूबाची उपजिवीका भागवते याबददल माहीती नाही. तक्रारदार यांचे नांवावर शेती होती व फेरफार आधारे तिचे नांवावर झाली या बाबत माहीती नाही. मयताने हप्त्याची रक्कम सामनेवाले क्र.1 कडे दिली नाही. त्यामुळे ते ग्राहक होऊ शकत नाही. मयताचे नांवे अपघाताचे वेळी जमिन नव्हती. दावा मुदतीत दाखल केलेला नाही. अपघाताबददल माहीती नसल्यामुळे सदर मजकूरास नकार देत आहेत. पोलिस स्टेशनला तक्रार दिली या बाबत माहीती नाही. आयूक्त (शेती) महाराष्ट्र शासन यांना या तक्रारीमध्ये पक्षकार केलेले नाही. त्यामुळे आवश्यक गैरअर्जदार या मुददयावर तक्रार खारीज करण्यायोग्य आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, त्यांना तक्रारदाराचा विमा प्रस्ताव पुर्ण कागदपत्रासह मिळाला नाही. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचे प्रकरण बंद करण्यात आले याबाबतचे पत्र तक्रारीत जोडलेले नसल्यामुळे तक्रारदारास दावा देण्याचे कारण घडलेले नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे पोस्टाद्वारे सादर केले आहे. तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही कारण ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियमन स्विकारुन ही जोखीम घेतली आहे. त्यांचेच ग्राहक होऊ शकतात आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोत व शासनास विना मोबदला सहाय करतो. अपघात दि.15.1.2010 रोजी झाला. सदरील प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड मार्फत कबाल औरंगाबाद कार्यालयास प्राप्त झाला नंतर तो प्रस्ताव कबाल औरंगाबाद मार्फत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दि.21.1.2010 रोजी पाठविता असता सदरील दावा अर्ज युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दि.31ृ.12.2010 रोजीच्या पत्रान्वये दावा नामंजूर केल्याचे वारसदारास कळविण्यात आले आहे.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी स्वतः त्यांचे म्हणणे निशाणी क्र.10 वर सादर केले आहे. तक्रारदार यांनी त्यांचेकडे प्रस्ताव दि.11.3.2010 रोजी सादर केला होता. तो प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचे कार्यालयात दि.15.3.2010 रोजी सादर केला. सामनेवाले क्र.2 कडून दि.3.6.2013 रोजी त्रुटीचे पत्र मिळाले. त्यानुसार तालूका कृषी अधिकारी यांनी 7/12, 8 अ चा उतारा, वयाचा दाखला, मतदान कार्ड, प्रथम माहीती अहवाल या कागदपत्राची पूर्तता दि.22.7.2010 रोजी केली. सामनेवाले कग.2 यांचेकडून दि.6.12.2010 रोजीचे पत्रानुसार तालुका कृषी अधिकारी माजलगांव यांनी सहा ड, फेरफार, सहा-क वारस नोंदवही या त्रुटीच्या कागदपत्राची पूर्तता दि.14.2.2011 रोजी केली. सर्व कागदपत्राची पूर्तता करण्यात आलेली असल्यामुळे त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही. तरी त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.18 अन्वये दाखल केले आहे. तसेच नि.4 सोबत दस्त हजर केले आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी शिवाजी उलमूले यांचे शपथपत्र नि.16 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री. विर व सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री. जाधव यांनी यूक्तीवाद केला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली
रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय? अंशतः
2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदाराचे वकील श्री.वीर व सामनेवाले यांचे वकील श्री.जाधव यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र याचे अवलोकन केले त्यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हयांनी पतीच्या निधनानंतर सामनेवालाकडे विम्याची रक्कम मिळण्याकामी विमा प्रस्ताव दाखल केला होता, सदर प्रस्ताव सामनेवालाकडे मुदतीत दाखल केला आहे. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्राची पुर्तता केली आहे. तसेच सामनेवाला क्र.3 कडे पूर्ण कागदपत्राची पुर्तता करुन रितसर विमा प्रस्ताव दाखल केला.
सामनेवाला क्र.1 यांच्या जबाबाचे व त्यासोबत दाखल केलेले श्री.शिवाजी उलमुले यांच्या शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारीतील मजकूर स्पष्टपणे नाकारला आहे. त्यांच्या कथनेनुसार सामनेवाला क्र.1 यांना तक्रारदाराचे विमा प्रस्ताव हे पूर्ण कागदपत्रासह प्राप्त झाले नाही सबब तक्रारदारास दावा देण्याचे कारण घडलेले नाही.
सामनेवाला क्र.2 यांच्या जबाबाचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे दि.21.12.2010 ला पाठविला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदर प्रस्ताव दि.31.12.2010 ला दावा नामंजूर केल्याबाबत वारसदारास कळविण्यात आले आहे.
सामनेवाला क्र.3 यांच्या जबाबाचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.3 यांना तक्रारदाराचा विमा प्रस्ताव दि.11.03.2010 रोजी प्राप्त झाला तसेच सामनेवाला क्र.3 यांनी वेळोवेळी सामनेवाला क्र.2 यांच्याकडून मिळालेल्या त्रुटीच्या खाली नमुद केलेल्या कागदपत्राची पुर्तता केली. 7/12, 8अ चा उतारा, वयाचा दाखला, मतदान कार्ड, प्रथम माहिती अहवाल या कागदपत्राची पुर्तता दि.22.07.2010 रोजी केली. तसेच सामनेवाला क्र.2 यांच्या दि.06.12.2010 रोजीच्या पत्रानुसार सामनेवाला क्र.3 यांनी सहा ड, फेरफार, सहा क, वारस नोंदवही इत्यादी कागदपत्राची परिपूर्तता केली.
वर नमुद केलेले कथन यांचे बारकाईने अवलोकन केले तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पती हे दि.15.02.2010 रोजी सुलतानपूर शिवारात विहीरीचे काम करत असताना दगड डोक्यावर पडून मयत झाले आहे. त्याबाबत माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी पोलीस पेपर दाखल केले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेला 7/12 चा उतारा व सहा ड व फेरफारचा नोंदीचा उतारा याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे मयत पती हे व्यवसायाने शेतकरी होते ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याकउे संपूर्ण कागदपत्राची पुर्तता करुन विमा प्रस्ताव दाखल केला आहे सामनेवाला क्र.1 यांच्या जबाबाचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.1 यांना तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा पूर्ण कागदपत्रासह प्राप्त झाला नाही असे निदर्शनास येते. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबवलेली आहे. त्याकरीता महाराष्ट्र शासन हे सामनेवाला क्र.1 यांच्याकडे विमा हप्ता भरलेला आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव हा आवश्यक पूर्ण कागदपत्रासह सामनेवाला क्र.1 यांच्याकडे सादर करावे व सामनेवाला क्र.1 यांनी सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावावर योग्य कार्यवाही करावी असे मंचाचे मत आहे. यावरुन तक्रारदार यांची तक्रार ही अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांनी घेतलेला निर्णय मान्य नसल्यास तक्रारदार यांना मा.मंचात तक्रार दाखल करता येणार. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- तक्रारदार यांना निर्देश देण्यात येतो की, त्यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गतचा विमा प्रस्ताव पूर्ण कागदपत्रासह सामनेवाला क्र.1 यांच्याकडे निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत सादर करावे.
- सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांना
तक्रारदाराचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या
आत योग्य कार्यवाही करुन निकाली काढावा.
4) खर्चाबाबत आदेश नाही.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड