निकाल
दिनांक- 17.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार शारदाबाई गोरख ढेंगे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेचा लाभ न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून विम्याची रककम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे बीड येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करुन कूटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. तक्रारदार यांचे पती गोरख साधू ढेंगे हे व्यवसायाने शेतकरी होते.त्यांचे नांवे बीड येथे गट क्र.18 मध्ये 21 आर जमिन नोंदलेली आहे.
तक्रारदार यांचे पती उपजिवीकेसाठी अकलूज जि.सोलापूर येथील कारखान्यावर ट्रॅक्टर क्र.एम.एच.-13-जे-5577 मध्ये बसून जात होते. दि.21.10.2009 रोजी सदरील ट्रॅक्टर हा दूपारी 12.30 चे दरम्यान अकलूज जवळ आला असता अपघात झाला. तक्रारदार यांचे पती ट्राली वरुन खाली पडले व त्यांस गंभीर मार लागला. तक्रारदार यांचे पती यांना अकलूज येथील सरकारी दवाखान्यात शरीक करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. अपघाताची खबर रामचंद्र भोसले यांनी दिली. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर विरुध्द गून्हयाची नोंद केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा तयार केला. तक्रारदार यांचे पतीचे प्रेतावर शवविच्छेदन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सन 2009-10 या कालावधीत शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना लागू केली होती. महाराष्ट्रातील सर्व शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाने सामनेवाले क्र.1 यांचेकडे शेतक-याचा विमा उतरविलेला आहे.
तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रकक्म रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्यासाठी दि.15.5.2010 रोजी तालुका कृषी अधिकारी बीड यांचेकडे क्लेम दाखल केला. दि.3.6.2010 रोजी सामनेवाले क्र.2 यांनी पाठविलेले पत्र तक्रारदार यांना मिळाले. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्र क्लेमसोबत दिलेले होते. संपूर्ण कागदपत्र जोडल्याची पोहच तक्रारदार यांचेकडे होती. तसेच बँकेचा खाते क्रमांकही पाठविला होता. तक्रारदार यांनी दि.26.3.2010 रोजी सामनेवाले क्र.3 यांचेकडे दस्त हजर केलेले आहेत. विमा कंपनीने दि.31.12.2010 रोजी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे.. तक्रारदार यांनी वास्तविक क्लेमकामी आवश्यक असलेले सर्व दस्त पाठविले होते. तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्यानंतर तक्रारदार यांनी या मंचासमोर तक्रार क्र.55/11 दाखल केले होते. सदरची तक्रार दि.14.12.2011 रोजी या मंचाने फेटाळली. तक्रारदार यांनी मा.राज्य आयोग, परिक्रमां खंडपीठ, औरंगाबाद येथे अपिल क्र.32/11 दाखल केले होते. त्यांचा निकाल दि.22.11.2012 रोजी देण्यात आले. तक्रार क्र.55/11 मध्ये या मंचाने दिलेले निकाल रदद करण्यात आला व तक्रारदार यांनी नवीन प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांचेकडे दाखल करावा व प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.1 यांनी एक महिन्यात निकाली काढावा असे आदेश दिलेले आहेत. तक्रारदार यांनी नवीन प्रस्ताव व सोबत सर्व दस्त सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाठविले आहेत. प्रस्ताव व कागदपत्र मिळूनही सामनेवाले क्र.1 यांनी अद्यापपावेतो निर्णय घेतला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून विमा क्लेम रक्कम रु.1,00,000/- मिळावी व त्यावर व्याज मिळावे तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.10 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्या बाबी नाकारलेल्या आहेत. सामनेवाले यांचे कथन की, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना बँक खात्याचा तपशील, 8-अ चा उतारा, 6-ड उतारा,फेरफार नोंदी, प्रथम खबरी रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केल्या बाबत पत्र दिले होते. तक्रारदार यांनी मुदतीत कागदपत्र दाखल केले नाही म्हणून क्लेम नाकारण्यात आलेला आहे. तक्रारदार यांचा क्लेम मूदतीत नाही.
सामनेवाले क्र.2 हे मंचाससमोर हजर झाले. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांना प्राप्त झाला, तो प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांचेकडे दि. 21.12.2010 रोजी पाठविला. सामनेवाले क्र.1 यांनी दि.31.12.2010 रोजी दावा नामंजूर केला.
सामनेवाले क्र.3 यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही, त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांचे वकील श्री.विर यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व दस्त यांचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.जाधव यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्लेम न
देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत
करतात काय होय.
2. तक्रारदार हे शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेचा
लाभ मिळण्यास पात्र आहेत काय होय.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केले शपथपत्र व दस्त यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी या मंचासमोर तक्रार क्र.55/2011 दाखल केली होती. या मंचाने तक्रारदार यांची तक्रार दि.14..12.2011 रोजी रदद केली. सदरील निकाल पत्राचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी कागदपत्राची वेळेवर पूर्तता केली नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे हा निष्कर्ष काढता येत नाही. या कारणास्तव नाकारली आहे. सदरील न्यायनिर्णया विरुध्द तक्रारदार यांनी मा.राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद यांचेकडे प्रथम अपिल नंब.32/12 दाखल केले होते. मा.राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.22.11.2012 रोजी निर्णय देऊन तक्रार यांचे अपिल मंजूर केले आहे. या मंचाने दि.14.12.2011 रोजी तक्रार क्र.55/2011 मध्ये दिलेला निर्णय रददबातल केलेला आहे व तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे नवीन प्रस्ताव पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे. विमा प्रस्ताव मिळाल्यानंतर विमा कंपनीने एक महिन्याचे आंत निर्णय घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत. सदरील निर्णय झाल्यानंतर तक्रारदार यांनी नवीन प्रस्ताव दि.14.01.2013 रोजी सामनेवाले क्र.1 यांचेकडे सादर केला आहे. त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्र हजर केली आहेत.
तक्रारदार यांचे वकील श्री.विर यांनी असा यूक्तीवाद केला की, नवीन प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांना प्राप्त होऊनही त्यांनी मुदतीत क्लेम मंजूर केला नाही. सामनेवाले क्र.1 यानी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.विर यांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावर वेधले व असे निदर्शनास आणून दिले की, दि.14.01.2013 रोजी तक्रारदार यांनी नवीन प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांचेकडे दाखल कला. तो प्रस्ताव प्राप्त झाल्याबददल सामनेवाले क्र.1 यांचेकडून पोहच घेतली. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांना वेळोवेळी क्लेम मंजूर करण्याबाबत विचारणा केली. तसेच दि.21.3.2013 रोजी नि.22 अन्वये तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पत्र पाठविले त्यांचीही दखल घेतली नाही. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना विमा क्लेम देण्यास टाळाटाळ केली आहे व सेवेत त्रूटी ठेवली आहे.
सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.जाधव यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी मुदतीत दस्त हजर न केल्यामुळे त्यांचा क्लेम पूर्वी नाकारला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले दस्त व शपथपत्र यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता तक्रारदार यांनी मा.राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी अपिल क्र.32/12 मध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 विमा कंपनी यांचेकडे नवीन प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावासोबत क्लेम मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली आहेत. क्लेम व आवश्यक ती दस्त सामनेवाले क्र.1 यांना प्राप्त झाल्या बाबत त्यांची लेखी पोहच आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे मा.राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी निर्देशित केल्याप्रमाणे प्रस्ताव पाठविला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी त्या प्रस्तावामध्ये कोणताही निर्णय घेतला नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्ताचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती गोरख हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचे नांवे शेत जमिन नोंदलेली होती. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू मोटार अपघातामध्ये झाला. त्या बाबत पोलिस स्टेशन अकलूज मध्ये गुन्हयाची नोंद झालेली आहे. तक्रारदार यांनी गून्हयाची प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, गांव नमुना 8-अ चा उतारा, 7/12 चा उतारा,फेरफार रजिस्ट्ररचा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र हे दस्त हजर केलेले आहेत.
वरील सर्व दस्ताचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी आहे व त्यांचा अपघातात मृत्यू झाला ही बाब सिध्द होते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतक-यासाठी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना अंतर्गत विमा पॉलिसी काढलेली आहे. ती विमा पॉलिसी सामनेवाले क्र.1 यांचेकडे काढलेली आहे. तक्रारदार यांनी प्रस्ताव व सर्व दस्त देऊनही सामनेवाले क्र.1 यांनी तो प्रस्ताव मंजूर केला नाही. सामनेवाले क्र.1 यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सामनेवाले क्र.1 यांचेकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना तक्रार दाखल करावी लागली त्या खर्चापोटी रककम रु.1500/- व झालेल्या मानसिक त्रासाबददल रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक