निकाल
दिनांक- 13.10.2014
(द्वारा- श्री.रविंद्र राठोडकर , सदस्य )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून ते मौजे दासखेड ता.पाटोदा जि.बीड येथे राहतात. तक्रारदाराने दि.2.5.2012 रोजी दिप एजन्सीज,बीड यांचेकडून हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल रक्कम रु.42,450/- ला रोख खरेदी केली असून त्यांचा नंबर एम.एच.-23-एई-1504 असा आहे. त्यावेळेस तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 यांचेकडे सदरील मोटार सायकलचा रक्कम रु.1413/- चा दि.2.5.2012 ते 1.5.2013 या कालावधीचा विमा उतरविलेला असून त्यांचा पॉलिसी नंबर 3005/7159153/00/000 असा आहे. तक्रारदाराने पूढे असे कथन केले आहे की,दि.19.11.2012 रोजी त्यांने त्यांचे राहत्या घरासमोर हिरो होंडा स्प्लेडर प्लस मोटार सायकल लावून झोपी गेले. दूस-या दिवशी म्हणजे दि.20.11.2012 रोजी सकाळी उठून पाहिले असता सदरील मोटार सायकल दिसून आली नाही. म्हणून त्यांने सदरील मोटार सायकलचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. म्हणून ती चोरीस गेल्याची खात्री पटली. त्याबददल तक्रारदाराने दि.28.11.2012 रोजी पोलिस स्टेशन पाटोदा येथे सदरील मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली असून त्यांचा गून्हा नंबर 178/12 असा आहे. संबंधीत पोलिसांनी सदरील मोटार सायकलचा तपास केला असता ती कूठेही मिळून आली नाही. म्हणून त्यांने त्यांचा समरी रिपोर्ट दि.4.3.2013 रोजी मा. न्यायालयात दाखल केला आहे. सदरील मोटार सायकल मिळून न आल्यामूळे संबंधीत पोलिसांनी तपास बंद केला आणि तक्रारदार यांने सामनेवाले क्र.1 यांचेकडे वाहन चोरीला गेल्यामुळे मोटार सायकलची विमा रक्कम मिळावी म्हणून आवश्यक ती कागदपत्रासह विमा दावा दाखल केला परंतु सामनेवाले क्र. 1 यांनी दि.29.5.2013 रोजीचे पत्र तक्रारदार यांना पाठवून आपला क्लेम 8 दिवसांनी उशिरा दाखल केला म्हणून नामंजूर केल्याचे कळविले. त्यामुळे आपण विमा रक्कम मिळण्यास अपात्र असल्याचे सांगितले.
तक्रारदाराने पूढे असे कथन केले आहे की, संबंधीत पत्र मिळाल्यामूळे ते वाचून धक्का बसला कारण सदरील मोटार सायकलची शोधाशोध करण्यासाठी 7-8 दिवस गेले होते. त्यानंतर ती मोटार सायकल मिळून न आल्यामुळे संबंधीत पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. तसेच तक्रारदाराने विमा कंपनीच्या कूठल्याही अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले नाही.
तक्रारदाराने या तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यांने या तक्रारी मार्फत अशी विनंती केली की, सामनेवाले यांने विम्याची रकक्म देण्यास जाणूनबूजून टाळाटाळ केली आहे. म्हणून सामनेवाले यांनी विम्याची रक्क्म रु.42,550/- सदरील रक्कम वेळेत न मिळाल्या मूळे रक्कम रु.25,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोमर हजर होऊन त्यांनी नि.10 नुसार लेखी म्हणणे सादर केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील ब-याच मजकूर मान्य केलेला आहे आणि काही मजकूरा बददल आपणास माहीती नाही असे कथन केले आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाले याचेकडे क्लेम फॉर्म व आवश्यक सर्व कागदपत्रे देऊनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळेत विमा रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे म्हणून सदरील तक्रार दाखल करण्यासाठी दि.29.5.2013 रोजी कारण घडले हे म्हणणे चूक आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांची मोटार सायकल दि.19.11.2012 रोजी चोरीला गेली असून त्यांची माहीती तक्रारदारास दि.20.11.2012 रोजी सकाळी झाली, परंतु तक्रारदाराने तक्रार त्यांच दिवशी म्हणजे दि.20.11.2012 रोजी जवळच्या पोलिस स्टेशनला देणे गरजेचे होते परंतु तक्रारदाराने तसे करण्याच्या ऐवजी सदरील तक्रार पाटोदा पोलिस स्टेशनला आठ दिवसाने म्हणजे दि.28.11.2012 रोजी दिली. तसेच सदरील चोरीची माहीती सामनेवाले क्र.1 यांना ताबडतोब लेखी कळवणे आवश्यक होते परंतु तक्रारदाराने तसे केले नाही. तसेच तक्रारदाराने विमा कंपनीच्या अटी व शर्तीचा तक्रारदाराने भंग केला आहे. म्हणून दि.29.5.2013 रोजीच्या पत्रामार्फत तक्रारदाराचा दावा मंजूर करता येत नाही असे सामनेवाले क्र.1 यांने तक्रारदारास कळवले. सामनेवाले क्र. 1 यांनी अशी विनंती केली आहे की, तक्रारदाराचा दावा 8 दिवसांने उशिरा दाखल झाला असून विमा कंपनीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र. 2 यांना या मंचाची नोटीस मिळाली परंतु ते या मंचासमोर हजर झाले नाही म्हणून सामनेवाले क्र. 2 यांचे विरुध्द मंचाने एकतर्फा आदेश दि.14.08.2014 रोजी केला आहे.
तक्रारदार यांचे विधिज्ञ श्री.पंडीत आणि सामनेवाले क्र.1 यांचे विधिज्ञ श्री. डी.बी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्राचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.1 यांनी विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान
भरपाई देण्यास कसूर केला आहे ही बाब तक्रारदार शाबीत
करतात काय ? होय.
2. तक्रारदार नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांची तक्रार, कागदपत्रे आणि शपथपत्र यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधीज्ञ श्री. के.एस.पंडीत यांने असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार व्यवसायाने शेतकरी असून मौजे दासखेड येथील रहीवासी आहेत. तक्रारदार यांनी दि.2.5.2012 रोजी दिप एजन्सी बीड येथून हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल रोख रक्कम रु.42,450/- ला खरेदी केली असून त्यांचा नंबर एम.एच.-23-एई-1504 असा आहे. त्यांची खरेदी पावती या प्रकरणात दाखल केली आहे. तक्रारदाराने त्यांच दिवशी सामनेवाले क्र.2 यांचेमार्फत सामनेवाले क्र. 1 यांचेकडे दि.2.5.2012 ते 11.5.2013 या कालावधीचा रक्कम रु.1413/- भरुन विमा उतरविलेला असून त्यांचा पॉलिसी नंबर 3005/7159153/00/000असा आहे. तक्रारदार यांचे विधीज्ञाने पूढे असा यूक्तीवाद केला की, दि.19..11.2012 रोजी तक्रारदार त्यांचे घरासमोर मोटार सायकल लावून झोपी गेले. दूस-या दिवशी म्हणजे दि.20.11.2012 रोजी सकाळी उठून पाहिले असता सदरील मोटार सायकल दिसून आली नाही. म्हणून त्यांने इतर शेजारी पाजारी यांचेकडे मोटार सायकल बाबतचा खात्री केली परंतु ती मोटार सायकल मिळून आली नाही. त्यामुळे मोटार सायकल चोरीला गेल्याची खात्री झाली. सदरील मोटार सायकल शोध्ण्यासाठी तक्रारदारास 7-8 दिवस गेले. त्यानंतर तक्रारदाराने दि.28.11.2012 रोजी सदरील मोटार सायकल चोरीस गेल्याची तक्रार पोलिस स्टेशन पाटोदा येथे केली असून त्यांचा गुन्हा क्र.178/12 असा आहे. संबंधीत पोलिसांनी सदर मोटार सायकलचा तपास केला असता ती मिळून आली नाही. म्हणून तशा प्रकारचा समरी रिपोर्ट दि.4.3.2013 रोजी मा. न्यायालयात दाखल केला. तसेच तक्रारदाराने विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाले क्र. 1 यांचेकडे दावा दाखल केला. परंतु सामनेवाले क्र. 1 यांनी तो दावा आठ दिवस उशिराने दाखल केल्यामूळे नामंजूर करुन तशा प्रकारची माहीती तक्रारदारास दि.29.5.2013 रोजीच्या पत्राने कळविली. म्हणजेच तक्रारदाराने विमा पॉलिसी अंतर्गत असणा-या अटीचे व शर्तीच उल्लंघन केले. परंतु तक्रारदाराने जाणूनबूजून आठ दिवसांचा विलंब केलेला नाही. कारण त्या कालावधीत मध्ये तक्रारदार सदरील मोटार सायकलचा तपास करीत होते.
पूढे असा यूक्तीवाद केला आहे की, तक्रारदाराने या तक्रारी बरोबर मोटार सायकल खरेदी केलेली पावती, विमा पॉलिसी, नोंद पूस्तिका, एफ.आय.आर., सामनेवाले क्र. 1 यांनी पाठविलेले पत्र इत्यादी दस्ताऐवज या तक्रारीसोबत मा. मंचासमोर दाखल केले आहे. म्हणून तक्रारदाराची विनंती की, तक्रारदारास विम्याची रक्कम म्हणून रु.42,450/-, सदरील विमा रककम न मिळाल्यामूळे रु.25,000/-, मानसिक व शारीरिीक त्रासापोटी रु.25,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाले क्र. 1 यांनी दयावेत असे आदेश करावेत.
सामनेवाले क्र. 1 यांच्या लेखी कैफियतीचे व शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1 यांचे विधीज्ञ श्री. डी.बी.कूलकर्णी यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदाराच्या तक्रारीतील जवळपास मजकूर मान्य केला आहे. तसेच त्यातील काही मजकूरा बाबत माहीती नाही असे कथन केले आहे आणि सामनेवाले क्र.1 यांनी विमा रकक्म देण्यास टाळाटाळ करुन मानसिक व शारीरिक त्रास तक्रारदारास दिला ही बाब मान्य केली नाही. पूढे असा यूक्तीवाद केला आहे की, तक्रारदाराची मोटार सायकल दि.19.1.1.2012 रोजी चोरीला गेली असून त्यांची माहीती तक्रारदारास दि.20.11.2012 रोजी झाली. तक्रारदाराने त्यांच दिवशी संबंधीत पोलिस स्टेशनला व सामनेवाले क्र. 1 यांनी माहीती देणे जरुरीचे होते पंरतु तक्रारदाराने तसे करण्याचे ऐवजी घटनेनंतर आठ दिवस उशिराने म्हणजे दि.28.11.2012 रोजी पोलिस स्टेशन पाटोदाला तक्रार नोंदविली व तशा प्रकारची माहीती सामनेवाले क्र.1 यांना दिली. म्हणजेच तक्रारदाराने पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार सदरील घटनेची नोटीस किंवा कंपनीस आणि पोलिस स्टेशनला दिली नाही. म्हणजेच आठ दिवस उशिराने सदरील घटनेचा क्लेम दाखल केला. जो की, विमा कंपनीच्या अटी व शर्तीचा भंग आहे. म्हणून यांच कारणास्तव सामनेवाले क्र. 1 यांनी दि.29.5.2013 रोजी सदरचा दावा मंजूर करता येत नाही असे तक्रारदारास कळविले. म्हणून सामनेवाले क्र.1 यांचे विधीज्ञाने अशी विनंती केली की, सदरील दावा हा उशिरा दाखल केलेला असल्यामुळे तो नामंजूर करण्यात यावा.
सामनेवाले क्र.2 यांना या मंचाची नोटीस मिळूनही ते मा. मंचासमोर हजर झाले नाही, किंवा लेखी म्हणणे दाखल केले नाही. म्हणून या मंचाने त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय घेतला.
वरील सर्व बाबीचा, कागदपत्राचा विचार केला असता या मंचासे असे दिसून येते की, तक्रारदाराची मोटार सायकल स्प्लेंडर प्लस क्र.एम.एच.-23-एई-1504 असा असून ती दि.20.11.2012 रोजी चोरीला गेल्याचे समजले ही बाब सिध्द होते. त्याच बरोबर सदरील मोटार सायकलचा विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधीत सामनेवाले क्र.1 यांना कळविले होते परंतु सदरील माहीती तक्रारदाराने आठ दिवसांने कळवली. म्हणजेच तक्रारदाराने सदरील माहीती जाणूनबूजून उशिरा कळविली नाही. कारण त्या कालावधीमध्ये तक्रारदार सदरील मोटार सायकलचा इतरत्र शोध घेत होते ही बाब सिध्द होते. परंतु सामनेवाले क्र.1 यांनी विमा दावा आठ दिवस उशिरा दाखल केल्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाले म्हणून तो नामंजूर केला आहे परंतु सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे या बाबतची कोणतेही कागदपत्र, पुरावा या मंचासमोर दाखल केला नाही. म्हणजेच सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब शाबीत होते. म्हणून तक्रारदारास विमा पॉलिसी अंतर्गत विम्याची रक्कम रु.39,315/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी र.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- सामनेवाले क्र.1 यांनी दयावेत असे या मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक