Maharashtra

Bhandara

CC/21/90

स्‍नेहा ताराचंद टिचकुले - Complainant(s)

Versus

युनिव्‍हर्सल शॅम्‍पो जनरल इन्‍शुरन्‍स कं. ली. - Opp.Party(s)

श्री.उदय क्षीर्सागर

16 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/90
( Date of Filing : 03 Sep 2021 )
 
1. स्‍नेहा ताराचंद टिचकुले
रा.केसलवाडा.वाघ. ता.लाखनी जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. युनिव्‍हर्सल शॅम्‍पो जनरल इन्‍शुरन्‍स कं. ली.
डिव्हीहजनल ऑफीस नंबर 202. 2 माळा विनर्स कौर्ट झेड के वरती, लुल्ला नगर. सहाने सुजाान पार्क. पुणे ४११०४०
पुणे
महाराष्‍ट्र
2. मॅनेजर, मे.जायका इंशूरन्‍स ब्रोकर्स प्रा. लि.
दुसरा मजला. जायका बिल्‍डींग कमर्शियल रोड ि‍सवील लाईन्‍स नागपुर ४४०००१
नागपुर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Nov 2022
Final Order / Judgement

(पारीत दिनांक-16 नोव्‍हेंबर, 2022)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या  कलम 35 खाली     विरुध्‍दपक्ष युनिव्‍हर्सल शॅंपो जनरल  इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर यांचे विरुध्‍द तिचा मृतक पती याचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे

    तक्रारकर्तीचे   तक्रारी प्रमाणे तिचा  मृतक पती  श्री ताराचंद पिसाराम टिचकुले हा शेतकरी होता आणि त्‍याचा विमा शासनाने काढलेला होता आणि विम्‍याचे वैध कालावधीत त्‍याचा अपघाताने मृत्‍यू झाल्‍याने मृतकाची पत्‍नी आणि कायदेशीर वारसदार या नात्‍याने विमा दाव्‍याची रक्‍कम मिळावी यासाठी तिने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर प्रस्‍तुत तक्रार दाखल केली. तक्रारी मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे त्‍याचे  मृतक पतीची  माहिती खालील विवरणपत्रामध्‍ये देण्‍यात येते-

मृतक शेतक-याचे नाव

श्री ताराचंद पिसाराम टिचकुले

मृतकाचे नावे असलेल्‍या शेतीचा तपशिल

मृतकाचे मालकीची मौजा केसलवाडा (वाघ) , तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं 273 शेती आहे.

अपघाती मृत्‍यूचा दिनांक

05/03/2020

मृत्‍यूचे कारण

तक्रारकर्तीच्‍या मुलाचे आणि वडील श्री ताराचंद पिसाराम टिचकुले यांचे भांडण झाल्‍याने  आणि मुलाने खून केल्‍याने  मृत्‍यू झाला.

तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा सादर केल्‍याचा दिनांक

22/05/2020

त.क.चे विमा दाव्‍या संबधात सद्द स्थिती काय आहे

 तालुका कृषी अधिकारी यांनी मृतक अपघाताचे वेळी अल्‍कोहलच्‍या अमलाखाली असल्‍याचे कारण देऊन फेटाळला अशी माहिती दिली.

 

      तक्रारकर्तीने  पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज सर्व्‍हीसेस हे प्राप्‍त विमा दाव्‍यांची छाननी करुन त्रृटींची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन विमा दावा निर्णयार्थ विमा कंपनी कडे पाठवितात. सदर विमा पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्‍यू संबधात कायदेशीर वारसदारास रुपये-2,00,000/- एवढी रक्‍कम मिळणार होती. परंतु तिचा  विमा दावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिली, त्‍यामुळे तिला  शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

 

1.    विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्तीला  विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विरुध्‍दपक्षां कडे  विमा दावा  दाखल केल्‍याचा दिनांक-22/05/2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे

 

2.    तिला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्‍य  ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे त्‍यांनी तक्रारी मधील त्‍यांचे विरुध्‍दचे संपूर्ण आरोप तसेच तक्रारकर्तीच्‍या   मागण्‍या या नामंजूर केल्‍यात. तक्रारकर्ती ही  स्‍वच्‍छ हाताने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर आलेली नाही.  प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र जिल्‍हा ग्राहक आयोगास येत नाही. तक्रारकर्तीने तक्रारी मध्‍ये असे नमुद केले की, तिचे पतीचा खून तिच्‍या मुलाने दिनांक-05.03.2020 रोजी केला आणि झालेला खून हा अपघाता




मध्‍ये मोडत नाही.  घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीचा मृतक पती  हा अल्‍कोहलचे अमलाखाली होता ही बाब मृतकाचे व्‍हीसेरा रिपोर्ट वरुन दिसून येते, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला. ते व्‍हीसेरा अहवाल आणि  विमा दावा नामंजूर पत्राची प्रत जोडत आहे. त्‍यांनी  नियमानुसार  विमा दावा  नामंजूर  केलेला आहे, सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

 

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज सर्व्‍हीसेस प्रायव्‍हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  दाखल  केले.  त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे  यातील तालुका कृषी अधिकारी यांना शासनाचे मार्फतीने विमा दाव्‍या संबधीचे कामकाज करण्‍यासाठी सक्षम अधिकारी म्‍हणून प्राधिकृत केलेले आहे. ते  शासन आणि विमा कंपनी यांचे मध्‍ये मध्‍यस्‍थाची भूमीका बजावतात.  तालुका कृषी अधिकारी यांचे कडून प्राप्‍त विमा दाव्‍याची छाननी करुन  संबधितां  कडून विमा दाव्‍यातील त्रृटींची  पुर्तता संबधितां कडून ते करवून घेतात. विमा दावा निश्‍चीतीचे अधिकार हे विमा कंपनीला आहेत. तक्रारकर्तीचे पतीचे दिनांक-05.03.2020 रोजी अपघाती निधन झाले होते. तक्रारकर्तीने तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात  दिनांक-22.05.2020 रोजी विमा दावा दाखल केला होता. सदरचा विमा दावा जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना प्राप्‍त झाला होता. त्‍यांनी पुढे तो विमा दावा दस्‍तऐवजासह विरुध्‍दपक्ष् क्रं 1 विमा कंपनी कडे  दिनांक-19.04.2021 रोजी पाठविला होता.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने   दस्‍तऐवजाची शहानिशा केल्‍या नंतर मृतक व्‍यक्‍ती हा अपघाताचे वेळी दारुचे प्राशन केलेला असल्‍याचे  कारणा वरुन त्‍यांचे दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्रान्‍वये विमा दावा नामंजूर केला. अशाप्रकारे त्‍यांनी  अशा प्रकारे त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य  योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज  करण्‍याची विनंती केली.

 

05.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे शपथे वरील लेखी उत्‍तर, विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे शपथे वरील लेखी उत्‍तर आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे अवलोकन  करण्‍यात आले. तक्रारकर्ती  तर्फे  वकील श्री उदय क्षिरसागर तर  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री जयेश एम. बोरकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

                                                                         ::निष्‍कर्ष::

06.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्तीने तक्रारी मध्‍ये असे नमुद केले की, तिचे पतीचा खून तिच्‍या मुलाने दिनांक-05.03.2020 रोजी केला  होता आणि झालेला खून हा अपघाता मध्‍ये मोडत नाही.  घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीचा मृतक पती  हा अल्‍कोहलचे अमलाखाली होता ही बाब मृतकाचे व्‍हीसेरा रिपोर्ट वरुन दिसून येते, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-26.04.2021 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला. ते व्‍हीसेरा अहवाल आणि  विमा दावा नामंजूर पत्राची प्रत जोडत आहे.  मृतक हा अपघाताचे वेळी दारुचे अमलाखाली होता हे दर्शविण्‍यासाठी प्रादेशिक न्‍यायवैद्दक विज्ञान प्रयोगशाळा नागपूर (Regional Forensic Science Laboratory, State of Maharashtra, Nagpur) यांचे दिनांक-03.06.2020 रोजीचे अहवालाची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केली,  त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

“Description of articles contained in Parcels”

  1. Viscera in a plastic jar wrapped in cloth labelled- Stomach, loops  of intestine.
  2. Viscera in a plastic jar wrapped in cloth labelled-Pices of both lungs, liver, spleen and kidneys.

Exhibit Nos. (1) (2) and (3) also labelled- Tarachand Pisaram Tichkule.

 

“Results of Analysis”

यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

Exhibit Nos. (1) and (2) contain (103) milligrams and (99) milligrams of Ethyl Alcohol per 100 grams, respectively.

 

    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करताना मुख्‍यतः सदर व्‍हीसेरा अहवालाचा आधार घेतलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  रासायनिक परिक्षणाचे अहवाला प्रमाणे  मृतका मध्‍ये अल्‍कोहलचे प्रमाण contain (103) milligrams and (99) milligrams of Ethyl Alcohol per 100 grams आढळलेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दिनांक-26.04.2021 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्रात व्‍हीसेरा रिपोर्ट नुसार विमाधारक अपघताचे वेळी त्‍याच्‍या शरिरा मध्‍ये  दारु अल्‍कोहल आढळून आलेले आहे तसेच लाभार्थीचा केलेला खून यामुळे विमा दावा देय होत नसल्‍याचे  नमुद केले.  

 

07.   प्रकरणात उपलब्‍ध पोलीस दस्‍तऐवजा वरुन असे दिसून येते की, पोलीस स्‍टेशन लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी दिनांक-05.03.2020 रोजीचे एफ.आय. आर.  सोबत  श्री जितेंद्र ताराचंद टिचकुले याचे पोलीस स्‍टेशन लाखनी यांनी दिनांक-05 मार्च, 2020 रोजी घेतलेले बयान याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये असे नमुद आहे की,  त्‍याचे घरी तो, त्‍याचा लहान भाऊ लोकेश, आई श्रीमती स्‍नेहा टिचकुले आणि वडील नामे ताराचंद पिसाराम टिचकुले  हे एकत्र राहतात आणि त्‍याचे वडील श्री ताराचंद पिसाराम टिचकुले ( या प्रकरणातील मृतक शेतकरी) हे नेहमीच दारु पिऊन घरी सर्वा सोबत भांडण करीत होते. दिनांक-05.03.2020 रोजी तो बाहेर घराचे आसपास असताना लोकांचा आवाज आला आणि त्‍याचे आंगणात लोकांची गर्दी होती व आंगणात तयाचे वडील श्री ताराचंद पिसाराम टिचकुले वय 52 वर्ष रक्‍त बंबाळ अवस्‍थेत पडले  होते , त्‍यांचे बाजूला लहान भाऊ लोकेश उभा होता, त्‍याने काय झाले या बाबत विचारले असता त्‍याने असे सांगितले की, तो अशोक लेलॅन्‍ड कंपनीतून  डयुटीवरुन आला तेंव्‍हा वडीलांनी माझी स्‍प्‍लेंडर गाउी क्रं MH-36-U/3983 ओढली व माझी गाडी मला परत कर असे बोलून भांडण केले व शिविगाळ करुन आंगणातील बल्‍लीने त्‍याला मारण्‍यास धावले असता त्‍याने वडीलांचे हातातील लाकडी बल्‍ली हिसकावून त्‍याच बल्‍लीने वडीलांचे डोक्‍यात मारले त्‍यामुळे वडील जागेवरच मृत्‍यूमुखी पडले असे नमुद केलेले आहे.

 

08    तक्रारकर्तीने  आपले शपथपत्रात तसेच  लेखी युक्‍तीवाद यामध्‍ये असे  असे नमुद केलेले आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिचे पतीचा अपघाती मृत्‍यू संबधीचा दावा हा मृतक अपघाताचे वेळी  अल्‍कोहलच्‍या नशेमध्‍ये असल्‍याचे फेटाळला होता परंतु त्‍या संबधात स्‍वतंत्र असा कुठलाही पुरावा  दाखल केलेला नाही. पोलीस दस्‍तऐवज हा पुरावा म्‍हणून वापरता येणार नाही, असे नमुद केले.

 

09.    आम्‍ही महाराष्‍ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये खूना मुळे विमा दावा देय नाही असे कुठेही नमुद केलेले नाही.

 

10.    तक्रारकर्त्‍याचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी आपल्‍या तक्रारीचे समर्थनार्थ  केवळ फोरॅन्‍सीक लेबॉरेटरी यांनी दिलेल्‍या अहवालावर मृतक हा अपघातीचे वेळी अल्‍कोहलचे अमलाखाली होता या कारणास्‍तव विमा कंपनीला विमा दावा नामंजूर करता येणार नाही या बाबत खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

 

  1.           Hon’ble State Commission Circuit Bench at Nagpur First Appeal No.-1/17/34-“Tata AIG-Versus-Smt.Charu Mahendra Bhope” Order dated-20.03.2019

 

       मा. राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी आपल्‍या अपीलीय निवाडया मध्‍ये खालील मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवली-

A      I (2015)CPJ 146 (NC) “Bajaj Allianz General Insurance Company Ltd.-Versus-  Achala Rudranwas Marde”

 

 

B                 III (2015)CPJ 104 (NC) “M.Sujatha-Versus-Bajaj Allianz General     Insurance   Company Limited”

 

 

C                2015(2) CPR 316 (NC) “Executive Engineer, IPH Division-Versus-   Shisma Devi  and others.

 

 

D               2015 (2) CPR 345 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-Ashminder     Pal Singh”

 

 

सदर मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवरुन मा.राज्‍य ग्राहक आयोग  खंडपिठ नागपूर यांनी पुढील प्रमाणे मत नोंदविले-

       “The Ratio laid down in the above mentioned authorities can be broadly drawn as that mere postmortem and Forensic Science Laboratory report cannot be a conclusive proof to repudiate the claim under the exclusion clause of influence of alcohol at the time of Accident.”

          सदर मा.न्‍यायनिवाडयांचे आधारे विमा कंपनीने केलेले अपिल मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी फेटाळले असून जिल्‍हा ग्राहक आयोग, नागपूर यांनी दिलेला आदेश कायम ठेवला. मा. राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी अपिलीय प्रकरणात पारीत केलेला आदेश आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतो असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

                                                                          ****** 

 

  1.        Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- I (2018)CPJ 541 (NC) “Anil Kumar-Versus-National Insurance Company Limited and others”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “Case history reveals factum of alcohol influence without any supportive or cogent evidence it cannot be concluded as person was under alcohol influence”

                                                                       ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- I (2015)CPJ 146 (NC) “Bajaj Allianz General Insurance Company Ltd.-Versus-Achala Rudranwas Marde”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “Gross post-mortem findings are not supported by any histopathological evidence of acute Alcohol injury to liver”

                                                             ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- III (2015)CPJ 104 (NC) “M.Sujatha-Versus-Bajaj Allianz General Insurance Company Limited”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले-Mere smell of alcohol or presence of ethyl alcohol in tissue samples cannot lead to inference that a person is incapable of taking care of himself”

                                                                  ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- 2015(2) CPR 316 (NC) “Executive Engineer, IPH Division-Versus-Shisma Devi and others.

 

      उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “It would not be just fair and reasonable to deny benefit of insurance policy to complainants only on the basis of report of State Forensic Science Laboratory” उपरोक्‍त मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा न्‍यायनिवाडा आमचे समोरील हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो याचे कारण असे की, केवळ राज्‍य न्‍यायवैद्दक विज्ञान प्रयोगशाळा (Statel Forensic Science Laboratory) यांनी दिलेल्‍या अहवालाचे आधारे विमा कंपनीला विमा दाव्‍याची रक्‍कम नामंजूर करता येणार नाही असे मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने स्‍पष्‍ट केलेले आहे. आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तशीच स्थिती आहे, हातातील प्रकरणात प्रादेशिक न्‍यायवैद्दक विज्ञान प्रयोगशाळा नागपूर (Regional Forensic Science Laboratory, State of Maharashtra, Nagpur) यांनी दिलेल्‍या अहवालाचा आधार घेऊन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला आहे, जे उपरोक्‍त  मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे न्‍यायनिवाडया प्रमाणे योग्‍य व न्‍यायसंगत नाही.

                                                      ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-  2015 (2) CPR 345 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-Ashminder Pal Singh”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “Car Accident claim Repudiated-On ground of smell of alcohol- Appellant Insurance Company not provided evidence of proof that Respondent Insurer under influence of intoxication at the  time of accident”

                                                                     ******

  1.        Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- III( 2011) CPJ 232 (NC)  “Life Insurance Corporation.-Versus-Ranjit Kaur”

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- Mere presence of alcohol even above usually prescribed limits is not a conclusive proof of intoxication”

 

11.  पोलीस दस्‍तऐवजांचा फायदा विमा कंपनीला होणार नाही या संदर्भात तक्रारकर्त्‍याचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवली, त्‍या निवाडयांचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे काळजीपूर्वक वाचन करण्‍यात आले त्‍यातील संक्षीप्‍त निरिक्षणे नोंदविण्‍यात आलीत, ती निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत-

 

  1. IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्‍याचे कायद्दा नुसार भक्‍कम पुरावा आहे असे म्‍हणता येणार नसल्‍याने पोलीसांचे दस्‍तऐवजाचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                                                   ***** 

 

  1. 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka

      सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

 

12.   पोलीस दस्‍तऐवजांचा फायदा विमा कंपनीला होणार नाही या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगावदारे खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते, त्‍यातील संक्षीप्‍त निरिक्षणे नोंदविण्‍यात आलीत, ती निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत-

 

1      III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh

           Khanduja & Anr.”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्‍टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्‍या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                                            *****

2.   IV (2015) CPJ 307 (NC)-“United  India Assurance Co.Ltd.-Versus-Saraswatabai Balabhau Bharti”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, मृतकाने विष प्राशन केले होते या संबधाने पुरावा आलेला नसल्‍याने त्‍याने आत्‍महत्‍या केली होती असा निष्‍कर्ष काढता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                                         ***** 

3.    Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011-“United India Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sumanbai Rangrao Mugal and others”

        मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी आदेशा मध्‍ये  स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्‍यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्‍हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, जेणे करुन ही बाब सिध्‍द होईल की, मृतकाने आत्‍महत्‍या केलेली आहे.  

 

4.      Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Consumer Case No.-100 of 2013 Decided on-01 March, 2019- “MS. Manisha Gupta & 03 others-Versus-M/s Birla Sun Life Insurance Company Ltd.” 

 

     मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्‍या निवाडया मध्‍ये   रासायनिक विश्‍लेषक विभागाचे (Dept. of Forensic Medicine)  अहवाला मध्‍ये  मृतकाने  सायनाईड प्राशन करुन (No evidence of consumption of cyanide by late Ajay Gupta was found) आत्‍महत्‍या केल्‍या बाबतचा कोणताही पुरावा आढळून न आल्‍याने अपिलार्थी-मूळ तक्रारकर्तीचे अपिल मंजूर केले.

                                                     ***** 

 

5.  Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Revision Petition No.-421 of 2013 Decided on-05 Sep., 2019- “Oriental Insurance Company Ltd.-Versus-Rishikesh Sandeep Kale & 04 others.” 

    मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनी दाखल न करु शकल्‍याने विमा कंपनीचे अपिल खारीज केले. उपरोक्‍त नमुद मा.वरीष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू होतात असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

                                                 ***** 

 

 

उपरोक्‍त मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू होतात आणि सदर न्‍यायनिवाडे आमचेवर बंधनकारक आहेत. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा  विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूरीचे पत्रात मृतकाचा खून झालेला असल्‍याने विमा दावा देय नाही. या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील मा. राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांचे निवाडयावर  भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai- First Appeal No.-A/11/166, Order dated-22/08/2013  in “Shri Machindra Ramnath Chavanke-Versus-ICICI Lombard General Insurance Company”

 

        सदर निवाडया प्रमाणे विमाधारक शेतक-याचा खून झाला होता परंतु जिल्‍हा ग्राहक मंच, नाशीक यांनी ग्राहक तक्रार क्रं-सीसी/178/2008, निकाल पारीत दिनांक-18.02.2011 अन्‍वये शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये खून समाविष्‍ट होत नाही म्‍हणून  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज केली होती. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने मा. राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांचे कडे उपरोक्‍त क्रमांकाचे अपिल केले असता मा. राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी तक्रारकर्त्‍याचे अपिल मंजूर करुन जिल्‍हा ग्राहक मंचाचा निकाल रद्द ठरविला आणि विमा कंपनीला तक्रारकर्ता यांना विमा राशी व्‍याजासह देण्‍याचे आदेशित केलेले आहे. सदर न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणात लागू होतो असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

13.  आम्‍ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्‍यामध्‍ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्‍या आहेत, त्‍यामधील विमा दावा निकाली काढण्‍यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.

 

अक्रं-9 विमा कंपन्‍यांना सुस्‍पष्‍ट कारणां शिवाय विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्‍यांनी नामंजूर विमा दाव्‍या प्रकरणी सुस्‍पष्‍ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व  त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/आयुक्‍त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्‍ये नोंद घेणे अनिवार्य आहे.

 

अक्रं-10 विमा प्रस्‍तावात त्रुटी असल्‍यास  त्‍या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्‍यावर पंधरा दिवसांच्‍या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्‍यथा तीन महिन्‍या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्‍या पासून त्‍यावर 21 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्‍या प्रकरणी मंजूरी योग्‍य प्रस्‍ताव नाकारल्‍यास विमा सल्‍लागार कंपनीने शेतक-यांच्‍या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्‍यायाधीश/ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्‍यायालय येथे दावे दाखल करेल.

 

अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत  कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.

   

अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्‍त होणारे व संगणक प्रणाली मध्‍ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्‍या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्‍ताव सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.

 

   वरील प्रमाणे  शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्‍या आहेत.     महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील असे स्‍पष्‍ट नमुद आहे.

 

14.    उपरोक्‍त विवेचन केल्‍या प्रमाणे तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर  विमा रकमेवर  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक- 26.04.2021 पासून  ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर तिला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-  मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

15.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                              ::अंतिम आदेश::

  1. तक्रारकर्ती श्रीमती स्‍नेहा ताराचंद टिचकुले यांची  तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनिव्‍हर्सल जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर, डिव्‍हीजनल ऑफीस, पुणे  यांचे  विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला  तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/-  (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-26.04.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्तीला  अदा करावी.

 

  1. तक्रारकर्तीला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला   अदा करावेत.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं  2 मे. जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकर्स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड, नागपूर यांचे  विरुध्‍दची  तक्रार त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे खारीज  करण्‍यात येते.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.