निकाल
दिनांक- 10.10.2014
(द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या )
तक्रारदार शेख नासेर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे चुकीच्या पध्दतीने मोबाईल क्रमांक बंद करुन सेवा देण्यात कसूर केला म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे,तक्रारदार हे खाजगी नौकरी करुन आपला व आपल्या कूटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी सामनेवाले क्र.1 कंपनी कडून सिमकार्ड सन 2006 मध्ये खरेदी केले. सदर सिमकार्डवर 9823392786 हा क्रमांक मिळाला होता. प्रथम सदर सिमकार्ड हे पोस्टपेड होते व नंतर कालांतराने तक्रारदार यांनी सदर सिमकार्ड प्रिपेड करुन घेतले होते. सदर प्रिपेड सिमकार्डचा नंबर एच-28991272162736429144 असा मिळाला होता. तक्रारदार हे सदर मोबाईल नंबर प्रिपेड करुन घेतलेवर वारंवार रिचार्ज करुन आजपर्यत पैसे भरुन वापरत होते. तक्रारदार यांनी सदर नंबर जवळपास 7 वर्ष वापरला. दि.16.7.2013 रोजी सामनेवाले कंपनीने सदर मोबाईल नंबर कसल्याही प्रकारची सूचना न देता अचानक बंद केला. तक्रारदारांचा मोबाईल नंबर बंद केल्यामुळे सामनेवाले क्र.1 यांच्याकडे त्या बाबत तक्रार केली. त्यांनी सामनेवाले क्र.2 यांना कळवितो असे सांगितले. तक्रारदार यांनी वारंवार सामनेवाले क्र.1 यांच्या मार्फत सामनेवाले क्र.2 यांचेकडे तक्रार करुनही मोबाईल नबरची परत सेवा चालू केली नाही. तक्रारदार यांचा सदर मोबाईल नंबर चालू असताना सामनेवाले यांचे सूचनेप्रमाणे व शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक ती कागदपत्र पुरवली होती. तक्रारदार यांनी कंपनीस सर्व कागदपत्र पुरवली होती. तक्रारदार यांनी सदर मोबाईल वर संपर्क केला असता तो क्रमांक कंपनीने दूस-या व्यक्तीस दिलेला आहे. याबाबत सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार हयांनी सदरील मोबाईल नबर सात वर्ष वापरला. त्यावेळेस तक्रारदार यांनी सदरील मेाबाईल नंबर सर्व मित्रांना, नातेवाईकांना व नौकरीच्या ठिकाणी संबंधीताना दिलेला होता. सदरील मोबाईल नंबर बंद पडल्यामूळे तक्रारदार यांना मित्राशी व नातेवाईकाशी असलेला सपंर्क तूटला. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागले. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सदर मोबाईल क्रमांक का काढून घेतला या बाबत कोणतेही उत्तर दिले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक 9823392786 परत मिळावा तसेच मोबाईल नंबर बंद केल्यामुळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रकक्म रु.3,000/- असे एकूण रु.13,000/- मिळावेत.
सामनेवाले क्र.1 हयांनी नि.क्र.8 अन्वये नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाही, म्हणून त्यांचे विरुध्द मा. मंचाने दि 25.11.2013 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला .
सामनेवाले क्र.2 यांनी नि.14 अन्वये लेखी कैफियत दाखल केली आहे. तक्रारीतील मजकूर स्पष्टपणे नाकारला आहे. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही. तक्रारदाराने तक्रारीतील सत्य परिस्थिती लपविली आहे. सामनेवाले क्र.1 हे सामनेवाले क्र.2 चे अधिकृत वितरक आहे. ही बाब मान्य आहे. सूरुवातीला सन 2006 मध्ये सदर मोबाईल नंबर हा तक्रारदार यांचे नांवे होता ही बाब मान्य आहे तदनंतर तक्रारदार यांने पोस्ट पेड चे रुपांतर प्रिपेड मध्ये केले. तदनंतर पडताळणी केली असता सदर मोबाईल नंबर हा तक्रारदार हे वापरत नव्हते. सदर नंबर हा कैलास टेकाडे नावांचा व्यक्ती वापरत होते. त्याबाबतचे कागदपत्र मंचासमोर दाखल केले आहे. तदनंतर कैलास टेकाडे या व्यक्तीने सूध्दा सदर विवादीत नंबरचे मोबाईल वापरला नाही असे आढळून आले. Telecom Regulatory च्या अधिकार अन्वये दि.24.5.2013 च्या नोटीफिकेशन नुसार जर एखादा ग्राहक हा मोबाईल नंबर न वापरत असल्यास सदर व्यक्तीचे मोबाईल नंबर हे बंद करण्यात येतो. तदनंतर कैलास टेकाडे हया व्यक्तीच्या नांवावर असलेला विवादीत मोबाईल नंबर दि.16.7.2013 पासून बंद करण्यात आला आहे. तो नंबर बंद झाल्यानंतर सामनेवाले हे सदर मोबाईल नंबर दूस-या व्यक्तीच्या नांवे करु शकतो. त्या अनुषंगाने सामनेवाले यांना सदर विवादीत मोबाईल नंबर हे शहानुर अत्तर पूणे या व्यक्तीच्या नांवे वितरीत केले आहे. सबब, तक्रारदारानी तक्रार ही कोणतेही कारण नसताना दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, पुरावा व यूक्तीवादाचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे यांचे अवलोन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी चुकीच्या पध्दतीने मोबाईल क्रमांक बंद
करुन सेवा देण्यात कसूर केला ही बाब तक्रारदार शाबीत करतात
काय ? नाही.
2. तक्रारदार हे तक्रारीतील नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांच्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सन 2006 मध्ये सामनेवाले क्र.1 यांचेकडून सिम कार्ड खरेदी केले होते. त्यांचा मोबाईल क्रमांक 9823392786 असा होता. सिम कार्ड खरेदी केला तेव्हा सदर नंबर हे पोस्ट पेड होते. तदनंतर तक्रारदार यांने सदर मोबाईल क्रमांक प्रिपेड केले. तक्रारदार हे सदर मोबाईल नंबर सात वर्ष पर्यत वापरत होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे मोबाईल नंबर कोणतीही सूचना न देता बंद केले. सामनेवाले यांच्याकडे विचारपूस केली असता सामनेवाले यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तदनंतर सदर नंबर हे दूस-या व्यक्तीच्या नांवे आहे असे आढळून आले. सामनेवाले यांनी कोणतीही सूचना न देता मोबाईल नंबर बंद केल्यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, तक्रारीतील विवादीत मोबाईल नंबर हे सन 2006 मध्ये तक्रारदार यांचे नांवे होता ही बाब मान्य आहे. तक्रारदार यांने सदर मोबाईल नंबर हे पोस्ट पेड चे प्रिपेड मध्ये केले. सदर मोबाईल नंबरची पडताळणी केली असता मोबाईल नंबर कैलास टेकाडे या व्यक्तीच्या नांवे होता. सदर कैलास टेकाडे यांचे नाव ब्लॅक लिस्ट मध्ये आल्यानंतर गैरवापर होऊ नये म्हणून दि.16.7.2013 पासून कैलास ठेकाडे यांच्या नांवावर असलेले मोबाईल नंबर बंद केले. तदनंतर कायदया व नियमानुसार सदर मोबाईल नंबर हे शहानूर अत्तर पूणे यांच्या नांवे केला आहे. तक्रारदार यांने सदर मोबाईल नंबर 7 वर्षापर्यत वापरले. तसेच मोबाईल क्रमांक बंद करतेवेळी म्हणजे दि.16.07.2013 पर्यत तक्रारदार वापरत होते हे सिध्द करण्यासाठी कोणतेही दस्त मंचासमोर हजर केले नाही. तक्रारदार यांने सदर तक्रार ही कोणतेही कारण नसताना दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी पूराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले. कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सन 2006 मध्ये तक्रारदार यांच्या नांवे सदर मोबाईल नंबर होता. त्रारदार यांने सदर मोबाईलचे पोस्ट पेड चे रुपांतर प्रिपेड मध्ये केले. हयाबाबी सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदार यांने सदर मोबाईल नंबर 2006 पासून 7 वर्षापर्यत वापरला आहे ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांने कोणतेही विश्वसनीय असे दस्त मंचासमोर दाखल केले नाही. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हे 2006 मध्ये सदर मोबाईल नंबर वापरत होते. तदनंतर तक्रारदार यांनी सदर मोबाईल नंबरचा वापर केला नाही म्हणून सामनेवाले यांनी नियमानुसार विवादीत मोबाईल नंबर हे कैलास टेकाडे यांचे नांवे दिले. तदनंतर ही कैलास टेकाडे हा व्यक्ती सूध्दा सदर मोबाईल नंबर वापरत नसल्यामुळे नंबर बंद करुन दि.16.8.2013 रोजी सामनेवाले यांनी तो मोबाईल नंबर शहानुर अत्तर पूणे यांच्या नांवे केला असे निदर्शनास येते. तक्रारदार हे सदर मोबाईल नंबर वापरत नसल्यामुळे सामनेवाले यांनी नियमानुसार सदर मोबाईल क्रमांक दूस-या व्यक्तीस वापरण्यासाठी दिला. सदर मोबाईल नंबर हे शहानूर अत्तर पूणे यांच्या नांवे सध्या कार्यरत आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही.
तक्रारदार यांने दाखल केलेले 2006 रोजीच्या बिलाचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांने विवादीत मोबाईल नंबरचे 2006 चे बिल दाखल केले आहे. तक्रारदार यांने सदर तक्रार ही दि.28.08.2013 रोजी दाखल केली.यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांने सदर तक्रार ही विहीत मुदतीत दाखल केली नाही. तसेच तक्रारदार जर हे मोबाईल नंबर दैनदिन वापरत होते ही बाबही सिध्द करु शकले नाहीत. सामनेवाले यांनी नियमानुसार बंद असलेला मोबाईल नंबर दूस-या व्यक्तीस देऊन सेवा देण्यात त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सदर मोबाईल नंबर हे श्हानुर अत्तर पूणे यांच्या नांवे आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांने सदर तक्रार ही विहीत मुदतीत दाखल केली नाही. तसेच सात वर्षापयत सदर मोबाईल नंबर वापरत होते ही बाब सिध्द करु शकले नाही. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार हे तकारीतील मागणी मिळण्यास पात्र नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
मुददा क्र..1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक