Maharashtra

Bhandara

CC/20/47

सिंधु लक्ष्‍मीनजी गायधनी - Complainant(s)

Versus

तालुका कृषी अधिकारी. तालुका कृषी अधिकारी कार्यालय. लाखनी - Opp.Party(s)

श्री. वाडीभस्‍मे

29 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/47
( Date of Filing : 22 Jun 2020 )
 
1. सिंधु लक्ष्‍मीनजी गायधनी
रा.अर्बन बॅंकेचे बाजुला. मेन रोड. लाखनी तह. लाखनी. जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. जिल्‍हा कृषी अधिक्षक. जिल्‍हा कृषी अधिक्षक कार्यालय
जिल्‍हा कारागृहाचे मागे. जेल रोड. भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
3. जगदीश लक्ष्‍मनजी गायधने.
रा. अर्बन बॅंकेचे बाजुला. मेन रोड. लाखनी. जि.भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. तालुका कृषी अधिकारी. तालुका कृषी अधिकारी कार्यालय. लाखनी
तह. लाखनी. जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. जिल्‍हा कृषी अधिक्षक, जिल्‍हा कृषी अधिक्षक कार्यालय.
जिल्‍हा कारागृहाचे मागे. जेल रोड. भंडारा तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
3. शाखा व्‍यवस्‍थापक. दी ओरीयंटल इ्ंंशूरन्‍स कंपनी लि.
संत तुकडोली वार्ड, भंडारा तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
4. प्रबंधक, जायका इ. ब्राेेेेेेकरेज प्राय.लि
२ माळा. जायका बिल्‍डींग कमर्शियल रोड सिव्‍हील लाईन्‍स सदर नागपूर - ४४०००१
नागपूर
महाराष्‍ट्र्र
5. जिल्‍हाधिकारी कार्यालय भंडारा
ती.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Aug 2022
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

              

01.  उभय तक्रारदारांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -1986 च्‍या कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष ओरिएन्‍टल  इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर  यांचे विरुध्‍द  तक्रारकर्ती क्रं 1हिचे पती आणि तक्रारकर्ता क्रं 2 याचे वडील यांचे  अपघाती मृत्‍यू संबधात गोपीनाथ  मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-   

 

     उभय तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे तक्रारकर्ती क्रं 1 ही मृतक श्री लक्ष्‍मण बकारामजी गायधनी यांची पत्‍नी असून  तक्रारकर्ता क्रं 2 याचे  मृतक     श्री लक्ष्‍मण गायधनी वडील आहेत. मृतक श्री लक्ष्‍मण बकाराम गायधनी हा  व्‍यवसायाने शेतकरी होता आणि शेतीवरच त्‍यांचे कुटूंबियाचा उदरनिर्वाह होता. मृतकाचे नावे मौजा लाखनी,  तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे तलाठी साझा क्रं6 मध्‍ये  शेती  असून  तिचे गट क्रं-570/2/3/1, क्रं-570/2/3/2, क्रं-570/2/3/2/1, क्रं-570/2/3/3/1, क्रं-570/2/3/5, क्रं-570/2/3/7 आणि क्रं-570/2/3/9  आहे. तसेच लाखनी,जिल्‍हा भंडारा येथे घर आहे.

 

   तक्रारदारांचे  तक्रारी प्रमाणे यामधील विरुध्‍दपक्ष क्रं 1 हे तालुका कृषी अधिकारी असून त्‍यांचे मार्फतीने महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांचा गोपीनाथ मुंडे अपघाती विमा काढला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे विरध्‍दपक्ष क्रं 1 चे वरिष्‍ठ अधिकारी आहेत. विरुध्‍दपक्ष  क्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस ही ब्रोकरेज कंपनी आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 5  जिल्‍हाधिकारी हे महाराष्‍ट्र शासनाचे अधिकारी  आहेत.

 

   तक्रारदारांनी  असे नमुद केले की, तक्रारकर्ती क्रं 1 हिचे पती तर तक्रारकर्ता क्रं 2 याचे वडील श्री लक्ष्‍मण बकाराम गायधनी हे दिनांक-24.06.2017 रोजी त्‍यांचे बिना गेअरच्‍या टी.व्‍ही.एस. स्‍कुटी नोंदणी क्रं-MH-31/BN-2704 या वाहनाने शेतीच्‍या कामा करीता सुरक्षितरित्‍या व काळजीपूर्वक वाहन चालवित होते, असे असताना अन्‍य वाहन ट्रक क्रमांक-WB/23-D/4804 ने त्‍यांना  जोरात धडक मारली असता ते जखमी होऊन रक्‍तबंबाळ होऊन खाली कोसळले आणि  त्‍यांचा घटनास्‍थळीच  अपघाती  मृत्‍य झाला. अपघाती घटेनेची तक्रार पोलीस स्‍टेशन लाखनी येथे त्‍याच दिवशी दिनांक-24.06.2017 रोजी नोंदविण्‍यात आली असता पोलीसांनी घटनास्‍थळावर जाऊन पोलीस पंचनामा केला तसेच साक्षीदारांचे बयान नोंदविले. मृतकाचे शवविच्‍छेदन जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय  भंडारा येथे करण्‍यात आले.  मृतकाचे मृत्‍यू पःश्‍चात  तक्रारदारांनी एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, सातबारा उतारा, गाव नमुना आठ, मृत्‍यू दाखला  इत्‍यादी  आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांसह विहित नमुन्‍यातील फॉर्म मध्‍ये विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1  तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-08.09.2017 रोजी दाखल केला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी सदर विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे वरिष्‍ठ अधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं 2 अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात पाठविला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी सदर विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज सर्व्‍हीसेस यांचे कडे पाठविला.  विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी  विमा दावा प्रस्‍तावाची तपासणी छाननी करुन पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीचे कार्यालयात विमा दावा निश्‍चीती साठी पाठविला.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 अधिक्षक कृषी अधिकारी यांनी  विमित शेतक-यांची  यादी विरुध्‍दपक्ष क्रं5  जिल्‍हाधिकारी  यांचे कडे सादर केली.  परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 3  विमा कंपनीने दिनांक-07.03.2019 रोजीचे पत्रामध्‍ये  खोटे कारण दर्शवून विमा दावा नामंजूर केला.  परंतु सदर विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारदारांना दिनांक-11.05.2020 रोजी प्राप्‍त झाले. वस्‍तुतः मृतक श्री लक्ष्‍मण गायधनी  हे अपघाताचे वेळी बिना गेअर  असलेले हलके दुचाकी वाहन चालवित होते व अशा हलक्‍या वाहनास वाहन चालविण्‍याचे परवान्‍याची गरज नसते. तक्रारदार  असे सांगतात की, मृतक     श्री लक्ष्‍मण  गायधनी यांचे जवळ वाहन चालविण्‍याचा परवाना अपघाताचे वेळी होता परंतु तो अपघाता मध्‍ये कुठेतरी खिशातून पडला असावा. शेतकरी अपघात विमा योजनेत संबधित शेतक-याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना  असावा अशी अटी कुठेच नाही. पोलीसांचे एफ.आय.आर. आणि ईतर दस्‍तऐवज यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, मृतक श्री लक्ष्‍मण गायधनी यांना अन्‍य  ट्रक ड्रायव्‍हरने भरधाव वेगाने व निष्‍काळजीपणे ट्रक चालवून धडक दिली होती आणि त्‍या ट्रक ड्रायव्‍हरला पोलीसांनी आरोपी केलेले आहे.  अशा प्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा  कंपनीने विमा दाव्‍याची  रक्‍कम देणे लागू  नये  म्‍हणून चुकचे  कारण पुढे करुन  विमा दावा नामंजूर करुन  तक्रारदारांना  दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्‍हणून  त्‍यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-  

 

 

  1. तक्रारदारांचे नात्‍याने अनुक्रमे  पती व वडील असलेले श्री लक्ष्‍मण बकारामजी गायधनी यांचे अपघाती मृत्‍यू मुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/-   उभय तक्रारदारांना विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

  1. विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍यांना झालेल्‍या शारिरीक त्रासा बद्दल रुपये-20,000/- आणि  मानसिक त्रासा पोटी रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

  1. विरुध्‍दपक्षांनी  तक्रारदारांना आर्थिक नुकसानी पोटी रुपये-35,000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय सदर तक्रारीचा खर्च, वकीलांची फी, वेळोवेळी  जिल्‍हा ग्राहक आयोगात येणा जाण्‍याचा खर्च आणि वारंवार भेटी दिल्‍यामुळे  शेतीचे झालेले नुकसान यासाठी रुपये-40,000/-  विरुध्‍दपक्षांनी  तक्रारदारांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

  1. विरुध्‍दपक्षां कडून तक्रारदारांना देय विमा रकमेवर तसेच ईतर देय रकमांवर वार्षिक 18 टक्‍के दराने व्‍याज आकारुन येणारी  रक्‍कम  देण्‍याचे  आदेशित व्‍हावे.

 

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले.  त्‍यांनी उभय तक्रारदार यांचे अनुक्रमे नात्‍याने  असलेले पती व वडील मृतक श्री लक्ष्‍मण गायधनी यांचे नावे  मौजा लाखनी  येथे शेती होती व ते शेतीचा व्‍यवसाय  करीत होतेही बाब मान्‍य केली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी  शासनाचे  वतीने मृतक शेतक-यांचे विमा दावे स्विकारतात आणि  विरुध्‍दपक्ष  क्र 2 अधिक्षक कृषी अधिकारी  यांचे कडे सादर करतात.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे विमा प्रस्‍तावांची तपासणी करुन पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष जयका इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस ब्रोकरेज सर्व्‍हीस यांचे कडे पाठवितात.  मृतक श्री लक्ष्‍मण  गायधनी यांचा ते रस्‍त्‍याने टी.व्‍ही.एस. स्‍कुटीने जात असताना एका ट्रकने जोरात धडक दिल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला होता ही बाब मान्‍य केली.  तक्रारदारांचा विमा दावा  प्रस्‍ताव  त्‍यांना तालुका कृषी अधिकारी, लाखनी यांचे कडून दिनांक-11.09.2017 रोजी प्राप्‍त झाला असता त्‍यांनी  कोणताही  विलंब न लावता सदर विमा दावा प्रस्‍ताव पुढील कार्यवाहीसाठी  विरुध्‍दपक्ष    क्रं 4 जयका  इन्‍शुरन्‍स  ब्रोकरेज सर्व्‍हीसेस यांचे कडे दिनांक-12.09.2017 रोजी पाठविला.  विमा दावा प्रस्‍ताव मंजूर अथवा नामंजूर  करणे ही विमा कंपनीचे अखत्‍यारीतील बाब असल्‍याने  त्‍यांना प्रस्‍तुत तक्रारी मधून मुक्‍त करण्‍याची विनंती  केली.

 

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 3  ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी  तर्फे  लेखी उत्‍तर  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल  करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा व्‍दारे  प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजा वरुन  मृतक  शेतक-याचे नावे  शेती होती तसेच  तक्रारदार हे विमा कंपनीचे ग्राहक आहेत ही बाब मान्‍य केली.  मृतक शेतक-याचे दुचाकी  वाहनास  ट्रकने धडक  दिल्‍यामुळे अपघाती  मृत्‍यू झाला होता ही बाब सुध्‍दा मान्‍य केली. तक्रारदारांनी दाखल केलेले शेती विषयक तसेच पोलीस  दस्‍तऐवज  त्‍यांना मान्‍य  आहेत.  विरुध्‍दपक्षक्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीने दिनांक-07.03.2019रोजीचे रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या पत्रान्‍वये तक्रारकर्तीला तिचा विमा दावा नामंजूर झाल्‍याचे कळविले होते. विमा दावा प्रस्‍तावा सोबत प्राप्‍त झालेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनी व्‍दारे केल्‍या नंतर अशी बाब निदर्शनास आली की, अपघाताचे वेळी मृतक शेतकरी हे दुचाकी वाहन  स्‍कुटी चालवित होते परंतु मृतक शेतक-या जवळ दुचाकी  वाहन चालविण्‍याचा  चालक परवाना नव्‍हता. दिनांक-07.03.2019 रोजी विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीचे नावे देण्‍यात आले होते आणि सदर पत्राच्‍या प्रती कृषी अधिकारी व  जयका इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना देण्‍यात आल्‍या होत्‍या.  तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजनेत संबधित  शेतक-याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना असावा अशी अट कुठेही नमुद नाही हे म्‍हणणे खाटे  आहे, वस्‍तुतः संबधित  शेतक-याचा  वाहन चालविताना अपघाती मृत्‍यू झाल्‍यास त्‍याचे कडे वैध वाहन चालक परवाना असणे आवश्‍यक आहे. तक्रारदारांचे म्‍हणणे की, त्‍यांना  दिनांक-07.03.2019 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे  पत्र दिनांक-11.05.2020 रोजी मिळाले होते ही बाब नामंजूर करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष क्रं 3  विमा कंपनी तक्रारदारांनी  त्‍यांच्‍या  तक्रारी मधून  केलेल्‍या  सर्व मागण्‍या या नामंजूर करीत आहे.  तक्रारदारांची तक्रार खोटी  व चुकीची असल्‍याने ती खारीज व्‍हावी अशी विनंती  विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात नमुद केले की, मृतक शेतक-याचा विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजासह जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कडून दिनांक-25.11.2017 रोजी त्‍यांना प्राप्‍त झाला होता.  त्‍यांनी सदर विमा दाव्‍याची छाननी करुन पुढे तो विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडे दिनांक-04.12.2017 रोजी पाठविला होता. विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने विमा दावा प्रस्‍तावाची शहानिशा केल्‍या नंतर मृतका जवळ अपघाताचे वेळी वाहन चालविण्‍याचा परवाना नसल्‍याने दिनांक-07.03.2019 रोजीचे पत्राव्‍दारे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला.  विरुध्‍दपक्ष क्र 4 ही एक विमा सल्‍लागार कंपनी असून  ते शासन आणि विमा कंपनी यांचे मध्‍ये मध्‍यस्‍थाची भूमीका पार पाडतात. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

 

 

06.   तक्रारदारांची  तक्रार व दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्षांची लेखी उत्‍तरे,  तसेच तक्रारदार यांचा शपथे वरील पुरावा, विरुध्‍दपक्ष क्रं 3  विमा कंपनी तर्फे दाखल शपथे वरील पुरावा, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा लेखी युक्‍तीवाद  याचे अवलोकन करण्‍यात आले.  तक्रारदारांचे अधिवक्‍ता श्री राजकुमार वाडीभस्‍मे मौखीक युक्‍तीवादाचे वेळी अनुपस्थित  होते. विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनी तर्फे अधिवक्‍ता श्रीमती निला नशीने यांचा   मौखीक युक्‍तीवाद  ऐकण्‍यात आला. शेतकरी अपघात विमा  योजनेचे  प्रकरण असल्‍याने प्राधान्‍य देऊन तक्रार निकालासाठी  नेमण्‍यात आली. जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्‍याय निवारणार्थ उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मृतकाचा विमा दावा नाकारुन विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कपंनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

2

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

 

मुद्दा क्रं 1 व क्रं 2 बाबत-

 

 

07.    मृतक शेतकरी श्री लक्ष्‍मण बकारामजी गायधनी  यांचे नावे अपघाताचे वेळी मौजा लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे भूमापन 570/2/3/2,  क्रं-570/2/3/2/1, क्रं-570/2/3/3/1, क्रं-570/2/3/5, क्रं-570/2/3/7 आणि क्रं-570/2/3/9 शेती होती ही बाब दाखल सात बारा उतारा  व गाव नमुना  आठ अ वरुन सिध्‍द होते आणि त्‍या बाबत उभय पक्षां मध्‍ये सुध्‍दा विवाद नाही. मृतकाचे मृत्‍यू  नंतर तक्रारदार हे त्‍यांचे कायदेशीर वारसदार आहेत व त्‍यांचे नावे वारसान नोंदवही  मध्‍ये नोंद घेण्‍यात आली ही बाब गाव नमुना 6क वरुन सिध्‍द होते.

 

 

08.   पोलीस स्‍टेशन, लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी दिनांक-24.06.2017  रोजी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. वरुन  असे दिसून  येते की, मृतक  श्री लक्ष्‍मण बकारामजी गायधनी हे राष्‍ट्रीय महामार्ग क्रं 6 वरुन त्‍यांची स्‍कुटी क्रं-MH-31/BM-2704 ने रस्‍ता क्रास करीत असताना भंडारा साकोली कडे जाणा-या ट्रक क्रं- WB-23/D-4804 चे चालकाने त्‍याचे ताब्‍यातील ट्रक भरधाव वेगाने व  निष्‍काळजीपणे चालवून वर नमुद स्‍कुटी चालकास घडक देऊन  त्‍याचे मरणास  कारणीभूत झाल्‍याने फीर्यादिचे रिपोर्ट वरुन सदरचा गुन्‍हा दाखल करुन तपासात घेतल्‍याचे नमुद आहे.  पोलीसांचे घटनास्‍थळ पंचनामा, मरणान्‍वेषन वृत्‍त यामध्‍ये सुध्‍दा  अशाच प्रकारचा मजकूर नमुद आहे. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथील दिनांक-24.06.2017 रोजीचे शवविच्‍छेदन  अहवाला मध्‍ये मृतकाचे मृत्‍यूचे कारण  हे “HEAD INJURY ASSOCIATED WITH HAEMORRHAGE AND SHOCK DUE TO CRUSH INJURY TO RIGHT LOWER LIMB’  पोलीस दस्‍तऐवज आणि शवविच्‍छेदन अहवाल  यावरुन ही बाब सिध्‍द होते की, मृतकाचा  मृत्‍यू हा अन्‍य ट्रक चालकाने निषकाळजीपणाने वेगाने ट्रक चालवून  धडक दिल्‍याने  अपघाती झाला.

 

 

09.    सदर प्रकरणात  विरुध्‍दपक्ष क्रं  3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे  त्‍यांचे अधिवक्‍ता श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्‍तीवाद असा आहे की,  मृतक  शेतकरी श्री लक्ष्‍मण बकारामजी गायधनी यांचे जवळ अपघात दिनांक-24.06.2017 रोजी वैध वाहन चालक परवाना नव्‍हता आणि त्‍यामुळे  तक्रारदारांना शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये विमा दावा देय होत नाही. शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रका प्रमाणे अपघाताचे वेळी वाहन  चालविणा-या  शेतक-या जवळ वैध वाहन चालक परवाना असणे आवश्‍यक व बंधनकारक आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्ती श्रीमती  सिंधु लक्ष्‍मण गायधनी यांचे नावे दिनांक-07.03.2019 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र देऊन कळविले होते की, अपघात हा मृतक शेतकरी दुचाकी वाहन चालवित असताना झालेला आहे व अपघाताचे वेळी मृतका जवळ दुचाकी वाहन चालविण्‍याचा परवाना नव्‍हता त्‍यामुळे विमा दावा रद्द करीत आहोत. सदर पत्राची प्रत जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा आणि जयका इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना दिलेली आहे.

 

 

10.    जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचे विमा दावा नामंजूरीचे  दिनांक-07.03.2019 चे पत्रा पासून  दोन  वर्षाचे आत म्‍हणजे दिनांक-20.06.2020 रोजी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  तक्रार दाखल केलेली असल्‍याने तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी  प्रमाणे मुदती  मध्‍ये आहे. तसेच  तक्रारकर्तीने  दिनांक-08.09.2017 रोजी विमा दावा प्रस्‍ताव विरध्‍दपक्ष क्रं 1  तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे  कडे दाखल  केल्‍या नंतर त्‍यांनी दिनांक-11.09.2017 रोजी विना विलंब विमा दावा प्रस्‍ताव  त्‍यांचे वरिष्‍ठ   कार्यालय  विरुध्‍दपक्ष क्रं 2  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी  भंडारा यांचेकडे सादर केला व त्‍यांनी सदर विमा दावा प्रस्‍ताव त्‍वरीत विनाविलंब दिनांक-12.09.2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेकडे पाठविला.  विरुध्‍दपक्ष  क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे त्‍यांना विरुध्‍दपक्ष क्रं 2 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कडून विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-25.11.2017 रोजी प्राप्‍त झाला होता व त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स  कंपनी मध्‍ये विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-04.12.2017 रोजी पाठविला होता. विरुध्‍दपक्ष    क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-07.03.2019 रोजीचे  पत्रान्‍वये नामंजूर  केला. विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून विरुध्‍दपक्ष  क्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीला  विमादावा  प्रस्‍ताव दिनांक-04.12.2017 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतर  त्‍यांनी  जास्‍तीतजास्‍त  03  महिन्‍यात म्‍हणजे दिनांक-04.03.2018 पर्यंत  विमा दाव्‍यावर निर्णय देणे अभिप्रेत होते परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं 3 विमा कंपनीने विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-07 मार्च,2019 रोजी नामंजूर केला याचाच अर्थ असा होतो की,  विरुध्‍दपक्ष क्रं3 विमा कंपनीने विमा दावा निश्‍चीतीसाठीची 03 महिन्‍याची मुदत हिशोबात घेता दिनांक-04.03.2018 पासून तब्‍बल एक वर्ष उशिराने विमा दाव्‍या वर निर्णय घेतलेला आहे ही बाब सिध्‍द होते.

 

 

11.  दिनांक-04 डिसेंबर, 2009 रोजीचे महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार जर शेतक-याचा मृत्‍यू अपघाता मुळे झाला असेल आणि अपघातग्रस्‍त  शेतकरी स्‍वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालक परवाना सादर करणे आवश्‍यक राहिल असे नमुद केलेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने  त्‍यांचे दिनांक-07.03.2019 रोजीचे पत्रान्‍वये मृतक शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना नव्‍हता या कारणासाठी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला आहे.

 

 

12.   आम्‍ही प्रकरणातील उपलब्‍ध पोलीस दस्‍तऐवजाचे अवलोकन केले. पोलीस स्‍टेशन, लाखनी,  जिल्‍हा भंडारा  यांनी दिनांक-24.06.2017  रोजी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. वरुन  असे दिसून  येते की, मृतक  श्री लक्ष्‍मण बकारामजी गायधनी हे राष्‍ट्रीय महामार्ग क्रं 6 वरुन त्‍यांची स्‍कुटीक्रं-MH-31/BM-2704 ने रस्‍ता क्रास करीत असताना भंडारा साकोली कडे जाणा-या ट्रक क्रं- WB-23/D-4804 चे चालकाने त्‍याचे ताब्‍यातील ट्रक भरधाव वेगाने व  निष्‍काळजी पणे चालवून वर नमुद स्‍कुटी चालकास घडक देऊन  त्‍याचे मरणास कारणीभूत झाल्‍याने फीर्यादिचे रिपोर्ट वरुन सदरचा गुन्‍हा दाखल करुन तपासात घेतल्‍याचे नमुद आहे.  पोलीसांचे घटनास्‍थळ पंचनामा, मरणान्‍वेषन वृत्‍त यामध्‍ये सुध्‍दा अशाच प्रकारचा मजकूर नमुद आहे. थोडक्‍यात पोलीस दस्‍तऐवजा वरुन ही बाब सिध्‍द होते की, अपघाती घटने मध्‍ये मृतक शेतक-याचा कोणताही दोष वाहन चालविण्‍या मागे नव्‍हता, तर जो काही अपघात झालेला आहे तो ट्रक चालकाचे भरधाव वेगाने निष्‍काळजीपणे  ट्रक चालवून मृतक शेतक-याचे स्‍कुटी वाहनास धडक दिल्‍यामुळे झालेला आहे ही बाब प्रकर्षाने दिसून येते.

 

 

13.   जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  भिस्‍त खालील मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्‍या निवाडयावर ठेवण्‍यात येते-

 

  1.    WRIT PETITON NO.-2420 OF 2018-BHAGUBAI DEVIDAS JAVLE-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER

 

          सदर निवाडयात मा. उच्‍च न्‍यायालयाने शेतकरी अपघात विमा  योजना ही मृतक शेतक-यांच्‍या वारसदारांना नुकसान भरपाई देण्‍यात यावी यासाठी सुरु केलेली आहे. एफ.आय.आर. वरुन असे दिसून येते की, वाहन चालविण्‍या-या शेतक-या विरुध्‍द तो वाहन चालक परवाना नसताना वाहन चालवित होता असा कोणताही गुन्‍हा नोंद केलेला नाही. प्रथम दर्शनी असे दिसून येते की, महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्‍त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्‍याचा निष्‍कर्ष मा. उच्‍च न्‍यायालयाने काढला. कारण ही योजना सामाजिक दायीत्‍वाचे तत्‍वावर शासनाने तयार केलेली आहे.

 

 

  1.    WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER

 

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, मृतक शेतक-याची मोटर सायकल ही रस्‍त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला सापडली आणि मृतक शेतक-याच्‍या दोषामुळे अपघात झाला होता असे कुठेही दस्‍तऐवजा मध्‍ये नमुद नाही.

 

 

 

  1.       HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 1126 OF 2019 DATE OF ORDER -05/10/2021- “THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD.-VERSUS-SMT.GANGUBAI VISHNU SHINDE & OTHERS”

 

       सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍ट नमुद केले की, पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. वरुन आणि पोलीस दस्‍तऐवजावरुन असे दिसून येते की, जो काही अपघात झालेला आहे तो अज्ञात वाहनचालकाने दोषपूर्ण वाहन चालविल्‍यामुळे झालेला आहे. महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक-04.12.2009 चे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्‍त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्‍याचा निष्‍कर्ष मा. राज्‍य ग्राहक आयोगाने काढला.

 

 

 

  1.       HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 200 OF 2018 DATE OF ORDER -27/09/2021- THE NATIONAL INSURANCE COMPANY-VERSUS-SUNDHUBAI HAMBIRRAO NAGNE & OTHERS.

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍टपणे नमुद केले की, जो काही अपघात झालेला आहे तो मृतक   शेतक-याजवळ वैध चालक परवाना नव्‍हता या कारणामुळे झालेला नाही  तसेच सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने  मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पुढील निवाडयावर भिस्‍त ठेवली-  In the  case in hand it is quite apparent that, the accident is not occurred for want of valid license of the deceased. Not having license is not the cause of accident. Hence , the complainant rightly relied upon the Judgement of Hon’ble Apex Court in 2004 (5) ALL MR (SC) 251 (Supreme Court) in National Insurance
Company Ltd.-Vs. Swaran Singh stated Supra. But the accident occurred due to the fault on the part of driver of offending vehicle and the offence is also registered against him. Therefore, in the case in hand repudiating the claim on the ground that, the driver was not having valid and effective driving license at the time of accident, amounts to deficiency in service on the part of opponent Insurance Company.

 

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा अशीच वस्‍तुस्थिती आहे की, जो काही अपघात मृतक शेतक-याचा झाला तो ट्रक चालकाने निष्‍काळजीपणाने वेगाने ट्रक चालवून मृतक शेतक-याच्‍या स्‍कुटीला धडक दिल्‍यामुळे झालेला आहे आणि पोलीसांनी सदर ट्रक चालकाचे विरोधात गुन्‍हा सुध्‍दा नोंद केलेला आहे. मृतक शेतक-याचे विरोधात कोणताही गुन्‍हा पोलीसांनी नोंदविलेला नाही.

 

 

  1.     HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 158  OF 2020 DATE OF ORDER -24/11/2021- THE ORIENTAL INSURANCE COMPANY-VERSUS-SMT. GAYABAI APPASAHEB JADHAV & OTHERS.

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालयाचे WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER या निवाडयाचा आधार घेऊन पुढे नमुद केले की, Wherein the Hon’ble High Court observed that, there was nothing to infer that accident was occurred due to fault of deceased, and to reject the claim. Insurance Company has committed deficiency in service mistaken in rejecting claim. In view of the scheme introduced for benefit of farmers,  as seen in GR of 2009 is binding on the insurance company. This court hold that, compensation needs to be given to the petitioner and interest also to be paid, as provided in GR of 2009.

 

उपरोक्‍त नमुद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतात. त्‍यामुळे आम्‍ही असा निष्‍कर्ष काढीत आहोत की, विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

 

14.   आम्‍ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्‍यामध्‍ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्‍या आहेत, त्‍यामधील विमा दावा निकाली काढण्‍यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.

 

अक्रं-9 विमा कंपन्‍यांना सुस्‍पष्‍ट कारणां शिवाय विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्‍यांनी नामंजूर विमा दाव्‍या प्रकरणी सुस्‍पष्‍ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व  त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/आयुक्‍त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्‍ये नोंद घेणे अनिवार्य आहे.

 

 

अक्रं-10 विमा प्रस्‍तावात त्रुटी असल्‍यास  त्‍या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

 

अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्‍यावर पंधरा दिवसांच्‍या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्‍यथा तीन महिन्‍या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर     15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

 

अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्‍या पासून त्‍यावर   21 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्‍या प्रकरणी मंजूरी योग्‍य प्रस्‍ताव नाकारल्‍यास विमा सल्‍लागार कंपनीने शेतक-यांच्‍या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्‍यायाधीश/ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्‍यायालय येथे दावे दाखल करेल.

 

 

अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत  कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.

   

 

अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्‍त होणारे व संगणक प्रणाली मध्‍ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्‍या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्‍ताव सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.

 

   वरील प्रमाणे  शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्‍या आहेत.

 

 

15.     महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील असे स्‍पष्‍ट नमुद आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स  सर्व्‍हीसेस यांचे  कडून विरुध्‍दपक्ष  क्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीला विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-04.12.2017 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतर  त्‍यांनी  जास्‍तीत जास्‍त  03  महिन्‍यात म्‍हणजे दिनांक-04.03.2018 पर्यंत  विमा दाव्‍यावर निर्णय देणे अभिप्रेत होते परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं 3 विमा कंपनीने विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-07 मार्च,2019 रोजी नामंजूर  केला याचाच अर्थ असा होतो की,  विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने विमा दावा निश्‍चीतीसाठीची 03 महिन्‍याची मुदत हिशोबात घेता दिनांक-04.03.2018 पासून तब्‍बल एक वर्ष उशिराने विमा दाव्‍यावर निर्णय घेतलेला  आहे ही बाब सिध्‍द होते.

 

 

16. सदर शासन परिपत्रका प्रमाणे तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयां प्रमाणे विरुध्‍दपक्ष  क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे  विमा दाव्‍या  संबधात कायदेशीर बाबी संबधी कोणतीही शहानिशा न करता विनाकारण आज पर्यंत विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 चे  उत्‍तर होकारार्थी आल्‍याने मुद्दा क्रं 2 अनुसार तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे  उभय तक्रारदार हे  महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका प्रमाणे विमा दावा रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर विमा रकमेवर वर सविस्‍तर नमुद केल्‍या प्रमाणे  विमा दावा निश्‍चीतीसाठीचा दिनांक-04.03.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 15 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे असे‍ जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी, लाखनी, जिल्‍हा भंडारा  व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी  भंडारा तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड ही  विमा सल्‍लागार कंपनी यांनी त्‍यांचे कर्तव्‍य  योग्‍य रितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष क्रं 5 जिल्‍हाधिकारी, भंडारा यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने व त्‍यांचे  विरुध्‍द कोणतेही  आरोप  नसल्‍याने  त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

17.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

 

                                                                           ::अंतिम आदेश::

 

 

  1. उभय तक्रारदारांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 3 ओरिएन्‍टल  इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, भंडारा तर्फे शाखा प्रबंधक यांचे विरुध्‍द  खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी उभय तक्रारदारांचे नात्‍याने अनुक्रमे पती व वडील असलेले मृतक श्री  लक्ष्‍मण बकारामजी गायधनी यांचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा निश्चितीचा दिनांक-04.03.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम उभय तक्रारदारांना अदा करावी.

 

 

  1. उभय तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 3  विमा कंपनीने उभय तक्रारदारांना दयाव्‍यात.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, लाखनी, तालुका- लाखनी  जिल्‍हा भंडारा  आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्‍यांचे  कर्तव्‍य योग्‍य रितीने पार पाडल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं  2 यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 4 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे प्रबंधक नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 5 जिल्‍हाधिकारी, भंडारा यांनी तक्रारदारांना  कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने व त्‍यांचे  विरुध्‍द कोणतेही  आरोप  नसल्‍याने  त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 3 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स   कंपनी तर्फे शाखा प्रबंधक, शाखा कार्यालय भंडारा यांनी  प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. सर्व पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.