निकाल
दिनांक- 29.04.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार शेख लतीफ शेख युसूफ यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले क्र.3 यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे मौजे धारुर जि.बीड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांचे नांवे मौजे धारुर येथे शेत गट नंबर 278 शेत जमिन नोंदलेली आहे. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून शेती व्यवसाय करुन कूटूंबाची उपजिवीका चालवतात.
दि.1.6.2011 रोजी तक्रारदार हे इंडिया बँक शाखा धारुर समोरुन जात असताना समोरुन ट्रक्टर क्र.एम.एच.-44-853 भरधाव वेगाने आला व तक्रारदार यांना धडक दिली. तक्रारदार हे जमिनीवर खाली पडले. तक्रारदार यांचे डावे पायावरुन ट्रक्टरचे चाक गेल्याने तक्रारदार यांचा पाय फॅक्चर होऊन मोठी दुखपत झाली. तक्रारदार यांचा डावा पाय कायम स्वरुपी निकाली झाला. तक्रारदार यांनी एस.आर.टी.आय, मेडीकल कॉलेज अंबाजोगाई येथे अँडमिट केले. दि.2.6.2011 रोजी सदर घटने बाबत तक्रार धारुर पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. ट्रक्टरचे ड्रायव्हर विरुध्द भारतीय दंड संहिता कलम 279, 337, 338 अन्वये गून्हा दाखल झाला.
तक्रारदार हा शेतकरी असल्याने व शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सामनेवाले क्र.3 यांचेकडे विमा काढलेला आहे. सदरील विम्याची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी दि.30.4.2012 रोजी सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल केला. सामनेवाले क्र.2 यांनी तो क्लेम सामनेवाले क्र.3 यांचेकडे वर्ग केला. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम उशिराने प्राप्त झाला असल्याने व पॉलिसी संपल्यानंतर मिळाल्यामूळे तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला व तसे पत्र तक्रारदार यांना दि.5.3.2013 रोजी पाठविले. तक्रारदार यांना सदरील अपघातात 60 टक्के कायम स्वरुपी अपंगत्व आलेले आहे. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुन सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.50,000/- मिळावे म्हणून तक्रार केली आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी नि.14 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी सामनेवाले यांचेकडे कोणताही अर्ज दिला नाही व कागदपत्र सादर केले नाही. तक्रारदार यांनी विलंबाने प्रस्ताव सादर केला आहे.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.13 अन्वये सादर केले. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, ते ब्रोकर म्हणून काम पाहतात. त्याकामी ते कोणतीही फि घेत नाहीत. त्यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. सामनेवाले क्र.2 हे फक्त कृषी अधिका-याकडून आलेला क्लेम विमा कंपनीकडे पाठविण्याचे काम करतात.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.25 अन्वये सादर केले. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मिळाला ही बाब मान्य केली आहे. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम दि.5.3.2013 रोजी नाकारला आहे ही बाब मान्य केली आहे. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना अपंगत्व आले नाही असे कथन केले आहे. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम अत्यंत उशिराने प्राप्त झाला. त्यामुळे नाकारण्यात आला. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवी नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र पुराव्याकामी दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी पूराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी पूराव्याचे शपथपत्र नि.26 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.5 सोबत दस्त हजर केले आहेत. तक्रारदार यांचे वकील श्री. राजपूत यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.3 यांचे वकील श्री.साळवे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन
सेवत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय होय.
2. तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम
मिळण्यास पात्र आहेत काय होय.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांचे वकील श्री. राजपूत यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हे अशिक्षीत असून अपघात झाल्यानंतर त्यांना 60 टक्के अंपगत्व आले. तक्रारदार यांना सदरील क्लेम दाखल करणेकामी विलंब झाला. तो विलंब तक्रारदार हे वैद्यकीय उपचार घेत होते व तक्रारदार यांची देखभाल करण्यासाठी कोणीही नसल्यामुळे क्लेम दाखल करण्यास विलंब झाला. तक्रारदार यांनी योग्य व वाजवी कारण देऊनही तक्रारदार यांचा क्लेम दाखल करण्यास झालेला विलंब विमा कंपनी यांनी माफ केला नाही. तक्रारदार यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष दाखल केलेले दस्तावर वेधले व सामनेवाले क्र.3 यांनी प्रस्ताव उशिराने प्राप्त झाला तरी प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे.
सामनेवाले क्र.3 यांचे वकील श्री. साळवे यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचा क्लेम खुप उशिराने प्राप्त झाल्यामुळे व पॉलिसीची मुदत संपली असल्यामुळे तो क्लेम रास्त व योग्य कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदार यांनी मुदतीत क्लेंम दाखल न केल्यामुळे तक्रारदार हे स्वतः जबाबदार आहेत. तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व दस्त यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला दस्त यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचा दि.1.6.2011 रोजी अपघात झाला व त्या अपघातामध्ये त्यांचे डावे पायावरुन ट्रॅक्टरचे चालक गेले व त्यांना गंभीर दूखापत झाली याविषयी वाद नाही. तक्रारदार यांनी एस.आर.टी. आय. मेडीकल कॉलेज अंबाजोगाई येथे उपचार घेतले. तक्रारदार हे दि.1.6.2011 ते 30.6.2011 या कालावधीत दवाखान्यात शरीक होते. अपघाताची खबर पोलिसांना देण्यात आली आहे व ट्रॅक्टरचे ड्रायव्हर विरुध्द गून्हा नोंदविण्यात आलेला आहे. तक्रारदार यांना 60 टक्के अपंगत्व आलेले आहे.
सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मुदतीत मिळाला नाही या कारणास्तव नाकारला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला दस्त यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी क्लेम दि.30.4.2012 रोजी दाखल केला होता. तो क्लेम सामनेवाले क्र.3 यांना प्राप्त झाला. सामनेवाले क्र.3 यांनी दि.5.3.2013 रोजी तक्रारदार यांना त्यांचा क्लेम नामंजूर झाला हे कळविले आहे. केवळ तक्रारदार यांचा क्लेम उशिराने प्राप्त झाला या कारणास्तव क्लेम नाकारला आहे. तक्रारदार यांनी योग्य व वाजवी कारण नमूद करुन क्लेम उशिराने दाखल केला असता त्यावर विमा कंपनीने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित होते तसेच झालेला विलंब माफ करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तक्रारदार यांचा एक पाय कायम स्वरुपी निकामी झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी क्लेमसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र प्राप्त करणे व क्लेम दाखल करणे ताबडतोब शक्य नव्हते. तक्रारदार यांना क्लेम दाखल करण्यास उशिर झाला.केवळ क्लेम दाखल करण्यास उशिर झाला या कारणास्तव तक्रारदार यांचा क्लेम नाकारणे उचित नाही. तक्रारदार यांनी मुदतीत क्लेम दाखल केला नाही परंतु त्या बाबत तक्रारदार यांनी योग्य व वाजवी कारणे दिलेली आहेत. सबब, या मंचाचे मत की, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. म्हणून तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक