निकाल
दिनांक- 26.03.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार उत्तरा अशोक फड यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,तक्रारदार हे मौजे निरपणा ता.अंबाजोगाई जि.बीड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार ही मयत अशोक फड यांची पत्नी आहे. तक्रारदाराचे मयत पती हे शेती व्यवसाय करुन स्वतःचे व कूटूंबाची उपजिवीका करीत होते. तक्रारदाराच्या पती हे दि.7.6.2009 रोजी सकाळी शेतात वांग्यावर फवारणी करण्यासाठी गेले होते. मयताच्या पत्नीने सांगितले की, फवारणी करत असता इंडो सल्फाईन या औषधाचे झाकण उघडत असताना सदरचे इंडो सल्फाईन हे औषध पोटात गेले. त्यांस जीपमध्ये बसूवून सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे आणले असता डॉक्टरांनी तक्रारदाराच्या पतीस मयत घोषित केले. घटनेची फिर्याद पोलिस स्टेशनला दिली. मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. मयताचा मृत्यू हा विषामुळे झाला आहे असा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. तक्रारदाराचे पती हे शेतकरी असल्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 मार्फत फॉर्म भरल्यानंतर सामनेवाले क्र.2 कडे पाठविला. सामनेवाले क्र.2 हे प्रस्तावाची छाननी करुन सामनेवाले क्र.1 कडे पाठवितात. तक्रारदार यांनी प्रस्तावासोबत तलाठयाचे प्रमाणपत्र, रु.100/-चे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, 7/12 चा उतारा, 8-अ, फेरफार नक्कल, 6 ड, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर. मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र दाखल केले. तक्रारदारास विमा दावा रक्कम दिली नाही म्हणून त्यांनी दि.6.7.2013 रोजी वकिलामार्फत सामनेवाले क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठविली. सामनेवाले यांना नोटीस मिळून सुध्दा त्यांनी उत्तर दिले नाही व रक्कमही दिली नाही. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विमा दावा रक्कम रु.1,00,000/- 15 टक्के व्याजाने दि.7.6.2009 पासून मिळावेत, तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत.
सामनेवाले क्र.1 हे हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांचे मयत पती यांनी स्वतःहून इंडो सल्फन विष प्राशन केले. सदर अपघात हा कायदयाच्या अनुषंगाने अनुचित आहे. सदर अपघात हे महाराष्ट्र शासनाच्या पॉलिसी प्रमाणे व जी आर नुसार त्यांच्या शर्तीच्या अटी भंग झाल्या. सबब, तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.11 अन्वये दाखल केले आहे.तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाहीत. विमा कंपनीचे ते ग्राहक आहेत. सामनेवाले हे विमा सल्लागार म्हणून काम करतात.अपघात दि.07.06.2009 रोजी झाला. सदरील प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड मार्फत त्यांना प्राप्त झाला व तो प्रस्ताव दि.21.6.2010 रोजी सामनेवाले क्र.1 यांना पाठविला आहे. तो प्रस्ताव दि.24.11.2010 रोजी नामंजूर केल्याचे तक्रारदारास कळविले आहे. त्यांचे सेवेत कोणत्याही प्रकारची त्रूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी.
सामनेवाले क्र.3 हे नोटीस मिळूनही गैरहजर, त्यांचे विरुध्द एकतर्फा तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील रेखा जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांनी दाखल केलले जवाब व कागदपत्र यांचे अवलोकन केले.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत
अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम न देऊन सेवेत
त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय
2. तक्रारीत नमुद केलेली नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार
पात्र आहेत काय होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील रेखा जाधव यांनी युक्तीवाद केला. युक्तीवाद करत असतांना त्यांनी सांगितले की, अर्जदाराचे मयत पती हे शेतकरी होते. त्यांच्या नांवे गट नं.283 व 284 मध्ये शेतजमिन आहे. तक्रारदार यांचे पती हे शेतात वांग्यावर फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणी करण्यासाठी इंडो सल्फाईन या औषधाच्या बाटलीचे झाकण उघडत असतांना सदर इंडो सल्फाईनचे औषध हे तक्रारदार यांचे मयत पती यांच्या पोटात गेले. तक्रारदार यांचे मयत पती यांना सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने राबवलेली शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्क्म रु.1,00,000/- मिळण्यासाठी सामनेवाले क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रितसर प्रस्ताव दाखल केला. सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.2 यांच्याकडे पाठविला व तो प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.1 विमा कंपनी यांच्याकडे पाठविला. परंतु सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव हा निर्णयी काढल्याबददल तक्रारदारास कळविले नाही. नंतर तक्रारदार यांनी वकिलामार्फत सामनेवाले यांना नोटीस दिली. सदर नोटीसचे उत्तर सामनेवाले यांनी दिले नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा विमा दावा यावर योग्य कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची रक्कम रु.1,00,000/- मिळण्यापासून वंचीत राहीले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाले क्र.1 व 2 हजर मंचासमोर हजर झाले. सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला.
सामनेवाले क्र.2 यांच्या जवाबाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.2 यांनी सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.1 विमा कंपनीस पाठविला व विमा कंपनीने सदर प्रस्ताव नामंजूर केल्या बाबत तक्रारदारास कळविले आहे.
सामनेवाले क्र.1 यांच्या वकिलांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदाराचे मयत पती यांनी स्वतःहून इंडो सल्फाईन ही औषध पिऊन घेतली त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा बेकायदेशीर आहे व तो अपघात या पॉलिसीच्या शर्ती व अटी यांचा भंग करणारा आहे. सदर अपघात हा महाराष्ट्र शासनाच्या जी आर मध्ये बसत नसल्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी दावा नाकारला आणि तक्रारदार यांनी वेळोवेळी कळविले असताना ही कागदपत्राची पुर्तता केली नाही. फेरफारची नक्कल दाखल केली नाही. सबब, तुमचा दावा हा नामंजूर करण्यात आला आहे. सबब, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबाचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पती अशोक फ हे दि.7.6.2008 रोजी विषबाधा झाल्यामुळे मयत झाला. सदरील बाब ही तक्रारदाराने दाखल केलेल्या पोलिस पेपरवरुन सिध्द होते. तक्रारदार यांच्या पतीच्या नांवे निरपणा येथे गट नं.283 व 284 मध्ये शेतजमिन आहे. यावरुन तक्रारदार यांचे पती शेतकरी हेाते व ते शेतीचा व्यवसाय करीत होते हे सिध्द होते.
महाराष्ट्र शासनाने सामनेवाले क्र.1 यांच्याकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम भरलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला आहे. त्यासोबत सर्व कागदपत्राची पुर्तता केली आहे. तो प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांना प्राप्त झालेला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव हा तक्रारदार यांनी फेरफारची या कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे नाकारलेला आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही शेतक-याच्या हितासाठी राबवलेली आहे. सदर योजने अंतर्गत दाखल केलेला प्रस्ताव हा सामनेवाले क्र.3 यांच्याकडे दाखल केल्यानंतर त्या कागदपत्राची शहानिशा होऊन सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.2 कडे पाठविला जातो व सामनेवाले क्र.2 हे पुन्हा प्रस्तावाची छाननी करतात. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास तक्रारदारास कळवितात परंतु सामनेवाले यांचे जबावामध्ये त्यांनी सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.1 कडे पाठविला आहे. सामनेवाले क्र.2 यांनी प्रस्तावाची शहानिशा करुन प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी कागदपत्राची पूर्तता केली नाही. त्या कारणामुळे नाकारलेला आहे. तक्रारदाराचा प्रस्ताव ज्या कारणामुळे ते कारण संयूक्तीक नाही. सबब, या मंचाचे मत सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 यांच्याकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक