निकाल
दिनांक- 12.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार सलीमाबी मशोयोद्यीन शेख् यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेचा लाभ न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून विम्याची रककम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हया व्यवसायाने शेतकरी आहेत. दि.29.2.2012 रोजी तक्रारदार यांचे पती शेख मशोयोद्यीन शमशोद्यीन हे मोटार सायकलवर जात होते. समोरुन ऊसाने भरलेला ट्रक क्र.एम.एच.-डि-1744 भरधाव वेगाने येत होता. ट्रकचे ड्रायव्हरने निष्काळजीपणाने ट्रक चालवून तक्रारदार यांचे पतीचे मोटार सायकलला जोरात धडक दिली. तक्रारदार यांचे पती यांचे डोक्यास गंभीर जखम होऊन ते घटनास्थळावर मृत झाले. सदरील अपघाता बाबत खबर अंबाजोगाई पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व तक्रारदार यांचे पतीचे प्रेत शवविच्छेदनसाठी पाठविले. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते त्यांचे नांवे मौजे राडी येथे गट क्र.55 ही शेत जमिन नोंदलेली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा शेतकरी वैयक्ती अपघात विमा सामनेवाले क्र.2 यांचेकडे काढलेला आहे. विमा रक्कम मिळण्याची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत ब्रोकर विमा कंपनी करतात. तक्रारदार यांनी मयत शमशोद्यीन यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई यांचेमार्फत सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे रितसर क्लेम दाखल केला. क्लेम सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे हजर केली. मयत शमशोद्यीन यांचे अपघाती मृत्यू हा पॉलिसी कालावधीत झालेला आहे. तक्रारदार हया मयत शमशोद्यीन यांच्या कायदेशीर वारस असून त्या शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम कोणत्याही संयूक्तीक कारणाशिवाय नाकारला आहे. सबब, तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल ेली आहे. तक्रारदार यांनी अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.2 विमा कंपनी यांचेकडून शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रास याबददल नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.8 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, ते मध्यस्थ म्हणून काम करतात. कृषी अधिका-याकून आलेला क्लेमची छाननी करुन, कागदपत्राची पूर्तता करुन घेऊन क्लेम विमा कंपनीकडे पाठवितात. तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.12 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हया ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी विमा पॉलिसीची कोणतीही रक्कम भरलेली नाही. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी आवश्यक ते दस्ताऐवज पाठविले नाही. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी नि.9 अन्वये आपले लेखी म्हणणे हजर केले. सामनेवाले क्र.3 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचे पती अपघातात मयत झाल्यानंतर त्यांनी विमा रककम मिळणेकामी तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत दि.18.10.2012 रोजी क्लेम दाखल केला. सदरील अर्ज सामनेवाले क्र.1 डेक्कन इन्शुरन्स यांचेकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.7 अन्वये दस्त हजर केले. ज्यामध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याचा फॉर्म, सामनेवाले क्र.3 यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे क्लेम पाठविल्या बाबत पत्र, क्लेम कामी आवश्यक ते सर्व दस्त, पोलिस पेपर, शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे. तक्रारदार यांनी त्यांचे शपथपत्र नि.19 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेला पुरावा यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री. पावसे यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 व 3 हे यूक्तीवादाचे वेळी गैरहजर, सामनेवाले क्र.2 विमा कंपनी यांचे वकील श्री.साळवे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत
त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय होय.
2. तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम
मिळण्यास पात्र आहेत काय होय.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री. साळवे यांनी या मंचाचे लक्ष नि.20 सोबत दाखल केलेल्या दस्तावर वेधले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले मयत शमशोद्यीन यांचे शवविच्छेदन अहवाल यावर वेधले. सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री. साळवे यांनी असा यूक्तीवाद केला की, शमशोद्यीन हे अपघातात मयत झाले. त्यांचे रक्ताचे नमूने घेण्यात आले. रक्त तपासणीचा अहवाल या मंचासमोर हजर केलेला नाही. त्यांनी पूढे असा यूक्तीवाद केला की, मयत हे दारु पिऊन गाडी चालवित होते. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी असा युक्तीवाद केला की, शवविच्छेदन अहवालामध्ये कूठेही मयत हे दारु पिलेले होते या बाबत उल्लेख केलेला नाही. तसेच व्हिसेरा ही राखून ठेवण्याल आलेला नाही. केवळ रक्त तपासणीसाठी काढून ठेवले यावरुन मयत हे दारु पिऊन गाडी होते असा निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुनही सामनेवाले क्र.2 यांनी क्लेम कोणत्याही संयूक्तीक कारणाशिवाय प्रलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत सामनेवाले क्र.2 यांनी त्रूटी ठेवली आहे.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला व सामनेवाले क्र.2 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे यांचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी निवेदन नि.12 मध्ये कूठेही मयत हे दारु पिऊर गाडी चालवित होते व तसेच मयत यांचे रक्त तपासणीसाठी पाठविले होते व त्या बाबत कागदपत्र तक्रारदार यांनी सादर केले नाही यांचा उल्लेख आढळून येत नाही.
या मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेले सर्व दस्त यांचे अवलोकन केले. प्रामुख्याने मयत शमशोद्यीन यांचा शवविच्छेदन अहवालातील अनुक्रमांक 21 चे अवलोकन केले. मयत यांचे पोटामध्ये कोणत्याही प्रकारचे दारुजन्य पदार्थाचा वास आढळून आला नाही. शवविच्छेदना मध्ये मयत हा दारु प्यायलेला असावा या बाबत कूठेही उल्लेख नाही. मयत शमशोद्यीन यांना अपघातामध्ये गंभीर जखम झाली व त्या जखमे मुळे मयत झाला ही बाब सिध्द होते. मयत शमशोद्यीन हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे मौजे राडी येथे गट क्र.55 ही शेत जमिन नोदलेली होती. मयत यांचे रस्ता अपघातात मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने शेतक-यासाठी कल्याणकारी योजने अंतर्गत शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सूरु केली आहे व त्यांचा हप्ता सामनेवाले क्र.2 यांचेकडे भरलेला आहे. मयत शमशेद्यीन यांचा मृत्यू विमा कालावधीत झालेला आहे. तक्रारदार हया मयत शमशोद्यीन यांच्या पत्नी आहेत. तक्रारदार हया शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेच्या लाभार्थी असून त्या विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक