निकाल
दिनांक- 11.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार शिवमाला शंकर बडे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत सेवा देण्यास कसूर केला म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार यांचे पती शंकर श्रीरंग बडे हे ऊस तूटून कारखान्याला गेल्यामूळे ऊसाच्या फडातील पाचट जाळीत असताना पाचट पेटून दिल्यानंतर त्यांचा धूर झाला, तो धूर तक्रारदाराचे पती शंकर यांचे डोळयात गेला. आग विझवत असताना ते जाळात पडले व गंभीर भाजले. डॉक्टरांकडे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू दि.21.04.2012 रोजी झाला. सदरील घटनेची माहीती दिंदूड पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन घटनेचा पंचनामा केला व पूढील तपास केला. तक्रारदार यांचे पती नांवे मौजे देवदहिफळ या गांवी शेत जमिन नोंदलेली आहे. ते व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतक-याकरिता शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने सूरु केली आहे व प्रत्येक शेतक-यांचा विमा काढला आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळणेकामी कार्यवाही तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत बोकर विमा कंपनी यांचेकडे क्लेम पाठविला जातो व तो क्लेम विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविला जातो. तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी धारुर यांचेमार्फत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम व आवश्यक ते सर्व दस्त सामनेवाले क्र. 1 मार्फत सामनेवाले क्र. 2 यांचेकडे पाठविले. विमा पॉलिसी सूरु झाल्याचे कालावधीत शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनीस प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याचे आंत त्यावर निर्णय घेणे बंधरकारक आहे. तक्रारदार यांनी क्लेम दाखल करुनही सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला नाही. सामनेवाले यांनी दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी विमा रक्कम रु.1.00,000/- त्यावरील व्याज व मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व दाव्याचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र. 1 डेक्कन इन्शूरन्स ब्रोकर लि. हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.7 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र. 1 यांचे कथन की, ते सेवा पूरविण्याचे काम करतात ते विमा कंपनी कडे मध्यस्थ म्हणून मर्यादित कात करतात. सामनेवाले क्र. 1 हे कोणत्याही प्रकारची फि अथवा आर्थिक मदत घेत नाहीत. सामनेवाले क्र. 1 यांना प्राप्त झालेला प्रस्तावाची छाननी करुन विमाक कंपनीस पाठविण्याचे काम करतात. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. सबब, त्यांचे विरुध्दची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र. 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.11 अन्वये आपले लेखीइ कैफियत सादर केली. सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांनी नमूद केलेल्या सर्व बाबी स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला आहे व त्या बाबत पत्र दि.25.2.2012 रोजी तक्रारदार यांना पाठविले आहे. सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मृत्यूचे कारण मयाताचा घेतलेला मृत्यूपूर्व जवाब, यामध्ये नमूद केलेल्या बाबीच्या कारणास्तव नाकारला आहे. मयत शेतकरी शेतात काम करीत असताना त्यांला गंभीर हदयविकाराचा झटका आला त्यामुळे तो खाली व त्यामुळे 35 टक्के भाजला गेला. मृत्यूचे कारण मयताला गंभीर हदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला आहे. मयताचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. सदरील बाब पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
सामनेवाले क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांना नोटीस प्राप्त झाली ते या मंचासमोर हजर झाले नाही, सबब त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांनी नि.4 सोबत क्लेम फॉर्म, 8-अ, 7/12 चा उतारा, फेरफार नोंद, गान नमूना 6-क, बँक पासबूक, प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र, खबर, घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय प्रमाणपत्र हजर केले आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.16 वर दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि-8 वर दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि.12 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त व शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री.वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मूददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजने अंतर्गत तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रूटी
ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय होय.
2. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत
लाभ मिळण्यास पात्र आहेत काय होय.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांचे वकील श्री. पावसे यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती शंकर हे शेतामध्ये काम करीत होते. ऊसाचे फडातील पाचट ते जाळीत असताना त्यांचा धूर झाला व तो धूर त्यांचे डोळयात गेला. ते जाळ विझवत असताना ते जाळात पडले व गंभीररित्या भाजले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 2 यांचेकडे संपूर्ण कागदपत्रासह सामनेवाले क्र. 3 मार्फत क्लेम पाठविला. सामनेवाले यांनी कोणत्याही संयूक्तीक कारणाशिवाय तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे व सबब तक्रारदार यांची तक्रार मंजर करण्यात यावी.
सामनेवाले क्र. 2 यांचे वकील श्री. वाघमारे यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू तिव्र हदयविकाराचा झटका आला आहे. मृत्यू हा नैसर्गिक कारणामुळे झालेला आहे. सदरील बाब विमा कंपनीच्या अटीमध्ये बसत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम संयूक्तीक व योग्य कारणासाठी नाकारला आहे. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले पोलिस पेपरचे अवलोकन केले. पोलिसांनी मयत शंकर यांचा जवाब दि.15.2.2012 रोजी नोंदविला. त्यात असे नमूद केले आहे की, दि.8.2.2012 रोजी त्यांचे शेतातील ऊस तूटून कारखान्याला गेला. त्यांने ऊसाचे पाचट पेटविले त्यावेळी त्यांला चक्कर आली व तो तेथे पडला. त्यांचे दोन्ही पाय, मांडया भाजल्या गेल्या. डॉक्टरांनी प्रमाणित केलेल्या मृत्यूच्या कारणाचा उतारा पाहिला असता तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू टर्मीनल कारडिओमेर्टी अॅटक तसेच 35 टक्के डिप बर्न इज्यूरी यामुळे झाला आहे असे नमूद केलेले आहे. सामनेवाले यांनी त्यांचे यूक्तीवादामध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा हदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. सदरील बाब सिध्द करण्यासाठी या मंचासमोर वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नाही. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते ते शेतीत काम करीत असताना चक्कर येऊन पडले. त्यावेळेस पेटवलेल्या ऊसाच्या जाळामूळे ते भाजून गंभीर जखमी झाले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्राचे अवलोकन केल्यानंतर या मंचाचे मत की, तक्रारदार यांचे पती हे शेतात काम करीत असताना चक्कर येऊन पडले व भाजून जखमा झाल्यामुळे मयत झालेले आहेत. सदरील घटना ही अपघाताने झाल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासानाने शेतक-यासाठी कल्याणकारी योजने अंतर्गत शेतक-यांचा मृत्यू झाल्यास सामनेवाले क्र.2 यांचेकडे विमा काढला आहे. सबब, सामनेवाले क्र. 2 हे तक्रारदार यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक