निशाणी क्रं.१ वरील आदेश
निकाल दिनांक – २६/११/२०१९
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
__________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, सामनेवाले विद्युत कंपनीच्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण झाले असल्याने तक्रारदाराच्या शेताता आग पसरली व त्यात नुकसान झाले. त्या संदर्भात दिनांक ०१-०४-२०१९ रोजी नगर पोलीस स्टेशनला लेखी खबर देण्यात आली व त्याप्रमाणे पंचनामा करण्यात आला व नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवालेकडे अर्ज करण्यात आला होता. परंतु त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही व दुर्लक्ष केले, त्यामुळे सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.
३. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र व कागदपत्रांची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, विद्युत निरीक्षक, विद्युतनिरीक्षण विभाग, अहमदनगर यांनी अभिप्रायाचे पत्र दिलेले आहे. सदर पत्राची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सदर अपघात केंद्रीय प्राधिकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय) विनियम २०१० च्या नियम क्र.१२ आणि भारतीय वीज अधिनियम, २००३ कलम क्रमांक १३५ चे उल्लंघन झालेले आहे.
४. मा.सर्वोच्च न्यायालय यांचा यु.पी. पावर कार्पोरेशन विरूध्द अनीस अहमद या न्यायनिवाड्यानुसार कलम १३५ भारतीय वीज अधिनियम, २००३ असलेला वाद विषयी ग्राहक मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र या मंचाला नाही. म्हणुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आ दे श
१) सदर तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र मंचाला नसल्याने तक्रारदाराची तक्रार नस्तीबध्द करण्यात येते. २) तक्रारदार यांना योग्य न्यायालयात दाद मागण्याची परवानगी देण्यात येत आहे. ३) तक्रारदार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. ४) या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी. ५) तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |