Maharashtra

Bhandara

CC/20/78

सकुबाई गोमा डोंगरवार - Complainant(s)

Versus

तालुका कृषी अधिकारी - Opp.Party(s)

श्री. अमोल. ए. भुजाडे

08 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/78
( Date of Filing : 07 Sep 2020 )
 
1. सकुबाई गोमा डोंगरवार
रा. घानोड ता.साकोली. जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. तालुका कृषी अधिकारी
साकोली. भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी. जिल्‍हा परिषद. भंडारा
भडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
3. बजाज कॅपिटल इन्‍शुरन्‍स लि.
बजाज हाउस 97. नेहरु पॅलेस नवी दिल्‍ली ११००१९ मार्फत स्‍थनिय शाखा ब्‍लॉक ४.५ पूूूनम चेम्‍बर. सदर बाजार. नागपूर. ४४०००१
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Jul 2022
Final Order / Judgement

         (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                        (पारीत दिनांक- 08 जुलै, 2022)

    

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्‍या कलम-35 खाली विरुध्‍दपक्ष  क्रं 4 नॅशनल   इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर  यांचे विरुध्‍द  तिचे मृतक पतीचे  अपघाती मृत्‍यू संबधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-   

 

     तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे ती मृतक शेतकरी श्री गोमा मुकूंदा डोंगरवार याची पत्‍नी असून त्‍यांना अशोक, राधेश्‍याम आणि प्रिया ही अपत्‍ये असून ते सर्व वयस्‍क आहेत आणि  त्‍यांची लग्‍ने झालेली आहेत. तिचे पतीचे नावे मौजा घानोड, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा येथील तलाठी साझा क्रं 13,                
गट क्रं-238, 338-अ, 338-ब व 359 शेती होती. तिचा पती श्री गोमा मुकूंदा डोंगरवार हा दिनांक-20.07.2016 रोजी सायंकाळी अंदाजे-4.30 वाजता त्‍याची टीव्‍हीएस एक्‍सल सुपर कंपनीच्‍या मोटर सायकल क्रं- महा.-35/ई-8749 ने जात असताना घानोड येथील प्रवेश व्‍दारा समोरील डांबरी रोडवर संतुलन गेल्‍याने रस्‍त्‍यावर पडला त्‍यामुळे त्‍याचे डोक्‍याला गंभिर दुखापत आणि शारीरीक जखमा झाल्‍यात, त्‍याला त्‍याचा लहान भाऊ पूजाराम याने अॅम्‍ब्‍युलन्‍सने सरकारी दवाखाना साकोली येथे नेले असता तेथील डॉक्‍टरांचे  सांगण्‍या वरुन जिल्‍हा रुग्‍णालय, भंडारा येथे आणले असता त्‍याचा  दिनांक-21.07.2016 रोजी मृत्‍यू झाला. पोलीस स्‍टेशन साकोली येथे एफ.आय.आर. नोंदविण्‍यात आला. पोलीसांनी घटनास्‍थळ पंचनामा आणि मरणान्‍वेषन अहवाल नोंदविला.

 

      तिने पुढे असे नमुद केले की, पतीचे मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रितसर विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1  तालुका कृषी अधिकारी साकोली यांचे कडे  दिनांक-06.12.2016  रोजी दाखल केला होता. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी असून त्‍यांचे मार्फतीने विमा दावा स्विकारल्‍या जातो आणि पुढे तो विरुध्‍दपक्ष क्रं 3  विमा सल्‍लागार कंपनीकडे  सादर केल्‍या जातो आणि त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीकडे विमा दावा निश्‍चीतीसाठी पाठविल्‍या जातो. विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका  कृषी अधिकारी यांनी दिनांक-06.03.2017 रोजीचे तिचे नावाचे पत्रान्‍वये मृतकाचे चालक परवान्‍याची मागणी केली होती परंतु तक्रारकर्तीने जिल्‍हा कृषी अधिकारी, भंडारा येथील दिनांक-03.03.2017 रोजीचे कॅम्‍प मध्‍ये तिचे मृतक पतीचे चालक परवान्‍याची प्रत विमा कंपनीचे प्रतिनिधी जवळ दिली होती. असे असताना विरुध्‍दपक्ष क्र 4 नॅशनल इन्‍शुरन्‍स  कंपनीने दिनांक-28.07.2017 रोजीचे पत्र तिचे नावाने पाठवून  त्‍याव्‍दारे  तिचा विमा  दावा वैध वाहन  परवाना नसल्‍याचे  कारणा वरुन नामंजूर केला. तिने जिल्‍हा ग्राहक आयोगा  समक्ष तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब माफ व्‍हावा यासाठी वेगळा अर्ज दाखल केलेला आहे. म्‍हणून तिने  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-  

 

 

  1. तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू मुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर मृत्‍यू दिनांका पासून ते तक्रारीचा निकाल लागे पर्यंत  द.सा.द.शे.12 टक्‍के दराने व्‍याज यासह रक्‍कम देण्‍याचे विरुध्‍दपक्षांना आदेशित व्‍हावे.

 

 

  1. सदर तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षां कडून मिळावा

 

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, साकोली, तालुका साकोली,  जिल्‍हा भंडारा यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्ती ही मृतक श्री गोमा मुकूंदा डोंगरवार याची विवाहित पत्‍नी असून त्‍यांचे भूमापन क्रं-238, 338/अ व 359 शेत असून ते शेतीचा व्‍यवसाय करतात ही बाब मान्‍य केली. मृतकाचा अपघात दिनांक-20.07.2016 रोजी झालेला असून अपघाती मृत्‍यू दिनांक-21.07.2016 रोजी झाला असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभाची रक्‍कम मिळण्‍या करीता त्‍यांचे कार्यालयात  दिनाक-06.12.2016  रोजी विमा दावा दाखल केला होता  आणि त्‍यांनी  त्‍यांचे वरिष्‍ठ कार्यालय जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात पत्र क्रं-1354 अन्‍वये  दिनांक-06.12.2016  रोजी  विमा दावा सादर केला होता. अशाप्रकारे त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य विना विलंब पार पाडले असून कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीस दिली नाही असे नमुद केले.

 

 

04   विरुध्‍दपक्ष क्रं 2 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्ती ही मृतक श्री गोमा मुकूंदा डोंगरवार याची विवाहित पत्‍नी असून त्‍यांना दोन अपत्‍ये आहेत.  त्‍यांचे भूमापन क्रं-238, 338/अ व 359 शेत असून ते शेतीचा व्‍यवसाय करतात ही बाब मान्‍य केली. तालुका कृषी अधिकारी साकोली यांचे कडून त्‍यांना तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-06.12.2016 रोजी प्राप्‍त झाला असता त्‍यांनी कोणताही विलंब न लावता सदर विमा दावा प्रस्‍ताव  नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूर यांचे कडे दिनांक-06.12.2016 रोजी पाठविला. विमा दावा प्रस्‍ताव मंजूर  करणे वा  नामंजूर  करणे  ही त्‍यांचे अधिकारातील बाब नाही असे नमुद केले.

 

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 बजाज कॅपीटल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांना ई मेल व्‍दारे  दिनांक-06.04.2021 रोजी नोटीस तामील झाल्‍या बाबतचा पुरावा त.क. यांचे वकीलांनी प्रकरणात दाखल केला, परंतु अशी नोटीस तामील होऊनही ते गैरहजर असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे तक्रारी मध्‍ये दिनांक-03.01.2022 रोजी पारीत करण्‍यात आला.

 

 

06.   विरुध्‍दपक्ष क्रं 4  नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा भंडारा तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी असे नमुद केले की,  सदर प्रकरणात अपघात हा दिनांक-20.07.2016 रोजी झालेला आहे आणि तालुका कृषी अधिकारी साकोली,जिल्‍हा भंडारा यांनी तक्रारकर्तीला दिनांक-06.03.2017  रोजी पत्र लिहून  स्‍पष्‍ट नमुद केले होते की,  आपण पत्र मिळताच त्‍वरीत  मृतकाचा  वाहन परवाना विमा कंपनीचे  कार्यालयात दाखल  करावा सदर परवाना  दाखल न केल्‍यास विमा दावा नामंजूर झाल्‍यास  ते जबाबदार राहणार नाहीत तरी सुध्‍दा तक्रारकर्तीने वाहन परवाना विमा कंपनीकडे  सादर केला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा   कंपनीने  तालुका कृषी  अधिकारी  यांचेकडे  दिनांक-25.04.2017 रोजी पाठविलेल्‍या पत्रान्‍वये मृतकाचे वाहन परवान्‍याची  प्रत  मागितली होती  परंतु तालुका कृषी अधिकारी  यांनी वाहन परवाना प्रत पाठविली नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने दिनांक-28.07.2017 रोजीचे पत्राव्‍दारे तक्रारकर्तीचा विमा दावा  अपघाताचे वेळी  मृतका जवळ वैध परवाना नव्‍हता या कारणा वरुन नामंजूर केला होता ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1  तालुका कृषी अधिकारी यांना कळविली होती त्‍यामुळे विमा दावा नामंजूरीचे दिनांका पासून  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक  आयोगा समक्ष दोन वर्षाचे आत म्‍हणजे  दिनांक-28.07.2019 पर्यंत दाखल करावयास  हवी   होती परंतु  प्रस्‍तुत  तक्रार ही 07 महिने व 26 दिवस विलंबाने दाखल केलेली असल्‍याने ती मुदतबाहय असल्‍याचे  कारणावरुन  खारीज करण्‍यात यावी . मृतका जवळ  अपघाताचे वेळी वैध चालक परवाना नसल्‍यामुळे  विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचे उल्‍लंघन झालेले असल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी. सबब विमा कंपनीने कोणतीही  दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे नमुद केले.

 

 

07.   तक्रारकर्तीची तक्रार, शपथे वरील पुरावा व दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्षांची लेखी उत्‍तरे आणि लेखी युक्‍तीवाद  व मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे याचे अवलोकन करण्‍यात आले तसेच तक्रारकर्ती तर्फे अधिवक्‍ता श्री अमोल भुजाडे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 नॅशनल इन्‍शुरन्‍स  कंपनी तर्फे अधिवक्‍ता कु. दलाल यांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्‍यायनिवारणार्थ उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

सदर तक्रार मुदतीमध्‍ये आहे काय?

-होय-

2

शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मृतकाचा विमा दावा नाकारुन विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कपंनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

3

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

मुद्दा क्रं 1 ते क्रं 3 बाबत-

 

 

08.   विरुध्‍दपक्ष क्रं 4 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीचे लेखी  उत्‍तरा प्रमाणे  त्‍यांनी दिनांक-28.07.2017 रोजीचे पत्र विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांना देऊन तक्रारकर्तीचा विमा दावा  नाकारला असल्‍याचे कळविले. प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-07.09.2020 रोजी दाखल आहे. विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने दिनांक-28.07.2017 रोजीचे पत्राव्‍दारे तक्रारकर्तीचा  विमा दावा  अपघाताचे वेळी  मृतका जवळ वैध परवाना नव्‍हता या कारणा वरुन नामंजूर केला होता त्‍यामुळे विमा दावा नामंजूरीचे दिनांका पासून  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दोन वर्षाचे आत म्‍हणजे  दिनांक-28.07.2019 पर्यंत दाखल करावयास  हवी होती विरुध्‍दपक्ष क्रं 4 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्तीने  प्रस्‍तुत  तक्रार ही 07 महिने व 26 दिवस विलंबाने दाखल केलेली  असल्‍याने ती मुदतबाहय असल्‍याचे  कारणावरुन  खारीज करण्‍यात यावी.

 

  

09.   या संदर्भात तक्रारकर्तीने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेल्‍या विलंब माफीचे अर्जात ती वयोवृध्‍द असून सतत आजारी असते या कथनाचे पुराव्‍यार्थ तिने दिनांक-25.07.2019 ते 23.03.2020 या कालावधीचे नाफडे नर्सींग होम, साकोली, जिल्‍हा भंडारा येथील डॉक्‍टरांनी निर्गमित केलेले  वैद्दकीय प्रमाणपत्र सुध्‍दा दाखल केलेले आहे करीता तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब माफ व्‍हावा अशी विनंती केलेली आहे. तक्रारकर्ती ग्रामीण भागातील अशिक्षीत स्‍त्री आहे  आणि  ती एक वयोवृध्‍द स्‍त्री असून आजारी असते व तिने पुराव्‍यार्थ वैद्दकीय  प्रमाणपत्र सुध्‍दा दाखल केलेले आहे त्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे माफ करण्‍यात येतो.

 

 

तक्रारकर्तीला जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यास झालेल्‍या विलंबा बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे मा. राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र मुंबई यांचे खालील नमुद निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

“THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD.-VERSUS-SMT.VANITA PATIL”-FIRST APPEAL NO.-1559 OF 2008,ORDER DATED-17/12/2009

 

      या प्रकरणात तक्रार दाखल करण्‍यास झालेला 04 वर्षाचा विलंब माफ करण्‍यात आला होता आणि त्‍यावर कारण देताना असे नमुद केले होते की, विमा योजनेचे लाभार्थी हे ग्रामीण भागातील असल्‍यामुळे आणि त्‍यांना या विमा योजने संबधीची माहिती असण्‍याची शक्‍यता नसावी म्‍हणून ते मुदतीमध्‍ये तक्रार दाखल करु शकले नाही.

 

       आमचे समोरील हातीतील प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्ती ही एक  ग्रामीण भागातील राहणारी असल्‍याने तिला कायदेशीर बाबींची कल्‍पना नाही तसेच ती वयोवृध्‍द असून आजारी होती त्‍यामुळे तिला जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करण्‍यास  उशिर झालेला आहे परंतु तिची परिस्थिती लक्षात घेता प्रस्‍तुत  तक्रार मुदतबाहय आहे असे ठरविता येणार नाही.

 

 

10.   दिनांक-04 डिसेंबर, 2009 रोजीचे महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार जर शेतक-याचा मृत्‍यू अपघाता मुळे झाला असेल आणि अपघातग्रस्‍त  शेतकरी स्‍वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालक परवाना सादर करणे आवश्‍यक राहिल असे नमुद केलेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीने  त्‍यांचे दिनांक-28.07.2017 रोजीचे पत्रान्‍वये मृतक शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना नव्‍हता या कारणासाठी तक्रारकर्तीचा  विमा दावा नामंजूर केलेला आहे. पोलीस निरिक्षक,पोलीस स्‍टेशन, साकोली  यांनी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. मध्‍ये मृतक हा मोटर सायकल भरधाव वेगात चालवित असल्‍याने डांबरी रस्‍त्‍यावर पडून  त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे नमुद केलेले आहे परंतु केवळ पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. वरुन अपघाताचे वेळी मृतक हा भरधाव वेगाने मोटरसायकल चालवित  होता ही बाब सिध्‍द होत नाही याचे कारण असे आहे की, पोलीसां कडून पंचनामा हा त्‍यांना वेळेवर मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे तयार केलेला असतो परंतु सदर माहिती विश्‍वासार्ह आहे किंवा नाही हे तपासून पाहण्‍यासाठी साक्षीदाराची सखोल तपासणी  न्‍यायालया मध्‍ये होणे आवश्‍यक असते. या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालांचा आधार घेण्‍यात येतो-

 

  1. 2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.

        सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case” पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.

         

 

  1.   2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”

     सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

 

 

 

  1.  Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011-“United India Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sumanbai Rangrao Mugal and others”

 

        मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी आदेशा मध्‍ये  स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्‍यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्‍हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाहीजेणे करुन ही बाब सिध्‍द होईल की, मृतकाने आत्‍महत्‍या केलेली आहे.

 

     हातातील प्रकरणात  केवळ पोलीसांनी एफ.आय.आर. मध्‍ये नमुद केले की, मृतक हा अपघाती  घटनेच्‍या वेळी त्‍याची मोटरसायकल भरधाव वेगाने  चालवित होता ही बाब सिध्‍द होत नाही, त्‍यासाठी प्रत्‍यक्षदर्शी सखोल पुराव्‍याची गरज असते.

 

 

11.    मृतका जवळ अपघाताचे वेळी वैध चालक परवाना नव्‍हता या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील  मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्‍या निवाडयावर ठेवली-

 

  1.    WRIT PETITON NO.-2420 OF 2018-BHAGUBAI DEVIDAS JAVLE-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER

 

 

    सदर निवाडयात मा. उच्‍च न्‍यायालयाने शेतकरी अपघात विमा  योजना ही मृतक शेतक-यांच्‍या वारसदारांना नुकसान भरपाई देण्‍यात यावी यासाठी सुरु केलेली आहे. एफ.आय.आर. वरुन असे दिसून येते की, वाहन चालविण्‍या-या शेतक-या विरुध्‍द तो वाहन चालक परवाना नसताना वाहन चालवित होता असा कोणताही गुन्‍हा नोंद केलेला नाही. प्रथम दर्शनी असे दिसून येते की, महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्‍त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्‍याचा निष्‍कर्ष मा. उच्‍च न्‍यायालयाने काढला. कारण ही योजना सामाजिक दायीत्‍वाचे तत्‍वावर शासनाने तयार केलेली आहे.

 

 

  त.क.चे वकील श्री अमोल भुजाडे यांनी आपली भिस्‍त मा. उच्‍च न्‍यायालयाचे खालील निवाडयावर ठेवली-

 

  1.    WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER Order Dated-06/03/2019

 

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, मृतक शेतक-याची मोटर सायकल ही रस्‍त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला सापडली आणि मृतक शेतक-याच्‍या दोषामुळे अपघात झाला होता असे कुठेही दस्‍तऐवजा मध्‍ये नमुद नाही. सदर योजने मध्‍ये वारसदारास मृतकाचे वाहन चालक परवान्‍याची प्रत दाखल करणे आवश्‍यक असल्‍याचे कुठेही दिसून येत नाही असे नमुद केले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणणे आहे की, विमा शर्तीचे अटी व शर्तीचा भंग झाला तर ते सिध्‍द करण्‍याची जबाबदार विरुध्‍दप्क्ष विमा कंपनीची असल्‍याचे नमुद केले.

 

 

 

  1.       HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 1126 OF 2019 DATE OF ORDER -05/10/2021- “THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD.-VERSUS-SMT.GANGUBAI VISHNU SHINDE & OTHERS”

 

       सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍ट नमुद केले की, पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफ.आय.आर. वरुन आणि पोलीस दस्‍तऐवजावरुन असे दिसून येते की, जो काही अपघात झालेला आहे तो अज्ञात वाहनचालकाने दोषपूर्ण वाहन चालविल्‍यामुळे झालेला आहे. महाराष्‍ट्र शासनाचे  दिनांक-04.12.2009 चे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्‍त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्‍याचा निष्‍कर्ष मा. राज्‍य ग्राहक आयोगाने काढला.

 

 

  1.       HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 200 OF 2018 DATE OF ORDER -27/09/2021- THE NATIONAL INSURANCE COMPANY-VERSUS-SUNDHUBAI HAMBIRRAO NAGNE & OTHERS.

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍टपणे नमुद केले की, जो काही अपघात झालेला आहे तो मृतक शेतक-याजवळ वैध चालक परवाना नव्‍हता या कारणामुळे झालेला नाही  तसेच सदर निवाडया मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पुढील निवाडयावर भिस्‍त ठेवली-  In the
case in hand it is quite apparent that, the accident is not occurred for want of valid license of the deceased. Not having license is not the cause of accident. Hence , the complainant rightly relied upon the Judgement of Hon’ble Apex Court in 2004 (5) ALL MR (SC) 251 (Supreme Court) in National Insurance 
Company Ltd.-Vs. Swaran Singh stated Supra. But the accident occurred due to the fault on the part of driver of offending vehicle and the offence is also registered against him. Therefore, in the case in hand repudiating the claim on the ground that, the driver was not having valid and effective driving license at the time of accident, amounts to deficiency in service on the part of opponent Insurance Company.

 

     आमचे समोरील हातातील प्रकरणात मृतक मोटर सायकल चालवित असताना संतुलन बिघडल्‍याने रस्‍त्‍यावर पडून त्‍याचा अपघाती मृत्‍यू झालेला आहे.

 

 

  1.     HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 158  OF 2020 DATE OF ORDER -24/11/2021- THE ORIENTAL INSURANCE COMPANY-VERSUS-SMT. GAYABAI APPASAHEB JADHAV & OTHERS.

 

     सदर निवाडया मध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालयाचे WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER या निवाडयाचा आधार घेऊन पुढे नमुद केले की, Wherein the Hon’ble High Court observed that, there was nothing to infer that accident was occurred due to fault of deceased, and to reject the claim. Insurance Company has committed deficiency in service mistaken in rejecting claim. In view of the scheme introduced for benefit of farmers,  as seen in GR of 2009 is binding on the insurance company. This court hold that, compensation needs to be given to the petitioner and interest also to be paid, as provided in GR of 2009.

 

 

उपरोक्‍त नमुद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतात. त्‍यामुळे आम्‍ही असा निष्‍कर्ष काढीत आहोत की, विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा  विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

 

 

12.   आम्‍ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्‍यामध्‍ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्‍या आहेत, त्‍यामधील विमा दावा निकाली काढण्‍यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.

 

अक्रं-9 विमा कंपन्‍यांना सुस्‍पष्‍ट कारणां शिवाय विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्‍यांनी नामंजूर विमा दाव्‍या प्रकरणी सुस्‍पष्‍ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व  त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/आयुक्‍त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्‍ये नोंद घेणे अनिवार्य आहे.

 

 

अक्रं-10 विमा प्रस्‍तावात त्रुटी असल्‍यास  त्‍या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

 

अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्‍यावर पंधरा दिवसांच्‍या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्‍यथा तीन महिन्‍या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

 

अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्‍या पासून त्‍यावर 21 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्‍या प्रकरणी मंजूरी योग्‍य प्रस्‍ताव नाकारल्‍यास विमा सल्‍लागार कंपनीने शेतक-यांच्‍या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्‍यायाधीश/ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्‍यायालय येथे दावे दाखल करेल.

 

 

अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत  कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.

   

 

अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्‍त होणारे व संगणक प्रणाली मध्‍ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्‍या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्‍ताव सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.

 

   वरील प्रमाणे  शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्‍या आहेत.

 

 

 

13.     महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केल्‍यास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील असे स्‍पष्‍ट नमुद आहे. तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीने दिनांक-28.07.2017 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला.

 

 

14. सदर शासन परिपत्रका प्रमाणे तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयां प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीने तक्रारकर्तीस कायदेशीर बाबी संबधी कोणतीही शहानिशा न करता विनाकारण आज पर्यंत विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व 2 चे  उत्‍तर होकारार्थी आल्‍याने मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे  तक्रारकर्ती ही महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका प्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-28.07.2017 पासून  ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 15 टक्‍के व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे‍ जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

15.    या ठिकाणी जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे एक गोष्‍ट नमुद  करणे आवश्‍यक वाटते की, तक्रारकर्तीचा विमा दावा हा विरुध्‍दपक्षक्रं 4 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीचे नागपूर  कार्यालयाने नामंजूर  केलेला आहे आणि नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीची स्‍थानीक शाखा भंडारा असून तक्रारकर्ती ही भंडारा जिल्‍हयात राहते त्‍यामुळे नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीचे नागपूर कार्यालया मार्फत स्‍थानीक शाखा कार्यालय भंडारा यांना प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये प्रतिपक्ष  करणे ठिक  आहे  परंतु तक्रारकर्तीचे वकीलांनी  नॅशनल ईन्‍शुरन्‍स कंपनीचे मुख्‍य कार्यालय कोलकाता, पश्‍चीम बंगाल तसेच  नागपूर कार्यालय मार्फतीने  भंडारा शाखा कार्यालय यांना प्रतिपक्ष केलेले दिसून येते.

 

 

16.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 हे अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी साकोली आणि जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा असून त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 (I) ते 3 (III) बजाज कॅपीटल इन्‍शुरन्‍स लिमिटेड, नवि दिल्‍ली आणि शाखा कार्यालय नागपूर ही  विमा सल्‍लागार कंपनी असून त्‍यांचे  विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

17.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

 

                                                                     ::अंतिम आदेश::

 

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 4 नॅशनल  इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड कार्यालय धरमपेठ नागपूर तर्फे व्‍यवस्‍थापक मार्फत स्‍थानीक शाखा कार्यालय भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक,नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी भंडारा  यांचे विरुध्‍द  खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 4 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचा मृतक पती गोमा मुकूंदा डोंगरवार याचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-28.07.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

 

  1. तक्रारकर्तीला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 4 विमा कंपनीने तक्रारकर्तीला दयाव्‍यात.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2  अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी साकोली  आणि जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 3 (i) ते  (iii) बजाज कॅपीटल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड या विमा सल्‍लागार कंपनीने त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 4 नॅशनल  इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड कार्यालय धरमपेठ नागपूर तर्फे व्‍यवस्‍थापक मार्फत स्‍थानीक शाखा कार्यालय भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक,नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी भंडारा यांनी सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

 

  1. सर्व पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.